नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 31, 2022

सांज ..

ढळला सुर्य तो कणखर वृत्तीचा ..
आकाशाशी एकरूप झाला डोंगर माझ्या दुःखाचा ..

आशा ही मावळली , निराशा ही मावळली ..


सांज वेळ ही जणू माझ्यासाठी अवतरली ..

मला साद घालू लागली ..
ढळणाऱ्या सूर्या खाली मला निजवू लागली ..

" आज बाई तू सोड चिंता सारी ..
   मोकळा श्वास घे देवाच्या दारी .."
सांगू लागली ..

कणखर किती तो सुर्य तरीही ढळतो. 
मग का बर आपण दुःखापुढे नतमस्तक होतो .
मला विचारू लागली ..
दुर्गा मते

भाव जर दिला नाही ना तर , नाती तुटतील ..

काळ बदलला , वर्ष गेली..
पण मी नेहमी आपलेपणा जपत आनंदाने जगत राहिली ..
चूक नसतानाही अनेकदा स्वारी बोलले ..
दुरावलेली मने अनेकदा स्वखुशीने जोडले .

  हा लेख माझ्या आवडीचा विषय . मला नाती जोडायला आणि जोडलेली नाती जपायला खूप आवडत . मी एकदा माणसाला जवळ केलं ना की , अंतर देत नाही . नात्याला नाव असो नसो मला जोडलेलं प्रत्येक नातं खूप प्रिय असतं .

मी कुठलच नातं स्वार्थी पणाने जोडल नाही . हा भांडते ही खूप limits नाही . पण थोडी शांत झाले चूक कळली ना की खूप वाईट वाटत . लगेच पुढचा मागचा विचार न करता स्वारी बोलायला जाते .

थोडीशी अल्लड आहे . त्यामुळे चालत . सगळे चालून घेतात.  आणि कोणी नाही घेत. पण मी आहे तशीच आहे . बदलेल की नाही माहीत नाही . जाऊ दे मी डायरेक्ट विषयाला हात घालते .

  माझा आजचा विषय आहे ..

  '  भाव जर दिला नाही ना तर , नाती तुटतील '

आपण अनेकदा म्हणतो , " कशाला कोणाला भाव द्यायचा . समोरचा बोलला तर , बोलायचं समोरून कोणालाही बोलायला जायचं नाही ." पण खर तर , चुकीचं आहे . जो विचार सध्या आपण करत असेल , तोच same विचार जर समोरचा व्यक्ती ही करत असेल तर ? मग बोलणंच होणार नाही .

आपण वाट बघू त्याने आधी बोलण्याची तो वाट बघेल आपण आधी बोलण्याची मग काय बोलणं चं होणार साईड इफेक्ट काय होईल ? नातं क्लोज होईल . माणुसकी हळू हळू हरवत जाईल .

करेक्ट आहे का हे ? मला विचाराल तर बिलकुल नाही . नाती जर टिकवून ठेवायची असेल ना तर , थोडासा attitude बाजूला काढून ठेवावा लागेल . चूक नसताना ही अनेकदा स्वारी बोलण्याची सवय करून घ्यावी लागेल .
तरच कुठे नाती ही टिकतील . कोणाला हे जमेल कोणाला हे नाही जमणार . स्वभावावर dipend आहे ते .

ज्याला इगो महत्वाचा त्याला नाही जमणार आणि ज्याला नाती महत्वाची त्याला नक्की जमेल .

नसतील तुमच्याकडे माणसं जिवाभावाची ,
सुख दुःख हक्काने व्यक्त करण्यासाठी ..
मिळालेलं यश बघून पाठीवर शाब्बासकी देणारी .व्यक्ती
तर काय कामा चा तुमचा attitude इगो त्यापेक्षा तोच इगो आणि attitude बाजूला ठेवून नात्यांना जपणं केव्हाही चांगलं ..

हा लेख मी कोणाचेही मन व भावना दुखावण्याचा हेतू ने
लिहिलेला नाही . तरी ही कोणाच्याही भाव ना दुःखवल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागते ..
Written by - durga mate ..

माझं हास्य .

हास्य असतेच नेहमी चेहऱ्यावर फुललेले ..
जणू जन्मतःच वरदान ते मला भेटलेले ..

मी कितीही रडत असले ना ,

तरी क्षणात हसते ...

का रडत होतीस एवढा वेळ .

स्वतः लाचं विचारते .आणि पुन्हा हसते ..

माझ् हसण पण जगावेगळ्चं मनातल्या मनात ..

फुलते आणि विरगळते ते ही क्षणात.  

तुम्ही मला कधीही बघा.  

मी तुम्हाला खलखलून हसतांनाचं दिसेल ..
चेहऱ्यावर बारा वाजलेले कधीच नसेल ..

मला माझ्यातील सर्वात जास्त जी गोष्टी आवडत असेल ना ती म्हणजे माझी smile ..तिच्याशिवाय मी अपूर्ण च आहे ...ही कविता काल्पनिक बिलकुल नाही हे वास्तविक आहे ..


नाही करणार मेसेज ..

खूप मिस केलं तुला.
तू रिप्लाय नाही दिला मला ...

काही हरवल्या सारखं वाटतेय ..

जे कधीचं जवळ नव्हत ..तेच हरवलंय.  

का कुणास ठाऊक ?

आज खूप सून सून वाटतंय . 

तुझी खूप आठवण येतेय. 

तुझ्याशी बोलावंस पण वाटतंय.

पण आता ठरवल ..पुढचे चार दिवस तुला बिलकुल मसेज नाही करणार . 

शक्य नाही . पण अशक्य पण नाही. .

काल्पनिक रचना ..

Jan 30, 2022

तुझ्या पावलानी.

तुझ्या पावलानी घर जपले ..


कुशीत येता तू  , मी नव्याने जन्मले. 


   पाऊले तुझी जशी ..
   लक्ष्मीची चाऊल ..
    अगणी पडले पाऊल .
     झाले मी भाग्यवान ..
   
तुझ्यासाठी सोसल्या कळा ..

त्या कळ्या तूनी जन्मला .


आनंदाचा सोहळा...
पिकला जसा हिऱ्या मोत्याचा मळा .

     तुझ्या पावलानी घर जपले ..
     कुशीत येता तू मी नव्याने जन्मले ..
दुर्गा मते

ती पुन्हा जन्मते .

जेव्हा एक मूल जन्माला येते ..
तेव्हा एक स्त्री आई म्हणून जन्म घेते ..

आयुष्य तिचं तिच्या बाळासाठी पणाला लावते ..
स्त्रित्वाचे पांग फेडते ...

काय सांगू स्त्रित्वाची कीर्ती .


माया ममता ह्याची ती अजाण मूर्ती ..

गर्भात अंकुर वाढवते तिच्या प्रेमाचे ..
अंश ते साक्षीदार कित्येक गोड क्षणाचे ..

एक स्त्री जन्म बालकास देताना पुन्हा जन्मते ..
आईच्या रुपात साक्षात भगवंत श्री कृष्ण चं जणू अवतरते .
त्या बालकांचे संगोपन करते ..
सृष्टी निर्मिती पूर्ण करण्यास मदत करते ..
दुर्गा मते


सोनेरी आयुष्य माझे ..

उदरात तुला वाढते .
गर्भात तुला जपते .

तुझ्यासाठी मी रे नवा जन्म घेते .

सोनेरी आयुष्य माझे तुला दान करते ..


जशी चाहूल तुझ्या येण्याची .

तशी उमळते कळी माझ्या स्त्रित्वाची .


क्षण माझ्या आयुष्याचे ..

साक्षीदार होई तुझ्या जन्माचे ..


तुला जन्म देता देता ....

मी ही पूर्नजन्म घेते ..

तुझ्यासाठीच जगण्याचे स्वप्न वेडे बघते ..


Written by - durga mate 

Jan 29, 2022

गरज असते ..

जीवनात असते गरज सोबतीची ..
मग ती असो मैत्रीची किंवा प्रेमाची ..
    
    ती सोबत कला शिकवून जाते जगण्याची ..
    ती ओढ लावते जीवास गोड सहवासाची ..

प्रेमा पेक्षा मैत्री श्रेष्ठ मी मानते ..
प्रेमाला भवितव्य मिळेल ह्याची कल्पना नसते ..
मैत्रीचा शेवट होईल ह्याची भीतीच नसते ..

   जीवनात खरच गरज असते ..
   चांगल्या मैत्रीची निस्वार्थ प्रेमाची ..
    तिचं सोबत झुळूक घेऊन येते आनंदाची ..
    पहाट घेऊन येते कित्येक गोड क्षणाची ..
Written by - durga mate

Jan 28, 2022

कोणाची हमी घेता येत नाही ....

मी लोकांना वेळेपेक्षा वेगाने बदलताना पाहिले ,
मी लोकांना त्यांचे वर्षाचे नाते क्षणात तोडताना पाहिले ..

कारण फार काही मोठे नव्हते मन दुरवण्याचे ..

निव्वळ खेळ होते ते गैरसमजाचे ..

    एकमेकांचे ओघळणारे अश्रू झेळणारे ..
     एका ताटात भांडून हक्काने जेवणारे ..
    
अचानक एकमेकांवर पेटून उठले ..
मैत्रीने शत्रूत्वाचे रूप धारण केले ...

       खेळच हे नशिबाचे ,
        चुकले का कोणास आजवर ते ..
  
कोण कधी बदलेल सांगता येत नाही ..
आता तर कोणत्याच व्यक्तीची हमी घेता येत नाही ..
Durga mate.
©®

काल्पनिक रचना असे कितीतरी माणस आयुष्यात येतात.  ते मनात घर करुन राहतात . त्यांच्या चांगल्या स्वभावाने आपलं मन जिंकून घेतात .


तुला काय वाटतं ?

" तुला काय वाटतं ? मी सारखं सारखं तुला कॉल मेसेज करते म्हणजे , मला काही काम नाहीत . मी रिकाम टेकडी आहे का ? असं वाटतं असेल तर तो तुझा निव्वळ गैरसमज आहे . मी तुला एवढं महत्व देते कारण माझं स्वतः पेक्षा जास्त प्रेम आहे . तुझ्यावर . आपल नातं खूप इंपॉर्टन्ट आहे माझ्यासाठी ..स्वारी म्हणजे होतं . "

आता पर्यंत तिला ज्याच्यासाठी जगायचं होतं . ती त्याच्याशी बोलत होती . म्हणन्यापेक्षा ती त्याला त्याचा फायनल डिसिजन सांगत होती . मात्र तो मठपने तिच्यासमोर उभा राहून नुसत तिचे एक्स्प्रेशन न्याहलत होता. 

" तुला काहीच फरक पडत नाही का रे ? मी एवढी बोलतेय एवढा जीव जाळते य तुझ्यासाठी . काहीतरी बोल ना रे " अस म्हणत ती सारखी आक्रोश करत होती . पण तरीही त्याला काहीही फरक पडला नाही.  पण शेवटी तिचा आक्रोश एवढा वाढला त्याला ते आवडल नाही . त्यावर तो एवढंच बोलला ..

" मी तुला आधीच संगतीलेल होतं . मी मूड नुसार वागतो . माझा मूड असेल तर , बोलतो . हसतो . जेवतो खातो पितो . खुश राहतो . "

" तुझ्या मूड मध्ये मी कुठेच नाही का रे ? " ती कळलीने बोलली ..

" ते नाही माहीत मला .."

" हा ..तुला काहीही विचारल तरी तुला काहीच माहीत नसत . हे नेहमीच आहे तू ..mr.r.k नाती ही मुडवर नसती टिकतं . ती एकमेकांच्या भावना जपून टिकवावी लागतात . हेचं तुम्हाला आजपर्यंत कळलं नाही . आणि मला ही अशा एकदम खालचे विचार करणाऱ्या माणसाची प्रेयसी होण्यात काडीचा ही intres नाही . बाय कायमचं ."
असं म्हणत ती त्याला कायमची सोडून गेली .

जो मूड नुसार वागतो ना तो कधीच कोणालाही खुश नाही ठेवू शकत त्यामुळे त्याच्या पासून चार हात लांब रहीलेलेच बरं ..
दुर्गा mate
©®

Jan 27, 2022

तिची ..

हा विषय जरा सांभाळून लिहिते ...

लिहावस वाटतं नव्हत पण आज जे दृश्य पाहील ते आवडल नाही म्हणून लिहिते ..


तिची शिर्षक ही पूर्ण नाही दिलं . कारण स्पेशली त्त्या विषयावर  बोलायला मलाच आवडत . तिची मासिक पाळी .


महिन्यातून चार दिवस पाहुणी म्हणून येते . आणि पाचव्या दिवशी रिटर्न जाते . धार्मिक कार्यात आली तर मग तिची तिचं मासिक पाळी अडथळा बनते ..


एवढी का ओ वाईट ती ? प्रश्न सतत मनात येतो . उत्तर सापडता सापडता जीव थकतो . उत्तर मिळतच नाही .


आज पाहिलं मी एका बाईला मासिक आलेली होती . तर ती पंगतीत जेवायला बसली नाही . बाजूला बसली एकटीच आणि तेच मला खूप खटकल . मी त्यांना म्हंटल ही " अहो , एवढं काही मानायच नाही . पूर्वी चालायचं हे सगळ आता एवढं मानायच नाही . मी तरी बिलुकल मानत नाही "


तर त्या ह्यावर फक्त हसल्या लहान आहेस   . हळू हळू समज येईल असं बोलल्या . मला तर आवडलच नाही आणि कधी आवडणार पण नाही .


ती एक नैसरगिक देणं आहे .

स्त्रित्वाची शान आहे ..

मग तिचाच का असा विटाळ ? 


इथेच माझे शब्द संपले ..


हा लेख लिहिण्यामागे कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही

दुर्गा मते
©®

शोधतेय तुला

शोधतेय मी तुला ,
माझ्याच मौनात ..
आठवणींच्या हिंदोळ्यात ..

    शोधतेय मी तुला ..
    नभाच्या कुशीत ..
    कधीतरी माझ्याच ,
    डोळ्यांच्या ओलसर पापणीत ..

शोधतेय मी तुला ..
दाटून आलेल्या माझ्या हुंदक्यात ,
घालमेल झालेल्या हृदयात ..

     शोधतेय मी तुला ..
     हरवून बसलेल्या माझ्या विश्वात ..
      हरवलेल्या माझ्या श्वासात ..
Durga mate 
©®

इतक नको रे छळू मला

इतकही छळू नकोस मला ,
वेळ निघून जाण्याआधीचं सांगते तुला ..

   तुझ छळन तुलाच त्रास देईल .
    वेळोवळी जेव्हा आठवण माझी येईल ..

तुझ असच वागणं चालू राहिलं ,
थोड ही नाही बदललं .........

       तर मीच सोडून जाईल तुला ते ही कायमची ..
        कधीचं परत न येण्यासाठी ...........

विरहात तू रडशील ,
माझ्या  आठवणीत तडफडशील ..
जगणं तुझ तू हरवून बसशील .
श्वास घेणं सोडून देशील ...

    माझ्या आठवणींत झुरत राहशील ..
    माझ्या प्रेमाला मात्र कायमचा मुकशिल ...

आधीच सांगते तुला ..
इतकाही छळू नकोस मला ..
तुला सोडून जावं लागेल मला ..

काल्पनिक रचना ..
दुर्गा मते
©®

तू नाही ना सभोवताली ...

ताऱ्यानी भरलेले आकाश , बाजूला समुद्र किनारा ,
पण अपूर्ण आहे , तुझ्याशिवाय हा सुंदर नजारा ....

जरी ही चांदण्याची सुवर्ण रात ,
तरीही अपूर्णच प्रेमाची बरसात ..
नाही ना सख्या हातामध्ये तुझा हात ..

चंद्र तो नभातला रुसून बसला ,
चांदणीचा ह्या जीव सारा तुझ्या मध्ये होता अडकला ..

फुलांची उधळण तिने तूझसाठी होती केली ,
तरीही सुगंधाची अत्तरे नव्हती धरवळली ..
तू नव्हता ना सभोवताली ...

ताऱ्यानी भरलेले आकाश , बाजूला समुद्र किनारा ,
पण अपूर्ण आहे तुझ्याशिवाय हा सुंदर नजारा ..

