भावनेच्या भरात ह्या लेख मालिकेतील पहिला लेख माझा .
आयुष्य डिस्टर्ब होत.
खरोखरच भावनेच्या भरात प्रेमात पडल्या नंतर .. आपण खूप सारी स्वप्न रंगवतो . स्वप्नांना अस्तित्व आहे की , नाही ह्याची दखल न घेताच वाहवत जातो . आणि नंतर एकटो पडतो .
प्रेम वाईट नाही हे , जर अनुभवण्या पुरत असेल .
मनावर ताबा असेल तर ...जर आपल्या मनावरचा ताबा सुटला तर , मग खरोखरच खूप त्रास होतो . आणि त्याहूनही जास्त त्रास होतो . जीव लावलेल्या माणसाला बायचान्स सोडून जाण्याची गरज पडली तर , किंवा तो आपल्याला दुखवून गेला तर ..म्हणजेच विरह नशिबी आला तर , आणि प्रेम केलं म्हंटल्यावर 💯💯विरह येतो.
प्रेमाची शिक्षाच ती आहे .
जेव्हा नशिबी विरह येतो . तेव्हा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो . हळव्या मनाला असंख्य वेदना झालेल्या असतात . त्या वेदनांच्या जखमा खोलवर रुजलेल्या असतात . तात्पुरत्या विझतात आठवणींच्या हिंदोळ्यावर पुन्हा नव्याने आठवतात . आणि मग खरोखर आयुष्य डिस्टर्ब होत . एक क्षण अस ही वाटायला लागतं .
का आला असेल हा आपल्या आयुष्यात आणि आपण तरी का ह्याला जीव लावल्याची चूक केली असेल . भावनांचा गुंता वाढत जातो . आणि खरोखर खूप त्रास होतो .
त्यामुळे वाहवत जाण्याआधी मनावर ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे. अनुभव प्रत्येक गोष्टीचा घ्यायला हवा . पण त्या आधी हा अनुभव आपल्याला आयुष्यभर त्रास ही देऊ शकतो . ह्याचा ही जरा विचार करायला हवा .
हा लेख लिहिण्याचा एकमेव उद्देश ..आयुष्य डिस्टर्ब होत.
त्यामुळे जरा मनावर ताबा ठेवायला हवा. जर आपण मनावर ताबा ठेवला नाही तर नुकसान दुसऱ्या - तिसऱ्या कोणाचं नाही होतं. आपलच होतं . जगासाठी नाही स्वतः साठी तरी मनावर ताबा असायलाच हवा .आणि मग कोणताही अनुभव घ्यावा नवा . 😊😊😊😊👍👍
दुर्गा मते
हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू ने लिहिला नाही . तरीही नकळत कोणाचेही मन दुःखवल्या गेले असेल तर , चुकीस क्षमस्व :
No comments:
Post a Comment
Comments plz.