नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jun 30, 2023

अज्ञात डायरी

अज्ञात डायरीत ..
एक गुपित लपून ठेवलं ..
त्याला मनाच्या कुपीच ..
पान ही जोडलं ...

तुझी माझी भेट ..
सुंदर शब्दात रेखाटली ..
गुलाब ची ती मुकी फुल ..

आज पुन्हा केसात माळली ..

तू माझ्या सोबत ..

काढलेला पहिला फोटो ..

त्यात व्यवस्थित चिकटवला ..

तो बघतांना आज पुन्हा ..

तुझ्यात जीव रंगला ..

रंग प्रेमाचा जेव्हा माळला ..
तेव्हा त्यातच ..
विरहाचा डाव ही चांगलाच रंगवला ..
फक्त तुझ्यामुळेच मी ..
त्या अज्ञात डायरी शी नाळ जोडला ..

दुर्गा मते

Jun 29, 2023

एकटेपण नकोस झालं ..

हल्ली खूप एकट एकट राहते  .
स्वतःला खूप कम नशिबी फिल करते ..
खरच कंटाळा आला य एकटं राहण्याचा ..
बरं तरी छंद जडला लिखाणाचा ..
नाही तर काय झालं असतं ..
आयुष्य च नकोस झालं असतं ...
मोबाईल माणसाची कमी नाही भरून काढू शकत ..
पण मन गुंतवून ठेवत ....
म्हणून थोड हलक वाटतं ...
तरीही आता हे एकटेपण नकोस झालं ..

एकटेपणा

" सुधा अग प्लीज लग्न कर ..अशी एकटीने संपूर्ण आयुष्य नको राहू ...एकट्या बाईचं जगात वापर न खूप अवघड असतं..त्यात तू तरुण ..तुझ्या सोबत जे घडल ते वाईटच ..ते कुणाही सोबत घडू नये . हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
प्लीज बाई तू लग्न करून घे ...ऐक माझ .."

सुधा ची आई तिला समजावत होती.  आणि सुधा मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती ...काहीही झालं तरी तिला आता दुसरं लग्न करायचं नव्हत.  संपूर्ण आयुष्य एकटीने जगायचं ..असा मनी कयास च तिने बांधला होता ..

" आई ...दुसर लग्न करू आणि पुन्हा एकटं राहू ...तुला ही माहीत आहे ..चांगलं मला माझ्या नवऱ्याने का सोडलं ते ...."

एवढं बोलून सुधा भरल्या डोळ्यांनी आपल्या आई कडे बघू लागली ...आईची नजर ती बोलल्या वर आपसूकच खाली गेली .....

आणि त्यांनी ही त्यांच्या डोळ्यांतील आसवांना वाट मोकळी करून दिली....

" आई प्लीज नको रडू अशी ....मी कधीही आई होऊ शकणार नाही ...म्हणूनच हर्ष वर्धन नी मला सोडून दिलं ना ...मग आता कशा वरुन मला दुसरा एखादा पुरुष स्वीकारेल ...? "

तिला खूप त्रास होत होता. बोलताना पण तरीही ती बोलत होती . कारण तिला माहीत होतं ...आपण आयुष्य भर एकटे तर राहणार आहोत . पण त्या एकट्या पणा सोबत हा त्रास ही राहणार होता ..

आई काहीच  न बोलता आत निघून गेल्या ... आणि सुधा ने आज नव्याने तिचा एकटेपणा स्विकारलारला तो ही आयुष्यभरासाठी ...