Durga mate
©®

Jan 26, 2022

मनाची दुसरी बाजू ..

आज मी ह्या लेखा मध्ये मनाची दुसरी बाजू मांडणार आहे ....

मन शरीरातील एक अनमोल घटक . ज्याचं मन चांगलं तो सर्वांचा आवडता व्यक्ती असतो . माणूस दिसायला कसा ही असला तरी चालतो . फक्त त्याच मन चांगलं असायला हवं . असं आपण बोलता बोलता नेहमीच बोलून जातो . आज मी त्याचं मनाची दुसरी बाजू मांडणार आहे ..

" जे वैरी न चींती , ते मन चींती " ह्या वाक्य सर्वांनीच ऐकलेल असेल . आणि खरच ते खूप खरं आहे . खूप सत्यता आहे.  त्या वाक्यात . त्याला अनुसरूनच लिहिणार आहे मी आज . 

आपलं मन जितका चांगला विचार करतो ना , त्याच्या पेक्षा दुपटीत वाईट विचार करत असतो.  

नात्यात दुरावा किंवा गैरसमज निर्माण करण्याचं काम ही त्या मनाची नकारात्मक शक्तीच करत असतं.  मन हे कधी स्थिर राहत नाही.  सतत बदलत असतं . 

समोरचा थोडस मनावीरुद्ध वागायला लागला की , तो नावडता होतो . काही काळाने तोच जर मनासारखं वागायला लागला तर तोच व्यक्ती सर्वात जास्त आवडायला लागतो . 

कधी कधी मनात नसताना कळतं नकळत बरच काही घडून जातं . त्याला जबाबदार हे मन चं असतं . आपल्याच माणसांबद्दल ते क्षणात आपलेपणा निर्माण करत तर , क्षणात दुरावा निर्माण करत . हे मन हे ना खूपच वाईट कुठे असतं , ह्याचा शोध आज पर्यंत लागला नाही . आणि ते अस का असेल ह्याचा शोध तर लागुच शकत नाही ...
  

    थँक्यू ! 🙏🙏🙏🙏🙏🙏

पहिलं प्रेम आहेस तू ..

तू ते पहिले प्रेम आहेस ,
जे मी कधीच विसरणार नाही ..
तू अशी भावना आहेस ,
जी कधीही मिटणार नाही ..

तुला विसरण्याची ताकत नाही , रे माझ्यात ..

कारण हा वेडा जीव अडकलाय ना तुझ्यात ..


तू पहिलं प्रेम आहेस माझ ..

तुझ्या आधी आयुष्यात कोणी आलचं नव्हत ..

तुझ्या एवढं देणं महत्व ..

मला कोणाला जमलंच नव्हत ..

कारण तू पाहिलं प्रेम आहेस ना माझ ..
तू एक निशब्द भावना आहेस माझी ...
Written by -  durga mate

काल्पनिक रचना माझ्या वास्तवाशी संबधित नाही ..

नुसत म्हणायचं आम्ही शिवभक्त

नुसत आम्ही शिवभक्त म्हणून चालत नाही . तस वर्तन ही असावं लागतं . स्त्रियांच्या नादी लागणं त्यांना विनाकारण त्रास देणं ही कुठली शिव भक्ताची लक्षण आहेत .

पोलिस कंप्लीट करेन अशा वारंवार धमक्या देणं हे शिव भक्तांना शोभत का ? खरच शिवभक्त असाल ना , इथे लिपीवर दादागिरी करण्यापेक्षा रस्त्यावर दररोज  होणारे बलात्कार थांबवण्याचा प्रयत्न करा . किती तरी लोक अन्याय सहन करत आहे . त्या अन्याय सहन करणाऱ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याच बळ द्या .

आणि नुसतच टिव टिव काय करायची.  काही तरी अॅक्शन घ्या की , स्त्रियांच्या विरोधात पोलीस कंपिल्ट करन हे वाटत तितकं सोपं नक्कीच नाही.  हे ज्याला कळलं तो खरच ग्रेट ....

कंप्लीट करणारा मूर्ख असू शकतो , पण रिपोर्ट करणारा मूर्ख नक्कीच नसतो.  तो खूप ग्रेट असतो . तो कुठल्याही स्त्रीचं नाव कधीही रिपोर्ट नाही करत आणि त्यात अविवाहित मुलींच तर , नाहीच नाही . हे माहीत असलं म्हणजे मिळवलं ...

कोणी जर विनाकारण आम्ही शिवभक्त आमचे संस्कार ग्रेट असं म्हणत दादागिरी करत असेल ना तर , त्यांनी ही दादागिरी थांबवावी कळकळीची विनंती ..कारण तुम्ही समोरच्याला बदनाम करण्या च्या नादात स्वतः ही बदनाम होत आहात हे विसरत आहात ..

  हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू ने लिहिलेला नाही . माझ्या अनुभवावरून आणि वैचारिक पातळीवर लिहिलेला आहे ...
तरीही कोणाचे कळत नकळत मन दुखवल्या गेलं असेल तर , चुकीस क्षमस्व ...

Jan 25, 2022

प्रेम बंधन भाग- 20

कालच्या भागात आपण पाहिलं राहुल आणि नित्या ने पुणे दर्शन घेतल . ते दर्शन घेताना मस्तच किस्से घ डले .
शेवटी तर ते हॉटेल मध्ये न जेवता घरीच पार्सल घेउन आले होते ..आता बघुया पुढे ..

 नित्याने दरवाजा ओपन केला दोघेही आत मध्ये गेले . ती आणि तो दोघेही फ्रेश झाले . तिने ता ट वाढून घेतले .
ते जेवायला बसले ..

" तू तर खूपच घाबरते स एवढं घाबरून चालत नाही ." तो तिला म्हणाला ..

" मी कुठे घाबरते ..म्हणजे नाही घाबरत.  " ती म्हणाली .

" मग आज काय होतं . ते ? " तो 

" हा ..म्हणजे ..नवीन शहर ना त्यामुळे जरा .." तिचा चेहरा खूप पड ला ..

त्याला हसायला आलं . तिचा पडलेला चेहरा बघून ..
पण तिला वाईट वाट्टेल म्हणून त्याने कंट्रोल केलं .
आणि ते जेवायला लागले ..जेवण वैगरे झाल्यानंतर झोपण्याची तयारी केली . तिने त्याला गेस्ट रूम मध्ये झोपायला सांगितले . आणि ती तिच्या रूम मध्ये झोपायला गेली . दिवसभर त्यांना विशेष असं काही वाटलं नाही . पण रात्र ही जरा बोचली . एका स्त्री आणि पुरुषाने एकच घरात ते ही आपले आपले जोडीदार नसताना हा विचार येऊन गेला . 

ते याबाबत स्पष्ट बोलले नसले तरी , त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होत . पण झोपले कसे तरी झोप काही दोघांनाही लागली नाही . कशी तरी रात्र सरली नी पहाट झाली . 

          " गुड मॉर्निंग , मग झोप झाली ना व्यवस्थित " नित्या ने राहुल साठी चहा आणला आणि ती त्याला विचारू लागली ..

" Hmm पण एवढी खास नाही लागली ..नवीन जागा त्यामुळे .." तो चहाचा एक घोट घेत म्हणाला ..

तिने तिच्यासाठी ही चहा आणला होता . ती पण त्याच्यासोबत चहा पीत होती . 

" Hmmm माझ ही same तेचं होतं आहे.  इथे आल्यापासून झोप म्हणजे नक्की काय तेच विसरले मी त्यात शेखर पण मला एकटीला सोडून गेले .." आणि ती अचानक स्थब्ध झाली .

" I can understand " तो म्हणाला .

तिने फक्त गोड smile दिली. "  बरं खाण्यासाठी काय बनवायचं . की ऑर्डर करायचं काही . " ती विषय बदलत बोलली.  

" ऑर्डरचं करू कशाला त्रास करून घेते ." तो म्हणाला 

" त्रास कसला ? ऑर्डर नको काहीतरी छान खायला बनवते . कालपासून आपण बाहेरचं खातं आहो . बाहेरचं खाणं तब्येतीसाठी चांगलं नसतं ." असं म्हणत ती किचन मध्ये गेली . 

तो ही तिच्या पाठोपाठ गेला . ती स्वयं पाक करायला लागली . आणि तो तिच्या मध्ये मध्ये लहान मुलांसारखं .

" बरं ऐक जर आपण घरीच जेवण बनवणार असू तर , मग मी पण तुला हेल्प करणार . चालेल का ? "

ती त्याच्या बोलण्यावर हसली . तिने कपाळाला हात लावला . " तू काय हेल्प करणार मला ."

" ये , हसू नको ..छान जेवण बनवता येत मला . " तो म्हणाला ..

" बरं नाही हसत ..तू आधी अंगोळ करून ये . आणि मग मला हेल्प कर .." ती म्हणाली ..

" हो ते राहीलच नाही का ? येतो मी लवकर अंगोल करून .." तो अस म्हणत धावत रूम मध्ये  अंगोलीला गेला ..

त्याची अंगोल होई पर्यंत तिने कणिक बिजवून पोळ्या पण केल्या तरी तो रूम मधून बाहेर आला नाही . मग हीच गेली त्याच्या रुम मध्ये. त्याला बघून हँग झाली .
" काय भारी दिसतोस रे . " 

" काय बोललीस ? " त्याने विचारलं ..

तिला तर तिचीच लाज वाटली . " काही नाही . काही नाही अस म्हणत तीने विषय बदलला ..चल आता , तू हेल्प करणार होतास ना मला .." 

" हो म्हणजे काय ? चल " त्याने पनीर ची भाजी 

" व्वा वास तर खूपच छान येतोय . राहुल तू एकदम छान कुक आहेस.  " ती म्हणाली ..

" हो ते पण आहे. चल आता जेवायला मला खूप भूक लागली . " तो म्हणाला ..

" मला पण चल " 

दोघांनी पण जेवण केलं . आणि पुन्हा हॉल मध्ये निवांत बसले ..

" राहुल तू भाजी खूप छान बनवली होती पण .." ती म्हणाली ..

" मी छान चं बनवतो भाजी .. ऐक ना " तो म्हणाला 

" मी निघू का आता ..खूप काम आली आहेत ..मला निघाव लागेल ..

" ओके चालेल . बॅग भरुया आपण . " असं म्हणत ते दोघेही गेस्ट रूम मध्ये गेले.  बॅग वैगरे भरली . आणि हॉल मध्ये आले ..

दुपारचे तीन साडे तीन वाजले असतील . निरोप देताना दोघांचेही डोळे भरून आले होते . 

" पोहोचल्या नंतर मला आठवणीने कॉल कर .." ती म्हणाली . 

" हो बाय बाय. " म्हणत त्याने तिला घट्ट मिठी मारली . आणि आपल्या परतीच्या प्रवासाला निघाला ..

क्रमशः ..

पुढील भाग लवकर ..




Jan 24, 2022

माझी लव्ह स्टोरी

माझी लव्ह मी कुणाला बी सांगायचे नाय ...

ज्याच्या प्रेमात पडले त्याला बी नाय ..

त्या कृष्ण सख्याची मी प्रेम दिवाणी ..

तरी त्याला बी नाय ...

माझी लव्ह स्टोरी मी कुणाला बी सांगायची नाय ..

जळतो जीव ज्याच्यासाठी ,

नजर कुणाची त्याला लागू देणार नाय ..

माझी लव्ह स्टोरी मी कुणाला बी सांगायची नाय ..

जरी नाही झाले त्याची तरी रडणार नाय ..

त्याच्या सहावसाशिवाय हवं मला तरी काय ..

माझी लव्ह स्टोरी मी कुणाला बी सांगायची नाय ..

त्याच्याशिवाय मी कोणाची होणार बी नाय ,
तरीही  सांगते माझी लव्ह स्टोरी मी कुणाला बी सांगायचे .नाय ...

Written by - durga mate


Jan 23, 2022

ती चूक पुन्हा घडू द्यायची नाही ..

तुटलेला विश्वास हा तुटलेल्या आरशा सारखा असतो ,
जो कधीही दुरुस्त करता येत नाही ......

कधी कधी कळत - नकळत विश्वासाला तडा जातो ..
पण नंतर तो विश्वास परत कधीच नाही मिळवता येत .
आणि आपण ही तो विश्वास परत मिळवण्याच्या नादात पडायचं ...
सोडून द्यायचं जिथल्या तिथं ...
पुन्हा तिकडे पाठ फिरवून ही नाही बघायचं ..
विश्वासाला तडा कळत नकळत गेलेला असतो .
तेव्हा  खूप त्रास .. ज्याच्या विश्वासाला तडा गेला त्याच्या पण आणि ज्याच्याकडून गेला त्याला पण त्यामुळे पुन्हा
नाही ठेवायची अपेक्षा गमावलेला विश्वास परत मिळवण्याची .
हा पण एक लक्षात ठेवायचं जी चूक एकदा हातून घडली ती चूक पुन्हा नाही घडू द्यायची ...
Written by - durga mate ..

Jan 22, 2022

माझं आयुष्य ...

माझ् आयुष्य मला खूप प्रिय आहे ..
जस बी आहे , तस खूप सुंदर आहे ...

दुःख आहे म्हणून मी नाराज नाही हे ,
दुःख सरून सुख मिळेल आता ही आशा ही नाही हे ..

जे आयुष्यातून  निघून गेले ,
त्यांनी परत यावं ही आस ही नाही हे ..
माझं आयुष्य जस बी आहे .. तस खूप सुंदर आहे ..

आता कोणासाठी ही मनात फिलींग्ज नाही हे ..
कोणावर प्रेम करण्याची ईशा ही नाही हे ..
प्रेम करण्याची ईशा नाही म्हणून कोणाचा तिरस्कार करायचा हे माझ्या तत्वात नाही हे ..
माझं आयुष्य जस बी आहे तस मला खूप प्रिय आहे ..

ह्या चार भिंतीत ही , मी खूप खूष आहे ..

चार भिंती पलीकडचं जग बघण्याची आता आस ही नाही हे ..

माझं आयुष्य जस बी आहे , तस मला खूपच प्रिय आहे .
Written by - durga mate 

नाते ..

नात्याला प्रयत्नांची गरज असते ,
आणि प्रयत्न प्रेमाने पूर्ण होतात ...

गरजेपेक्षा जास्त समजून घेणं ,
असू द्याव नात्यात ...
भांडण ही जरासे हवेत वो ...
तरच प्रेमाची बाग फुलते ..

गैरसमज क्षणात सोडवावे ,
आपले पणाने एकमेकांचे मन जिंकून घ्यावे ...

नाते क्षणो क्षणी बहरावे ...

प्रयत्न पूर्वक नाते हे जपावे ...
जरी नावा - गावात नाही उतरता आलं ..
तरीही एकमेकांच्या मनात कायमच फिक्स होता आलं पाहिजे .....
Written by - durga mate 

Jan 21, 2022

कृष्ण सखया ..

प्रभा जेव्हा येते दारी ..
ऐकू येते कृष्ण सखयाची बासरी ..
निशा जेव्हा येते भेटीस ...
कळप दिसतो नयनांना माझ्या ..
कृष्ण सखयाचाच  ...


सावळे जरी त्याचे रूप ..

देई नय नांस सुख ... 


सावळा कृष्ण माझा ..

खरच आहे वो ह्या धरणीचा खरा राजा ..

जेव्हा  जेव्हा येई संकट ह्या मायभुमिवर ..

करी त्याचे अद्भुत रूप धारण ....
खरच आहे तोच ह्या पृथ्वीचा पालन हारण ..
Written by - durga mate ..


स्वारी ना ..


" ऐक ना . तू नको ना रागवुस ..प्लीज हवं तर , मी कान पकडते ..स्वारी ना ..खरच स्वारी .."

नीलिमा नयन समोर  उभी राहून केविलवाण्या स्वरात म्हणाली ...

आज नयन पहिली वेळ तिच्यावर रागवलेला होता .
ह्याच्या पूर्वी कधीच नव्हता तिच्यावर रागवलेला . सतत एकमेकांशी भांडायचे पण आज पहिली बार तो तिच्यावर एवढा चिडला होता .

