मी लोकांना वेळेपेक्षा वेगाने बदलताना पाहिले ,
मी लोकांना त्यांचे वर्षाचे नाते क्षणात तोडताना पाहिले ..
कारण फार काही मोठे नव्हते मन दुरवण्याचे ..
निव्वळ खेळ होते ते गैरसमजाचे ..
एकमेकांचे ओघळणारे अश्रू झेळणारे ..
एका ताटात भांडून हक्काने जेवणारे ..
अचानक एकमेकांवर पेटून उठले ..
मैत्रीने शत्रूत्वाचे रूप धारण केले ...
खेळच हे नशिबाचे ,
चुकले का कोणास आजवर ते ..
कोण कधी बदलेल सांगता येत नाही ..
आता तर कोणत्याच व्यक्तीची हमी घेता येत नाही ..
Durga mate.
©®
काल्पनिक रचना असे कितीतरी माणस आयुष्यात येतात. ते मनात घर करुन राहतात . त्यांच्या चांगल्या स्वभावाने आपलं मन जिंकून घेतात .
छानच 👌👌👌
ReplyDelete