नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Mar 31, 2022

आई तू सावली माझी ...

सुख आयुष्याला लाभावे .
तुझ्या सावलीत जीवन हे सरावें ....
स्वप्न तू ही ह्याचं आशेने पहावे ..
माझ्यासाठी आयुष्य तुझे झिजावे ..

तुझ्या चरणाशी बांधू दे ..
संसार सुखाचा .....

तुझ्या कृपेने बरसू दे क्षण आनंदाचा ..

पूरव आई हट्ट हा तुझ्या लेकरांचा ..

प्रेमळ तुझे सुर ऐकु दे मला ..

अंगाईत तुझ्या एकरूप होऊ दे मला ..

ही तुझी चिमणी ..

मिठू मिठू बोलती ..

शब्द काळजातले रचनेत उतरवते ..

पुढच्या जन्मी ही देव बाप्पा ..

तुझ्याच पदरात मला घालेन ग !

ह्याचं आशेत मी जगते ..

तुझ्यासाठी ही कविता ही करते ..

दुर्गा मते

Mar 30, 2022

सांज ही सजली

सांज ही सजली आपल्यासाठी ...
ढग निळे झाले एका भेटीसाठी ..

हळवा वारा गाऊ लागला ..
प्रेमाच्या गोष्टी मजला सांगू लागला ...

थेंब थेंब नभातून बरसले ..
पाहण्यास तुजला वेडीपिसी झाले ..

काळजाने फोडला हंबरडा साजना ..
जीव हा झाला बावरा..तू ऐकणा ..
भाषा मनाची समजून घे ना ..

सांज ही नटली ..
तुझ्या भेटीने कळी माझी लाजली ...
सांज ही ह्या कळी साठीचं  होती सजली ..

ती चे सजने साध्य झाले .
तुला मला शब्द मनातले कळले ..
दोन प्रेम दिवाणे एक झाले .
दुर्गा मते

राणी मी हूकुमाची ..

मीच माझ्या हुकुमाची राणी .
नाही मला कोणी वाली ..

जे मनास वाटते ..
ते मी करते ..
स्वच्छंदी आयुष्य जगते ...

क्षणात रागवते ..
क्षणात गोड होते ..
हळव्या मनाची भाषा मी ऐकते .

राणी मी हुकुमाची ..

मी माझी मलाच प्यारी ...

पूर्ण करते स्वप्न मीच माझी सारी ....

राणी मी हूकुमाची ..

परिभाषा जाणते स्वअस्तित्वाची .

मशाल पेटले कर्तुत्वाची ...

दुर्गा मते

Mar 29, 2022

जादूगार मी नव्या दमाचा ...

जादू गार मी नव्या दमाचा कवी मनाचा ..
रचनेत इतिहास घडवी सुख - दुःखाचा ..

वेड मला प्रचंड वाचण्याचे ....
वाचता वाचता शिकते मी सूत्र जगण्याचे ..

नभातील चांदणी बघता होई खुश मन ..

रचनेत स्वतः ला चांदणी ची उपमा देत जगते एक क्षण ..

जादूगार मी साहित्य निर्मिती तील छोटासा भाग ...

मोठा कवी - लेखक होता येणार नाही मला  ..नाही ह्याचा राग.....

आनंद ह्याचाच मजला अपार ...

कल्पनेत प्रत्येक रूप घेऊन होता येते मजला  साकार

कल्पनेत जत्रा भरवतो हळव्या क्षणांची ...
आवड आहे हो मला लिखाणाची ....
जादू आहे माझ्याकडे कल्पना करण्याची ..
दुर्गा मते

Mar 28, 2022

कुछ तो बताओ

शायद हमने भी प्यार ।
किया था आपसे ।।

नहीं दूर जाना चाहते थे ।

हम आपसे ।।


क्यूं नहीं हो आप हमारी किस्मत में ?

किसे पूछू में सवाल ।।

क्या जानते हो आप मेरे दिल के हाल ।

किस परिस्थिति में  ,


मै जी रही हूं ।

आपको खुले आखों से ।।

खोंते हुए देख रही हु ।


बताओ  कैसी जिऊ , मै आपके सिवाय ।।

कैसे जिंदगी सजाऊ मै आपके सिवाय ।
बताओ प्लीज़ कुछ तो बताओ ।।
दुर्गा मते


स्वप्नांचे घर बांधू ..

बांधू दे आकाशी मला स्वप्नांचे घर ..
साथीला तू चल त्या घरी जीवनभर ..

दोघे जोडीने त्यात आनंद भरू ..
प्रत्येक क्षण हा फुलवून टाकू ..

भास होतील मला खूप सारे ..
तू उतरव त्यांना सत्यात न्यारे ..

लावू आपण आशेचे दिवे किनारी ..
सोबत माळवू आनंदाची मोर पिसारी ..

मी वाट बघेन तुझी उंबरठ्यावर ..
तू राज कर माझ्या मनावर ..
मी नाव कोरील माझ तुझ्या दिलावर ..

चल दोघे मिळुनी त्या आकाशी जाऊ ..
स्वप्नांचे घर नवे तिथे बांधू ....
दुर्गा मते

Mar 27, 2022

साथ देशील मला ..

येशील का परतून जीवनी ..
स्वप्न दिसे तुझेच नयनी ..
विसरूनही तुला विसरता येत नाही .
तुझ्याशिवाय जीवन माझे पूर्ण होतं नाही .
आठवांचा कळप हवासा वाटतो ..

जीव हा अजुनही तुझ्यात गुंततो .
तू मला पाहिजे ..
एका क्षणासाठी नाही .
आयुष्य भरासाठी पाहिजे ..
तू समजुन घे ना व्यथा मनाची .
दे ना कबुली प्रेमाची ....
मी वाट बघतेय तुझ्या उत्तराची.
मी नाही दुखावणार कधी तुला.
शपथ घे ना रे ..
साथ देशील मला ..
दुर्गा मते ..

गाठ सत जन्माची .

ही कथा मी एका स्पर्धेसाठी लिहीत आहे . वाचकांनी वाचून भरुभरून प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा ..

आज विनाला बघायला देशमुख घराण्यातील कुलदिपक सम्राट देशमुख येणार म्हणून लगबग सुरू होती . वीणा दिसायला सुंदर पण तब्येतीने जरा धष्ट पुष्ट सर्वांना चिंता ह्या मुलीला कोणी होकार देईल का ? ह्याची ...तिच्या ही मनात नेहमी हीच धास्ती असायची ..मला  होकार देणारा येईल ना माझ्या आयुष्यात ..कारण तिचं स्वप्न होतं.  जो मुलगा पहिल्यांदा बघायला येईल . त्यानेच मला होकार द्यावा . 

आज जो मुलगा तिला बघायला येणार आहे . तो तिच्या वडिलांचा खूप जवळचा मित्र असल्यामुळे नकाराची खूपच शक्यता होती . इंफॅक्ट तिच्या वडिलांनी तिला सांगितलच होतं . ह्याला तू 80 टक्के जरी पसंद नसली ना . तरी तो तुला होकार देईल .

बाबांच्या ह्या एका वाक्यावर तिने कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला होकार दिला ...

सम्राट देशमुख ...दिसायला अतिशय सुंदर . त्याच्या तुलनेत विना काहीचं नव्हती .

     10 च्या सुमारास मुलाकड चे तिला बघायला आले.  ती खूप छान रेडी झाली . तिला वाटायचं मी खूप जाड आहे.  पण साडीत ती नॉर्मल दिसत होती...


ही आपली विना आहे ह्याच्यावर कोणाचाच विश्वास बसनेसा झाला ..  तिच्या आईने गडबड सरबड तिची दृष्ट काढली . तेच तिचे बाबा तिला बोलावण्यासाठी आले .


" खूप गोड दिसतेय माझी परी राणी ! " विनाच्या कपाळावर नाजूक किस करत बाबाने तिचं कौतुक केलं .


बाबांनी केलेल्या गोड कौतुकावर तिने ही छान ओठी हास्य फुल वलं ...


ते तिला घेऊन समोरच्या दालनात गेले .


सम्राट ने तिच्या कडे बघून नाक मुरडल . कारण त्याने तिला मनामध्ये जस इमॅजिन केलं होतं . तशी ती बिलकुल नव्हती .


त्याच्या चेहऱ्याच्या हाव भावारून तिच्या लक्षात आलं होतं . की ह्याला आपण पसंद नाही . तिने मनातल्या मनातच खूप नाराज झाली . ह्याने जर आपल्याला नकार दिला तर पुन्हा कधीही लग्नाची स्वप्न रंगवायची नाही . ठरवून मोकळी झाली . 


कांदे पोह्याचा कार्य क्रम झाला.  मुलाने होकार दिला.  ती आश्चर्य चकित झाली . हे असं कसं झालं ? विचारात पडली .


घरातील सर्व मंडळी खुश झाली . आणि साखरपुडा ही कधी असेल हे लगेच जाहीर केलं . अजुन चार दिवसांनी करून टाकू साखरपुडा असं मोठ्या माणसांनी ठरवून टाकलं .


ठरलेल्या दिवशी साखरपुडा ही झाला . दोघेही खूप सुंदर दिसत होते . " मेड फॉर इच अदर " साखरपुडा ही झाला खूप सुंदर पोझ देऊन फोटोशूट पण झालं . पण एक गोष्ट विनाला खूपच खटकली .


आज सम्राट एक शब्द ही तिच्या बरोबर बोलले नव्हते . बोलायचं तर दूरचं साध त्यांनी तीच्याकडे बगितल ही नव्हत .


तिला ह्या गोष्टीचं खूपच वाईट वाटलेलं असतं  . तिच्या मनात भलते सलते विचार येत असतात . ते विचार खूप त्रास दायक ठरले . तिचं मन आतून खूप तुटतं होतं .


मी ह्यांना पसंद तर नसेल ना ? सारखा हाच प्रश्न तिच्या मनात येतं होता . मजबुरीने ह्यांनी होकार दिला असेल का ? प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. 


तिच्या डोळ्यात अश्रू दाटलेले बघून तिचे जिजु ही हळवे झाले .


" काय झालं विना ? " रडतेस का ? " त्यांनी विचारलं


" जिजु " दाटलेले हुंदके फुटले . " त्यांना मी पसंद तर नसेल ना . त्यांनी मजबुरीने तर होकार दिला नसेल हा " ती मोठं मोठ्याने रडू लागली .


" तू शांत हो आधी . रडू नको .. असं काही नसेल मनातील गैरसमज काढून टाक .  " तिला शांत केल्यावर त्यांनी सम्राट ला कॉल केला . आणि मोबाईल विनाच्या हातात दिला . ते तिथून निघून गेले .


" हॅलो विना .कशी आहेस ? " सम्राट ..


" मस्त तुम्ही " विणा .


" मी पण छान " सम्राट


" तुम्हाला मी मनापासून पसंद आहे ना हो " विणा ने प्रश्न विचारला.


" हो तू मला पहिल्या भेटीत मनापासून आवडली होती . म्हणून मी होकार दिला . का काय झालं ? " सम्राट


" काही नाही " विणा .


" ओके ..एक लक्षात ठेव . पुन्हा डोळ्यात पाणी कधीचं आणायचं नाही . आता ही गाठ सत जन्माची बांधली गेली . आहे माझी तुझ्यासंग आणि तुझी माझ्यासंग .


" मग तुम्ही त्या दिवशी माझ्याशी बोलला का नाही " विणा.


" बोर झालो होतो मी ..आणि मेन म्हणजे तुझी मजा क घेत होतो.  " असं म्हणत ते हसायला लागले . आणि ती पण"  काय तुम्ही " अस म्हणत नाजूक लाजली .


" असाच आहे मी ..बोलू परत बाय "


असं म्हणत ते फोन ठेवतात . आणि विणा ही आनंदाने उड्या मारत मारत बेडरूम मध्ये जाते .
दुर्गा मते


कशी वाटली स्टोरी वाचून नक्की कळवा ...

Mar 26, 2022

प्रेमास ह्या पूर्णत्व लाभले ..

तू ही अपूर्ण ..
मी ही अपूर्ण ..
एक होता दोन मन ..
होई आयुष्य संपूर्ण ...

भास होता तुझे ..
श्वास थांबे माझे ..
वेगळेच बाई रंगले ..
हे प्रितीचे सोहळे ...

भाव माझे तुला उमगले .
शब्द माझे बंद ओठात रुजले ..
स्वप्न माझे तुझ्या हास्यात फुलले ...

अपूर्ण प्रेमाला तुझ्यामुळे पूर्णत्व लाभले ..

आयुष्याचे ह्या कोडे सुटले ..
माझे मन तुझे झाले ..
गीत ओठी प्रेमाचे आले ..
शब्दां - शब्दांत तुझे नावं कोरले ..
प्रेमास ह्या पूर्णत्व लाभले ..
दुर्गा मते


हसताना तू.

हसताना तू दिसते छान ..
गंध चाफ्याचा . मेहंदीचे पान ...

घराची तू शोभा ..
आईच्या काळजाचा तुकडा ...

बापाची लाडकी परी ..
नसते जेव्हा घरी ..

डोळ्यात येते पाणी ..
असे लाडकी ती  राणी ..

कानी येता बोल - बोबडे शब्द तिचे ..
डोळ्यांचे पारणे फिटे ....

 ती आनंदाची प्रकाश ज्योती ...
उंबरठ्यावर ह्या शोभून दिसे पणती ..

लाडकी लेक आमुची ....
शोभा वाढवते घराची...

हसताना दिसते ती छान ..
गंध चाफ्याचा मेहंदी चे पान ...
दुर्गा मते ..