तो उंचच आवाजात म्हणाला , " रागवू नको तर , काय करू . तू सतत भांडत असते . माझ्याशी भांडते ते ठीक आहे . पण ; त्या मूर्ख लोकांच्या का नादी लागतेस . स्वतःची चं अब्रू घालवून घेतेस ते नाही आवडल मला . "

" अरे पण ते कसं बोलतात माझ्याशी . ते पाहिलं नाहीस का तू ? " ती आता तिचंच खरं असल्यासारखं बोलली .

" त्यांचं नको सांगू मला " नयन तिलाच गप्प करत बोलला .

" मग कोणाचं सांगू . म्हणजे त्यांनी कसंही वागायचं . आणि मी शांत राहायचं . असं का ? "

" गप्प रहायचं . अग तशा वेळेस काय होतं माहितेय का ? 50 टक्के लोकं तुला चुकीचे समजतात . आणि 50 टक्के तुला . मग ह्यात तुझीच अब्रू जाते . त्यामुळे शांत राहायचं ." तो तिला समजावत बोलला.

" बरं ..बरं ..आता नाही नादी लागतं ..पण तू शांत हो आधी आणि मला नेहमीप्रमाणे गोड smile दे .." ती पुन्हा कान पकडत बोलू लागली .

" ओके इट्स ओके. " म्हणत त्याने तिला माफ केल . आणि मिठीत घेतल. इथे आलं खरं प्रेम दिसून.  जो आपल्यावर प्रेम करतो ना तो आपल्या चुका लगेच दाखवून देतो ...
Written by - durga mate

दोघी मैत्रिणी

कधी असते निशा सोबती ,
कधी असते प्रभा सोबती ..
त्यांचे सवे रंगती ..
छान गमंती - जमंती ..

     सांजवेळी निशा मोहक रुप दावते ,
     तिचेच अनुकरण करत ..
      प्रभा ही छान नटते ...

दोघीही बहिणी हव्या -  हव्याशा वाटतात ..
ह्या दिवसाची सुंदरता त्या वाढवतात ..

Written by - durga mate 

Jan 20, 2022

आता बास झालं ...

आनंदाचा एकमात्र क्षण शोधतोय ,

माझे सर्व दुःख लपवण्याचा प्रयत्न करतोय ....


अग्नीच्या निखाऱ्यावर मी चालतोय ..

अनुभवाच्या तप्त ज्वालामुखीत मी तपतोय ..


अंगणी बहरलेला मोगरा सुकताना मी बघतोय ..

रोज तो बहरावा म्हणून त्याला खतपाणी घालतोय ..


सांज वेळी सुर्य ढळताना रोज मी बघतोय ..
ओंजळीतील निराशा त्याला अर्पण करतोय ..

धावत्या ट्रेनमध्ये रोंज मी चढतो य  ..
चार दिवस सुखाचे बघण्यासाठी घाम घालतोय ..

दीन रात मी मेहनत करतोय ...
आयुष्याच्या संध्याकाळी अगंनी सुख बरसाव ..
म्हणूनच आज मरमर करतोय ..
Written by - durga mate


उद्यासाठी आज जगतोय

आनंदाचा एकमात्र क्षण शोधतोय ,


माझे सर्व दुःख लपवण्याचा प्रयत्न करतोय ....


अग्नीच्या निखाऱ्यावर मी चालतोय ..


अनुभवाच्या तप्त ज्वालामुखीत मी तपतोय ..


अंगणी बहरलेला मोगरा सुकताना मी बघतोय ..


रोज तो बहरावा म्हणून त्याला खतपाणी घालतोय ..


सांज वेळी सुर्य ढळताना रोज मी बघतोय ..
ओंजळीतील निराशा त्याला अर्पण करतोय ..

धावत्या ट्रेनमध्ये रोंज मी चढतो य  ..
चार दिवस सुखाचे बघण्यासाठी घाम घालतोय ..

दीन रात मी मेहनत करतोय ...
आयुष्याच्या संध्याकाळी अगंनी सुख बरसाव ..
म्हणूनच आज मरमर करतोय ..
Written by - durga mate


ते आपल्या चांगल्या साठीचं बोलत असतात ..

हा लेख आज मी लिहितेय ह्याचं संपूर्ण श्रेय येवला सरांना जात ..आज त्यांच्याशी बोलण झाल आणि विषय सुचला ......


  शीर्षकावरून आलच असेल लक्षात थोडक्यात हा लेख मी कोणत्या मुद्द्यावर लिहिणार आहे . ते पण ;  तरीही सांगते .. कोड्यात नाही पाडणार कोणालाही ..


   आपले वडीलधारे आपल्या चांगल्याच विचार करून आपल्याला चार समजूतदारीच्या गोष्टी सांगत असतात . कधी कधी ते आपल्याला सांगतात म्हणून आपल्याला त्यांचाच राग येतो . आणि आपण त्यांनाच चुकीचं समजून जे आपल्याला हवं तेच करत असतो .


पण खर तर आपण तेव्हा चुकत असतो . आपण त्यांचं ऐकायला हव . ते जे सांगतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.  ते आपल्या भल्यासाठीच बोलत असतात.  ते आपल्याला आपल्या चुका दाखवून देतात.  म्हणून वाईट वाटून नाही घ्यायचं . उलट त्यांना thanks बोलायचं.  कारण कोणी जर आपल्याला आपल्या चुका दाखवून दिल्या . ना तर , आपण रिपेअर होतं . आपलं mind आपल्याला रिपेअर व्हायला भाग पाडत . का माहितेय ?


कारण आपल्याला चार समजूतदारीच्या गोष्टी आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या आपल्या वडील धाऱ्यांनी समजवलेल्या असतात ..त्यांनी आपल्या पेक्षा चार उन्हाळे आणि चार पावसाळे जास्तच बघितलेले असतात . त्यामुळे ते आपल्याला योग्य तोच सल्ला देत असतात .


  कधी कधी तो सल्ला आपल्याला नाही पटतं ..कारण बदलती विचारसरणी ....आपल्याला आधुनिक विचार भुरळ पाडत असतात.  तेच आपल्याला छान वाटतात आणि त्यांचा स्वीकार करणं आपल्याला आवडत असतं . वडील धाऱ्यांचे  विचार आपल्याला मागासलेले आणि भूरसटलेले वाटतात . पण ते तस वाटणं चुकीचं आहे.  कारण सगळेच आधुनिक विचार हे चांगलेच असतात.  असं काही नाही हे , आणि सगळेच पारंपारिक विचार हे भूरसटलेले आहेत अस नाही ..


  आपल्या पूर्वजांनी जे विचार  मांडलेत जी तत्व मांडली  ते पूर्ण विचार करूनच मांडलेली आहेत . त्यामुळे आपण त्यांचा आदर करायला हवा . आणि आता लेटेस्ट जी नव पिढी आधुनिक विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे ती पण पूर्ण पने विचार करूनच मांडण्याचा प्रयत्न करत आहे . ज्या घटना आता चालू पिरेड मध्ये घडत आहेत.  त्या चालू घडामोडींवर मांडण्याचा ती प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यातील जे विचार आपल्याला चांगले वाटतात.  त्या चांगल्या विचारांचा सुध्धा सन्मान करायला हवा .


    मी असं म्हणणार नाही तुम्ही प्रत्येक वेळेस मोठ्या व्यक्तींनी जे सांगितल तेचं ऐका . कारण ते जे सांगतील ते सर्वच बरोबर असेल असं नाही ना . आणि त्यांचे विचार तुम्हाला पटतीलचं अस ही काही नाही.  प्रत्येक जण ज्याला जी तत्व आवडतात त्या तत्वानुसार आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात . जे आवडल ते घ्यायचं नाही आवडल सोडून द्यायचं .


कधीच मीच खरा आणि मी मांडलेली तत्वचं खरी अशी ही भावना मनात नाही ठेवायची . कारण आपण मांडलेली तत्व ही समाजाच्या दृष्टीने पण बरोबर असायला हवी . ती समाजाने स्वीकारायला पण हवी . ते पण खूप महत्वाचं आहे . आणि आपले वडीलधारे हेच आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात . हे आपण सर्वात आधी समजून घ्यायला हवं ..म्हणजे आपल्याला कोणी आपल्या चुका दाखवून दिल्या तर जास्त वाईट नाही वाटणार ..


  सांगायचा मुद्दा एवढाच आपले वडील धारे हे आपल्याला आपल्या  चांगल्याचाचं विचार करून  समजावत असतात ..ते बोलता बोलता जास्तीच बोलून गेले तर , वाईट नाही वाटून घ्यायचं . त्यांचा हेतू हा आपल्याला दुखावन नसतो तर , आपल्या हातून परत तीच चूक होऊ नये हा असतो . जेवढ पटलं तेवढं घ्यायचं.  पण कधीच कोणाचाही राग नाही ठेवायचा .  मनात राग ठेवून परत तिचं चूक करण ह्याला म्हणतात अहंकार तो आयुष्य बरबाद करण्याचं काम करतो. 


प्रगती तर होतच नाही पण अधोगती मात्र शंभत टक्के होते ...


अधोगती होऊ नये असं वाटत असेल तर , वडीलधाऱ्यानी सांगितलेल्या गोष्टी ऐकाव्या ...आयुष्याचे सोने होईल ..

  हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही.
चुकीस क्षमस्व ..
Written by - durga mate ..


शोधतोय मी ..

आनंदाचा एकमात्र क्षण शोधतोय ,
माझे सर्व दुःख लपवण्यचा प्रयत्न करतोय ...
काळा नुसार स्वतः ला बदलतोय ..
नव उमेदीने जगण्याचं बळ मी शोधतोय ..

अनुभवात मी होरपळतोय ..
खाच खळल्यात मी वनवास भोगतोय ..
कोणी एक क्षण आनंदाचा भाड्याने देईल का ? 
ते मी बघतोय ....

अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली यार ..
ज्याच्यासाठी जिवाचं रान केलं ...
त्यांनीच आरोपाचे शिक्के भाळी मारले ..
मला कुटुंबानेच आज मला वाळीत टाकले ...

खरच मी आज शोधतोय ..
आभासी जगात ..
एकट राहण्याचा मंत्र ...
भूतकाळ विसरून जाण्याचा शस्त्र ......
होऊन निशब्द ..
Written by - durga mate 

Jan 19, 2022

तूच श्वास माझा

तूच आहेस मला नेहमी हसवणारा ,
तूच आहेस माझ्या स्वप्नांना सजवणारा ..

राजकुमार माझ्या दिलदार मनाचा ...

साक्षीदार माझ्या आयुष्यातील गोड क्षणाचा..

तूच आहेस सप्तपदी सोबत चाललेला ..

सात वचनांचा आनंद देऊन गेलेला ..

तूच आहेस माझा राम आणि श्याम ..
तुझ्यापुढे आयुष्य मी माझ ठेवते  गहाण...

तूच आहेस माझा श्वास ....
तुझ्यासाठी जगणं हाच एक ध्यास ...

तूच शिकवलं मला जगायला ..
रडताना हसायला ...
आयुष्य हे आनंदाने जगायला ..

तू आयुष्य झालास माझं ...
शेवटच्या क्षणी हे मन भरून भरून ..
कौतुक करतय तुझ . 
Written by - durga mate 

काहीचं कस रे वाटत नाही ..

काहीचं कस रे वाटत नाही ..
तुला मला सोडून जाताना ..

मी तुझ्यात गुंतले ..
हे बघून लगेच ..
वेगळं होण्याचा निर्णय घेताना ...

माझे मन तुझे झाले ..
कळताच तू तुझे मन बदलले ..
असे कसे वागणे तुझे जगा वेगळे ..
ज्याच्या मुळे खरच मी हतबल झाले ..

पौर्णिेमेचा चंद्र प्रकाश देता देताच ..
अमावस्येचा काळोख देऊन गेलास ..
असा कसा रे  तू  चंद्र माझ्या मनातल्या नभातला ...
Written by - durga mate 

मुलगी प्रेमात पडल्यानंतर तिच्यात होणारे बदल ..

वयात आलेल्या प्रत्येक मुलीला कोणी ना कोणी तरी आवडतच .  ज्याला प्रेम किंवा आकर्षण संबोधल्या जात.  जेव्हा मुलीला कोणतरी आवडायला लागतं . तेव्हा तिच्या मध्ये खूप बदल होतात.  ते बदल आज थोडक्यात ह्या लेखा मध्ये मांडते ..

   त्याला बघताच ...
   निशब्द शब्द बोलके होतात ..
    गालावर लाली चढते ..
   एक अनामिक ओढ साद घालते ..
    ह्या कोवळ्या  मनाला ...
     पहिल्या भेटीची ..पहिल्या प्रेमाची ..
      जादूच न्यारी ...
      शब्दात सांगता येईल की नाही माहीतच नाही ...

 कोणतीही मुलगी जेव्हा प्रेमात पडते . तेव्हा जगते कमी आणि कल्पनेत रंगते जास्त .   ती स्वतः शिच बोलायला लागते . त्याचा चेहरा आठवला की मग मनातल्या मनातच हसायला लागते . सतत त्याच्याशी बोलण्याची आस तिला असते . सतत त्याचा चेहरा बघावासा वाटतो.
 
मोबाईल फोन मध्ये जेव्हा एखादं रोमँटिक गाणं लागलं . तर हे गाणं कोणीतरी आपल्यासाठीच खास लिहिलंय अस ही वाटायला लागतं.  खरच जेव्हा ही कोणी  व्यक्ती प्रेमात पडतो ना तेव्हा हे जग , सत्य कमी आणि भास अधिक वाटायला लागतो .

खरच वेडेपणाचे दिवस असतात ते काहीचं ठाऊक नसतं.  ज्याच्यावर जीव जडला तो व्यक्ती आपल्या हक्काचा होईल की नाही . पण तरीही काही क्षण का होईना त्याच्यासोबत त्याच्यासाठीच जगावस वाटतं .
कारण त्याच्यावर आपण निस्वार्थ प्रेम केलेलं असतं . कोवळ्या वयात कुठल्याही स्वार्था शिवाय तो आपला कोणीच नसताना  त्याला आपण आपल सर्वस्व मानलेल असतं ..

मुलांचं ही तसचं असतं . एखादी मुलगी आयुष्यात आली की तिच्याशिवाय ह्या जगात दुसर कोणीही स्पेशल नाही असच वाटायला लागतं . तिच्यामुळेच सिनेमा बघण्याचा छंद जडतो....अजुन बरच काही घडत अनेक चांगले वाईट बदल घडतात ..

मी एवढंच लिहू शकते कारण मी अजुन तरी कोणाच्या ही प्रेमात नाही पडले ...जेव्हा पडेल ना तेव्हा खूप छान लेख लिहिन पुन्हा ..
काही कमी जास्त झाल असेल तर क्षमस्व ...
Written by - durga mate 

माय माउली माझी ..

तूच आहेस मला नेहमी हसवणारी ,
तूच आहेस माझ्या स्वप्नांना जागवणारी ..
माझ्या नाजूक पंखांना बळ देणारी ..
इवल्या इवल्या मनावर योग्य संस्कार देणारी ..
माय माउली माझी  माझी आई ..


चुकले कधी तर ,
कान पकडून एक फटका देणारी ,
कुशीत घेऊन , अस वागू नये ,

बाळा सतत समजवणारी ..

माय माउली माझी माझी  आई ..


माझ्या सोबत खेळणारी ,
भातुकलीचा डाव आखणारी ..
खळखळून मला हसवणारी ..
तर कधी रडवणा री .
पुन्हा कुशीत घेऊन ,
पाठीवरून मायेने हात फिरवणारी
माय माउली माझी .माझी आई
Written by - durga mate

Jan 18, 2022

गुंतन्याची भीती वाटते ...

ज्याला कोणाला एखाद्या मध्ये गुंतण्याची भीती वाटतं असेल त्याच्यासाठी हा लेख ...

विषय तसा नाजूक आहे . प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकवणारा आहे . 

खूप जीव घेणं असतं ,
एखाद्या मध्ये गुंतण ,
गुंतून पुन्हा त्याच्यापासून वेगळं होणं ..
ज्याच्यासाठी आयुष्य जगायचं होतं ..
त्याला कायमचं विसरून जाणं ..
खरच खूप अवघड असतं ..
पण गुंतण्याची भीती वाटते ..
म्हणून एखाद्या मध्ये गूंतन सोडून द्यायचं का ? 
जो आवडतो त्याच्यापासूनचं  दूर पळायचं का ? 