Jun 28, 2023

कनेराचे फुल

कोणाला गुलाबाच फुल आवडत तर कोणाला जाई - जुईच् पण,
मला आवडत ते कनेराचे फुल ...
जरा जगावेगळी चॉईस आहे माझी पण काय करणार कनेराच्या
फुलाला  कोनीच् आपल मानत नाही . आणि मि सगळेजण करतात तसा अन्याय त्याच्यावर् करू शकत नाही . आता तुम्ही विचारालं फुलावरही कोणी अन्याय करत का ? तर मि सांगेन हो
फुलांवरही अन्याय होतो , मि स्वतः हा पाहीलंय् फुलांवर अन्याय. होताना  सर्वच् फुलांवर नाही होत पण बीचाऱ्या कनेरावर् मात्र नक्कीच् होतो .
शहरी भागात नसेल होत कनेरावर् अन्याय , कधाचीत् कनेराची गोष्ट च् माहित नसेल , पण मि खेड्यात राहते त्यामुळे माझा  कनेराशी संबध् आला आणि त्याची गोष्ट कळाली ........
माणसं माणसावर् अन्याय करतात हि तर मनात खंत आहेच् पण याहून मोठी खंत आहे  ति माणसाने निसर्गालाही नाही सोडलं या गोष्टीची .
माझ्या गावांत एक जागृत देवस्थान् आहे , त्यामुळे  रोज सकाळी लवकर उठायच् , बागेत जाऊन फुल आनायचे आणि देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे हे आम्हा मैत्रीनीच्  ठरलेल
रुटीन आहे . ह्यात कधीच बदल नाही झाला कितीही. कामं असो आम्हचा नियम म्हणजे नियम् आहे . आम्ही मैत्रीनी सोबत जायचो , सोबत यायचो .पण आज मला जरा जास्तच उशीर झाला . मैत्रीनीही मला एकटीला मागे सोडून निघून गेल्या होत्या
मग काय मि एकटीच बागेत गेले , दररोजच्या सारखे आज तिथे फुलच् नव्हते . मात्र बघताक्षणी लक्ष वेधून घेणार एक फुलपाखरु मला दिसलं . काळ्या रंगाची बॉर्डर असलेलं ते फुलपाखरु  , छटा हि लाल पांढऱ्या रंगांच्या अगदी काळ्या बॉर्डरला शोभेल अशा , त्याच ते रूप बघून मि त्याच्याकडे एकटक् बघतच्  राहिले . नकळत त्याच्याजवळ गेले अन माझ्याकडून ते ज्या फुलझाडावर बसलेल् होत .ते झाडच् हाल्ल् आणि ते उडायला लागल् , मि हि त्याच्या मागे धावू लागले , खूप दुरवर् धावत गेले अगदी बागेच्या शेवटच्या टोकापर्यंत तिथेही डोळे दिपतील् असं निसर्गसौंदर्य बघायला मिळाल् जे आजपर्यँत मि  नव्हतं पाहिलं . उग्र वासाची घाणेरीची फुल तर होतीच् , पण त्याचबरोबर् होती ती मंद गुलाबी रंगाची कनेराची फुल त्याच्या सुंगधाने तर मनाला साद घातलीच् होती , पण रुपही मनाला मोहवनारच्  होत . ती फुल पाहून मि खूप खुश झाले . कारण आज वेगळया प्रकारची फुल मि मंदिरात घेऊन जाणार होते .
जे आजपर्यँत कोनीहि नेले नव्हते .
जवळ असलेल्या पारडीत् मि सारी फुल तोडून् ठेवली आणि घाई - घाईने मंदिराच्या दिशेने निघाले , तिथे गेल्यानंतर स्वप्नांतही विचार नव्हता केला असा प्रकार घडला . मि पूजा केल्यानंतर देवी समोर फुल ठेवणारच् तर ,  ती फुलाची पारडी एका बाईने
घेतली आणि ती कनेराची सारी फुल मंदिरापासुन् खूप दुरवर् असलेल्या कचऱ्याच्या पेटीत नेऊन टाकली . मला त्या बाईचा खूप राग आला , पण मि काहीच नाही बोलू शकले कारण ती गावातील् सर्वात वृद्ध स्त्री होती , शिवाय तिच्या अंगात देवी येते असंही म्हणतात . म्हणून मि काहीच न् विचारता तिनेच् , सांगीतल .
             तु आज कनेराची फुल आणली हरकत नाही , पण
यानंतर हि फुल मंदिरात तर आणूच् नको पण तूझ्या घरातील्
देवाऱ्यात् हि नको ठेवत जाऊ हि फुल भूत- प्रेत काढण्यासाठी