नव्याने आठवले ..

पापण्याला भास छळू लागले ..
फुलांचे थवे ..सुर नवे गाऊ लागले ..

आठवणींच्या गावी परतून ही आली ..
कोमजणे लिहिलेले टवटवीत फुलांच्या भाळी ..

उदबत्तीचा सुगंध वाऱ्यासवे उडून गेला ..
नवतिचा प्रवास आज नव्याने केला ..

हळवे मन भासू लागले लाजळूचे पर्न ..

विरहाचे हुंदके ऐकताना बधीर झाले कर्ण ..

ओलेचिंब झाले डोळे ..आठवताना क्षण कोवळे ..

अजीब त्या पटलावर रंगले होते विरहाचे सोहळे ..

मनाच्या तळ्यावर नाव एकाचे कोरलेले ..

मेहंदीच्या हातावर स्वप्न कोणा दुसऱ्यासाठी रंगलेले .

चित्र ते समोर डोळ्यापुढे उभे राहिले ..

त्याला कित्येक दिवसांनी आज पाहिले ..

सुवर्ण क्षण आज नव्याने आठवले ..
दुर्गा मते

काल्पनिक रचना ..


Mar 25, 2022

देव भेद भाव नाही करत.

हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू ने लिहिला नाही . वाटलं म्हणून सहज मनातलं लिहिलं एक छोटासा अनुभव ...

त्या दिवशी आम्हाला खूपच तहान लागली होती . नरड कोरड ठक पडल होतं . आभाळ ही खूप तापलं होतं . तापलेल्या आभाळा खाली जीवाची लाही लाही होतं होती.  जीव नुसतं पाणी पाणी करत होता ..


रस्त्यावर एका ठिकाणी पाणे पोई दिसली . ती पानेपोई मुस्लिम धर्माच्या लोकांनी लावलेली होती.  तहान एवढी लागली होती . की लक्षात ही नव्हत आलं . नक्की ही पाणे पोई कुठल्या धर्माची आहे. थंडगार पाणी घटा घटा  पिल जीव शांत झाला .


तो माणूस थोड्याच वेळाने माईक मध्ये काहीतरी पुकारू लागला .


पाणी पिऊन झाल्यानंतर आत मध्ये येऊन शिबिराला भेट द्या . त्या शिबिरात पुस्तक होते.  ते ही फ्री मध्ये कुठलही पुस्तकं घ्या . त्याची फिस घेणार नव्हते. 


मी जाऊन पाहिलं तर त्यामध्ये सगळे मुस्लिम धर्माच्या रीले टेड पुस्तक होती . पण मी ते न घेताच वापस फिरले .


पुस्तक घरी घेऊन गेले तर खूप बोलणे खावे लागले असते माहीत होतं म्हणून पाणी मात्र पोटभर पिले .


आणि मग मनात आलं . त्यांचं पाणी पोटभर पिले . मग कुराण घ्यायलाच का पाऊले थबकली .


आपण  पोटासाठी तहान भागवण्यासाठी त्यांची मदत घेतो . जात पात बघत . देवाचे पाय पडताना धर्माचा अभ्यास करताना चं का बघायची जात पात ..कोणत्याही धर्मातील देव कधीही भेदभाव करत नाही . हा माझ्या जातीचा नाही म्हणून दूर लोटत नाही .


येशू ख्रिस्ताकडे जा तो आशिष देतो . विठ्ठलाकडे जा तो ही जवळ करतो . अल्ला ही दुवा देतो . माणूस स्वार्थी विचार करतो देव कधीच करत नाही. 


जर आपल्याला त्यांचं पाणी चालू शकतं तर , मग देव आणि धर्म चालायलाच हवा.  तो मान्य करण्यात कोणताही कमीपणा वाटू न द्यावा ..😊😊😊🙏🙏🙏
दुर्गा मते

चुकून काही कमी जास्त लिहिलं गेलं असेल तर , चुकी साठी माफी असावी.  जे मनातून  वाटलं ते मी प्रामाणिकपणे लिहिलं .


हुंदका दाटून आला

आजवर रडलेच तर होते ..
घाव मनाचे दिसू नये म्हणून ..
ओठांवर हसू फुलवत होते ..
त्यात यशस्वी होत होते ..

आजही नशिबाचे ऐकतेय ..
मनाला जाळतेय .. 
कंठ भुकेला झाला ,  हुंदका गहिवरून आला ..
श्वास हा चालू असताना ही स्थब्ध झाला ..

पापणी मिटेना ..अश्रू हि थांबेना ..
देह हा ओल्याचिंब आसवाखाली भिजलेला ..
हळुवार येता सुखाचे स्पर्श तरीही कोरडा होईना.  

अनुभवाचे चटके बालमनावर कोरलेले ..
त्याच मनावर आज अनुभवाचे चटके झेलत ..
दुःख नवे रुजलेले . 

सांगता ही येईना ..
बोलता ही येईना ...
मन मोकळं करायला हक्काच ठिकाण ही गवसेना . 
दुर्गा मते
©®

अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे ..

अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो . हे वाक्य तोंडपाठ झालय पण प्रत्यक्षात उतरायचं मात्र अजूनही बाकीचं आहे ...

अन्याय करणाऱ्याला अन्याय सहन करणारा मोकळीक देत असतो.  त्यात अन्याय सहन करणारा गरीब अन् लाचार असेल तर , मग बघायलाच नको . अन्याय करणारा किती खालच्या दर्जावर जाऊन भ्रष्टाचार करेल ते
सांगता येत नाही. 

गरीब असो लाचार असो , सुसुक्षित असो असुसुक्षित असो ..होणार अन्याय कधीही सहन करायचा नाही.  अन्यायाला वाचा ही फोडलीच पाहिजे. 


आपण  आपल्या वर होणारा अन्याय सहन करत राहिलो.  तर तो अन्याय आपल्याला आयुष्य भर सहन करावा लागतो.  अन्याय करणाऱ्याच्या डोळ्यासमोर खुळा भ्रम तयार होतो . आपण ह्याच्याशी कसही वागलो.  तरी ह्या येड्याला काहीचं फरक पडत नाही . असा नकारात्मक  विचार करत अन्याय करणाऱ्याची मजल अजूनच वाढत जाते . आणि आपण त्याच्या वर्चस्वाच्या दबावाखाली दबलो जातो .


अन्याय हा फक्त कामाच्या ठिकाणीच होतो.  असं नाही . तो अगदी आपल्याच हक्काच्या घरातही  होतो . हे  आपलच घर आहे.  आपलीच माणसं आहेत . असा विचार करत आपण त्यांचं उन - धून बोलण सहन केलं ना तर मग आपली किंमत त्यांच्या नजरेत शून्य होते . त्यामुळे अन्याय हा कोणत्याही ठिकाणी होतं असेल तरी  , तो सहन नाही करायचा.  आपल्या हक्कासाठी नेहमी लढा द्यायला सज्ज रहायचं .


आणि महत्वाचं म्हणजे अन्यायाला वाच ही योग्य वेळेतच फोडायला पाहिजे . वेळ निघून गेल्यावर काहीच फायदा नसतो . वेळ निघून गेल्यावर एक तर आपण आपला जीव गमावलेला असतो किंवा मग आत्मविश्वास ....


कोणीतरी येईल माझ्यावर होणारा अन्याय दूर करण्यास .


ह्या खुळ्या आशेत तर बिलकुल रहायचं नाही.  आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण स्वतःच आवाज उठवायला पाहिजे .


कोणीतरी येईल ह्या आशेवर जर राहिलो ना , तर कोणी  येणार पण नाही . आणि तुमच्यावर होत असलेलाअन्याय


कधी थांबणार ही नाही . त्यामुळे स्वतःसाठी स्वतःच समर्थ


असणं केव्हाही चांगलं .


जो अन्याय सहन करतो ना तो आयुष्यात कधी यशस्वी ही होऊ शकत नाही . आणि कधी आनंदी ही राहू शकत नाही . त्यांच्या आयुष्यातील दुःख सरता सरणार नाही. 


सुख ओंजळीत असताना ही झेलता येणार.  आयुष्य नावाचं कोडं त्याने सोडण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते सोडवता येणार नाही . कारण ज्याला स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याच बळ नसेल त्याला जगण्याचं बळ काय येणार ?


माणूस हा परिपूर्ण आणि सक्षम तेव्हाच होऊ शकतो . जेव्हा तो अन्याया विरूद्ध लढा द्यायच शिकतो . जेव्हा तो अन्यायाविरुद्ध लढा द्यायला शिकतो ..तेव्हाच तो मनासारखं जगायला ही शिकतो ..

दुर्गा मते
©®


रंगहीन जीवनाची रंगीत भाषा ...

रंग हिन जीवनात ...
नाही मी आनंदात ..

शोधते आनंदाचे रंग ..

होऊनी तुझ्यात दंग ..

कवडसा तुझ्या सुखाचा मागते ..

रंग हिन जीवनाची .. रंगीत भाषा तुझ्यात शोधते ..

इंद्र धनुचे सप्तरंग ..

शोभून दिसे खास तुझ्या प्रीतिसंग ..

लाल रंग प्रेमाचा ...

देई सहवास सुखाचा ..

बरसे दुःख जीवनी ...

भास उरे तुझेच  फक्त नयनी ..

दुर्गा मते


Mar 24, 2022

मी एकटीच राहिले

दुःख मनाचे आज निकामी होताना बघतेय .
तरीही अजुनही सुखाची भीक मागतेय ...

सुवर्ण पाना वरचे अक्षर आज वाचतेय ...

भाळी लिहिलेल्या घटना रोज नव्याने पाहतेय...

स्वप्न माझे श्वासात भिनलेले रडले ..

काळ्याकुट्ट अंधारात जाऊन निपचित पडले ..

सुखाची बरसात होताना हसू चेहऱ्यावर फुलले ..

जे होते दुःख मी भोगलेले आज  भुलले ..

डाव सुखाचा उधळताना पुन्हा एकदा स्मरले .
आठवणीत रमताना मजला कोडे नवे पडले ..

जे मनास रुचले होते ..ते नशिबास नाही पचले ..
जे नशिबात होते ते मनाला न पटता ही त्याने स्विकारले
दुर्गा मते..

नशिबाने ठरवलेल्या गोष्टी मन स्वीकारत ..

दुःख मनाचे आज निकामी होताना बघतेय .
तरीही अजुनही सुखाची भीक मागतेय ...

सुवर्ण पाना वरचे अक्षर आज वाचतेय ...

भाळी लिहिलेल्या घटना रोज नव्याने पाहतेय...

स्वप्न माझे श्वासात भिनलेले रडले ..

काळ्याकुट्ट अंधारात जाऊन निपचित पडले ..

सुखाची बरसात होताना हसू चेहऱ्यावर फुलले ..

जे होते दुःख मी भोगलेले आज  भुलले ..

डाव सुखाचा उधळताना पुन्हा एकदा स्मरले .
आठवणीत रमताना मजला कोडे नवे पडले ..

जे मनास रुचले होते ..ते नशिबास नाही पचले ..
जे नशिबात होते ते मनाला न पटता ही त्याने स्विकारले
दुर्गा मते..

कविता एक

कविता साज विचारांचा ..
कविता आरसा माझ्या मनाचा .
कविता संगम माझ्या सुख - दुःखाचा .

कविता पहाट माझ्या स्वप्नांची. 
कवीता हाक माझ्या हृदयाची ..
कविता सखी माझी जिवाभावाची ..

कविता एक मोकळा श्वास ..
 कधी कधी सत्य असूनही वाटे आभास .
छंद मला एकच खास ..
कविता लिहिण्याचाचं आहे ध्यास ..
दुर्गा मते

आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे . जिच्यामुळे मला नवी ओळख मिळाली . माझं अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळाली . त्या माझ्या सर्वात खास मैत्रिणीचा आज दिवस आहे ..
कविता दिनाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा ..💐💐💐

वीण ही असेल शेवटच्या क्षणापर्यंत

वीण ही असेल शेवटच्या श्वासापर्यंत ...
साथ ही असेल शेवटच्या क्षणापर्यंत ...

नातं हे विश्वासाचं जिवापाड जपणार ..
श्वासा - श्वासांच समीकरण  मी रचणार ..

दूर असून ही तू जवळ भासणार ..

मनात तुझ्याच विचारांचं किलबिलाट असणार .

.कृष्ण समान तू हृदयात वसलेला ..

जीव माझा अर्धा तुझ्यात सामावलेला ...


लग्न घटिका जवळ येता माझी ...

मजला शोधण्यास होरपळणाऱ नजर तुझी ..


जरी दिसले नाही मी तुला कुमारिका वेशभूषेत ..
हळदीच्या अंगाने आले तुझ्यासमोर तरी पाणी आणू नको डोळ्यांत ..


वीण ही असेल शेवटच्या क्षणापर्यंत ..
रेखाटून ठेव चित्र मनात शेवटच्या श्वासापर्यंत ..
दुर्गा मते

Mar 22, 2022

रात्र ही काळोखी .

रात्र ही काळोखी ..
बात ही अनोखी ..

दोन जीवांची भाषा निराळी ..
गोडी त्याला प्रेमाची लाभली ..

अतरांचे आलिंगन तिन्ही सांजेला ..
सुर्य तो त्या लैला - मजनुसाठी माळला. 

दिवा ही तेल वातिविना सरला ..
गंध धुक्याचा अलुवार पसरला ...

नभी चांदण्याची बारात ..
रात ही सरली थाटा - माटात ..