मला तरी हे चुकीचं वाटत . जस आपण एखाद्या मध्ये गुंतू शकतो . तशीच कधी परिस्थिती आली तर ,  ज्याच्या मध्ये  गुंतलो होतो त्याला विसरता  येतंच की , थोडा त्रास होतो पण तो , ही खूप काळ टिकणारा नसतो ..

जो गुंतला त्याला ही ज्याच्यात गुंतला त्यालाही त्रास होतो . जेव्हा ..एकमेकांना पासून वेगळा होण्याचा निर्णय घ्यायचा असतो . पण ठीक आहे ना ..ज्याच्यात जीव अडकला होता.  त्याच्यापासून दूर जाताना थोडा त्रास तर होणारच ना ...

 आपण एक एकमेकांची काळजी करत असतो . ह्याला माझी किती सवय झाली होती . कसा राहील तो माझ्याशिवाय . पण अशक्य असं काहीच नसत . सगळं शक्य होतं हळू हळू एकमेकांशिवाय जगता ही आणि जगवता ही येत . आणि त्याला विसरता ही येत.  
सगळ शक्य असतं फक्त थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो..

आपण ज्याला विसरलो तो ही हळू हळू आपल्याला विसरायला लागतो . तो bussy होतो आणि खुश राहतो. आणि आपण ही आपल्या आयुष्यात bussy होतो आणि खुश राहतो . सगळ्या गोष्टी सुरळीत चालू असतात . काहीतरी निसटून गेलं हा भास ही कालांतराने नाही होतं . 
   
 गुंतन्याची भीती  वाटते म्हणून , एकमेकांपासून दूर नाही पळायचं ..जो पर्यंत शक्य आहे ..तो पर्यंत नातं निभवायच ....आणि अशक्य वाटलं तर मग थांबायचं . थांब न्याआधी एकदा ज्याच्यात आपण गुंतत चाललो , त्याच्या डोळ्यात डोळे घालुन स्वतःला विचारायचं . खरच इथे थांबन गरजेचं आहे का ? आणि आता इथे थांबन योग्य तरी आहे का ? 
Written by - durga mate ..

मैत्री ही अशीच राहू दे ...

खऱ्या मैत्रीवर विश्वास राहू दे ,
मैत्रीचे हे नाते अनंत राहू दे ...

मैत्रीचे रुपांतर जरी नाही झाले प्रेमात ,
तरी नको दुरावा येऊ देऊ आपल्यात. 

मैत्री ही अशीच बहरत राहू दे ...
जो पर्यंत तुझा - माझा शेवटचा श्वास भेटीला येत नाही ..
तोपर्यंत  मैत्री ही तोडायची नाही ...

जग घेईल आक्षेप ह्या मैत्रीवर ..
उडवतील शिंतोडे तुझ्या - माझ्या चरित्रावर ..
तरी डगमगुन जावू नकोस मित्रा ...

मान्यच नाही रे ह्या जगाला ..

एक स्त्री आणि एक पुरुष ..

फक्त एक चांगले मित्र - मैत्रीण  असू शकतात ...

Written by - durga mate 

Jan 17, 2022

प्रेम बंधन भाग 17

कालच्या भागात आपण पाहिलं राहुल आणि नित्या दोघे ही पुणे दर्शन घ्यायला सोबत निघणार असतात . आता बघुया पुढे ..

राहुल ने त्याच्या फ्रेंड ची फोर व्हीलर आणलेली होती . ते दोघे ही त्या फोर व्हीलर मध्ये बसतात . राहुल गाडी 75 च्या स्पीड ने चालवतो.  आणि एकदम रोमँटिक साँग्ज लावतो ..

पहला नशा है !
पहला घुमा ..
नया प्यार है .. नया इतंजार ..
कर लू में क्या अपना हाल ..
ये , दिलं है बेकरार ..

हे गाणं सुरू असताना . राहुल गाडी चालवत असताना समोर बघायचं सोडून . एकसारखं नित्याक डेच बघत होता . कधी डोळे लावत लावत तिच्यावर लाईन मारायचा तर कधी अलगद तिच्या ओंठापाशी आपले ओठ नेत हुलकावणी द्यायचा . आणि हसायचा ..
तिला त्याच्या तशा वागण्याचं खूप हसू ही यायचं आणि भीती ही वाटायची . 

" राहुल काय चाललय तुझ ? समोर बघून नीट गाडी चालव ." ती त्याला म्हणाली ..

तो तिच्याकडे तिरक्या नजरेने बघत .." मला समोर बघण्याची गरज नाही . " 

" हो का ? मग आपल्याला रस्ता कसा कळणार नक्की जायचं कोणत्या दिशेने ." नित्या त्याला चिडवत विचारू लागली ..

राहुल तिच्या खूप जवळ जाऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला . " मला तुझ्या डोळ्यात प्रत्येक रस्ता दिसतो .." 

नित्या त्याच्या बोलण्यावर हसली आणि म्हणाली , " वेडा माझा मित्र चालव नीट गाडी .."

आणि मग त्याच्याकडे लक्ष न देता ती तिच्या मोबाईल मध्येचं लक्ष द्यायला लागली ..

थोडा वेळ असच चाललं आणि राहुल ने एकदम गाडीची स्पीड वाढवली आणि अचानक गाडी थांबवली . 
आता जराशी ती घाबरली . तिने त्याच्यावर पाठीवर एक नाजूक थाप ठाकली . आणि जरा चिडून बोलली .

" राहुल काय प्रकार आहे हा ? कोणती पद्धत आहे ही गाडी चालवण्याची . आणि इथे थांबवली का ? " 

तो तिचा एवढा घाबरलेला चेहरा पाहून खूप हसला . तिची बोलण्याची स्टाईल जरा खूपच बदलली होती. 
" माझी आई थांबायचं आहे आपल्याला म्हणून गाडी थांबवली .." 

" इथे काय आहे स्पेशल ..? " नित्याने त्याला विचारले ..

" स्पेशल काही नाही ग ..ते बघ कॉफी शॉप ..कॉफी घेण्यासाठी थांबायचं आहे .." नित्या कॉफी शॉपच्या दिशेने चालत बोलला ..

नित्या मग काही न  विचारता त्याच्यामागे चालू लागली . त्यांनी कॉफी वैगरे घेतली आणि पुन्हा निघाले आपल्या पुढच्या मुक्कामी . नंतर ते एका भव्य - दिव्य मॉल मध्ये फिल्म बघण्यासाठी  गेले . 11 ते दीड फिल्म बघितली . दुपारी जेवण्यासाठी छान हॉटेल मध्ये थांबले . जेवण वैगरे झाल्यानंतर एका गार्डन मध्ये गेले.  त्या गार्डन मध्ये
खेळायला खूप काही होतं . लहान मुलांना ते यंग माणसांना खेळता येईल असे खेळ तिथे होते ..
ते आकाश पाळण्यात बसले . दोघेही खूप खुश होते . आजचा त्यांचा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर दिवस होता.  

" राहुल , किती लकी आहोत ना आपण . लग्न न करता सुद्धा आज किती छान मैत्री आहे . आपल्यात ..ही मैत्री अशीच असू दे प्लीज ..शेवट पर्यंत . जसे शेखर आहेत ना साता जन्मासाठी ..तसाच तू रहा मित्र माझा साता जन्मासाठी."  असं म्हणत ती त्याला मिठी मारते ..

" Hmm " करत तो ही तिला प्रतिसाद देतो ..

बराच वेळ झालेला असतो . संध्याकाळचे पाच साडे पाच वाजले असतील ..ते पुन्हा एका खूप मोठ्या मॉल मध्ये जातात . तिने एवढं मोठं मॉल आयुष्यात पहिलीच बारं पाहिलेलं असतं ..

" किती मोठं आणि किती सुंदर मॉल आहे ना " नित्या त्याला म्हणाली ..

" Hmm " तू हसताना खूप गोड दिसते .." राहुल 

" थँक्यू " नित्या ..

राहुल ने तिला एक साडी गिफ्ट केली . आणि नित्याने ही त्याला तिच्या चॉइस चा ड्रेस गिफ्ट केला . त्यांनी पूर्ण मॉल पाहिला . शॉपिंग ही केली ....फिरत फिरत असताना अचानक राहुल आणि नित्याचा हात एकमेकांच्या हातातून सुटल आणि ते दोघेही एकमेकांना दिशे नासे झाले . नित्या राहुल ला शोधत होती . राहुल नित्याला रेंज प्रोब्लेम मुळे कॉन्टॅक्ट होतं नव्हता.  नित्या खूप घाबरली होती . एवढी की शेवटी ती रडायला लागली.  तेवढ्यात तिच्या कानावर काही वाक्य ऐकु आले ..

" नित्या तुम्ही जिथे ही कुठे असाल , तिथून प्लीज वेल कम गेट कडे या . राहुल आपली वाट बघत आहे .." 

ते वाक्य कानावर पडताच नित्या हातात असलेल्या पिशव्या सांभाळत त्या गेट कडे पळते . आणि जाऊन त्याला घट्ट मिठी मारते ..

" काय राहुल ये . घट्ट हात पकडायचा की ..अशा गर्दीत एकटं सोडलं मला .." ती खूपच घाबरली होती . तिच्या बोलण्यातून जाणवत होत .

" किती घाबरते स.  एवढं घाबरन बरं नाही . " तो तिला जवळ घेत बोलला ..

" नवीन शहर असल्यामुळे वाटते थोडी भीती .." 
आणि ते बिल पे करुन बाहेर पडतात ..

" आता आपण हॉटेल मध्ये जावून जेवून करू आणि मग घरी.  " राहुल 

" नको आता कुठे डायरेक्ट घरीच जावू.  " नित्या 

" का ? " राहुल 

" नको रे प्लीज ..खूप थकले मी .." नित्या

" ओके मग पार्सल घेऊ .." 

" Hmm " म्हणत तिने थोडीशी स्माईल दिली ..

क्रमशः 
पुढील भाग लवकर ..

नाही मी हार मानणार ..

थकले जरी पंख माझे ..
तरी मी भरारी घेईन ..
पंखांना माझ्या नव्याने बळकट करेन ..

सरली आशा  मनाची जरी ,
उमेद असेल ही बाकी तरीही ..
ती जगण्यास प्रेरीत करील ..

 जरी अपयशाने  ठाण मांडून ठेवले ..
यशाचे दरवाजे बंद केले ..
तरीही मी प्रयत्नाचे नाही ,
ठेवणार शस्त्र खाली ...
जिद्दीने प्रयत्न करेन यशाचा होण्यास वाली ..

प्रयत्न करूनही थकले ,
आता हार माननेच योग्य ...
हे जरी मनास पटले ..
तरीही नाही हो मी हार मानणार ..
जिद्दीने पुन्हा नव्याने लढणार ...
Written by - durga mate

Jan 16, 2022

फ्युचर नसलेली नाती चुकीची नसतात ..

आजचा माझा विषय आहे . फ्युचर नसलेली नाती ...

 अशी काही नाती असतात की , त्या नात्यांना आपल्या नात्याच नक्की फ्युचर काय हेच माहित नसतं . 

..उदाहरण घ्यायचं झालं तर प्रेम ...हे नातं आपण घेऊ . 
वय - जात - गरीब - श्रीमंतीची दरी न बघता केल्या जातं ते प्रेम जगातील सर्वात सुंदर नातं .  कोणत्याही वयात कोणावरही होऊन शकत . मग  त्या नात्याचं नक्की 
 फ्युचर काय तेचं माहीत नसतं . मग ते नातं चुकीचं असतं का ? 

ह्या प्रश्नाच्या ठिकाणी मन थोडस अडखळल . आणि लिहावंस वाटलं . फ्युचर नसलेल्या नात्याबद्दल थोडंसं मनात साचलेल ...जर गरजेपेक्षा जास्त परखडपणे आणि नकळतपणे चुकीची मत मांडल्या गेली तर त्यासाठी मनापासून माफी मागते ..

  फ्युचर नसलेली जी नाती असतात . खरं तर तिचं जिवाभावाची असतात . नात्याला योग्य ते फ्युचर नाही . 
म्हणून जोडलेलं नातं.  लगेच तोडण अजिबात बरोबर नाही .

 जग काय म्हणेल ह्याचा विचार करत , आयुष्य जगायचं असेल ना तर , मग पाच पाच मिनिटाला आपल्याला आपली मतं बदलावी लागेलं . पाच मिनिट घोड्यावर आणि पाच मिनिटानंतर पायी चालावे लागेल . कारण जग हे " ना घोड्यावर बसू देत , ना पायी चालू देत . " 

त्यामुळे 75 पर्सेंट मनाप्रमाणे जगायचं . 25 पर्सेंट हे जग काय म्हणेल ह्याचा विचार करत जगायचं . कारण पूर्णपने आपण प्रत्येक वेळेस बरोबरच असू अस नाही , ना म्हणून जगताना थोडंसं सामाजिक भान असणं पण गरजेचं असतं ..

तर मी पुन्हा मुद्द्यावर येते . प्रत्येक नात्याला  फ्युचर असायलाच हवं हे गृहीत धरून कोणतेही नातं प्लीज जोडू नका . कारण कोणतच नातं हे नशीब घेऊन जन्माला येत नाही  की , त्या नात्याला योग्य फ्युचर असेलचं ...आणि योग्य फ्युचर नाही म्हणून लगेचच जोडलेलं जिवाभावाच ते गोड नातं तोडू पण नका . 

ते नातं शेवट पर्यंत तितक्याच जबाबदारीने निभवा . केवळ नात्याला फ्युचर नाही . म्हणून जर नातं तोडल ना
तर , खूप त्रास होतो . 

ज्याला  ते नातं आता नको असतं त्याला पण ; आणि ज्याला ते नातं हवं असतं त्याला पण ..खूप त्रास देणारा असतो तो क्षण ..तो क्षण कोणाच्याही आयुष्यात न आलेलाच बरा . जिथे तुम्हाला वाटतं .. आपण हे नातं पुढे नेऊ शकतो . ह्या नात्याला योग्य ते नावं देऊन एक चांगलं फ्युचर देऊ शकतो . तिथे तुम्ही त्या नात्याला योग्य ते फ्युचर देण्याचा जरूर प्रयत्न करा . ते नातं जोडण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ..

पण ; मला हे नातं तोडायच आहे . नको आता मला हे नातं.  खूप झालं इथे गुंतण , काय फायदा इथे गुंतून . इथेच थांबायला हवं आता ..जेव्हा तुम्हाला असं वाट्टेल ना , तेव्हा मात्र प्रामाणिकपणे एकदा नाही . हजारदा विचार करा . 
तुम्ही  ते नातं तोडून खरच खुश राहणार आहात . तुम्ही ते नातं कधीतरी तोडण्यासाठी  जोडलं होतं का ? 
की तुम्हाला ते नातं जोडून खूप फायदा होणार होता . आणि फायदा झाला नाही. म्हणून तुम्ही तोडण्याचा निर्णय घेतला . असं काही होतं का एकदा विचारा अंतर मनाला ..आणि मग ते नातं तोडण्याचा निर्णय घ्या ..
आणि मग जो निर्णय तुम्हाला योग्य वाट्टेल तो निर्णय घ्या. तो पर्सनल प्रश्न आहे . मी त्या विषयावर नाही बोलू शकत . 

माझा विषय आहे . फ्युचर नसलेल्या नात्याबद्दल माझे मत मांडण आणि मी ते मतं पूर्ण प्रामाणिक पने मांडणार.

   फ्युचर नसलेल्या नात्याला चुकीची उपमा देऊ नका ..
   जग काय म्हणेल , ह्याचा विचार करत कुठल्याच नात्याला पूर्णविराम देऊ नका ..
जस प्रत्येक स्वप्न सत्यात उतरत नसतं ..
तसं प्रत्येक नातं फ्युचर घेऊन जन्माला येत नसतं ..
हेचं एक आहे सत्य ...
ते सत्य स्वीकारूनचं ..नातं जोडण्याचा प्रयत्न करा.  आणि जोडलेलं नातं शेवटपर्यंत निभवण्याचा प्रामाणिक पने प्रयत्न करा .....

चुकीस क्षमस्व : 

ऑनलाईन प्यार की दास्तान ..