करणी करण्यासाठी वापरतात् त्यामुळे ती फुल कोणत्याच् देवाला चालत नाही . त्या बाईच् हे बोलणं मला विचित्र् वाटलं
हास्यास्पद वाटलं ,  देवाला फुल चालत नाही असंही कुठे असत का ? पण वाद न् घालता तिथून पळ काढन् मला योग्य वाटलं .
कारण आधीच् खूप उशीर झालेला आणि सोबतही कोणीच् नव्हतं .  म्हणून मि त्या बाईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि
घरी निघून आले .
पारडीत् असणारी सारी फुल त्या बाईने फेकली खरी पण कसं काय त्या पारडीत् एक फुल अडकून राहील् होत . ते फुल मि घरी आल्यानंतर बघीतल  , आणि दिवसमोर् ठेवलं  . त्या फुलाचा सुंगध घरभर् पसरला होता , त्याच्या सुंगधाने प्रसन्न वाटत होत .
अरे व्वा ! केवढा सुंदर  सुंगध येतोय आज कोणती अगरबत्ती लावली देवासमोर असं म्हणतं म्हणतं माने काकु आम्हच्या घरी आल्या आणि त्यांनी हे कनेराच् फुल बघून डोक्याला च् हात लावला . आणि म्हणाल्या  अग हे फुल का  आणलं ? आणि आणलं तर आणलं पण देवासमोर का ठेवलं .अस म्हनतच देवाऱ्यातल्  फुल उचलुन् बाजूला टाकलं . त्याचा तो  प्रश्न ऐकून मि तर चक्रावलेच् होते . मंदिरातही ती बाई तेच बोलली आणि आता माने काकू हि तेच बोलत होत्या . आता मात्र मला शहानिशा करायची होती . नेमक कनेराचे फुल देवासमोर् ठेवल्याने काय होत ? मि माने काकूना विचारलं काय हो काकू
काय फरक पडतो कनेराच फुल देवासमोर् ठेवल्याने . काय कमी आहे त्या फुलामध्ये अबोलीलाही लाजवेल् असा त्याचा रंग
आहे , मनमोहक् असा त्याचा सुंगध हे मग का ते देवाला चालत नाही . तर त्यावर त्या म्हणाल्या हे फुल करणी करण्यासाठी , भूत काढण्यासाठी ह्याचा वापर करतात ,  म्हणून ते देवाला चालत नाही .
मला तरीही ते पटत नव्हतं , मि त्यांना म्हणाले ज्याचा उपयोग् भूत प्रेत काढण्यासाठी होतो , त्याचा देवाला विटाळ कसा असेन ? उलट जे फुल वाईट गोष्टीचा  नायनाट करतो ते फुल
देवाला सर्वात प्रिय असायला हवं नाही का ? त्यावर त्या म्हणाल्या , " करणी करण तर वाईट च् आहे ना , लोकांच् आयुष्य बरबाद होत कोणी करणी केली तर "  आता माझ्याकडे
बोलायला शब्द नव्हते ,  पण तरीही मि  समजावण्याचा प्रयत्न केला यात फुलाची काय चुक ? फुल म्हणतं का मानसाला माझा
वापर करणी करण्यासाठी कर , लोकांच् वाईट करण्यासाठी कर
त्याला तर माहीतहि नसतं आपण नेमकं कुठे आहोत् , रस्त्याच्या
कडेला कि देवाऱ्यासमोर् लोकांनी जे स्थान दिल ते तो स्थान स्वीकारतो . हे ऐकल्यानंतर माने काकूही गप्प होतात . पण तरीही त्या पुन्हां म्हणाल्याच् तुझं म्हणणं काही मला पटत नाही .
मग  मिही त्याच्यासमोरच ते फुल घेतल् आणि पुन्हां देवाऱ्यात् ठेवल् .  आणि म्हणाले  बघा काकू देवाने तर फुल झीडकारल् नाही , स्वीकारलच् . उलट ह्या फुलाने माझं देवघर् अजून छान दिसतंय . त्या ह्यावर् काहीच नाही बोलल्या , मनाशीच पुटपुटल्या अशा आगाउच्या कोण नादी लागेल . आणि निघून गेल्या .
मि जे सांगत् होते ते अजूनही नव्हतं पटलं त्यांना .
खरं सांगायच झालं तर् विक्षीप्त् माणसाची विचारशैली आहे ,  कनेराच फुल नाही . मि कनेराचा स्वीकार केलाय आणि मला वाटतं देवानेही केला .मला एक कळत नाही
निसर्गातील्  प्रत्येक गोष्टीची निर्मिती देवाने केलीय मग देवच् त्याचा विटाळ कसा करेल ?