प्रेमा च्या प्रवासाची ही सुरुवात नवी ...
दोघांनाही हवी हवी ..
दुर्गा मते 

Mar 21, 2022

तू तो सिर्फ धडकन

दिल में तो आप हो ।

नसीब में कोई और ।।


एका सुना सुना सपना है ।

इस प्यार के रंग भरे मैफिल में ।।


रो रही है उम्मीदें मेरी ..

इस दिल को चाहत हे तेरी ..


कैसे उसे समजावू तू तो सिर्फ धडकन है मेरी .

किस्मत नही ....


ओ मेरे दिल के मेहबूब .

डोन्ट वरी नराज मत होईय .


आप सिर्फ मेरे कीस्मत मे नही हो ..

औंर दिलं मे आपके शिवाय कोई और नही हैं .


मे सिर्फ आप के सात

साथ फेरे नही ले सकती ..

लेकीन अगले सात जनम मे ,
आपको पाने की उम्मिद तो रखं सकती हुं ..

आपके नाम का लाय सन मेरे पास नहीं है ।
लेकिन इस दिल को हर पल आपका ही खयाल है । 
दुर्गा मते


अंदाज नाही बांधता येत ...

चांगुलपणा मागे लपलेले विध्वंसक  चेहरे आपल्याला नाही ओळखता येत .

आपले आपले वाटणारे कधी शत्रू होऊन आपला घात करेन नाही सांगता येत ...

आजकाल डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न मला नेहमी पडत असतो . कारण डोळे झाकून विश्वास ठेवावा अशा व्यक्तींशी भेट होतंच नाही . झाली तरी काही काळापूरती जो पर्यंत आम्ही एकमेकींशी गोड आहोत तोपर्यंत ती गोड असते .  जेव्हा आमच्या त छोट्याशा कारणावरून वाद होतात ..तेव्हा ती लगेच कडू होते . जिवापाड जपलेला विश्वासाला कसा तडा गेला . हे  ही लक्षात येतं नाही .

असं म्हणतात कपड्यांचं कापड ओळखता नाही आलं तरी चालतं ..पण माणसं ओळखता आली पाहिजे .
कपडे

अडगळीत टाकण्याचा ऑप्शन असतो . माणसं अडगळीत टाकण्याचा ऑप्शन नसतो . पण इथे नेमक होतं चुकीचं .. कापडाची निवड आपण काही क्षणात करतो . त्याची कॉलीटी कशी ? त्याचा रंग कसा ? ते किती दिवसापर्यंत टिकेन ह्याचाही अंदाज आपण काही क्षणात लावतो . माणसं ओळखण्यात आयुष्याचं खर्चिकरन होतं .
तरीही माणसाच्या स्वभावाचा अंदाज नाही बांधता येत ...
दुर्गा मते

Mar 20, 2022

शोध घेऊ नकोस ..

शोध घेऊ नको  माझ्या मनाचा ..
नाही पटणार तुला पैलू माझ्या विचारांचा ..


मी कधीच लोकांचा द्वेष नाही केला ..
प्रत्येकाला आपलाच मानण्याचा करार केला .


मी अहंकार कधीच नाही जपला ..

स्वाभिमान कधीचं नाही गमवला..


मी माझ्या माणसांना दूर नाही लोटल ..

जाणाऱ्यांना कधीचं नाही थांबवलं ..


ज्याचं मन भरलं ते सोडून गेले ..

ज्यांना माझं असणं महत्त्वाचं वाटतं ...
ते आयुष्य भर साथ देण्यासाठी थांबले ..
दुर्गा मते

एक नवी सुरुवात ..


सकाळपासून मी त्यांच्या मेसेज ची वाट बघतेय .

ते माझ्या मेसेज ची वाट बघताय .
बोलण्याची ईशा होतेय .
पण नको वाटतयं ....

स्टेटस बघण्याचाच खेळ चालू आहे .

फक्त जरा .. रुसलेला ..जरा तहान लेला .

दोन हळव्या मनाचा.....

प्रवास सुखाचा एका गोड नात्याचा ..
ही सुरुवात आहे ...
एका आगळ्या वेगळ्या नात्याची ..
कळी उमलणार प्रेमाची ....
जोडी जुळणार सात जन्माची ..
दुर्गा मते ..


Mar 19, 2022

तू हृदयात .

तू माझ्या हृदयात आहेस .
उद्या पडणार एक गोड स्वप्न .
त्या स्वप्नांचा एक भाग आहे स ..

तू मनाचा आवाज आहे ..

निरभ्र आकाशात न लुकलुकणारा काजवा आहेस ..


तू माझ्या ह्र्दयात आहेस

माझ्या आयुष्यात आहेस .

तू माझ्या स्वप्नांत आहे .

तू माझ्या सत्यात आहे .


तू नशिबात नाही हे

पण आणि आयुष्यात कायमस्वरूपी साठी फिक्स आहे .

कारण तू माझ्या हृदयात आहेस .

जेव्हा हृदयाचे ठोके बंद पडतील .
तेव्हाच मी तुझा विचार सोडून देईल ..
दुर्गा मते

Mar 16, 2022

💯💯💯💯💯सत्य ..


मनातील डायरी चे पान विषय अंतर्गत ..🌿🌿🌿

व्यक्त ही त्याच्याच समोर व्हावं .
ज्याच्या बद्दल तक्रार असेल ..
विनाकारण गैरसमज करून घेऊ नये .
चांगलचं नातं तोडू नये. 

बऱ्याचदा आपण द्विधा मनस्थितीत असतो .

म्हणजे आपण एखाद्या व्यक्ती विषयी मनात गैरसमज धरतो . त्याच्याबद्दल खूप वाईट साईट  बोलतो . आपल्याला कोणीतरी  समजून घेईल ह्या उद्देशाने  की तो तरी आपला गैरसमज दूर करेल . सांगेल तू त्याच्याबद्दल चुकीचा विचार करत  आहेस . खूप चांगली आहे . ती किंवा तो . झाले असतील थोडेसे मतभेद बोलून दूर करा गैरसमज . असं म्हणणार कोणीतरी आपल्याला त्या द्विधा मनःस्थितीत प मध्ये हवं असतं .

पण होतं चुकीचं मन राखण्यासाठी समोरचा  आपल्याला त्याच्याबद्दल वाईटचं सांगतो आणि मग अजूनच गैरसमज वाढतात . त्यापेक्षा ज्याच्या बद्दल आपल्याला तक्रारी आहेत ना त्याच्याशी स्पष्ट बोलून घ्यायचं . म्हणजे थोडे वाद होतील पण गैरसमज नाही होणार नातं नाही तुटणार . आणि प्रोब्लेम ही क्षणात सुटतील .

नातं तुटता तुटता नव्याने जोडता येईल .हे 💯💯💯सत्य आहे ...
दुर्गा मते


Mar 15, 2022

ती क्षणात रुजते ..

मनातील डायरी चे पान विषय अंतर्गत ...

विषय - पुरुषाचं वर्चस्व आणि स्त्री ...

ती क्षणात रुजते अंकुरते ..
मातीत फुल बनून उमलते ..


घरदार जपते ...
पुरुषांचा पुरुषार्थ सहन करते ..

स्त्री ही कणखर व्यक्ती महत्व ..
मोलाचेचं असे तिचे कर्तृत्व ..

हळवी सहनशील ..
प्रेमळ सुस्वभावी ..
स्वाभिमानी ..

स्त्री एक शक्ती ...
चहू बाजूंनी पसरली स्त्री शक्ती कीर्ती ..
दुर्गा मते

सावर ..

घाल भावनांवर आवर ..
जरा मनाला तू सावर ..

बांध फुटेल अश्रूंचा ...
प्रयत्न नको ग इथे थांबण्याचा ..

वेळ लागणार नाही ..
तुझ्यामुळे त्याचं आयुष्य बरबाद व्हायला ...
खूप वेळ लागेल ग ..
त्याच बरबाद झालेलं आयुष्य सावरायला .

त्याच्यासाठी जगायचं होतं ना ..
त्याच्या आनंदाचं कारण व्हायचं होतं ना ..
त्याच्या ओठांवरील हास्याच फुल व्हायचं होतं ना .

मग नको थांबू इथे ..
मनाला समजावून सांग ..
आणि त्याच्यापासून हो लांब ..

क्षणभर होईल त्याला त्रास ..
पण टिकून राहील आयुष्यात त्याच्या आनंदाची रास ..
तिचं ठरेल ग खास ..
हे ठेव मनात ..
आणि दूर हो राजा ..
तुझ्याच त्याच्यासाठी ..
दुर्गा मते

काल्पनिक रचना कोणाच्याही आयुष्याशी संबधित नाही 

यशस्वी जीवन होईल ...

जीवन हे खूप सुंदर आहे . फक्त त्याच्याकडे बघन्याचा दृष्टिकोन नकारात्मक नको सकारात्मक हवा .

खूप स्टेशन ह्या जीवनात येत असतात . कुठल्याच स्टेशनवर आपण कायम स्वरुपी स्थिर राहण्यासाठी उतरत नसतो . ज्या ही स्टेशन वर आपण उतरणार असतो . त्या स्टेशनचा निरोप घ्यावाचं लागेल . हे मनात रुजवूनचं स्टेशन वर उतरायच असतं .

आवडीच स्टेशन होतं माझ सोडून जायचं नव्हत. पण नियतीने चक्र फिरवलं . आणि जावं लागलं . कितीही रडले . ओरडले . ह्या स्टेशन  वरचा प्रवास अजुन रोमांचक व्हावा म्हणून हट्ट धरला. ऐकणा र्याने ऐकला पण तो पुरवलाच नाही . Infact हट्ट पुरणाऱ्या कडेही हट्ट पुरवण्याचे ऑप्शन बाकी नव्हते .कारण त्यानेही त्याच्या मनाची समजूत घातली होती . ज्या स्टेशन वर आपण उतरतो त्या स्टेशन वर थांबून रहायचं नसतं . त्या पुढे जाऊन त्याच्याही पुढचं स्टेशन बघायचं असतं . म्हणून प्रवास नावाचं चक्र चालूच ठेवा यचं असतं .


ज्याने समजूत घातली होती , ज्याच्याकडे हट्ट पुरवला होता . त्याच नाव होतं मन आणि जीवन आणि बुद्धी .


असाच विचार आणि अशीच समजूत मानवी जीवनात अनु प्रमाणे वावरत असलेला माणूस आणि त्याच्या मनाने त्याच्या बुध्दीने घातली तर , प्रत्येक मानवाचं जीवन यशस्वी होईल .


जे मिळालं नाही त्याच्यासाठी शोक करत बसायचं नाही . जे मिळालं नाही . त्याचा विचार करण सोडून द्यायचं .


ह्याच्याही पेक्षा काहीतरी खास मिळेल ह्या आशेवर जगायचं . म्हणजे हातातून निसटून गेलेल्या गोष्टीचा दुःख वाटतं नाही .


आणि महत्वाचं म्हणजे कितीही दुःख येवो कितीही संकट येवो हार मानायची नाही . आठवणींच्या कॅमेऱ्यात कैद व्हायचं नाही . ज्या स्टेशन वरचा प्रवास संपला त्या स्टेशन वर पुन्हा परत यायचं नाही . तर त्या पुढची हजार स्टेशन बघण्याची जिद्द ठेवायची. आयुष्य किचकट होतं नाही .


जगणं सुंदर होतं . यशाचे दरवाजे आपल्यासाठी ओपन व्हायला लागतात . आणि हळू हळू आपलं जीवन यशस्वी होण्याच्या मार्गावर स्थिर व्हायला लागतं .
दुर्गा मते

Mar 14, 2022

हिशोब मांडते ..

हिशोब मांडते आज डायरीत ..
जे राहिलेत आठवणीत ..
गोड क्षण बनुन ..
मनात सजून . 

आनंदाचे क्षण प्लस करते .
दुःखाचे वाईट क्षण माय नस करते ..

लोकांना त्रास दिलेला आठवणीत ठेवते ..
एक क्षण त्यांच्या आनंदासाठी जगते .

लोकांनी मला दिलेला त्रास,
 आयुष्य भरासाठी विसरते .
त्यांच्या साठी मनात ,
 आदर - स्नेह आणि प्रेम जागी ठेवते ..
दुर्गा मते

स्वप्न हे.

स्वप्न हे माझे ..
तुझ्या प्रितीतून आले ..
दिस हे सनई चे .. 
तुझ्या भेटीने आले...

सुरांना ह्या स्वर ..
तुझ्या मिठीचे लाभले ..
भाग्य हे माझे ....
तुझ्यासाठी मी  ही पाहिले..

उदास मन माझे .  
तुझ्या येण्याने प्रॅफुल्लीत झाले ...
सुखाचे क्षण आज नव्याने ..
आयुष्याला लाभले ..

डोईवर आज नाही ....
आसवांचे ओझे ......
हास्याचे फुल ओठांवर लाजे ...
भाग्य हे माझे. 
तुझ्यासाठी मी ही पाहिले .
दुर्गा मते

Mar 13, 2022

मला माफ कर

मला माफ कर.  
हवं तर राग धर ...
पण मला माफ कर.  

मनापासून प्रेम केलं होत. 
तुलाही माहीत.  
काहीचं नाही गुपित.  

एक होण नशिबात नव्हत . 
वेगळं होण तुला मला मान्य नव्हत. 

कशी आली रे ही  काळाची चाहूल 
चालतांना हळू हळू निसटून गेल हर एक पाऊल .

वेदना तू ही दिली  
मी ही दिली. 
बहरत चाललेली वेळ .
अलगद करपली...
दुर्गा मते

न परवडणारा प्रवास

रंग आनंदाचे जीवनी भरू ..
हर क्षण आनंदाने जगू ..