कधी कधी वाटतं ,
उगाच झाली ओळख आपली ..
अशी आभासी आणि नकली ..
उगाच रंगली प्रेम कहाणी ही आगळी वेगळी ..

तू दूर देशीचा राजा ,
मी माय देशीची राणी ..
अशी कशी रे  ही प्रेम कहाणी ..

तू आता बोल ,
भेटायला ये ..
मी लगेच सगळे काम सोडून भेटायला येतो ..
सहज बोलून जातो ..

शब्द तुझे ऐकताच ...
मला ऐकायला नसतं आलं ..
तर किती बरं झालं ...
मनापासून वाटतं ..

किती खुश होते .
नुसते फोटो तुझे बघून ..
त्या निर्जीव फोटो लाही ..
किस करते हसून हसून,😜😜

डोळे आतूरले ,
तुला प्रत्यक्ष बघण्यास ..
आनंदाने एक घट्ट मिठी तुला मारण्यास ..
मी आता खरच आतुरले ..

ओढ लागली ...

आकाश मोकळे ..
आज हवे हवे से वाटू लागले ..
धरणी वर पाय आज रुळेनासे झाले ...

उडत्या पाखरां वाणी ..
आज उंच झेप घ्यावी वाटू लागली ..
काहून , कनु आज ..
धरणी माय पोरकी वाटू लागली ..

आभाळाची छाया साद घालू लागली ,
हिरवळ जमिनीची आज नकोशी झाली ..

आकाशाला गवसणी , 
घालायची धडपड उरी दाटली ,
मला आज अभाळाला ,
गिरट्या घालायची ओढ लागली ...
Written by - durga mate 


आवडत का कोणाला ?

आई वडिलांचां संसार ,
डोळ्यांसमोर तुटताना पहायला आवडतो का कोणाला ? 

घास भरवणाऱ्या आईला ,
रडताना पाहताना आवडत का कोणाला ? 

25 वर्ष सुखाने चाललेला संसार ,
अचानक मोडताना पहायला आवडत का कोणाला ? 

आकाशाच्या कुशीत घाबरून दडून बसलेला ,
चंद्र पाहायला आवडत का कोणाला ? 

रोज घरात आई वडिलांचे होणारे ,
भांडण पहायला आवडत का कोणाला ? 

उमलेल फुल कोमजुन जातं असताना ,
पहायला आवडत का कोणाला ? 

सख्या आई वडिलांची ताटातूट होताना ,
आवडता का हे दृश्य कोणाच्याही लेकरांना पाहायला ..
हे हृदयस्पर्शी अनुभव अनुभवायला ..
आवडत का कोणाला ?
काल्पनिक रचना ..

Jan 15, 2022

रुसवा तुझा

रुसवा तुझा किती गोड ..
बघण्याची किती असते मला ओढ ..
तुझ नाक मुरडन लाजवाब ..
किती करू मी त्याची तारीफ आज ..

तुझा अबोला खरच खूप छळतो ,
मी तुला मनवण्याचा प्रयत्न करतो ,
तेव्हा खरच तुझा चेहरा खूप गोड दिसतो ..
मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो ..

लटका राग तुझा ,
सुरू होई पुन्हा प्रेम प्रवास माझा ..
वेडा हा राजा ...
आहे तुझाच दिवाना ..
म्हणून तर आलाय सोडवत रुसवा तुझा ...

Written by - durga mate

Jan 14, 2022

खरा मित्र माझा

अनेक टप्यात बनतो पुस्तक आपला मित्र ,
आपल्याला योग्य मार्गाच्या दिशेने दाखवतो चित्र ..

जेव्हा मनात नकारात्मक विचारांची पेरणी होते ..

तेव्हा सकारात्मक तेचा सुगंध पुस्तकच घेवून येते ..

पुस्तक कधी इतिहास सांगतो ..

तर  कधी इतिहास घडवणारा धडा शिकवतो ..

विज्ञानातून डिजिटल पिढी घडवण्याचे काम तो करतो ..


कोणी असो नसो सोबतीला ..

पुस्तक मात्र आवरजून असतो सोबतीला ..
पुस्तक हाच खरा मित्र माझा ..
आज सांगते तुम्हाला ....

पुस्तक माझा मित्र सांगताना आनंद होतो मनाला ..
त्याच्यामुळेच अर्थ आला , वो जगण्याला ..

Written by - durga mate

Jan 13, 2022

लॉक डाऊन नंतरची लव्ह स्टोरी

ऊर्मी आज सकाळपासून लस घेण्यासाठी गेली होती . 
आईने तिला अनेकदा सांगितल . "  जाऊ नकोस  तुला लस मिळणार नाही . कारण तुला 18 पूर्ण व्हायला कंप्लीट 1 महिना बाकी आहे . "

पण ऊर्मी हट्टी तिच्या मनात जे असेल ,  तेच ती करायची. 
ती गेलीस शेवटी लस घ्यायला . दोनदा नंबर येऊन ही तिला लस दिली . उन्हात तिच्या जीवाची ल्हाई ल्हाई झाली होती . त्यामुळे ती खूपच संतापली होती . 

मागे उभी असणारी ऊर्मी समोर येऊन लस देणाऱ्या व्यक्तीवर चांगलीच  बडकली आणि तिने तिच्या तोंडाचा पट्टा सुरू केला . 
" ओ सर ,  मला लस द्या की ..किती वेळ झाला . मी 
लाईन मध्ये नुसतं वेड्या सारखी उभी आहे . माझ्या पाठीमागून आलेल्या लोकांना तुम्ही लस दिली.  आणि माझ्याकडे साधं बघत ही नाही आहात . अशी कुठली तुमची वागण्याची पद्धत ? "  

तिच्या अश्या बोलण्यावर समोर असणारा व्यक्ती काही बोलणारच तर समोरून एक पोलिस ऑफिसर आला .
दिसायला एकदम हॅण्डसम कोणतीही मुलगी सहज त्याच्यावर भालेल . बोलण्यात ही खूप टॅलेंट .. तो ऊर्मी ला समजावू लागला ..

  " Exuse me mam ..तुम्हाला लस मिळणार नाही ." 

" पण का ? " ऊर्मी उंच आवाजात बोलली .

" अहो तुमचं वय नाही बसत.  "  तो i.p.s ऑफिसर तितक्याच समजूत दारिने बोलला ..

" अहो बसत ना . पुढच्या महिन्यात मला 18 पूर्ण होणार ."
ती बोलली.  

" अहो मग पुढच्या महिन्यात पण डोस येणार . तेव्हाच घ्या ना तुम्ही . " I.p.s ऑफिसर .

" आता काय प्रोब्लेम " ऊर्मी जिद्दीने बोलली .

" आता मिळणार नाही .". I.p s ऑफिसर 

" पण का ? " ऊर्मी .

" पुढच्या महिन्यात मिळणार " i.p.s ऑफिसर .

" ओके . पण मला कोण सांगणार डोस आला ते .." ऊर्मी उंच आवाजात बोलली .

" मी सांगतो ." I.p.s ऑफिसर 

" हो ..खरच ..मोबाईल नंबर द्या ." ऊर्मी ..

" काय ? " I.p.s ऑफिसर 

" मोबाईल नंबर .." ऊर्मी 

ऊर्मी एवढी जिद्दीला पेटली होती . की शेवटी त्या पोलीस ऑफिसर ने तिला आपला मोबाईल नंबर दिला . 
ती thanks बोलून निघणार तेवढ्यात ..ती thanks बोलल्यानंतर काळजी घ्या .  अस बोलल्यावर त्याने तिला सहज विचारलं .." काळजी का घेऊ .." 

ती चिडून बोलली .." मग आजारी पडा ..आणि कोणाच्याही प्रेमात पडणार नाही . ह्याची काळजी घ्या .
विशेष करून माझ्या .." हे शब्द तोंडातून बाहेर पडत नाही . तर तिने तिथून धूम ठोकली . पोलिस ऑफिसर ला तिचा बोलण्याचा हेतू समजला तेव्हा ती किती तरी दूर गेली होती . तो पोलीस तिच्यावर हसला आणि तिला त्याचे बोल ऐकू जाईल . एवढ्या उंच आवाजात बोल ला .

" अहो तुमच्या बोलण्याचा मी नक्की काय अर्थ घ्यायचा ."

तिच्या कानावर त्याचे बोल पडले होते . तिनेही उंच आवाजात रिप्लाय दिला .
" तुम्हाला जो अर्थ घ्यायचा आहे तो घ्या.  
ती हसत ही हसत घरी गेला . आणि तो ही हसत हसत घरी गेला ..

Love at first sight होतं ते ....

तिने नंबर तर घेतलाच होता . मग तो नंबर save केल्यानंतर सुरू झाला एका सुंदर नात्याचा प्रवास. मैत्री झाली . हळू हळू बोलण वाढल कॉलिंग वर ही बऱ्याचदा बोलण झालं. एकमेकांबद्दल आकर्षण ही वाढलं. आणि आला पुन्हा दुसरा डोस . ज्या दिवशी दुसरा डोस आला. 
नेमका त्याच दिवशी उर्मीचा वाढदिवस आला . 

I.p.s ऑफिसर ने सकाळीच तिला कॉल करून सांगितल . " आज लस मिळणार आहे . आणि पहिला नंबर तुझाच बर का ? " आणि त्याने फोन कट केला .

तिचा birthday होता . मग काय birthday girl काय कमी छान दिसणार का ? आई वडील घरी नसल्याचा तिने चांगलाच फायदा घेतला . छान रेड कलरची साडी घातली . केस मोकळे सोडले. ओंठावर डार्क लिपस्टिक लावलं . खुपचं छान दिसत होती ती त्या लुक मध्ये ...

ती गेली लस घ्यायला ..गर्दी कमी असल्यामुळे त्या पोलीस ऑफिसर ची नजर सहज तिच्यावर गेली . तिला त्या तशा लुक मध्ये पाहून त्याचा बीपी हाय झाला . तो चक्क पाच मिनिट नुसत तिच्याकडेच बघत होता ...

शेवटी हिचं गेली त्याच्याकडे. आणि त्याला जाऊन बोलली .
" ओ. काय बघता असा . ह्या पूर्वी काय मला पाहिलं नाही का ? " 

" पाहिलं होतं ना ..पण एवढ्या सुंदर लुक मध्ये आज पहिली बार बघतोय ना .." तो तीच्यकडे एकटक बघतच बोलला ..

तिला तर त्याच फार हसू येत होतं. " हो का ? घ्या मग बघून जेवढं बघायचं आहे . तेवढं बघून घ्या आज " 

त्याला कधाचित ती काय बोलली ते कळलंच नव्हत .तो बोलून गेला ." हो तेच तर करतोय " 

तो असं बोलल्यावर तर तिला त्याच जाम हसू आलं . एवढं
आलं की ते तिला कंट्रोलच नाही झालं .तिच्या हसण्याचा जेव्हा त्याला आवाज आला . तेव्हा कुठे तो भानावर आला ..

" काय ग काय झालं ? का हसतेस ? " तो विचारू लागला .

" काही नाही . मी आलेच लस घेऊन ." असं म्हणत ती हसत हसतच लस घ्यायला गेली .

तेवढ्यात त्याच्याकडे एक मुलगी गुलाबाची परडी घेऊन . 
गुलाब विकणारी चिमुरडी मुलगी आली . 
" दादा फुल घ्या ना " अस म्हणत ती त्याला विनवणी करत होती . त्याने गुलाबाचे खूप सारे फुल घेऊन त्याचा एक छानसा गुश्चा तयार केला . आणि त्या चिमुरडीच्या परडीत चार ते पाच हजार रुपये ठेवले . हे सारं दृश्य ऊर्मी दुरूनच बघत होती . 

ती चिमुरडी निघून गेली . आणि ऊर्मी ही लस घेऊन आली . तो तिला विचारू लागला .." घेतलीस का लस "
" हो घेतली " कापसाने लस घेतलेल्या जागेवर चोलत ऊर्मी बोलली ..

" त्रास होतोय का खूप " तो काळजी ने बोलला ..

" नाही .." ती हसतच बोलली ..

तो तिच्या समोर गुढग्यावर टेकून उभा राहिला .आणि हातात असलेले गुलाबाचे फूल घेऊन तिला प्रपोज करू लागला . 
तिने ही आनंदाने ते फुल घेतले . आणि त्याला एक घट्ट मिठी मारत ती बोलली .." म्हंटले होते ना प्रेमात पडशील ."
असं म्हणत ते दोघेही खूप हसले . आणि एकमेकांना मनापासून त्यांनी आपलं मानल.

कशी वाटली ही लॉक डाऊन नंतरची लव्हस्टोरी . कॉमेंट करून नक्की सांगा.  



दिवसच होते ते न्यारे ...

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात ,
पण जुन्याच आठवणी मनाला छान वाटतात ..

बालपणीच्या बंधन मुक्त आयुष्याच्या ..
ज्या कधीच नाही जाणार पुसल्या ...

ना ओझ होतं जबाबदाऱ्यांच ,
ना दडपण होतं कोणी टोमणे देईल याचं ..
खरचं जगणं होतं ते न्यारचं ..
नेहमीच हवं हवंस वाटणारं ..

जाई जुई मोगरा गुलाब ,
ह्यांच्याशी तर होतीच मैत्री ..
पण अजबचं ना ..
चिखल - माती हे तर आवडीचे होते राजे ..

खरचं दिवसच होते ते न्यारे ,
मनातून कधीच न हरवणारे ,
कायम स्वरुपी आठवणीत राहणारे ..
Written by - durga mate

Jan 12, 2022

त्यानेच तर लिहिलं ..

पृष्ठावर केली जातात उत्तरे चिन्हांकित ,
आपले भविष्य सुद्धा आहे यावर अंकित ..

असं म्हणतात ,
की देवाने आपलं नशीब जन्मापूर्वीचं रेखाटलं ,
त्याच्या हुकुमावरचं आपलं जीवन चालतं ..

काय खरं काय खोटं माहीत नाही ..
खरं खोटं करण्यात मला इन्ट्रेस नाही ..
कारण जाणते मी हाती काहीचं लागणार नाही ..

नशिबाचा खेळ हा ..
त्याच्या भाकितावरच चालणार ..
त्याने जे लिहून ठेवलं तेच हातून घडणार ..

सुख - दुःख , आसू आणि हसू ,
सगळ त्यानेच दिलं ..
बदल्यात काहीचं नाही मागितलं ..
 देह - आणि आयुष्य हे त्यानेच तर दिलं ..
त्या ईश्वराने ..सृष्टी निर्मित्याने ..

आयुष्याच्या पृष्ठावर सारचं त्याने लिहिलं ..
शेवटच्या श्वासाचं गुपित मात्र स्वतः कडे राखून ठेवलं ..
Written by - durga mate 





आता जरा जगून बघते स्वतः साठी

आता जरा जगून बघते स्वतःसाठी ..
खळखळून हसण्यासाठी ..
काळोखात गेलेले दुःख विसरण्यासाठी ..

आयुष्याचे रंग बघण्यासाठी..
उमलेल्या फुलांचा सुगंध घेण्यासाठी . 
नाजूक  मनाचं गोड व्यक्ती महत्त्व होण्यासाठी . 
आता जरा जगून बघते स्वतः साठी ..

माणुसकीचा ओलावा जपण्यासाठी ,
कुरूप विचार नष्ट करण्यासाठी ..
सुंदर विचार मनी रुजवण्यासाठी ..
आता जरा जगून बघते स्वतः साठी ..

स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी....
आयुष्य नेटाने जिद्दीने , चिकाटीने जगण्यासाठी ..
एक आदर्श व्यक्ती होण्यासाठी ...
आता जरा जगून बघते स्वतः साठी ..

Written by - durga mate 



प्रेम बंधन भाग- 19

कालच्या भागात आपण पाहिले की , नित्या आणि राहुलच कॉलिंग वर बोलणं होतं . त्यात राहुल नित्याला म्हणतो की उद्या माझ्या बरोबर पुणे दर्शन घ्यायला येशील का ? त्यावर नित्या हो म्हणून रिप्लाय देते . आता बघुया पुढे ....

नित्या आज खूप लवकर उठली होती . म्हणन्यापेक्षा तिला काल रात्रभर झोपच आली नव्हती . कारण ती ह्या आधी कधी एकटी राहिलीच नव्हती . पहिली वेळ ती एकटी राही ली होती . 