       हि स्टोरी पूर्णतः काल्पनिक आहे पण अशा अंधश्रद्धा
अजूनही बघायला मिळतात् ,  अशा कोणत्याही अंधश्रद्धेला वाव
देण्याचा माझा हेतू नाही तर , अंधश्रध्दा निर्मुलन करण्याचा हा एक छोटासा प्रयन्त आहे . काही चुकलं असेल तर माफी असावी . देव म्हटलं की भावना असतात आणि त्या दुःखवण्याचा माझा हेतू नाही ...


मै तुम और बारिश

बारिश मै और तुम
क्या मोसम बनाया था । भगवान ने
तुम्हे देखा और मुझे एहसास हुआ प्यार क्या होता है। Love at first sight kya hoti hai ।

उस दिन बारिश में first मुलाकात हुई । और भगवान ने मेरे दिल में आपको एक जगह दे दी । कोई रिश्ता नहीं था पुराना लेकिन फिर भी आप मेरे बहुत ही करीब के रिश्तेदार लग रहे थे । दिल समझ बैठा था । शादी करेंगे तो आप से ही फिर ये बात हमने ममा से कहीं । ममा भी बहुत खुश हुई । फाइन ली में शादी के लिए राज़ी हो गया । वो खुद आपके घर मेरे लिए रिश्ता लेकर गई । और वहा जाकर उन्हें पता चला। की आप ऑलरेडी शादी शुदा हो ।
बुरा लगा मुझे फिर भी मेरे दिल ने ही संभाला मुझे 😊😊

अलक


Jun 27, 2023

आई शी मैत्री करून बघा

अन्न पूर्ण ब्रम्ह आहे....त्याचा अपमान कधीही कुणीही करू नये ...मला ही  भाजी आवडत नाही ..मला ती भाजी आवडत नाही ...मला हे नको खायला मला ते नको खायला ..ह्या सवयी माणसाला कुपोषित करतात .

.त्यामुळे आई ताटात जे वाढेल ते आपण प्रेमाने खावं ...अगदी चटणी मिरची ही तिने ताटात कधी वाढली ना तरीही ...

" हाहाहा .... आई काय चव आहे ग तुझ्या हाताला ..ह्या तिखट मिरच्याना ही तू माझ्या किती आवडीच केलं ..खरच आज ना मी रोजच्या पेक्षा एक घास शिल्लक च खाल्ला "

कधी तरी तोंडभरून मन मोकळं जेवतांना कौतुक करा आईच ...तुम्ही केलेल्या त्या प्रेमळ कौतुकाने तिच्या चेहऱ्यावर पसरणाऱ्या हास्याच एकदा निरीक्षण करा ..दिवस भर केलेल्या कामाचा तिला जो शिण आलेला असेल तो क्षणात पळून जाईल ..

ती कधी नाराज वाटली ना कधीतरी तिची मैत्रीण होऊन तिला तिचा प्रोब्लेम विचारा ...तिचं दुःख कधी आपल्याही कवेत घेण्याचा प्रयत्न करा ...आणि स्वतःच हकदार व्हा तिच्या प्रेमळ मिठीच ...


    जर आई आपली मिडल क्लास असेल ना...तर कधी तिला स्टॅंडर्ड रहायला शिकवा ..मिडल क्लास म्हणून हिं नवु नका .....


बऱ्याच मुलींना पाहिलंय मी ....


" आई प्लीज माझ्या मैत्रिणी समोर येत जाऊ नको ..लाज वाटते मला तुझी .."


असं म्हणताना ..


कधीतरी विचार करून बघावा ...तिला नसेल वाटली  का लाज आपल्याला जन्म देताना ..हे ऐकण्यासाठीच का तिने आपल्याला जन्म दिला ...निरोगी शरीवार जखमा करून घेतल्या.....


.हजारो हाड मोडली असतील तिची आपल्याला जन्म देताना ...मग आपण असं बोलून पांग फेडणार का त्याचे ..एकदा विचार करून बघावा ....


आई ही आई असते ...


तिच्या आयुष्यात ती आपल्या लेकराची जागा ..


दुसऱ्या कोणालाच देत नसते ..


आई ही आई असते ...


मिडल क्लास ...स्टॅंडर्ड अस काही नसते ..


आई ही आई असते ..


ती फक्त आपल्या लेकरांसाठी जगत असते ..


असतील तिची ही काही स्वप्न ..


घेतले का कोणी ते विचारण्याचे कष्ट ..

एकदा त्या आईशी
मैत्री करून बघा ..
तिच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करा ..

Written by - durga mate

हे नातं नवं

हे नातं नवं नवं
मला हवं
जस पानावर पडतं दव

तस नातं हे नवं नवं  ऋतलं मनामधी ,
  दे ,  ना रं तू हात हातामधी
कोर तुझ - माझ नावं  त्या नभामधी
होऊ दे , तुझ्या माझ्या आयुष्याचे एक गावं .
प्रेमाचे त्याला मिळू दे रे नाव .
हे नातं नवं नवं .
मला हवं जस पानावर पडतं दव .