रुसवे फुगवे बाजूला ठेवू ..
माणुसकीची जपणूक करू ..

मान सन्मान देऊ .
आपुलकीची कास धरू ..

सत्याच्या वाटेवर ..
प्रकाशाची ज्योत पेटवू ..
यशाचे इंधन त्यात भरू ..
प्रवास हा न परवडणारा करू .
दुर्गा मते


Mar 12, 2022

तुला सोडून गेले

ह्या मैफिलीत ...
सोडून जाते तुला एकटी ..

होऊन मी प्रियसी  नकटी ..


चमचमत्या ताऱ्यांचे ...
निस्वार्थ किरणांचे ..
प्रेम तुला मिळावे ..
हेचं मागणे माझे ..

हळवे तुझे मन ..
जाणते मी रं ..
कठोर ही तू ...
माणुसकीत लपलेला ,

राक्षस ही तू ..
जाणते मी रं..

वेड जीवास लावले ..
मावळतीचे रंग तू ही दाविले ..
वासनेने लाल झालेले डोळे मी ही पाहिले ..
चरित्र जपण्यासाठी तुझ्यापासून दूर झाले ..

रंग भरली मैफिल सोडून गेले ..
प्रेमाची बरसात करून गेले ...
ताऱ्यांच्या प्रवास अनुभवून गेले ..
विनाकारण नाही रे ...
आणि तुला सोडून जाण्याचं खूप लहान ही नाही रे ..

दुर्गा मते


Mar 11, 2022

स्वप्नात ये ना ..

स्वप्नात ये ना ..
साजना मिठीत घे ना ..

हे रंग नवे ...
प्रितीचे मला हवे ..

तुझ्यासवे ..
स्वप्न रंगिन म्हणते ..
हळुवार रेशमी मनाला ..
नावात तुझ्या गुंफिते ..

लाजळूच्या पानाशी संगत धरते ...
गुण त्याचे आत्मसात करते ..

आयुष्यात येऊनी तुझ्या ...
प्राजक्ताचा सडा मी शिंपते ..
चांदणे प्रितीचे तुझ्या संगतीने फुलविते ..
दुर्गा मते

रहस्य ..

तुझ माझ् नातं .
एक रहस्य ठेवू. 
एकमेकांना न विसरण्याच ..
वचन देऊ ..

तू नको दाखवू ...
जगास माझी - तुझी ओळख ..
प्रीत ही मनात साठवू ..
भरल्या डोळ्यांनी एकमेकांना आठवू ..

चमचमते तारे , आज लाजले .

रहस्य हे तुझ्या माझ्या नात्याचे ..

न उलगडवावे कधीही त्यांनाही वाटू लागले ..

म्हणूनच तर आज ते लाजले ..


आज पूर्ण करू श पथ विधी...

तू वचन हे आधी...

नाही विसरणार मला कधी ...

नातं हे रहस्य समान जपून ठेवशील मनामधी ..
दुर्गा मते

Mar 10, 2022

देईल हात हाती तुझ्या ...

वादळ वारा ...
वीज कोसळे ...
तरीही नाते हे ...
शाबुत राहते ..

प्रेम तुझ्यावर करते ..
म्हणून तुला रे जपते . 
वादळ वारा ...वीज कोसळताना ...
हात माझा तुझ्या हाती देते .
नाते हे जपते ..

वेदना होत्या मनाला ..
तरी समजाविते क्षणा क्षणाला ..
स्वतःच्याच दीलाला ....
नको आसरा आयुष्याच्या किनाऱ्याला ..
तुझ्याशिवा य दुसरा ..

वादळ - वारा - वीज ..
कोसळताना देईल हात माझा ..
हाती तुझ्या ...
दुर्गा मते

स्वप्न पूर्ण झालं .

मनातील डायरी चे पान विषय अंतर्गत ...

   लग्न एक प्रथा ...
         आयुष्याची नवी सुरुवात ...

वयात आलेल्या मुला मुलींच स्वप्न ...विशेष करून लग्न आणि त्याला अनुसरून विविध स्वप्न म्हणजे माझा लाईफ पार्टनर असा तसा असावा . सुख दुःखात साथ देणारा असावा . माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारा असावा.  सावली बनुन प्रत्येक क्षणी माझी साथ देणारा असावा. वगैरे वगैरे वैगरे ....अशी विविध स्वप्न डोळ्यात साठवून खऱ्या आयुष्याची सुरुवात करणारी प्रथा म्हणजे लग्न ...


पण त्यापूर्वी जेव्हा एक मुलगा एका   मुलीला बघायला येतो . किंवा त्याही पूर्वी म्हणजे लग्नाचा विषय घरात निघतो.  तेव्हा एका मुलीच्या मनाची काय ? परिस्थिती असते.  ती परिस्थिती मी एका कथे  द्वारे इथे मांडणार आहे ........


     अनघा नुकतीच वयात आलेली मुलगी दिसायला गोड . स्वभावाने हळवी छोट्या छोट्या कारणावरून रडणारी . सतत हसतमुख चेहऱ्याने वावरणारी . तिचा गुमसुम असलेला चेहरा कोणालाही बघायला आवडत नसे . आणि ती सतत ही  हसतच रहायची . त्यामुळे कोणावरही तिचा गुमसुम असलेला चेहरा बघण्याची वेळ आली नाही .


  " ऐकल का ? आपल्या अनु साठी खूप छान स्थळ आलं आहे . हा बघ फोटो . " अनघाचे वडील बाहेरून घरात येत असतानाच बोलत बोलत आले . आणि किचन मध्ये आल्यानंतर मोबाईल फोन मधील अनघाला जो मुलगा बघायला येणार होता . त्याचा फोटो ते अनघाच्या आईला दाखवत असताना बाहेर गेलेली अनघा ही घरी आली . आणि तिच्या बाबांनी तिच्या आई बरोबर तिला ही त्या मुलाचा फोटो दाखवला .


" काय मग अनु मॅडम कसा आहे . माझा जावई ? "


अनघा चे बाबा तिच्या कडे बघत बघत तिला हसत हसत तिला विचारू लागले .  जणू ते तिचे म जाक घेत होते .


अनघा फोटो बघून शॉक.  काय बोलावं तिला सुचत नव्हतं . तो मुलगा दिसायला खूप म्हणजे  खूप म्हणजे खूपच भारी होता . तिच्या पेक्षा कित्येक पट्टीनी सुंदर त्यामुळे तिला काय बोलावं तेच सुचेना .


" बापू ...दिसायला तर सुंदर आहे.  हा पण तुम्ही नका बोलवू ह्यांना मला बघायला .." असं बोलून ती अवाऱ्यात गुपचाप निघून गेली .


" आता हिला काय झालं ? एरवी तर म्हणत असते.  प्रॉपर्टी थोडी कमी असली तरीही चालेल . पण मला शोभणारा मुलगा हवा . आता एवढा सुंदर मुलगा आहे . तरी मॅडम गेल्या रूसून ..तुम्ही ना खूप लाडावून ठेवलं हिला . अती लाड करता तुम्ही हिचे ." असं म्हणत तिची आई किचन मध्ये असणारे भांडे जोरजोरात आपटत होती .


अनघा चे  बाबा काहीचं न बोलता अनंघा कडे गेले .


" अनु , बाळा ,  ..काय झालं ? तुला मुलगा आवडला नाही का ? " ते तिच्या जवळ जाऊन तिला प्रेमाने विचारू लागले .


" नाही बापू , असं काही नाही .." अनु बाहेरच्या दिशेने असणाऱ्या जास्वंदीच्या फुल झाडाकडे एकटक बघत बोलली .


" अनु , इकडे बघ माझ्याकडे आणि मला नीट सांग बाळा काय प्रॉब्लेम आहे ? " बापू ..


" बापू तो मुलगा मला पसंद नाही करणार . आणि चार चौघात मला एका मुलाने  नकार दिला ही गोष्ट मला नाही रुचणार . म्हणून नका बोलू त्याला


बापू तिच्या बोलण्यावर आणि निरागसतेवर हसायला लागले . " एवढंच का ? बघू ते उद्या ..होकार देतो की नकार .


" नको ना बापू " अनघा एवढासा चेहरा करून बोलली .


" तू आता निवांत झोप बरं ..मी त्यांना सांगितलेलं आहे .  ग उद्या या म्हणून  आणि आता ऐन वेळेवर नाही सांगितल


तर चांगलं वाटणार नाही ते . मन दुखावल्या जाईल त्यांचं ." असं म्हणत ते तिला समजावू लागले ..


" आणि उद्या जर त्यांनी मला चार चौघात नकार दिला तर माझं किती मन दुखावल्या जाईल . ह्याचा विचार केला तुम्ही ? " अनघा चे डोळे भरून आले होते .


" काळजी नको करू बाळा . तो नाही देणार तुला नकार "


" तुम्हाला इतकी कशी खात्री ? " अनघा ..


" आणि तुला इतकी कशी खात्री ग ..? की तो तुला नकारच देईल .." बापू


" बापू , अहो मी बघा तो बघा माझ्या पेक्षा कित्येक पट्टी त सुंदर आहे.  तो दिसायला मला कसा होकार देईल . " अनघा ..


" अगं ! बाळा , असं काही नसतं . नशिबाचे भाग असतात . छान दिसण . एकमेकांना सुट होण . हे मनाचे खेळ असतात . " तिचे वडील तिला समजावत होते .


आता ती काहीच बोलू शकत नव्हती. ती शांतच राहिली .


" बरं तू झोप आता . मी पण झोपतो खूप उशीर झाला "


ते झोपायला गेले आणि ती ही झोपायला निघाली .


तस्वीर देखकर


यूहीं दिल आया आपपर ।।


फिर भी दिल में ,


घबराहट है ।


आप मुझे पसंद करेंगे ।


या नहीं । ।


आप मेरी जिंदगी बनेंगे ।


या नहीं ।।


आप है ना ।


मेरे किस्मत में ।।


कल होनेवाली मुलाकत ।


होंगी ना अगले सात जन्म तक ।।


बाप्पा प्लीज उद्या जो मुलगा मला बघायला येणार आहे.  ना त्याने प्लीज होकार च देऊ दे .  अशी प्रार्थना बाप्पाला करून ती झोपली .


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


उजाडली पहाट नवी .


आजची पहाट करेल तिच्या आयुष्याची सुरुवात खरी .


लग्न एक प्रथा ती पार करणार ..


तिच्या लग्नाची सुपारी नक्की फुटणार .


असं म्हणत तिचे बाबा तिला उठवायला आले .


" बाबा किती सुंदर बोललात तुम्ही . परत बोला ना प्लीज . " अनु हट्ट करू लागली .


" आता उशीर होईल.  नंतर बोलेल . तू आवर लवकर . खूप छान रेडी हो . ह्या बापाची लाडकी राजकुमारी वाटली पाहिजे . "


" ओके बापू .." ती बापूला घट्ट मिठी मारते .


10 साडे 10 च्या सुमारास ते पाहुणे तिला बघण्यासाठी येतात . ती खरोखर खूप सुंदर दिसत होती . कुठलाही राजकुमार तिला सहज पसंद करेल एवढी सुंदर .


ती किचन मधून समोर चहा घेऊन आली . तिने सर्वांना चहा दिला आणि तिच्या राजकुमाराला ही द्यायला लागली . तो राजकुमार तिच्याकडे बघतच राहिला . सगळ्याच लक्ष त्याने वेधून घेतलं. 


" मुलगी पसंद आहे ..त्याने सगळ्यांसमोर जाहीर केलं ."


तिच्याही जीवात जीव आला . पहिल्याच नजरेत त्याने तिला पसंद केलं . ही तिच्यासाठी खूप आनंदाची बातमी होती . लग्नाची सुपारी पक्की फुटली होती . लग्नाची बोलणी करून पाहुणे मंडळी परतीच्या प्रवासाला निघाले .


त्यांनी वाटू लावून अनघा चे बाबा घरात आले .


" काय मग अनु झालं ना मनासारखं .." अस बापू ने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला .


" हो बापू .. खरचं मनासारखं झालं . बापू मी असो . किंवा अजुन दुसरी कुठलीही मुलगी असो . प्रत्येक मुलीची एकच  इच्छा असते . की जो मुलगा मला फर्स्ट टाईम बघायला येईल ना . त्यानेच मला होकार द्यावा .
आणि माझी ही तिचं इच्छा पूर्ण झाली . " थँक्यू बाप्पा 🙏🙏 थँक्यु बाप्पू .
दुर्गा मते


Mar 9, 2022

भेट जपली ...

तू अविस्मरणीय सुगंध
माझ्या आयुष्यातून दरवळून गेलास ..

रिमझिम सरिप्रमाने आलास ...

क्षणात सोडून गेलास ..

मी आठवणींचा गंध घेत घेत जगते ..

कधी हसते , कधी रडते तर ,

कधी  एकांतात जाऊन मन रमवते ..

तू फक्त फुंकर मारली ...

मी सर्वच तुझ्यासाठी जगली ..

प्रीत असूनही तू पाठ फिरवली ..

सुगंधाची भेट तरीही मी जपली ..

दुर्गा मते ...

this not fair

मनातील डायरी चे पान विषयाअंतर्गत ...🌹🌹🌹🌹

विषयाचे नाव : लिखाणाची पुनरावृत्ती नको ..
ती पुनरावृत्ती अपमान आहे . लेखणीचा ..

लेखणी लेखकाची जीव की प्राण ..
लेखकाच्या हातून नेहमीच होतो तिचा सन्मान ..