ती पाच वाजताच उठली होती . आणि एकटीच काम असल्यामुळे आठ वाजेपर्यंत तिचं पूर्ण काम आवरलं होतं.  काम आवरल्या नंतर काय करावं सुचत नव्हतं.  एवढ्या मोठ्या फ्लॅट मध्ये एकटीने च काय भिंतीला बोलायच का ? असं स्वतःशीच बोलायची . तिला ती एकटीच राहत होती . ह्या गोष्टीची खूप चीड यायची .
वेळ जावा म्हणून टिवी ऑन केली . तर त्यातही कोणताच चांगला कार्यक्रम लागत नव्हता . 

तेवढ्यात दरवाजावर कोणी तरी बेल वाजवली . " कोण असेल एवढ्या सकाळी " ती विचारात पडली . परत दरवाजावर उभ्या असणाऱ्या व्यक्तींनी बेल वाजवली . 
हिने दरवाजा ओपन केला ..

" तू !!!"

 त्याला बघून ती खूपच खुश झाली ..
आणि तो ही तिला एवढ्या दिवसांनी बघून खूप खुश झाला . 

" हो ..मीच . काल ठरल होतं . पुणे दर्शन . विसरलीस ."
राहुल तिची फिरकी घेत घेत बोलला ..

" नाही रे . असं काही नाही . एवढ्या सकाळी सकाळी येशील . असं वाटलं नव्हत . बर आत तर ये ." असं म्हणत ती त्याला एक फ्रेंडली मिठी मारते ..

" हो आलोच " अस म्हणतो तो हातात असलेली बॅग घेऊन आतमध्ये येतो . घरातील डेको रेशन बघून

"वाव ! खूप छान सजवल घर ." 

" Hmm मी आणि शेखर ने मिळून सजवल " नित्या त्याला घर दाखवत बोलली ..

" तू बसतो स की फ्रेश होतोस ..मी तोपर्यंत चहा आणते आपल्यासाठी .." नित्या ..

" मी फ्रेश होतो . तू तो  पर्यंत चहा बनव छान मग आपण लगेच पुणे दर्शन घ्यायला निघू .." राहुल 

" आणि खायचं नाही का काही . भूक नाही लागली का तुला किती दूर वरुन आलास .." नित्या 

" नाही ग चहा घेऊन निघू आपण . बाहेर गेल्यावर काय बिना खाल्या पिल्याचं राहणार आहोत का ? " राहुल 

नित्या जराशी गोंधळली . " ओके मी बनवते चहा ती . बघ ती समोर बेडरूम आहे . आणि त्या मध्येचं वॉश रूम आहे . तू ये फ्रेश होऊन .." अस म्हणत नित्या किचन मध्ये गेली ..

राहुल ही फ्रेश होण्यासाठी गेला . रूम इतकी छान सजवली होती . की कितीतरी वेळ तो ती रुम बघतच राहिला . थोड्या वेळाने फ्रेश होऊन बाहेर आला . तो पर्यंत नित्या ने ही छान गरमा - गरम अद्रक - विलायची घालून चहा बनवला होता ..

दीर्घ श्वास घेत ." Wow ! चहा तर खूप छान वास येतोय"
असं म्हणत त्याने चहा चा कप उचलून तोंडाला लावला .
आणि चहा घेतला.  
" Wow ! खूपच छान झाला आहे.  चहा ..असा चहा मी आयुष्यात पहिली बारं . पिलो असेल . " राहुल तो चहा पीत पित बोलला ..

नित्या ही मान हलवत " हो का ? नका झाडावर चडवू घ्या लवकर पिऊन असं म्हणत तिचा कप घेऊन ती किचन मध्ये जाते . 
राहुल चा ही मग चहा पिऊन होतो . तो ही किचन मध्ये जातो . 

" अरे , हे काय राहुल . मला आवाज द्यायचा ना तू कशाला आणलास कप .." नित्या त्याच्या हातातील कप घेत बोलली . 

" का मला तुझ किचन दाखवायचं नव्हत का ? " राहुल तिच्यावर चिडत बोलला .

नित्या त्याच्या बोलण्यावर हसली . " राहुल अस काही नाही रे . किचन सारखं किचन आहे माझं . तू गेस्ट आहेस ना माझा म्हणून बोलले . वेडा बघ पूर्ण किचन तो पर्यंत आलेच मी change करून .." 
असं म्हणत ती बेडरूम मध्ये गेली .

छान वनपिस घालून वैगरे रेडी झाली . आणि बाहेर आली . तिला एवढ्या सुंदर लुक मध्ये पाहून राहुल एकदम हरवून गेला . 

" खूप छान दिसते . " नकळत बोलून गेला .

" थँक्यू ..चल आता ." असं म्हणत ते निघाले बाबा एकदाचे पुणे दर्शन करायला ..

बघू पुढच्या भागात काय काय मजा येते . ते पुण्यात त्या दोघांची ..

पुढील भाग लवकर ..


Jan 11, 2022

मनाच्या ओंजळीत..

मनाच्या ओंजळीत ..आपलेपणा जपला .

.स्वार्थासाठी नाही कधी जीव तळमळला ..

माणुसकीचा नाही कधी विसर पडला ..


संस्कार जपले ..
प्रेम ही उपमा ,
जोडलेल्या प्रत्येक नात्याला दिली ..
अनेकांच्या मनात मी घर करून राहिली ..

बोल - बोबडे गीत ,
नेहमीच हवे हवेसे वाटले ..
त्या गितां मध्ये नवखे सुर गवसले ..
त्या सुरांनी आयुष्याला रंग चढले ...

मनाच्या ओंजळीत ..
प्रेम - माया - ममता ..
नेहमी जागृत ठेवली ..
नाही कधीही देईल मी तिला तिलांजली ..

Written by -
Durga mate

येते ना तुझी खूप आठवण येते ..

येते ना ,
तुझी खूप आठवण येते ..
इतकी येते की ,
तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी येते ..

कोपऱ्यात बसून रडत असते ,
तुझ्या सोबतचा हर एक क्षण आठवण बसते ..

तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही होतं ..
पण तुझ्या आठवनिशिवाय माझा दिवस नाही कटत ..
ओघळणारे अश्रूचं मग , पिते हसत - हसत ..

खूपच आठवण आली तर ,
मग हताश होते ..
आसवांना तर परकी होतेच ,
पण ; हुंदक्याना ही नकोशी वाटते ..

धायमोकलून रडतांना ,
तू दिलेलं प्रेम पत्र वाचते ..
गुरफटलेल्या तुझ्या आठवणीतून बाहेर पाडते ..

Written by - durga mate

मनाच्या ओंजळीत..

मनाच्या ओंजळीत ..

आपलेपणा जपला ..

स्वार्थासाठी नाही कधी जीव तळमळला ..

माणुसकीचा नाही कधी विसर पडला ..

संस्कार जपले ..
प्रेम ही उपमा ,
जोडलेल्या प्रत्येक नात्याला दिली ..
अनेकांच्या मनात मी घर करून राहिली ..

बोल - बोबडे गीत ,
नेहमीच हवे हवेसे वाटले ..
त्या गितां मध्ये नवखे सुर गवसले ..
त्या सुरांनी आयुष्याला रंग चढले ...

मनाच्या ओंजळीत ..
प्रेम - माया - ममता ..
नेहमी जागृत ठेवली ..
नाही कधीही देईल मी तिला तिलांजली ..

Written by -
Durga mate

मनाच्या ओंजळीत..

मनाच्या ओंजळीत ..आपलेपणा जपला .

.स्वार्थासाठी नाही कधी जीव तळमळला ..

माणुसकीचा नाही कधी विसर पडला ..


संस्कार जपले ..
प्रेम ही उपमा ,
जोडलेल्या प्रत्येक नात्याला दिली ..
अनेकांच्या मनात मी घर करून राहिली ..

बोल - बोबडे गीत ,
नेहमीच हवे हवेसे वाटले ..
त्या गितां मध्ये नवखे सुर गवसले ..
त्या सुरांनी आयुष्याला रंग चढले ...

मनाच्या ओंजळीत ..
प्रेम - माया - ममता ..
नेहमी जागृत ठेवली ..
नाही कधीही देईल मी तिला तिलांजली ..

Written by -
Durga mate

निरीक्षण ...

पुन्हा हे काय खुणावत आहे ..
ह्या मार्गाला अंधाराची सवय आहे . 
माझ् निरीक्षण तंतोतंत आहे....

हा लेख केवळ अनुभव आणि निरीक्षण ह्यावर आधारित लिहीत आहे . विषय हा पूर्णपणे वेगळा आहे . शीर्षकाला शोभेलच अस नाही . आता वेळ न दवडता मी मेन मुद्द्यावर लिहायला सुरुवात करते . कुठून सुरुवात करावी कळेना . पण करते सुरुवात ..

     आज काल gf आणि bf चं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसतं . म्हणण्यापेक्षा ते प्रमाण वाढलेलेचं आहे . त्यात गैर असं मला तरी काहीच वाटतं नाही . वय असत . ज्या त्या वयात जे ते अनुभव आणि जो तो एन्जॉय करून घ्यायला पाहिजे . कारण एकदा वय निघून गेलं ना तर , मग सगळ्याच गोष्टी करायच्या अपूर्ण राहून जातात . आणि मग नंतर हळुवारपने आपलं हे करायचं राहून गेलं . केलं असतं तर निदान फिल तरी करता आलं असतं . हा विचार अलगद मनाला स्पर्शून जातो. पण तेव्हा हातात अस काहीच नसतं . त्यामुळे ज्या वयात ज्या वयात ज्या गोष्टी करण शक्य आहे . त्या त्या गोष्टी करून घ्यायलाच पाहिजे. अगदी प्रेमापासून ते विरहा पर्यंत साऱ्याच . साऱ्याच गोष्टी अनुभवायला हव्यात . 

        प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो . प्रत्येक अनुभवातून योग्य ती शिकवण घ्यायला पाहिजे . एखादा वाईट अनुभव आला म्हणजे लगेच घाबरून जायचं नाही . जगापासून दूर पळण्याचा प्रयत्न ही करायचा नाही . उलट नवीन उमेदीने दुसरा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हायचं . मग तो अनुभव कटू असो किंवा गोड ...

   विषय मी जास्त पांगत नाही ...

माणसाने प्रत्येक गोष्ट अनुभवायला पाहिजे . हे आजच्या एकविसाव्या शतकातील मुला मुलींना मान्य असतं . पण ह्याचं एकविसाव्या शतकातील मुला मुलींचे आई वडील त्यांना ही गोष्ट मान्य नसते. आणि ते त्यांच्या ठिकाणी बरोबर पण आहेत . मी त्याच्या बद्दल कोणतेही अपशब्द तोंडातून काढणार नाही . किंवा ह्या लेखात ही मांडणार नाही .
पण बऱ्याच गोष्टी आज मी इथे स्पष्ट मांडणार आहे . ज्या पूर्ण गोष्टी माझ्या निरीक्षणातील आहे . 

    लव्ह मॅरेज आजही खूप ठिकाणी ह्याला विरोध होतो . तुरळक ठिकाणी ह्याला मान्यता मिळते . त्याला मान्यता मिळायला हवी हा पॉईंट नाही माझा ..

     मुली प्रेमात का पडत असतील ? हा प्रश्न नाही पडत मला कधी आणि कधी पडणार पण नाही . कारण ह्या प्रश्नाचं उत्तर मला सापडल आणि ते उत्तर मला पटलं ही तेच आज मी इथे सांगते . तुम्हाला पटत की नाही ते पण सांगा . 

    कुठल्याच मुलीची इच्छा नसते . आपल्या आई वडिलांची मान आपल्यामुळे खाली जाईल अस वागण्याची .

 पण विश्वास न ठेवण्यासारखी गोष्ट आहे . बऱ्याच मुलींवर ही वेळ त्यांच्या आई वडिलां मुळेच येते . 
त्यांच्या आई वडीलांमुळेच त्यांना बाहेरच्या जगात आभासी प्रेम शोधावं लागतं . आणि ते एकदा झालं ना तर , मग त्यातून बाहेर पडणं शक्यच नसतं . आई वडिलांनी प्रेम स्वीकारलं नाही तर , मग शेवटचा ऑप्शन पळून जाणं किंवा आत्महत्या करणं एवढंच त्यांना माहीत असतं . पण आपण कधी ह्याचा विचार केला का ? ही वेळ त्यांच्यावर का आली ... नाही कधीच नाही ना ...


   माझी एक मैत्रीण होती आणि आता सध्या एक आहे . ज्या माझ्याशी एकदम सगळ्या गोष्टी फ्रीली शेअर करतात . ती तिच्या आई वडिलांचा खूप विचार करते . तिची आई तिचा जीव की प्राण आहे .  
तरीही तिने फिक्स केलय आपलं प्रेम जर उद्या कोणीही स्वीकारलं नाही तर पळून जायचं . तिची लव्ह स्टोरी पण खूप छान आहे . त्यामुळे तिचं ठाम मत मला कधी कधी आवडत . पण कधी कधी नकोस वाटतं . उगाच आई वडिलांचं नाव खराब होईल . अनेकदा मी तिला समजवण्याचा प्रयत्न ही केला . पण ती ऐकणार नाही . ह्याची मला खात्री आहे ... 

हीची कहाणी जर पहिली ना तर खरच विचार करण्यासारखी आहे . तिच्याशी जेव्हा जेव्हा बोलत असते . तेव्हा तेव्हा वाटतं हीच्यावर काही तरी लिहावं हा लेख जरी मी लिहीत असले ना , तरी ह्याचं संपूर्ण क्रेडिट तिलाच जातं . कारण हा विषय आज मला तिच्यामुळेच सुचला .. 

   कुठलीच मुलगी कधीच प्रेमात पडणार नाही . जर तिला तिच्या घरात योग्य तो मान सन्मान दिला तर , ती प्रेम शोधायला बाहेर पडणार नाही . वडिल वयात आलेल्या मुलीला उंच आवाजात बोलले नाही तर काय फरक पडतो का ? नाही ना ..

  मग प्लीज नका बोलू तुम्ही तुमच्या मुलीला उंच आवाजात कारण , वयात आल्यानंतर नाही सहन होतं तिला आपले वडील उंच आवाजात बोलतात ते . मलाही नाही आवडत माझे वडील मला कधी उंच आवाजात बोलले ते आणि कधी आवडणार पण नाही . माझ्या आईला पण नाही आवडत . माझे वडील जेव्हा माझ्याशी
उंच आवाजात बोलतात तेव्हा आणि कुठल्याच मुलीला नाही आवडत ....

तिचं चुकलं तिला प्रेमाने समजून सांगा . प्रत्येक वेळेस तिच्यावर चिडण हाच पर्याय नसतो . आणि मग जर तुमच्याकडे तोच पर्याय असेल ना तर , मग तोच पर्याय तुमची लेक तुमच्यापासून दूर दूर चालली हा संकेत पण असतो ..... कटू आहे पण सत्य आहे ..

तिला जेव्हा तुमच्या कडून प्रेम मिळत नाही. ना तेव्हाच तिला बाहेरच्या जगात प्रेम गवसत . तिला समजून घेणारा. 
वेळोवेळी कॉल करून विचारपूस करनारा . " जेवलीस काय ? मूड ठीक आहे ना ? फिरायला जायचं का ? "
असं आपलेपणा दर्शवनारे कितीतरी प्रश्न विचारनारा तिच्यासाठी जगणारा लव्ह यू ..किस यू बोलणारा हवा हवासा वाटतो . सुरुवातीला आई वडील आधी आणि मग नंतर तो अस असतं. आणि काही काळाने सर्वात आधी तो मग जग हे समीकरण होऊन बसत. तेव्हा जन्मदात्या आई वडिलांचं मोल ही शून्य असतं . 

पण खरं पाहिलं ना इथे चूक कोणाचीच नसते . मुलं वाईट वळणाला लागू नये म्हणून आई वडील धाक दाखवतात . 
आई वडिलांचा धाक मुलांना नको असतो . म्हणून ते त्यांचं वेगळं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात . 

जो तो ज्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर असतो . आपण कोणालाही चुकीचं नाही ठरवू शकत . 