नाही आता भीती जगाची ,
मी झाली रे तुझी दिवाणी ..
ओंजळ माझी रिकामी .
वाट पाहते तुझ्या प्रेमाची ..
हे नातं नवं नवं
मला हव
जस पानावर पडतं दव ..

तलावामध्ये उमलले फुल .
नको करू आता तू रं उशीर ..
हे नातं नवं नवं
मला हव जस पानावर पडतं दव ..
Written by - durga mate


Jun 26, 2023

यश अपयश

यश म्हणजे जित ...
आणि अपयश हार ..ही व्याख्या नाही हे आयुष्यात येणाऱ्या यश अपयशाची ...

अपयश मला यशा पेक्षा किंचीत का होईना महत्वाचं वाटतं ....

अपयश माणसाला कमजोर कमकुवत करतो .. तरीही यशापेक्षा किंचित का होईना त्याचं महत्व जास्त आहे ...पण ते प्रयत्न करणाऱ्याला ...अपयश आलं म्हणून हार मानणाऱ्या ला नाही ...

..........

उड़ान तेरी होगी पक्की
जब तेरी मंजिल होगी सच्ची
कर कोशिश पूरे दिल से
लढ जा तेरे किस्मत से
रख हौसला दिल में
पूरी हो जाएंगी तेरी हर एक मन्नत
दिल लगाके कर कोशिश
देख धीरे धीरे कैसी बदलेगी तेरी किस्मत 😊😊

वाचून छान वाटलं ना ...निराशा पदरी पडले ल्या निरागस चेहऱ्या समोर थोडी का होईना आशेची लकीर दिसली का ? नसेल दिसली तर..

Plese dont give up ...everything

कारण आपल्याला मुव ऑन करायचं ...काहीही गिव अप करण म्हणजे हार मान्य करन होतं ...

माणसाने हिमंतिने मरावं पण हरू नये ....कुठलीही गोष्ट अर्ध्यावर सोडून देऊ नये ....

सगळ्याच महत्वाचं म्हणजे..

अपयश ही यशाची पहिली पायरी असते ...ती पायरी चढून च आपल्याला वर जातं लागतं .. ती  पायरी चढायचीच नाही .अस आपण ठरवल आणि डायरेक्ट दुसऱ्या पायरीवर चढायचं हे जमेल का ? बिलकुल नाही .. शिखरावर पोहचायच म्हणजे प्रत्येक पायरी खूप काळजी पूर्वक चढावी लागते ...

मग पडण झडण धडपडण सगळं झेलाव लागतं....सहन कराव लागतं ... जिद्दीने पुन्हा पुढची पायरी चढावी लागते.   तेव्हा कुठे आपण सक्सेस होऊ ..मध्येचं गीव अप केलं तर फक्त रडत बसावं लागेल... मुव ऑन करायचं सुचणार नाही ...त्यामुळे जिद्दीने अपयशाची प्रत्येक पायरी चढायची ..आणि आपली जिद्द पूर्ण करायची...

आज खूप दिवसांनी लेख लिहिला ....काय चुकल असेल तर माफ करा dear readers ..

Written by - durga mate


यश अपयश

मला कधी हक्काने त्याच्याशी मन मोकळा संवाद साधायचा असतो ..ना तर कधीचं माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो . फक्त त्याच्यातील दृष्ट राक्षस जागी झाला ना , तेव्हा आणि तेव्हाच तो माझ्या पुन्हा पुन्हा प्रेमात माझ्या मनाचा ठाव कधी त्याने घेतलाच नाही .." 

ती एका दमात तिचं दुःख आयुष्यसमोर मांडते ..आयुष्य ही शॉक होतो ...वाटलं होतं त्यापेक्षा खूपच वेगळी वास्तविकता निघाली राणीच्या आयुष्याची ..

" बापरे ! किती भयाण वास्तविक आहे ना हे .." 

तो स्वतःशीच पुटपुटतो ...

अनु ओक्साबोक्सी रडतं असताना पुन्हा एकदा चक्कर येऊन पडते . ह्यावेळेस तो काहीच शॉक झाला नाही . राजकुमारी ते अनु चा प्रकार त्याच्या चांगलाच लक्षात आला होता ..

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...