नेहमी राखावा तिचा मान..
चुकूनही होणार तिचा अपमान ..
जबाबदारी आहे लेखकाची ..ठेवावी जाणं ..

तुम्ही म्हणाल आज  दुर्गा ने हे काय लिहिलंय वेड्यासारखं ..लेखक कधी जाणून - बुजून त्याच्या लेखणीचा अपमान करतो का ? माझं पण उत्तर नाहीच असेल . कुठलाच लेखक , कवी मुद्दाम हून त्याच्या लेखणीचा त्याच्या कलेचा अपमान नाही करत . पण कधी कधी त्याच्याच हातून कळत - नकळत त्याच्याच कलेचा अपमान होतो . आणि हे त्याच्या लक्षात ही येत नाही. आज  ही मला वाटणारी सर्वात मोठी खंत आहे . तर तो अपमान कळत नकळत कसा होतो . हे मी थोडक्यात स्पष्ट करते . उदाहरण म्हणून मी लेखक च घेते . आणि त्या उदाहरण मी स्वतः होते . मला कोणाचंही मन दुखवायचं नाही हे , पण चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याचा प्रामाणिक पने प्रयत्न करायचा . कारण माझ्या कलेवर माझं खूप प्रेम आहे . आणि त्याचा नकळत ही अपमान न व्हावा एवढीच इच्छा आहे ..


    लिखाणाची पुनरावृत्ती नको ..


ती पुनरावृत्ती अपमान आहे . लेखणीचा ..


हा माझा आजचा विषय ..


जरा डोकं खाणाराचं आहे ना ..hmm पण सहज नाही सुचला . आज सकाळी  स्वाती ताईंशी बोलण झाल .


लिपीवर प्रीमियर सुविधा अंतर्गत एका पुस्तकाने खूप पैसे कमावले आणि तेच पुस्तक प्रकाशित होऊन त्याला ही खूप प्रसिद्धी मिळाली . पण आश्चर्य चकित करणारी एक गोष्ट आहे . त्या गोष्टीचं मला खूप वाईट .


ते पुस्तक 7- 8 वर्षापुर्वीच एका लेखकाने प्रकाशित केलेलं होतं . आणि आज तेच पुस्तक आज पुन्हा प्रकाशित झाल घटना तिचं फक्त घटना मांडणारा वेगळा . मी त्या पुस्तकाचं नाव आणि लेखकांचं नाव मुद्दाम हून लिहिलं नाही कारण मला कोणाचही मन दुखवायचं नाही .सो असो ही नकळत घडली अस आपण गृहीत धरू आणि सोडू देऊ ..


माझं एवढंच म्हणणं आहे . आपण लेखक आहोत . कवी आहोत . आपण आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर खूप साहित्य निर्मिती करू शकतो . आणि ती साहित्य निर्मिती करन आपला अधिकार आहे . पण साहित्य निर्मिती करताना कोणाचंही साहित्य घेऊन त्याच्यावर आपल नाव टाकून प्रकाशित करण साफ चुकीचं आहे . त्यावेळी खरोखर आपल्या लेखणीचा आपल्या कलेचा अपमान होतं असतो . आणि हे आपल्या लक्षात ही येत नाही .


एखाद्याचं साहित्य खूप खूप आवडल त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा . त्या साहित्याला एवढी प्रसिद्धी मिळाली . मग आपण ही तसचं लिखाण करू थोडा फार फेर बदल करून हा विचारच मुळात चुकीचा आहे . आणि हा विचार अनेक जन करताना दिसतात .


उदाहरण : रामायण आणि महाभारत केवढी गाजलेली ग्रंथ आहेत . ती आता नवीन लेखक लिहितांना दिसतात . ही काय ह्यांनी लिहिली आहे . मग त्या लेखकाचे खरे लेखक काय फक्त नावाला आहेत . मान्य करते नवीन लेखक त्या विषयाचा अभ्यास करून प्रामाणिकपणे लिहिण्याचा प्रयत्न करतात . पण ते चुकीचं आहे . लोकांना मुळात रामायण महाभारत आवडत.  म्हणून तुमच्या पुस्तकाला प्रसिध्दी मिळते . पण त्यावर तुमचं नाव असण चुकीचं आहे . कारण त्याचे खरे लेखक च त्या नावाचे मानकरी आहेत .  कारण तुम्ही जरी ते पुस्तक प्रकाशित केलं असलं तरी त्याच्यासाठी खरा अभ्यास आणि मेहनत ही खऱ्याच लेखकाची आहे. त्यामुळे तुम्ही पुस्तक प्रकाशित करा . त्यातून पैसे मिळवा प्रसिद्धी मिळवा काहीचं हरकत नाही . पण जेव्हा तुम्ही लेखक म्हणून तुमचं नाव लिहाल ना , तेव्हा तुमच्या नावाआधी खऱ्या लेखकाचे नाव लिहायला विसरू नका ..


Infact लिखाणाची पुनरावृत्ती करन चुकीचंच आहे . ती पुनरावृत्ती म्हणजे अपमान आहे . लेखणीचा . ती पुनरावृत्ती होऊ नये . ह्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्नशील रहायला हवं .


आपण कल्पना शक्तीच्या जोरावर विविध विषयावर खूप लिखाण करू शकतो . आणि तेच करायला . ते लिखाण करतांना कोणाच्याही साहित्याची चोरी करू नये .


कोणाचं कितीही लिखाण आवडल तरी त्याला , भरभरून दाद देणं एवढंच मनात ठेवावं . आणि आपण ह्याच्याही पेक्षा सुंदर विषयावर लिखाण करू हाच विचार मनात ठेवावा . नक्कीच तुमच्या लेखणीची उंची वाढेल .आणि तिचा अपमान ही होणार नाही .


हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू ने लिहिला नाही . तरीही नकळत कोणाचेही मन दुखवल्या गेले असेल तर आधीच माफी मागते 🙏🙏🙏🙏🙏


तिचा सन्मान रोज करावा ...

मनातील डायरी चे पान विषायांतर्गत ...

काल 8 जागतिक महिला दिन ..
काल वेळ नाही झाला म्हणून आज लिहिते ...

तिचा सन्मान फक्त त्या एका दिवशीच नको करायला . दररोज करायला . ती रोजचं दुसऱ्यासाठी जगते . मग तिचा सन्मान एकाच दिवशी का ?

ती तुमची आई होते ..बहिण होते . कधी गुरु होते . कधी मैत्रीण होते . सुख दुःखात साथ देते . बदल्यात काहीचं मागत नाही . ती काही मागत नाही . म्हणून आपण काही देऊ नये . हैं तो गलत बात  है ना..त्यामुळे दररोज तिचा सन्मान करावा . तेवढंच तिला खूप बरं वाट्टेल . आपण सर्वाच करतो . ह्याचं तिला कधी ओझ नाही वाटणार . उलट ती खूप आनंदाने ती गरजेपेक्षा जास्त करेल तुमच्यासाठी आधीच खूप करते . तिचा सन्मान जर केला रोज . तर ती खरच खूप महत्त्व देईन .

सन्मान म्हणजे तरी काय हो ...

फक्त तिला पर्सनल स्पेस द्यावी . चार चौघात तिचा अपमान होणार नाही . ह्याची काळजी घ्यावी . तिला जगण्याचं आणि वयक्तिक विचारांचं स्वतंत्र द्यावं . तिच्या डोळ्यातील अश्रू च नाही . तर , तिच्या चेहऱ्यावरील हास्याच कारण बनावं ..बास ह्याच्यापलिकडे काहीचं नको असतं तिला ..अशा रीतीने दररोज तिचा सन्मान करावा .
दुर्गा मते
थँक्यू सो मच ...

Mar 8, 2022

महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

Happy womans day 💐💐💐
   All of you ...🍫🍫🍫🍫

स्त्री शक्ती एक अद्भुत रहस्य ...

कोड तिच्या मनाचं आणि तिच्या स्वभावाचं कधी उलगडणार नाही . हळवा ही तेवढाच कणखर ही तेवढाच ..ती एखाद्यावर जीवापाड प्रेम ही करू शकते . आणि एखाद्याचा गरजेपेक्षा जास्त तिरस्कार ही करू शकते . स्त्री आहे ती एक अद्भुत रहस्य कधीचं न उलगडणार कोड ...हा पण प्रत्येक स्त्री मध्ये एक गुण समान असतो . ती कधीच कोणा चाही मनापासून राग नाही करत . तिची चीड चीड तिचा गुस्सा हा काही क्षणापुरताच असतो . थोड्या वेळ गेला घडलेल्या गोष्टीचा विसर पडला की ती पूर्वीसारखी active होते ..

आणि हे  माझ्या बाबतीत खूप वेळेस घडत ...म्हणून मुद्दाम हून पॉइंट मांडला ....आणि तेव्हा कोणाबद्दल मी कसा विचार करेन हे माझं मलाच सांगता येणार नाही .😝😝😝😂😂😂

असो आज आहे womans day आज त्या प्रत्येक स्त्री चा  आवर जून सन्मान करावा असा दिवस ...

जिने आपल्याला जन्म दिला त्या आईचा .
ज्या बहिणीने तिच्या वाट्यात आपल्याला वाटेकरी होऊ दिलं त्या बहिणीचा ..
जिने राजा - राणीच्या छान छान कथा सांगितल्या त्या आजीचा ..
पुरणपोळीचा घास भरवण्याऱ्या मामीचा ..
प्रत्येक हट्ट हक्काने पुरवणाऱ्या गोड गोड मावशीचा  .
आई प्रमाणे जीव लावणाऱ्या काकूंचा ..
आणि मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करायला हक्काची एक सखी ...असतेच प्रत्येकाच्या आयुष्यात गौरव करूया आज त्या सखीचा ..

जरी स्त्री वेग वेगळ्या नावांनी गुंफलेली ..
प्रेम - माया - ममता जिव्हाळा यानेच ती जाते ओळखली ..

आज जागतिक महिला दीन मी भेटून गिफ्ट नाही देऊ शकत कोणाला कारण भेटायला कोणी इथे आसपास नाही राहत . पण ह्या लिपीवर खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्या. प्रत्येकीने मला लहान बहीण समजून मी कितीही चुका केल्या तरी माफ केल ...आणि तू छोटी आहेस अजून अस म्हणत चुका करायला मोकळीक दिली . आणि मी पण त्याचा पुरेपूर फायदा घेते .😝😝

मी फार काही नाही देऊ शकत,  पण आजच्या ह्या छान दिवशी प्रत्येक मैत्रिणी साठी खास काहीतरी लिहिण्याची इच्छा होती . म्हणून आज थोड थोड माझ्या प्रत्येक मैत्रीणी साठी ..

सुरुवात कोणापासून करावी तेच कळत नाही हे ,  starting कोणीही असो ending कोणीही प्रत्येकी साठी मनात तेवढंच प्रेम आणि आदर आहे . हे 💯💯💯💯💯💯आणि मी आधीच सांगते मी प्रत्येकी. शी रोजचं नाही बोलत . पण ओळखते मात्र सर्वांना प्रत्येकी शी छान नातं आहे..

थँक्यू सो मच आई ..
मला जन्म दिलास माझ्या आयुष्याला आकार दिलास ..
थँक्यू सो मच तुझ्यामुळे आज मला हे सुंदर जग बघायला मिळालं ...कितीही लिहिलं तरी उपकाराच ओझ काही फिटणार नाही ....तुला आजच्या ह्या  खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..💐💐💐




🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आधी कोणाचं लिहू कळत नाही हे , पण लीहीतेच ..

बघून त्यांना अस वाटतं ...
आनंदाने जीवन जगण्यासाठी ..
वयाच घेणं देणं सोडून द्यावं लागतं ..
चारोळी त्यांची आवडती श्रेणी ....
त्यात नेहमीच असतात त्या टॉप1 वर ..
ओळखा पाहू कोण ?
जाऊ दे मीच सांगते ...




रंजू ताई ...माझ्या खास मैत्रीण थँक्यू सो मच ताई कशासाठी ? माझ्याशी मैत्री केली त्यासाठी ...आणि माझ्या आयुष्यात आलात त्यासाठी ...



सुंदर विचारांची माझी सुविधा आई ..
लीपिवरील सर्वात पहिली मैत्रीण ..
मी सर्वात जास्त त्रास ह्यांनाच दिलेला असेल ..
तरीही त्यांनी कधी मनावर नाही घेतल .
आणि अंतर तर अजुनही नाही दिलं ....
आई म्हणते मी त्यांना म्हणून  हक्काने रागवतात ....
पण त्यांच्या रागवण्याचा मला नेहमी फायदाच झालेला आहे . त्यांच्यामुळे माझी एक वाईट सवय मोडली आहे .
खरच थँक्यू सो मच माझ्यावर योग्य वेळी रागवलात त्यासाठी आणि आज  हक्काने सांगते मी जेव्हा जेव्हा ही चुकेल ना तेव्हा तेव्हा हक्काने रागवा . कारण माझा राग एक क्षण असतो . पण जी सुधारणा होते ना ती नेहमी साठी होते ....थँक्यु सो मच 😘😘🍫🍫



ही माझी आई आहे ...
ह्यांना पण मी आईच बोलते ...
त्यांचं आणि माझ नातं पण खूप खास आहे .
मनाने खूप प्रेमळ ..
रचना ही एक नंबर करतात ...
आणि ह्याची बहिण ह्या त्यांना तायडे बोलतात ..
म्हणजे माझी अनघा आई ...




  
खूप म्हणजे खूप प्रेमळ ...
वाचनाची प्रचंड आवड ...
लिखाणातून चं ओळख झाली ...
बोलता बोलता ओळख वाढली ..
देव बाप्पाने तिची भेट घडवली ...
छान जोडी जमली माय लेकींची ..