पण एक सांगते समजून जर घेतलं ना , तर अनेक वाईट गोष्टींना आळा बसू शकतो . आई वडीलांनी पण मुलांना समजून घ्यायला पाहिजे . ते आपल्या आयुष्यातील छोट्या तील छोटी गोष्ट आपल्या बरोबर शेअर करू शकले पाहिजे . एवढं फ्रीडम प्रत्येक आई वडिलांनी आप आपल्या मुला बाळांना द्यायलाच हवं . तरच खऱ्या अर्थाने प्रेम - माया - ममता जिव्हाळा - आपुलकी टिकून राहील. 

हा लेख लिहिण्यामागचा उद्देश एवढाच आई वडील आणि मूल ह्याचं नातं एकदम फ्री असायला हवं . केवळ प्रेम फॅमिली य प्रेम मिळत नाही . ह्या कारणामुळे मुल किंवा मुली प्रेमात पडायला नको . ह्या कारणा व्यतिरिक्त जेव्हा व्यकी प्रेमात पडतो . ना ते खरं प्रेम असतं . आणि तेच प्रेम शेवट पर्यंत टिकतं . 

केवळ घरचे प्रेम करत नाही . म्हणून प्रेम बाहेर शोधण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे . घरचे ही आपल्यावर खूप प्रेम करत असतात . हे सगळ्यात आधी समजून घ्यायला हवं . तरच प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे ही कळू शकत . ते चिडतात , रागव तात आपल्याच साठी हे ही समजून घ्यायला हवं . आई वडिलांनी ही आपल्या लेकरांना एकट एकट वाट्टेल असं वागायला नको . सर्वांनी समजून घ्यायला हवं. 

हा लेख लिहितांना कोणाच्याही भावना नकळत दुखावल्या गेल्या असतील तर माफी असावी . कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही . मी फक्त माझे विचार मांडत असते पूर्ण प्रामाणिक पने ...

मी डायरेक्ट पॉइंट मांडते . मी लेटेस्ट विचारांची लेटेस्ट लेखिका आहे . त्यामुळे माझे सगळेच पॉइंट तुम्हाला पटतीलं अस नाही . जे नाही पटलं ते बिनधास्त सांगा कॉमेंट बॉक्स मध्ये ....

थँक्यू सो मच ऑल ऑफ यू ...🙏🙏🙏🙏

Jan 9, 2022

तुझ्याही नकळत ..

तुझ्याही नकळत ,
तुझ्या हास्याच गुपित व्हायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझ्यावर प्रेम करायला आवडेल मला ..
तुझ्याही नकळत ,
तुझा राग शांत करायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझ्यासाठी प्रेम पत्र लिहायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझे ओघळणारे अश्रू झेलायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझी सकारात्मक ऊर्जा व्हायला आवडेल मला ..
तुझ्याही नकळत ,
तुझ्या स्वप्नात यायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझ्यात मनात घर करून रहायला  आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
 तुझ्या ओठांची तहान व्हायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझ्या आसुसल्या देहाचा एक पराग व्हायला आवडेल मला , 
तुझ्याही नकळत ,
फक्त तुझ्यासाठी जगायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझ्यावर प्रेम करायला आवडेल मला ...❣️❣️❣️❣️

parts of attitude ..

आजकाल attitude ह्या शब्दाकडे कोणी नकारात्मक दृष्टीने बघत तर कोणी सकारात्मक दृष्टीने बघत . 
कोणाला attitude वाले माणसं आवडतात . तर कोणाला attitude वाल्या लोकांचा खूप राग येतो . 
पण माझ्या दृष्टीत attitude चे खूप प्रकार आहे . 
ते प्रकार आज मी ह्या लेखा मध्ये थोडक्यात मांडणार आहे . 

   1 ) सभ्य लोकांचा attitude ...
सभ्य माणसांना काही घेण देण जगात काय चाललय ह्याच्याशी . त्यांना फक्त आपलं काम भलं आणि आपण भलं ह्याच्याशीचं घेणं देणं असतं . जगात काय चाललय ह्याचा विचार करण्यापेक्षा ते आपल्या भवितव्याला काय बेस्ट असणार ह्याचा विचार करत जगत असतात . 
आणि लोकांना असं वाटतं काय घमंड आहे ह्या माणसात जगात काय चाललय ह्याचा जरा पण ; विचार करत नाही हा माणूस लोकांना त्याचं त्यांच्या आयुष्यात व्यस्थ राहणं ही खटकत असतं. 

2 ) असभ्य लोकांचा attitude ...
स्वारी मी असभ्य हा शब्द वापरला खरं तर हा शब्द वापरताना मला ही खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आहे . पण लिहिण्यासाठी महत्वाचा आहे . तो शब्द खरच स्वारी ....

तर , असभ्य लोकांचा attitude ....ते फक्त पकावू असतात . मी ह्याव करण अन् त्याव करण आणि वेळ आल्यावर काहीचं नाही . माझ्याशिवाय काहीचं होवू शकत नाही.  मी  आहे . तर , सर्व आहे . माझ्या शिवाय सर्वांची कामं अपूर्ण राहतात.  मनी मी पना थोडक्यात सांगायचं तर , फुगीर पना हा फुगीर पना सर्वानाच खटकतो.  पण हा ही एक प्रकारचा सुंदर attitude आहे .हा attitude पण सर्वांनाच नाही दाखवता येत.  तो दाखवण्यासाठी मुळात
अगांत attitude असावा लागतो . 

3 ) शांत लोकांचा attitude ....
शांत माणसं आपल्याला दुबळी वाटतात . ह्याच्यात काय दम असणार असं म्हणत , सगळेच त्याला इग्नोर करतात. किंवा कमी लेखतात.  इतरांपेक्षा शांत माणसाला कोणी ही कमीच लेखत . पण शांत वाटणारे पण सगळेच दुबळे नसतात . शांत पना हा त्यांच्या  अंगी 
असलेला एक चांगला गुण असतो . शांत शांत वाटणारे .
वारंवार त्यांना प्रुव्ह करण्याच्या फंद्यात पडत नाही..
पण जेव्हा ही ते स्वतःला प्रुव्ह करतात ना , तेव्हा एकदम
राडा करतात . नकळत पने सर्व सामान्यांच्या तोंडून एक वाक्य ऐकायला मिळत . " अरे वाटलं नव्हत हा पोरगा एवढा पुढं जाईल.  किती शांत होता हा कोणाला बोल म्हंटल्याने बोलत नव्हता . पण आज कौतुकास्पद कामगिरी केली .." 
असं म्हणत सगळेच त्याच कौतुक करतात.  सांगायचं एकच attitude चे पण खूप प्रकार असतात . 
पण मला सगळेच माहीत नाही . पण एक नक्की खूप प्रकार आहे . प्रत्येक attitude वाईट नसतो . Attitude मध्ये पण एक वेगळाच टॅलेंट असतो ..

थँक्यू सो मच ...
हा लेख लिहिण्याची आयडिया मला येवला सरांनी दिली.
पण मी एवढा ही परफेक्ट नाही लिहू शकले जेवढं सरांन
 वाटलं होतं . जेवढं सुचलं तेवढं लिहिलं ..

काही चुकल असेल तर क्षमस्व : 

दुर्गा मते
©®


अवचित वळण ...

चढ उतार ठरलेले आहेत..
अवचित येणाऱ्या वळणांची भीती नाही ..

ती वळण ही बरच काही शिकवतात ,
आयुष्याशी ह्या नव्याने ओळख करून देतात ..

अंगी कमी असलेले गुण ही डेव्हलप होतात ,
वळणावळणावर मग तेचं साथ देतात ...

अवचित येणारी वळण वाईट कधीच नसतात ,
त्या वळणांना बघण्याची दृष्टी मात्र सकारात्मक हवी ,
तरच विचारप्रणाली मनी रुजेल नवी ...

जी जगण्यास ठरेल अनमोल ..
विचार करायला लावेल सखोल ...
अवचित वळण ही असतात अनमोल ,
मग पटेल ओळख ......

दुर्गा मते 
©®

Jan 8, 2022

माणूस तिथे माणूस राहत नाही ..

माणूस तिथे माणूस राहत नाही ,
स्वतःला काय वाटतं ते ही सांगत नाही ..


दुःखाने पिडतो , सुखासाठी दडपडतो ,

आपण माणूस म्हणून जन्माला आलो ,हेचं  विसरतो .

माणूस तिथे माणूस राहत नाही ...


अहंकार त्याचा उंचावतो ,

मनाचा मोठेपणा कुठेतरी विसावतो ,

माणूस तिथे माणूस राहत नाही ...


उच्च - नीच्चता जिथे बघायला मिळते ,

वर्ण भेदाची कळी उमललेली असते ,

श्रेष्ठ - कनिष्ठ जिथे मनी रूजलेलं असतं ,

माणूस तिथे माणूस राहत नाही ...


परकेपणाचे सतत दर्शन होते ,

पांग फेडण्याच मानव जातीचा ,

हा जन्म लाभला ..

हा विचाराचं मनी कधी नाही रुजला ,


तिथे माणूस माणूस म्हणून जन्माला आला तरी कसा ?

माणूस तिथे माणूस राहत नाही ,

स्वतःला काय वाटतं ते ही सांगत नाही ..

Written by - durga mate



आठवण माझी

आठवण माझी ,
त्यात ओढ तुझी ..
हिंदोळ्यावर रोज झुलते मी ,
स्वप्न घेऊन उराशी ...

हलकं हलकं वाटतं ,
जेव्हा मन माझं ,
तुझ्यासमोर रीत होतं ..

माझ्या हर एक ,
प्रोब्लेम वरच सल्युशन ,
 तुझ गोड हास्य असतं ..

आठवणींच्या हिंदोळ्यावर ,
झुलतांना तू सोबत असावं ,
सारखं वाटतं ..

तू नसतांना आयुष्य नकोस वाटतं ,
श्वास घेणं मुश्किल होतं ,
तुझ्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतं ,
ते खऱ्या अर्थाने कळत ..

दुर्गा मते 

Jan 7, 2022

हा प्रश्न पडतो मला

खेळण्यासाठी तर खूप गोष्टी आहे .
मग माणसं भावनांशी का खेळतात ?

शरीरातील खूप पार्ट आहेत .
जे की दुखवता येऊ शकतात ..
मग वेडे लोकं मनाचीच का निवड करतात ?

यातना तर खूप असतात ..
मग विरहाच्याचं का त्रासदायक ठरतात ?

ती त्याच्यावर जिवापाड प्रेम करते ..

मग का तरीही तो तिला ,


टाइम पास म्हणून युज करतो ?

असंख्य स्वप्न बघितलेली असतात ,

तिने त्याच्या साथीने ..

तो नेमकं तेचं का विसरतो ?


जेव्हा ही केव्हा मी विरहात ,
चाचपडत असलेली मैत्रीण बघते ना ..
तेव्हा तेव्हा मला प्रश्न पडतो ....

देव करून ही वेळ कोणावरही न यावी ...

बिचारा तो भुकेने तडफडत होता . भाकरी साठी याचना करत होता . बाजीवर भुकेपोटी तळमळ करत होता . त्याची ती तशी अवस्था पाहून , तुमच्या आणि माझ्या सारख्याच्या डोळ्यात सहज पाणी येईल . पण त्याची अर्धांगिनी मात्र त्याला तस तळमळत पाहून खूप खुश होती . त्याचे अश्रू आणि हुंदके तिच्या हसण्याचे कारण ठरत होते.  

        राधिका ताईने आपल्या टोपल्यात असलेल्या दोन ज्वारीच्या भाकरी आणि पिठल त्याच्यासमोर ठेवलं . आणि त्याला पिण्यासाठी पाणी दिलं . त्याने घठा घठा पाणी पिल . मन तृप्त झालं . भाकरीचा एक तुकडा तोंडत टाकला . तेवढ्यात त्याची अर्धां गिनी आली . आणि त्याच्यासमोर असलेलं . ताट हिसकावून घेत बोलली , " मी तुला शेवटच्या श्वासापर्यंत अन्नासाठी तर सवणार . तू शेवटी तळ तळ करत मरला पाहिजे ते ही केवळ अन्नासाठी . 

तिचे ते बोल ऐकून सर्वांना च तिचा तिटकारा वाटला . तेवढ्यात शांत असलेला अण्णा आणि शेवटच्या घटका मोजत असलेला अण्णा तळमळीने बोलला ..
" तू आज मला अन्ना साठी तर सवत आहेस ना , अशीच एक दिवस तू ही तरसशील . आणि मग तुला माझी आठवण येईल . माझ्याही पेक्षा तुझी अंतयात्रा जास्तीचं भयानक असेल . तुझ्या पापाचा घडा भरला आणि तो लवकरच फुटेल लक्षात ठेव . " असं बोलून त्याने शेवटचा श्वास घेतला . 

त्याचा शेवटचा श्वास तिचा आनंद गगनात मावेनासा झाला . तिने त्याला शेवटचा नमस्कार तर केलाच नाही . त्याच्या देहाला लाथ मारली . आणि ती तिथून निघून गेली . 

देव करो अशी घटना कधीच कोणा बरोबरही न घडो . शेवटच्या क्षणी जेवढं आपल्याला शक्य असेल , तेवढ्या त्या आत्मच्या ईच्शा पूर्ण करायला हव्या ..

ही कथा पूर्णतः काल्पनिक तेवर आधारित आहे . कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ..

शोध ..

स्वप्न मी आकाशी शोधू पाहिलं ,
ते मला जमिनीतचं गवसलं ..

उमेदीने जगताना ,
सुख हरवल्या सारखं वाटलं ,
दुःख दिसेनासं झालं ,

आयुष्य खूपच बिझी झालं ,
माझ्यातल मी पणचं हरवलं ,

एकांतात जावं म्हंटलं ,
तर माझंचं मन ,
माझ्यावर हसलं ..

आपल्याच माणसांसाठी वेळ पुरेना ,
कुठे एकांत शोधायला चालला ? 
हक्कान विचारलं ! 

स्वतःपासून दूर पळण्याचा ,
खूप प्रयत्न केला ..
तरीही शेवटी शोध ,
हा माझ्या पाशीच येऊन संपला ...

Written by -
Durga mate 


Jan 6, 2022

असं कसं रे प्रेम तुझ ?

 
" असं कसं रे प्रेम तुझ ? घडीत जागं होतं . आणि घडीत अलिप्त होतं . मी व्यक्ती आहे . भाव - भावना आहेत मला 
तुझ्यासारखचं एक मन आहे मला , ज्याचा तुला विसर पडलाय . " वसू अत्यंत तळमळीने बोलत होती.  

तरीही समीरचा तिला काहीचं रिस्पॉन्स नव्हता . तो मूग गिळून गप्प बसला होता . ती तनफण - तनफण करत होती . रडत होती . पण तो मात्र शुंभा सारखा नुसत तिच्याकडे बघत होता . तिच्या डोळ्यातील पाणी वाहत होता . तरीही त्याला काहीही फरक पडत नव्हता . तिला त्याच्या तशा गप्प बसण्याचा खूपच त्रास व्हायचा . 
आणि हे फक्त आज पहिली वेळेस नव्हत घडल . हे सारखं सारखं घडायचं . हिला फार त्रास व्हायचा . म्हणून आज तो काय प्रेमाचा शेवट करायचा . असं मनात ठरवूनचं ती त्याच्याशी बोलत होती ...

" बोल ना रे ! असा काय मुग गिळून गप्प बसला " , ती श्वास एकवटून म्हणाली . 

त्याने एक शब्दही उच्चारला नाही . तिच्यासमोर उभा असलेला समीर बेड वर बसायला गेला . तिला तर जावून एक थोबाडीत द्यावी वाटतं होती त्याच्या पण हात बांधलेले 
श्वास कुठेतरी त्याच्यात अडकले होते.  
म्हणून ती गप्प राहिली . रड रड रडली . तिचं रडगाण बघून समीर घरातून फरार झाला .

" का रडतेस ? काय झालं ? " 
हे विचारायचं तर दूरच ती रडत असताना साधं त्याने तिच्याकडे ढुंकून ही पाहिलं नाही . तशीच त्याने बाईक काढली आणि बाहेर निघून गेला ...