आता बहिणीसाठी ...मला तर इथे खूप बहिणी मिळाल्या रिअल लाईफ मध्ये बहिण नाही . ह्याचं वाईट पूर्वी जास्त वाटायचं आता एवढं वाटतं नाही ..

कल्पना ओन्ली आय डिया  ताई ...दीक्षा ताई ..शशी ताई ..जयश्री ताई , नेहा ताई ..पूजा दि .. वैशू ताई ह्या माझ्या  सर्वात लाडक्या बहिणी ....




Dashing ..पाटलाची वाघीण ..
कल्पना ताई ..तिचा एक गुण मला खूप आवडतो ..
ती कधीच कोणालाच घाबरत नाही ..
आणि तू पण कधीचं कोणाला ही घाबरायच नाही .
सतत सांगते ..
ती कधी माझी आई होते ..कधी बहिण होते .
तर कधी माझी  मैत्रीण होते . खरच काय लिहू हिच्याबद्दल खूप गोड सखी आहे ही . तिने नेहमी मला suport केलेला आहे . तिचं आणि माझं नातं चं खूप छान आहे.  ते शब्दात सांगन कठीण आहे .

आता हिच्या मुळे मला एक गोड मैत्रीण मिळाली ..
रायगड ची शिवकन्या.. अहो कोण काय ? हीची डबल कॉपी म्हणजे दीक्षा ताई ..थँक्यु कल्पना ताई तुझ्यामुळेच आज आमची छान मैत्री जमलेली आहे .




दिसायला गोड ..बोलायला गोड ..
म्हणून असते रोज हिला बोलण्याची ओढ .
दररोज एक तरी मेसेज होतो ..
मी विसरले की ती करते .
ती विसरली  की मी करते ..
काहीही झालं तरी एकमेकींना एकमेकींचा विसर नाही पडू देत .......
सगळ्यात फास्ट माझी मैत्री हिच्याशी झालेली आहे.  आणि ती अजुनही छान होत चालली आहे . कारण ती एवढं छान बोलते ना तिचं बोलण ऐकत चं  रहावं वाटतं ..

जयश्री ताई.  
प्रेमळ ..शांत आणि सुस्वभावी ..
हा पण dashing पण आहे हा .. आमचं नातं पण खूप छान आहे . तिच्यावर तर मी पूर्वी खूप मोठा लेख लिहिला होता . तिला तो खूप आवडला होता ..त्यामुळे आज थोडच लिहिलं कारण तिला पण माहितेय मी सध्या खूप बिझी आहे . आणि ती मला समजून घेईल . कारण तिने  मला समजून घेण्याचा वसा घेतलेला आहे . तू छोटी आहेस ग अजुन म्हणून सतत माफ करते . आणि मी तिला खूप त्रास देते ..पण ताई प्लीज मला जशी आता समजून घेते तसचं नेहमी समजून घे . एवढीच विनंती ..
आय लव्ह यू ❣️❣️❣️❣️

शशी ताई ...

ह्या मॅडम तर फोटो देणार नाही . हे माहितेय मला म्हणून मी तिला मागितला च नाही . पण माझा बघा कारण दिसायला ती आणि मी same आहोत व्हिडिओ कॉल झाला ना त्यामुळे माहितेय .. आमचे स्वभाव पण same आणि वागणं पण same ..

तिचं माझं गमंत करत करत जुळल नातं .
मी 84 वर्षाची आणि ती 10 अशा गमंती तून नातं निर्माण झालं .
व्हिडिओ कॉल वर बघते तर समोर मॅडम आणि माझी बोलती बंद . पण अजूनही आमच्या नात्याची सुरुवात जशी झाली होती . तशीच आहे . एकदम गोड ..दोघींनाही फक्त हसायला आणि हसवायला आवडत . म्हणून कधाचित आमचं नातं safe आहे ..

शुभदा ताई ..




नाव स्वभाव आणि दिसण सगळचं छान ..
हीच्यासारखी मैत्रीण मिळाली .
पूर्व जन्मी खूप केलं असेल पुण्य म्हणून ..
हे ऋणानुबंध जुळल ..
खरच सांगते . तुम्ही सगळ्याच जनी खूप गोड आहात ह्यात संशय नाही . पण हिच्यात नक्की काही तरी वेगळं आहे.  म्हणून ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे ..
छोटी कशी आहेस ? असा एक दिवस आड मला मेसेज असतो . बोलण नेहमी नाही होतं.  पण मेसेज नेहमी होतो . तिने नाही केला तर मी करते मी नाही केला तर ती करते.खूप छान मैत्रीण आहे.  ही सगळ्यात आगळी वेगळी ..😊😊😊




गोड मैत्रीण हवी अशी ..
मानसी दि सारखी ..
दिसायला तर ती खूप सुंदर आहे ..
पण मनाने ही खूप चांगली आहे .
मी तिला ताई च बोलते पण  नातं माय लेकी प्रमाणेच आहे ...
ती मला आवडीने पिल्लू बोलते . मी तिची लाडकी आहे . सर्वांना सांगते . कधी परी तर कधी पिल्लू ह्याचं नावाने ती हाक मारते ..
अशी आई सर्वांना मिळावी एवढीच प्रार्थना करते ..
बिचारी नेहमी आजारी असते . 
म्हणून काळजी वाटते ....
म्हणून तिला आठवड्यातून एकदा तरी काळजीने मेसेज करण्याची इच्छा होते ...
खूप गोड  आणि हसरी मैत्रीण आहे ..




प्रकार कोणताही असो लिखाणाचा ..
लिखाणात हात नाही धरू शकणार कोणी वैशु ताईचा ..
तिने मला अलक हा प्रकार शिकवला तिच्यामुळेच मी आज अलक खूप चांगल्या प्रकारे लिहू शकते ..
थॅन्क्स वैशू ताई.....
ती  मला नित्याराणीच बोलते ..ग्रुप वर आम्ही धमाल करतो ...स्वभावाने खूप छान आहे ...




अश्विनी ताई ...
आमच्या वयात फार अंतर नाही ..
म्हणून आमचं नातं छान आहे ...
गप्पा - टप्पा नेहमी होत असतात. .
ती ही मनाने खूप चांगली आहे. 
माझ्या पेक्षा खूप समजदार आहे .



पूजा दि
माझी नवीन मैत्रीण हल्लीच झाली .
पण खूप लवकर खूप छान घट्टी जमली ..
कारण आम्ही एकाच भागात राहतो ना .आमची कधीही भेट होऊ शकते . त्यामुळे आता जोडलेली मैत्री तोडण अशक्य आहे . आणि आमचं आधीच ठरलेले आहे . जोडायच म्हणून जोडायच नाही तर टिकवायचं म्हणून जोडा यचं आणि नात तुटू शकनार नाही . कारण ती स्वभावाने खूप ग्रेट आहे ..




जानवी ताई म्हणजे माई ..पूजा दि आणि माझी पण ..
खूप छान स्वभाव माझ्या birthday च्या दिवशी पासून आम्ही एकमेकींना ओळखतो ...खूप दिवस नाही झाले
पण खूप कमी दिवसात खूप छान नातं निर्माण झालं . कारण त्यांचा छान स्वभाव ..दोन दिवस मी लिपी आणि wp दोन्हीवर पण नव्हते ..तेव्हा त्यांनी काय ग नीतू कुठे दोन दिवस दिसली नाही. मेसेज करून विचारलं खूप छान वाटलं ..




स्वाती ताई ..
लिखाण खूप छान असत त्यांचं .
लिखाणात नाविन्यता असते ..
स्वभाव पण छान आमचं नेहमी बोलण होतं .
आम्ही खूप दिवसापासून ओळखतो एकमेकींना ..
कॉलिंग वर पण भरपूर वेळेस बोललेलो आहे . भेटण्याचा च योग काय माहित कधी येतो ? .
येईल तेव्हा येईल ..पण आमचं कमिनिकेशन काही बंद नाही होणार ...हे नक्की ...



राजश्री ताई .


टीचर असल्यामुळे प्रेमळ स्वभाव ...


खरच खूप प्रेमळ स्वभाव आहे ..


गुड मॉर्निंग च नेहमी मेसेज असतो . आणि वेळ काढून बोलण होत.  कधी कधी मी खूप घाबरते . तेव्हा त्यांना कळाल की त्या मला नेहमी सांगतात.  अग घाबरु नको ग होईल सगळ ठीक ..अशा ह्या राजश्री ताई माझ्या खूप चांगल्या मैत्रिण आहे ...


अजुनही बऱ्याच आहेत. त्यांच्या साठी पण लिहायचं होतं .


राणी ठाकरे ..


ती. पण खूप छान आहे स्वभावाने आणि माझी खूप चांगली मैत्री न पण आहे . ती माझ्या wp वर नाही म्हणू.न तिचा फोटो नाही माझ्याकडे ..


आणि अजुन एक नेहा स्ना ..सगळ्याची आवडती ..


ती पण माझी खूप चांगली मैत्रीण आहे


तिचं लिखाण मला खूप आवडत स्पेशली शायरी ..


तिच्या शायरी ची मी खूप मोठी फॅन आहे ..तिचा ही फोटो नाही हे कारण ती आजच wp जॉईन झाली .


शीतल आणि वर्षा जगताप माझ्यासाठी खूप खास वर्षा ताई खूप सुंदर रचना लिहिते . आणि शीतल माझी बेस्ट फ्रेंड आहे .. खूप dashing माझ्याच वयाची पण माझ्या पेक्षा खूप हुशार आहे . तिची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही ..ह्या प्रतीलिपी ला मनापासून धन्यवाद तिच्या मुळेच आज मला ह्या गोड गोड मैत्रिणी मिळाल्या ..


आज माझ्या ह्या सर्व गोड गोड मैत्रीणीना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही घर आणि नोकरी सांभाळून खूप सुंदर कविता लेख लिहिता . तुम्ही सर्वच जणी माझ्या आदर्श स्थानी आहात . हा लेख लिहिण्याचा एवढाच उद्देश आहे . माझ्या मुळे तुमच्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर थोडी का होईना smile माझ्यामुळे ह्यावी . बाकी काहीच नाही .


आणि ज्यांना मी चुकून विसरले त्यांना खरच सॉरी त्यांच्यासाठी माझ्या मनात आदर किंवा प्रेम नाही अस नाही . पण आमच्या कडे लग्नाची गडबड आहे . त्यामुळे खूप लिहायचं होत. पण कमीच लिहिलं ..कारण एवढा वेळ नाही माझ्याकडे ..


महिला दिनाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫❣️❣️❣️❣️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐


भाग्यवान ..

तिचं अस्तित्व नाही ,
  फक्त चूल आणि मुल ..
गंध तिचे मन ..
जणू जाई - जुईचे फुल ..

जन्म बाईचा वरदान असे ....

शाप नसे ..

हे जिच्या हृदयी ठसे ..

धन्य ती माऊली असे ..

दोन घरं सांभाळायचं  ,

पुण्य तिच्या पदरी पडे ..

दोन आई बाबांचं प्रेम मिळायला ..

ही भाग्य लागते ..

आणि भाग्यवान ही ती स्त्रीचं असते ..
दुर्गा मते

Mar 7, 2022

स्वप्नांच्या दुनियेतली राणी .

शब्द तुझे मौन गीत माझे ..
अलगद रचू स्वप्न उद्याचे ..
भास हे नवखे प्रेमाचे ..
येईल ऋतु सुखाचे ..
ह्याचं आशेवर जगते ..

भास हे छळते ..
सुख हे लाजते ..
स्पंदन हे धडाडते

काळजाचे ठोके चुकते...
मी स्वप्न रंगवते ...

फुलली बाग नवखी ,
ही प्रीत अनोखी ..
स्वप्न माझे स्वच्छंदी ..
मी माझ्या विश्वात आनंदी ..
स्वप्नांच्या दुनियेतली राणी ...
बडबडते निरागस वाणी ..
दुर्गा मते ..

अशा गोष्टी मुळे मुली येतात ट्रॅप मध्ये ..


मुलींचा स्वभाव मुळातच साधा सरळ आणि प्रेमळ असतो . त्यांना प्रेमाचे रंग दाखवून फसवन कुठल्याही मुलाला सहज शक्य असतं . आणि मुलीही एखाद्या मुलाच्या ट्रॅप मध्ये कशा प्रकारे अडकतात . हे त्यांचं त्यांनाही कळत नाही . मग ते सोशल मीडिया वर असो किंवा रिअल लाईफ मध्ये . कुठेही त्या व्यवस्थित ट्रॅप मध्ये अडकतात . आणि एक समाज काहीही झालं तरी मुलींनाचं दोष देणार त्यांची बाजू समजून न घेता मुलींनाच गृहीत धरतो .


      मुळातच एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र मैत्रीण असू शकतात . ह्या विचाराने तिची आणि त्याची फ्रेंड शिप झाली . सोशल मीडिया वर रिअल मध्ये ते एकमेकांना ओळखत नव्हते . सुरुवातीपासून त्यांची मैत्री खूप छान होती .


समजून घेणं समजून सांगणं एकमेकांना वेळ देणं . ह्या गोष्टी मुळे त्यांची मैत्री बहरत गेली . तिचा त्याच्यावर खूप विश्वास बसू लागला . आणि त्याचा ही तिच्यावर . विश्वासाच्या जोरावर त्यांच्या मैत्रीच हळू हळू प्रेमात रूपांतर व्हायला लागलं . पण ते प्रेमात होणार रूपांतर दोघांनाही मान्य नव्हत .


   कोनामध्येही विनाकारण अडकायच नाही . अशा विचारांचा तो होता . आणि तिला तर तिच्या आयुष्यात कोणावरही कधीच प्रेम करायचं नव्हत . 


ते त्यांच्या विचारांवर जरी ठाम असले , तरी यंग होते . त्यामुळे मनावर हवा तेवढा ताबा ठेवायला जमल नाही .


हळू हळू त्यांचं एक दीड तास होणार बोलणं . 3 ते 4 तासावर गेलं . आणि मग खरोखरच ते एकमेकांमध्ये गुंतू लागले  .. हळू हळू त्यांच्या बोलण्या त नको ते विषय निघू लागले . अर्थात त्या विषयाचा तिला खूप त्रास व्हायचा .


त्यांचं मन आपल्यामुळे दुखावल्या जाऊ नये . ह्या भावनेने ती त्याला रिस्पॉन्स द्यायची.  पण तिच्या मनात हळू हळू त्यांच्या बद्दल नको त्या शंका येऊ लागल्या .


" हा नक्की चांगला असेल ना , सोशल मीडिया वर कोणीही चांगलं वागत . रियल लाईफ मध्ये कसा असेल?"


अशा प्रकारे प्रश्न तिच्या मनात सतत येत होते . ती कधी कधी त्यांच्याशी बोलण टाळायची.  पण तिने बोलण टाळलं की तो खूप upset व्हायचा . आणि तो upset झाला की ती ही upset व्हायची . त्यांच्या आनंदासाठी त्याच्या समाधानासाठी ती त्याच्या contact मध्ये राहिली. 


त्याच्या गोड गोड बोलण्यात ती अडकत चालली होती .


त्याच्यात अडकतांना स्वतःला पूर्णपणे विसरत चालली होती . आता तर तिच्यासाठी तोच तीच आयुष्य झाला होता . "तिचं आयुष्य म्हणजे फक्त तो आणि तोच" अशी उपमा तिने दिली होती .


ऑनलाईन नातं त्यांचं खूप छान झालं . आपण एकमेकांना 4 - 5 महिन्यापासून नाही तर , जन्मापासून एकमेकांना ओळखत असल्याची फिलिंग त्यांना येत होती . 


असं एकमेकांना किती दिवस wp बघायचं . असं दोघांनाही वाटू लागल होत . दोघानाही एकमेकांना भेटण्याची खूप ओढ लागली . ती ओढ संपुष्टात आली .  ते काही दिवसांनी भेटले ही . आणि पहिल्याच भेटीत नको त्या घटना घडल्या .


ती   दोन तीन वेळेस नाही म्हणाली . पण नंतर त्याच्या प्रेमळ आणि फसव्या शब्दांनी तिला फसवल व्यवस्थित रित्या ट्रॅप मध्ये अडकवल आणि बिचारीचं आयुष्य उदवस्थ झालं ....
दुर्गा मते


अशा घटना घडू नये म्हणून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे . सोशल मीडिया वाटते तेवढी चांगली नाही . हे लक्षात ठेवूनच लोकांशी संपर्क साधला पाहिजे .

हा पण इथे खूप चांगली माणस भेटतात ती ही जपून ठेवली पाहिजे .

ही कथा पूर्णतः काल्पनिक होती कोणाच्याही आयुष्याशी संबधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ..


Mar 6, 2022

चंद्राची कोर ..

चंद्राची कोर बघून तो रोज आठवतो ..
मला दिलेल्या तिच्या उपमेत रोज सामावतो ..

निशांत रात्री हळवा गारवा ...
मनास स्पर्शून गेला तुझ्या स्वभावाचा ओलावा ..

बोल माझ्या रुबाब दार राजकुमाराचे ..
किती किती म्हणून सांगायचे ......

कधी कधी फुलाची उपमा देतो ..
तर कधी मधाच्या गोडव्याची ...
काहीही झालं तरी काळजी घेतो मनाची ...

म्हणून चं तर तो क्षणो क्षणी आठवतो ...
माझ्या रचनेत गुप्त होतो ...
दुर्गा मते ..

काल्पनिक रचना एवढं नशीब नाही आमचं आणि बरच😊😊😊 आहे म्हणा ....उगाच घरच्यांना त्रास नको ...

का आलास आयुष्यात ...

का आलास माझ्या आयुष्यात ..
का राहिला माझ्या सहवासात ..
का घर निर्माण केलेस माझ्या मनात ..
आणि जोडलेलं नातं तोडून टाकल एका क्षणात ..

का अस केलं ...
एवढ्या वरही नाही भागल ..
म्हणून माझ नाव खराब केलं ..

मीच मागच्या जन्मी पाप केलं असेल ..

क्षण भर तुझी साथ मिळाली ..

कोरी पाटी कोरीच राहिली...

आसवांनी मात्र ओलीचिंब झाली ..

का आलास आयुष्यात ?
सुखाचा डाव उधळून लावयला ..
का आलास आयुष्यात ...
क्षणोक्षणी असे दुःख द्यायला ..

नको मला तुझी  हळवी साथ ...
ज्यात कधीच होणार नाही प्रेमाची बरसात ...
दुर्गा मते

म्हणतात ना ...

म्हणतात जीव लावलेल्या माणसाला आपण कधीच विसरू शकत नाही . ते अगदी खरं आहे . कितीही प्रयत्न केला तरी त्याला विसरण अशक्य असतं .

जीव लावलेला असतो ना मनापासून मग कस विसरता येईल त्याला आणि ते विसरण अशक्य आहे. 

गुंज हलकेच सांगितले होते तुला ..
साथ हवी होती मला ...

वेदना तू जाणायचा ....
माझ्या स्वप्नांना हळुवार आकार द्यायचा ...
सुरेख होता प्रवास नात्याचा ...

कसा कोसळला डोंगर दुःखाचा ..
ठावच घेतला त्याने सुखाचा ..

अबोल झाली दोन मन ...

विसरले ते प्रेमाचे क्षण ...


एकमेकांप्रती द्वेष तिरस्कार मनी बाळगला ..

अशा प्रकारे प्रवास नात्याचा संपला ...


एक सुंदर प्रवास त्याचा आणि तिचा संपलेला होता . तरीही सतत त्याचा चेहरा तिला आठवत होता . विश्वास पूर्ण होता स्वतः वर की आपण चुकीचं नाही तोच चुकीचा वागला आपल्याशी तरीही आजही त्याच्यासाठीच तिचा जीव तळमळत होता .

असा कसा हा डाव होता . नियतीचा की नशिबाचा ..

उधळून लावताना ही जीव मेटाकुटीला येत होता . त्याला विसरायचं ती खूप प्रयत्न करत होती . अयशस्वीचं ठरली कारण अजुनही कुठेतरी ती त्याच्यातच आहे अडकलेली होती .


तो तिच्या मनाविरुध्द वागत असताना ती त्याला सतत माफ करायची . आणि तिच्या चांगुलपणाचाच त्याने फायदा घेतला . ही गोष्ट तिला खूप खटकली ...

अखेरीस त्याच्या बद्दल तिच्या मनात असलेलं प्रेम कमी झालं . त्याचा विचार सोडून देण्याचं तिने पक्क केलं . 


पण अजून ही तिला विसरू शकत नाही हे , अजुनही ती त्यातच अडकलेली आहे कुठेतरी ...म्हणतात ना , " जीव लावलेल्या माणसाला आपण कधी विसरू शकत नाही . "

हे हिच्या बाबतीत खरं झालं ...
दुर्गा मते

तुटलेले स्वप्न माझे ...

तुटलेले स्वप्न माझे ..
तू नव्याने विणले ...

आकाशात नवे चंद्र - सुर्य दिसले ..
   त्याच्या प्रकशात नवे किरण गवसले ...

तुझ्या सहवासात अस्वस्थ मन माझे ...
स्वस्थ रे झाले .......

स्वप्न तुटलेले मनात राहिलेले ....
तुझ्यामुळे आज नव्याने पाहू शकले ...

      मेघा ला मी हसले ..
      बघ रे तुझ्याकडे येण्याचे साधन मज मिळाले.
      बोलताना हळूच लाजले...

तुटलेले स्वप्न माझे ..
तू नव्याने विणले ..

दुर्गा मते 

Mar 5, 2022

आयुष्यात यावं असं कोणीतरी ..

आयुष्यात यावं अस कोणीतरी ..
मनापासून प्रेम करणारं
गुलाबाच्या फुलासारखं जपणार ..
आयुष्यात यावं अस कोणीतरी ..

काटेरी वन सभोवताली आहे बोचनारी ..

संवेदना मनाची त्यास कधीच न कळणारी ..

आयुष्यात यावं असं कोणीतरी ..


वेदनेवर त्या फुंकर हळुवार मारणार ..

जखमेवर त्या प्रेमाने मलमपट्टी करणार ..

आयुष्यात यावं असं कोणीतरी ..


नाकाचा शेंडा किती लाल झाला बाई ..

असं म्हणत राग माझा क्षणात सोडवणारा .

घेऊन हाती आनंदाचा मोरपिसारा ..


आयुष्यात यावं असं कोणीतरी ..

अलगद ज्यास मी देऊ शकेल मनाचा किनारा ..

आणि त्याच्या विश्वातचं शोधेल उभ्या आयुष्याचा सहारा ..

आयुष्यात यावं असं कोणीतरी ..

जिवापाड प्रेम करणारा राजकुमार माझा हक्काचा ..
ज्याच्यासोबत प्रवास करयचा आहे ..
सुखी आयुष्याचा ..

आयुष्यात यावं असं कोणीतरी ..
जिवापाड प्रेम करणार ...
गुलाबाच्या पाकळ्या सम आयुष्य माझं तोलनार ..
दुर्गा मते ...

Mar 3, 2022

गंध त्या फुलाचे .

गंध त्या फुलाचे ..
आयुष्याला लाभले ..
उडालेले रंग जीवनात आले ...

सुखाची उधळण करू लागले .
गंध त्या फुलाचे ..
आयुष्याला लाभले ..

स्वप्न ते सावळे ...

निपचित होते पडलेले ...
नव्याने उभे राहिले ...
गंध त्या फुलाचे ...
आयुष्याला लाभले ..

एकरूप होते धरणीशी ..

संवाद साधत होते अबोल सखीशी ..
नव्हती ओढ त्या आकाशाची ...
त्यानेच केली  व्यक्त ईश्चा  मैत्रीची ...
गंध त्या फुलाचे ..
आयुष्याला लाभले ..
दुर्गा मते


रचना लिहिते

रचना लिहिते कधीतरी स्वतःसाठी ..
डोळ्यांतील पाणी आटवण्यासाठी ..

एकांत अनुभवण्यासाठी ...


स्वतःला सावरण्यासाठी ..
गालातल्या गालात हसण्यासाठी ..
मन मोकळं करण्यासाठी ..
स्वप्न त्यात ओतन्यासाठी ...
मुक्तपणे जगण्यासाठी ..

मनातील चलबिचल स्थिर करण्यासाठी ..

प्रेम - विरह व्यक्त करण्यासाठी ..

भूतकाळ विसरण्यासाठी ..

भविष्य आजमावण्यासाठी ..

रचना लिहिते कधीतरी स्वतःसाठी .

डोळ्यातील पाणी आटवण्यासाठी ...

दुर्गा मते

प्रेम झालं

प्रेम केलं  प्रेम केलं ..
जग म्हणत ..
नाही रे ..

प्रेम  झालं प्रेम झालं
मन म्हणत .

वाया गेली पोर ..
बोलतेय सार जग ..
तरीही तुझ्यातच रमल मन ..

तू गुस्सा करतो ..
भाव खातो ..
मला इग्नोर करतो .
तरीही जीव तुझ्यासाठी तळमळतो ..

प्रेम केलं प्रेम केलं ..
जग म्हणत ..
नाही रे ,
प्रेम झालं प्रेम झालं ..
मन म्हणत...
दुर्गा मते

सदर रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही ..

आयुष्य डिस्टर्ब होत ...

भावनेच्या भरात ह्या लेख मालिकेतील पहिला लेख माझा .

आयुष्य डिस्टर्ब होत.

खरोखरच भावनेच्या भरात प्रेमात पडल्या नंतर .. आपण खूप सारी स्वप्न रंगवतो . स्वप्नांना अस्तित्व आहे की , नाही ह्याची दखल न घेताच वाहवत जातो . आणि नंतर एकटो पडतो .

प्रेम वाईट नाही हे , जर अनुभवण्या पुरत असेल .
मनावर ताबा असेल तर ...जर आपल्या मनावरचा ताबा सुटला तर , मग खरोखरच खूप त्रास होतो . आणि त्याहूनही जास्त त्रास होतो . जीव लावलेल्या माणसाला बायचान्स सोडून जाण्याची गरज पडली तर , किंवा तो आपल्याला दुखवून गेला तर ..म्हणजेच विरह नशिबी आला तर , आणि प्रेम केलं म्हंटल्यावर 💯💯विरह येतो. 
प्रेमाची शिक्षाच ती आहे .

जेव्हा नशिबी विरह येतो . तेव्हा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो . हळव्या मनाला असंख्य वेदना झालेल्या असतात . त्या वेदनांच्या जखमा खोलवर रुजलेल्या असतात . तात्पुरत्या विझतात आठवणींच्या हिंदोळ्यावर पुन्हा नव्याने आठवतात . आणि मग खरोखर आयुष्य डिस्टर्ब होत . एक क्षण अस ही वाटायला लागतं .