त्याच तस काहीचं न बोलता निघून जाणं खूप त्रासदायक होतं तीच्यासाठी . ती अजूनच जोर जोरात रडायला लागली . तिचा आक्रोश एवढा वाढला की शेजारच्या घरी गेले समीरची आई घरी परतली ..

" काय ग ? काय झालं एवढ्या मोठ्या ने का रडतेस ? आणि समीर कुठे गेला " त्याची आई तिला शांत करत विचारत होती . 

तिने ही स्वतःला सावरलं घडलेला सारा प्रकार समीरच्या 
आईला सांगितला...आईला त्याच्या तशा वागण्याचं गूढ चांगलचं माहीत होतं. 

" शांत हो बाळा , नको रडूस अशी . अग तो तसाच वागतो . माझ्याशी पण तसचं वागतो . कारण मेंटल प्रोब्लेम आहे त्याचा मानसिक आजार आहे त्याला . शक्य असेल तर विसर माझ्या लेकराला आणि त्याच्यापासून मुक्त हो .
तो तुझ्यावर कधी प्रेम करेल ही आशा सोडून दे . कारण त्याने अजुन माझ्यावर ही कधी खरं प्रेम केलं असेल ह्याची खात्री नाही देऊ शकत.  
अग तू त्याच्यासोबत खुश राहशील अस मला तरी नाही वाटत . विसर बाळा तू त्याला एक आई नाही तर , एक स्त्री म्हणून तुला सांगते . आता तुझी इच्छा ! "

आई ने सांगितलेला त्याचा आजार ऐकुन ती निशब्द झाली . आईच्या कुशीत जाऊन रड रडली . 
" थँक्यू आई तुम्ही मला समीर बद्दल खरं खरं सांगितल . 
मी उगाच इतक्या दिवस त्याच्यासाठी थांबले होते . आता नाही थांबणार एक नवी झेप घेणार . आशीर्वाद असू देत आई . " 

" अग बाळा , थँक्यु काय ? आई बोलतेस ना मग थँक्यू काय ? " आई तिच्या कपाळावर किस करत बोलल्या .

" आई आपल्याच मुलांबद्दल एवढं वाईट सत्य कुठलीच आई सांगत नाही " ती त्याच्याकडे प्रेमाने बघत बोलली .

" माझ्या मुलामुळे कोणत्याही चांगल्या मुलीचं आयुष्य बरबाद व्हावं . असं नाही वाटतं बाळा मला " आई हुंदके देत देत बोलल्या ...

" आई ...." हा शब्द उच्चारत वसू आईच्या कुशीत शिरली आणि रड रडली ...आणि आयुष्याची एक नवीन सुरुवात
करण्यासाठी सज्ज झाली ..

कशी वाटली माझी ही स्टोरी आवडल्यास कॉमेंट नक्की करा ..

लेखक जन्माला येतो .....

आयुष्यात कितीतरी चांगले वाईट अनुभव ..खाच खळग्यांचा ..प्रवास . संघर्षाची रात्र ह्यातून जन्माला येतो तो लेखक ...कवी अजरामरचं होतो ...

रचनेत त्याचे अनुभव टिपत असतो . लेखाद्वारे मानवी संदेश तो देत असतो . कथेमध्ये त्याचेच आयुष्य तो मांडत असतो . 

लेखक हा त्याच्या परिस्तिथीतून मनस्थितीतून जन्माला येत असतो.  

परकेपणा झेलत झेलत तो  जगत असतो . वेडा कवी म्हणून जगप्रसिध्द होतो . लेखक कवी हा ऑन द स्पॉट जन्माला येतो . परिस्थिती वर मात करून तो नावा रूपाला येत असतो . 

लेखक  - कवी जितका कणखर तितकाच हळवा असतो.
सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलतेचं रूप असतो . 

टीका त्याच्यावर पेटून उठतात , 
लिखाण त्याचं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.  तरीही त्याचे शब्द त्याला लढण्यासाठी बळ देतात. कल्पना त्याची सहानुभूती होते.  नकळतपणे त्याची मानसिकता त्याचीच सकारात्मकता होते ..

लेखक - कवी संकटांवर मात करूनचं जन्माला येतो.  
नव्या जिद्दीने , नव्या उमेदीने त्याच्या लिखाणाला बळ देतो ..

हा लेख लिहिताना कोणाच्याही मनाला किंवा भावनेला ठेच पोहोचली असेल तर चूकिस क्षमस्व : 

दुर्गा मते 
©® 

गंध फुलांचा

गंध फुलांचा ,
साद घाली मनाला ..
तेरी याद आती है राजा ..
हर एक क्षणाला ...

किती तुझ्या आठवात बसू झुरत ,
प्रेम पत्र तू दिलेले ,
किती ठेवू दडून मनाच्या कुपीत ....

असू डोळ्यांतले ,
किती रे वाहू ,
फुलांचे सुगंधाचे अत्तर ,
कसे रे जीवनी मी लेवू ,

तू आलास आयुष्याला 
गंध नवा लाभला ,
जणू जिवंत पणीच स्वर्ग  मिळाला ..

तू गेलास ,
आयुष्यातील गंध घेऊन ,
स्मशानभूमीत जिवंत मनाची ,
अन् आयुष्यातील कित्येक क्षणांची चित्ता पेटून ..

आयुष्याचा गंध गेला ,
जेव्हा सख्या तू ,
 सोडून मला गेला ...
आयुष्यातील किती तरी गोड क्षण ,
जे होते तुझ्याबरोबर घालवायचे ,
ते अपूर्णच राहिले .....
आयुष्य जणू क्षण भंगुर झाले ....

ही केवळ काल्पनिक रचना आहे . माझ्या आयुष्याशी निगडीत नाही ...
Durga mate 
©®

Jan 5, 2022

शब्दाचं महत्व ..

शब्दाचं महत्व तेव्हा कळत . जेव्हा आपल्यावर आपल्या जिवाभावाच  आपल्या हक्काचं कोणीतरी खूप नाराज होतं.  तेव्हा वाटतं शब्द जरा जपून वापरले असते तर किती बरं झालं असतं ना . एक चांगलं नातं कधी तुटलंचं नसतं . 

पण तेव्हा वाटून काय फायदा . वेळ निघून गेलेली असते.  हाती पश्चातापशिवाय काहीचं ऊरत नाही . तेव्हा उगाच चुटपुट लागून राहते.  मन स्वतःच स्वतःलाच खात राहते . त्याआधी तोंड सांभाळल असत तर खरचं खुप बरं झालं असतं . असं वाटायला लागतं . 

वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला  काहीचं अर्थ  नसतो . काही गोष्टी अशा असतात.  ज्या की वेळीच सावरायला पाहिजे . आवर घालायला पाहिजे . स्वतःवर मनावर . सर्वच गोष्टीवर .मग विनाकारण त्रास नाही होतं.  

     त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या तोंडून निघणारे शब्द . ते नकळत बाहेर पडतात . कधी कधी तर मनात काहीचं नसतं .  बोलायला छान वाटतं.  म्हणून बाहेर पडतात . शक्यतो रागाच्या भरात आपण खूप जास्त बोलतो . तोंडाला येईल ते बोलून जातो . नकळत 
कारण तेव्हा त्या क्षणापुरता समोरच्या  व्यक्तीचा चांगुलपणा आपण विसरलेला असतो.  त्या व्यक्ती बद्दल मनात खूप राग आलेला असतो.  म्हणून वाट्टेल ते बोलून जातो.  त्याचा नंतर नात्यावर काय साईड इफेक्ट होईल.
ह्याची ही पर्वा करत नाही . तेव्हा खरं तर ते शब्द सावरायला हवे . थोडा त्या वर  शब्दावर ही आवर घालायला हवा . 

मला माहितेय ते वाटतं तेवढं सोपं नक्कीचं नाही . हे कारण मी पण खूप संकी आहे.  राग आल्यावर काय बोलेल ह्याची खात्री नाही देऊ शकत . हा पण एक चांगला गुण म्हणजे . राग शांत झाल्यावर स्वारी बोलून समोरच्याला मनवते . त्यामुळे सहसा माझ्यावर कोणीही नाराज होतं नाही . पण समोरचा तरी कितीदा समजून घेईल . त्यामुळे मी शब्दावर कंट्रोल करायचं ठरवलेलं आहे . आणि करणारच.  म्हणून तर हा लेख लिहून स्वतःला समजावते ....

    शब्द हे खूप जपून वापरावे ,
    ते एक शस्त्र असतं . 
   आपल्या चांगल्या व्यक्ती महत्वाचं ..
    एक god gift असतं . 
    उज्वल भवितव्याच .....
    तेच शस्त्र रक्षण करत असतं ..
     जोडलेल्या प्रत्येक नात्याच ....
    

Jan 4, 2022

प्रेम बंधन भाग - 18

कालच्या भागात आपण पाहिलं शेखर आणि .. डी. एस पी .साहेब बंधोबस्त करण्यासाठी . मुंबईला जाणार होते . नित्या शेखरला रडवलेल्या स्वरात बाय बाय बोलते ...

नवीन शहर परकी माणस . नित्याला खूप एकटं एकटं वाटतं होतं . शेखर ची कमी खूपच जाणवत होती.  ती सतत रडत होती . वेळ जावा  म्हणून लिखाण करत होती . खूपच एकटं एकटं वाटलं तर मग कोणाशी तरी चॅटिंग वैगरे करत होती . 

दिवस कसा तरी कटला पण रात्र तर , तिला खायला उठली होती . सायंकाळचे 6 वाजले असतील . तिने देवासमोर दिवा वैगरे लावला . आणि काहीतरी खायला करायचं म्हणून किचन मध्ये गेली . 

काय करावं सुचत नव्हतं . केवळ  एकटी साठी तिला पोळी भाजी बनवण्याचा कंटाळा आला होता.  तिने खिचडीचं साहित्य काढलं कांदा वैगरे कट केला . एवढ्यात नको थोड्या वेळाने बनवते . जेव्हा जेवण्याची वेळ होईल तेव्हा गरमा गरम पोहे . असं म्हणत परत ते साहित्य व्यवस्थित झाकून ठेवलं.  आणि हॉल मध्ये परत मोबाईल चाळत बसली ..

Wp आवडत्या व्यक्तीचा मेसेज बघून खूप खुश झाली .
  कोणाचा असेल बरं हा मेसेज शेकरचा की राहुलचा ?

नका ताण घेऊ मीच सांगते . राहुलचाचं मेसेज आला होता.  
Hi ! Can i call you ? 
तिने मेसेजला रिप्लाय न देता डायरेक्ट त्याला कॉल केला.

" कसा आहेस ? "  नित्या 

" कसा असेन सांग बरं ? "  राहुल 

" तू तर मस्तच असणार तुझ्या बरोबर रिदिमा आहे ना . "
नित्या त्याला चिडवत बोलते .

" हो का ? मग तू कशी नाराज असणार .. तुझ्या बरोबर पण आहे की तुझा शेखर ..तू पण खुशच असणार ना. "
राहुल तिच्यावर चिडत बोलतो . पण जस्ट मजाक .

 नित्या खोल आवाजात " नाही ना ! मी एकटीच आहे . बोर झाले खूप " 

" Ohh ! शेखर कुठे गेला ? "  राहुल ..

" तो बंधोबस्त करण्या साठी.  मुंबईला काल . आठ दिवसांसाठी.  आठ दिवस मी पुण्यात एकटीच.  " नित्या 

राहुल ती पुण्यात शिफ्ट झाली ह्याबद्दल काहीचं माहीत नव्हत . त्यामुळे तो ...मोठ्याने उंच स्वरात 
" पुण्यात ? "

" हो पुण्यात " नित्या 

" औरंगाबादचं पुणे कसं काय झालं ? " राहुल 

" औरंगाबादचं काही नाही झालं . मी शिफ्ट झाले पुण्यात..." नित्या ..

" कधी झालीस ? तू मला बोलली नाही काही ? " 
राहुल 

" हो अरे !  नाही बोलले वेळ नाही झाला मला . शिफ्ट झाल्यानंतर घर सेट करण्यात काही दिवस गेले.  आणि काल शेखर पण बंधोबस्त करण्यासाठी गेला.  सो आज वेळ होता.  म्हणून कॉल केला.  आणि स्वारी रे तुला सांगितल नाही त्यासाठी ..."  नित्या 

" इट्स ओके ! मग आवडल की नाही पुणे ? "  राहुल 

" अरे बाबा ! आत्ता शिफ्ट झाले . अजुन मला रस्ते नीट नाही माहीत नक्की कोणता कुठे जातो.  आणि शेखर पण गेले.  उद्या मार्केट मध्ये जाण्याची पंचाईत आहे माझी . तू पुण्याचं काय विचारतोस मला " ती चिडली होती बहुतेक. 

" चीडतेस काय मग नीट सांग ना . नीट सांगशील तर , जास्त व्यवस्थित कळेल मला .." राहुल 


" चिडली कुठे रे ? सांगतेय तुला " नित्या 

" तुझ तसचं आहे बघ . चिडते , रागवते.  आणि वर बोलते . कुठे चिडले ? कुठे रागवले.  "  राहुल 

" अरे काहीही काय ? " नित्या डोक्याला हात लावून बसली . काय माणूस आहे हा मनातल्या मनात पुटपुटत होती. 

" काही नाही राहू देतं " राहुल 

" अरे ! " नित्या 

" जाऊ दे रे ! " राहुल 

कुठे ह्याला डोकं लावत बसायचं असं विचार करून ती 
" ओके जाऊ देत " बोलते .

" Hmm , good उद्या पुणे दर्शन माझ्या सोबत घेणार का ? " राहुल 

" तुझ्यासोबत .." नित्या 

" हो " राहुल 

" अरे पण तू कोल्हापूर मी पुण्यात कस शक्य आहे.  " 
नित्या 

" मी पण पुण्यात आहे . सर्व शक्य आहे तुला चालणार असेल तर , "  राहुल 

" ओके चालेल मला . ये तू उद्या . मी माझ्या घरचा adress सेंड करते.  " नित्या ...

क्रमशः 

काय  वाटतं तुम्हाला कसं होईल नित्या आणि राहुलचं पुणे दर्शन . घेऊन येईल लवकरच .. 


वाढ दिवस माझ्या besti चा ..

Many many returns happy of the day 
   Dear besti 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आज माझ्या बेस्टीचा म्हणजे जयश्री ताईचा वाढ दिवस आहे . तिला वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...

तुला रचनेत कस मी सामावू , शब्द कमी पडतील एवढी तू सुंदर , मला लहान बहीण नाही ..तिची कमी तू पूर्ण केली ... प्रतिलीपी मुळे खूप चांगले वाईट अनुभव आले .
पण नशीब चांगलं तुझ्यासारखी एक जिवाभावाची बहिण , मैत्रीण मिळाली...

खूप काही शिकवलं , मी लहान म्हणून सगळ्या चुका माफ केल्या. तू मला दिलेली सर्वात महत्वाची शिकवण मी आज इथे लिहिणार आहे.  
जयश्री ताईने मला एक खूप महत्वाची शिकवण दिली .
शब्द जरा जपून वापरावे ..एकदा बाहेर पडलेला शब्द वापस घेता येत नाही . नाती लगेच तुटतात त्यामुळे शब्द जपून वापरावे . थँक्यू सो मच ताई तुझ्यामुळे मी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा संकल्प केला आणि पूर्ण पण करणार आहे . कारण तू सांगितलेलं आवडल मला ...
Thankyou so much dear besti ...
And once again many many returns happy of the day 💐💐💐💐 god bless you dear ..
 

   जपायला शिकवली विण नात्याची ,
   यशोदा जशी कृष्णाची तशीच जयश्री ताई माझी ,
   श्रीमंत मनाची ही जयश्री ताई ....
   ताई माझी लाडकी ...
   ईश्र्वर तुला सैद व खुश ठेवो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना ..........
नेहमी योग्य ते सांगते सोशल मीडिया वर कोण कोणाचा नाही . हे लक्षात ठेव . सर्वांशी जरा जपून मैत्री कर . कोणालाही जास्त जवळ करू नकोस. त्रास तुलाच होईल . हे ही तिचं सांगणं खूप आवडत मला ...म्हणून मी प्रतीलिपी सोडून दिली कायमची ...
पण हीच्यासाठी आज परत आले कारण ही माझी besti आहे ना ...

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...