का आला असेल हा आपल्या आयुष्यात आणि आपण तरी का ह्याला जीव लावल्याची चूक केली असेल . भावनांचा गुंता वाढत जातो . आणि खरोखर खूप त्रास होतो .

त्यामुळे वाहवत जाण्याआधी मनावर ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे.  अनुभव प्रत्येक गोष्टीचा घ्यायला हवा . पण त्या आधी हा अनुभव आपल्याला आयुष्यभर त्रास ही देऊ शकतो . ह्याचा ही जरा विचार करायला हवा .

हा लेख लिहिण्याचा एकमेव उद्देश ..आयुष्य डिस्टर्ब होत.


त्यामुळे जरा मनावर ताबा ठेवायला हवा.  जर आपण मनावर ताबा ठेवला नाही तर नुकसान दुसऱ्या - तिसऱ्या कोणाचं नाही होतं. आपलच होतं . जगासाठी नाही स्वतः साठी तरी मनावर ताबा असायलाच हवा .आणि मग कोणताही अनुभव घ्यावा नवा . 😊😊😊😊👍👍
दुर्गा मते


हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू ने लिहिला नाही . तरीही नकळत कोणाचेही मन दुःखवल्या गेले असेल तर , चुकीस क्षमस्व : 

देवाची भेट ..हृदयाशी थेट ..

मनातील डायरी चे पान ..

विषय - विविध रंगी मैत्री ....

देवाची भेट हृदयाशी थेट ..
असं एक खास नातं मैत्रीचं ..
बंध आपलुकीच ...

पावित्र्य जपत विणायचं ..

मैत्री एका पुरुषाची एका स्त्री शी असो किंवा ,

एका स्त्री ची एका पुरुषाशी असो ..

प्रोब्लेम कधीच आणि कुठेच नसतो ..

धागा मैत्रीचा तो मजबूत असतो ...


आज मी विविध रंगी मैत्री ह्या विषयावर लेख लिहिनार आहे . आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा . आणि जर नकळतपणे भावनेच्या भरात चुकन काही कमी जास्त झालं असेल तर , त्यासाठी सॉरी ...पुढच्या वेळेस चुका होणार नाही . ह्याची काटेकोरपणे काळजी घेतल्या जाईल .


विविध रंगी .. मैत्रीला कुंपण नसतं . तारुण्याचं , सौंदर्या च .. जाती - पातीच ..गरीब श्रीमंतिचं मैत्री हे नातं खूप खास आणि महत्वपूर्ण आहे . प्रत्येकाच्या आयुष्यात देवाने दिलेलं एक सुंदर वरदान म्हणजे मैत्री हे नातं आहे.

रक्ताच नसेल पण हक्काचं मैत्री शिवाय दुसर नातं कोणतचं नसेल . 

मग  ते नातं एका स्त्रीचं एका पुरुषाशी असो किंवा , एका 

पुरुषाचं एका स्त्री शी असो . मैत्री हे नातं लिंग बघून तयार होतं नाही . जिथं मन जुळतात . एकमेकांना समजून घेतल्या जात . मन मोकळं करण्यासाठी हक्काचं ठिकाण जी व्यक्ती वाटते . त्या व्यक्तीशी हे नातं जुळत .


मैत्री मध्ये वय ही नाही बघितल्या जातं . समोरचा आपल्या वयाचा आहे . की , आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे . ह्याचं कॅलक्युलेशन कोणी करत नाही . ज्या व्यक्तीशी आपण आपल्या मनातील हर एक गोष्ट फ्री ली बोलू शकतो . त्या व्यक्तीशी ते नातं नकळतपणे विणल्या जातं . आणि पुढे जाऊन -  प्रेम , जिव्हाळा , आपुलकी , माया , ममता ह्या भावनेने त्या नात्याची गुंफण मजबूत होत जाते . ह्यात गैर असं काहीच नाही हे ती त्या नात्याची गरज असते . पूर्वी पेक्षा अजुनही strong आणि परफेक्ट होण तिची कॅटेगिरी असते .


एका गोष्टीचा खेद वाटतो आज एका मुलाने एका मुलीशी मैत्री केली आणि त्यांची पूर्वी पेक्षा अजुन फुलत गेली .अगदी पावित्र्य जपून तरीही सुसुक्षित लोकांना देखील ती मैत्री नाही . तर त्यांची काहीतरी भानगड वाटते . हा विचार खूप चुकीचा आहे . म्हणजे माझ्या तत्वात न बसणारा आहे .


" एक स्त्री आणि एक पुरुष - एक मुलगा आणि एक मुलगी खूप चांगले मित्र मैत्रीण असू शकतात नाही , तर ते एक चांगले मित्र मैत्रीण असतातच . "


हे तत्व मानणारी मी आहे . आणि हे तत्त्व माझं आहे . आणि त्यामध्ये कधीही बदल नाही होणार . 


ज्या ठिकाणी सुख - दुःख अगदी हक्काने व्यक्त करता येतात  . त्याठिकाणी काही चुकीचं आहे अस मला तरी वाटत नाही. 


Infact मी तर म्हणेन ..


एका स्त्रीच्या आयुष्यात आवर जून एक मित्र असावा , आणि एका पुरुषाच्या आयुष्यात आवरजून एक मैत्रीण असावी . हा पण त्यांच्या तील ते मैत्रीचं बंध एकदम पवित्र हवं . कोणीही त्याच्यावर चिखल फेक करेन अस ते नको .


मैत्रीचं नातं खूप असतं ..


फक्त जपता यायला हवं ...

मला माहित मी चांगल्या प्रकारे लिहू शकले की नाही . पण माझ्या मनात मैत्री ह्या नात्याबद्दल अशा संकल्पना आहे ..
मी मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं मानते ..

Thankyou 

दिल के माही

बोलायचं होतं बरेच काही ..
तू थांबलाच नाही ..
ओ मेरे दिल के माही ..

प्रीत ही फितूर ,
संवादाला मी ही आतुर ..
ओ मेरे दिल के माही ...

गुलाबाच फुल पाहून तुला ,

बोलू लागल मला ..
ओ मेरे दिल के माही ...

हळूच कानी स्वर आले ..
तू न बोललेले शब्द मी ऐकले ..
ओ मेरे दिल के माही ..
कैसे बताऊ किती मी घडबडले ..
दुर्गा मते

हिंदि ओळी मुद्दाम हून वापरली शोभा वाढा वी म्हणून ...


Mar 2, 2022

मी तुझी राहणार नाही .....

तुला आज खूप भारी वाटतंय ,
माझं सहवासात नसन आवडतय ..

एन्जॉय कर तुझ लाईफ ..

आनंदाने मी ही होते hide...

मी स्वतःला समजावून दूर झाले ..

मी पणाने तुझ्या तुला अंधारात टाकले ..


चूक करूनही तू अभिमान बाळगला ...

मी खरा हाच पाढा मनी जपला ...

आयुष्यात खूप  शिकून ही अडाणीच राहिला ..


केलेली चूक मान्य ही करावी लागते ..

हा पाढाच तू विसरला ..........

समोरच्या वर वारं करण सोप असतं ..

तोच वार स्वतः वर होतोय हे बघण मुश्किल असतं ....

तू दाखवून दिलं ....

माणुसकी नावाची चीज तुझ्यात नाही ..

आणि तुझ्यासारख्या दगडाला कधी पाझर ही फुटणार नाही .......

पण लक्षात ठेव जेव्हा केव्हाही ,

तुला माझी आठवण येईल ना ..
तेव्हा मी आठवणीत राहील.....

माझा सहवास तू कायमचा गमावशिल ...
कारण तेव्हा खरोखरच मनातून आउट ऑफ झालेला असशील ...

मी जेव्हा तुला फक्त तुझी म्हणून हवी असेल ना ,
तेव्हा मी तुझी राहणार नाही ..

दुर्गा मते....

सदर रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही . ह्यांची वाचकांनी नोंद घ्यावी .
सुचलं म्हणून लिहिलं ...
कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही ...


अजुनही प्रतीक्षेत .

वाट पाहुनी थकले ,
डोळे ही दिपले ...

सुर्य ही अस्तास गेला ..
नव्याने सूर्यो दय झाला ..

त्या झाकोळ्या रात्री ..
विचीत्र घटना घडली
एक पणती नकळत विझली ..

मदतीची करत होती याचना ...
सैतानाची वाढली होती वासना ..
देवाला ही किंव येईना ...
मदतीची भीक ही पदरी पडेना ..

अश्रूंचा बांध फुटला ...
अखेरचा श्वास घेतला ...
जीव हा आकाशी बिळगला ..
तारा होऊनी चमकला ..

अजुनही नाही त्याला ज्ञाय मिळाला ..

अन्यायाचाचं विजय झाला ...


ज्ञाय हा अजुनही प्रतीक्षा करू लागला ..

दुर्गा मते

आसवांना आला पुर .

आसवांना आला पुर ,
गेला तू सोडून दूर...

विरहाच्या जखमा खोलवर रुजल्या ,
ज्या एकेकाळी तूच होत्या रे पुसल्या ..

हळवे माझे मन ,
दुबळे झाले रे तन ..
दिले तू इतके दुःख.  
आस होती मला ,
दुखः हूनही जास्ती देशील सुख. 

आस ही पुरात वाहून गेली ..
आनंदाची होडी माझी मला सोडून गेली ..
विरहाची जखम तू दिली ..
कोलमडून गेली प्रेम कळी ..

आसवांना आला पुर ,
गेला तू सोडून दूर ..

वणवे पेटले भवताली संशयाचे ..
धुके विरले सारे प्रेमाचे ..
नाही राहिले नाते जन्मोजन्मी चे ...

स्वप्न पाहिली बाबड्या मनाने ...

गेलास निघून स्वार्थीपणा ने ...

झाले मी सावध तू दिलेल्या विरहाने ....

तरीही का कुणास ठाऊक ..
आसवांना आला पुर ..
तू सोडून गेला दूर .
दुर्गा मते...

Mar 1, 2022

सुखाचे चांदने

आज खर्या अर्थाने जगण्याची रीत कळतेय . अनुभव घेत चालले ना , तशी हळू हळू शिकतेय . खूप कमी  वयात खूप अनुभव आले . प्रत्येक  नव्या अनुभवातून नवीन काहीतरी शिकले . आणि आज खऱ्या अर्थाने सुखाचे चांदणे गवसले ...

आता समाजाची रीत खूप चांगल्या प्रकारे कळली . माणसाचे स्वभाव खूप चांगले प्रकारे समजले . साधा आणि बिनधास्त स्वभाव असल्यामुळे अनेकदा फसले गेली . तरीही पुन्हा खड्यात पडली . 😜😜आणि ते पडण काही सोडणार नाही . 😜😜कारण त्याच्या शिवाय मी काही शिकणार नाही . असो ..

अनुभावाच्या आगीत होरपळले ..
आता कुठे सुखाचे चांदणे गवसले ...
लोकांच्या मनातील द्वंद्व कधी ना समजले ..
कशी त्याच्या जाळ्यात अडकले ..
माझे मलाच नाही कळले ...

फिरून फिरून पुन्हा तेच ..

नवे जुने अनुभव आले ...


त्या अनुभवानंतर आज सुखाचे चांदणे गवसले ...


जखमा खोलवर रुजलेल्या ....


शहाण्या करू लागल्या ...


आता तरी भानावर ये , सतत सांगू लागल्या ..


हा लेख म्हणजे माझ्या आयुष्याची एक नवी सुरुवात आहे . ही सुरुवात माझ्या अनेक चांगल्या - वाईट अनुभवांची साक्ष देते . आज मी माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करतेय .


आणि त्यात प्रेम आणि मुलांशी फ्रेंडशिप ह्या गोष्टीला बिलुकल महत्व नाही हे , कारण कुठल्या ही पुरुषाशी मैत्री करावी असा पुरुष कलियुगात जन्माला नाही आला . कुठलाही पुरुष असो , सुरुवातीला खूप चांगला वाटतो . अगदी ह्याच्या सारखा पुरुष शोधून ही सापडणार नाही असं ही वाटतं.  पण ते नकळत्या वयात खूप गोड गैरसमज असतात . आणि ते वेळीच दूर होणं खरोखर खूप गरजेचं असतं . नाहीतर खूप प्रोब्लेम होतात .


आयुष्य ही बरबाद होतं . त्यामुळे खरच आपण जर कुठल्याही विषयात भरकटत चाललो असेल ना , तर वेळीच थांबावं.  कुठेतरी स्वतः ला थांबवावं . पुढे जाण्यापेक्षा थांबन योग्य असतं . कारण पुढे जाऊन किती धोका असेल हे , आपण नाही सांगू शकत . म्हणून वेळेवर थांबन केव्हाही योग्य .


आणि मी ही आज हेच केलं .. म्हणजे तस विशेष काही नव्हत . प्रेम तर नव्हतच फक्त एक चांगली मैत्री होती .


पण मला ती वेगळ्याच वळणावर जाताना मला दिसत होती . म्हणून मी थांबले . हा चुकीच्या पद्धतीने थांबले .  पण थांबायचं चं होतं . पुढे जाण्यासाठी मन कधीच तयार होणार नव्हत . म्हणून मी वेळीच सर्व काही थांबवलं आणि नव्याने सुख शोधण्याचा प्रयत्न करते.  माझ्या आवडीच्या विषयात . आणि अभ्यासात. 

आता खऱ्या अर्थाने सुखाचे चांदणे गवसले ..
कळीतून एक नाजूक फुल उमलले ..
कांट्याच्या वेदना झेलत झेलत strong झाले ..
आता कुठे सुखाचे चांदणे गवसले ..
दुर्गा मते


इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...