हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू ने लिहिला नाही . वाटलं म्हणून सहज मनातलं लिहिलं एक छोटासा अनुभव ...
त्या दिवशी आम्हाला खूपच तहान लागली होती . नरड कोरड ठक पडल होतं . आभाळ ही खूप तापलं होतं . तापलेल्या आभाळा खाली जीवाची लाही लाही होतं होती. जीव नुसतं पाणी पाणी करत होता ..
रस्त्यावर एका ठिकाणी पाणे पोई दिसली . ती पानेपोई मुस्लिम धर्माच्या लोकांनी लावलेली होती. तहान एवढी लागली होती . की लक्षात ही नव्हत आलं . नक्की ही पाणे पोई कुठल्या धर्माची आहे. थंडगार पाणी घटा घटा पिल जीव शांत झाला .
तो माणूस थोड्याच वेळाने माईक मध्ये काहीतरी पुकारू लागला .
पाणी पिऊन झाल्यानंतर आत मध्ये येऊन शिबिराला भेट द्या . त्या शिबिरात पुस्तक होते. ते ही फ्री मध्ये कुठलही पुस्तकं घ्या . त्याची फिस घेणार नव्हते.
मी जाऊन पाहिलं तर त्यामध्ये सगळे मुस्लिम धर्माच्या रीले टेड पुस्तक होती . पण मी ते न घेताच वापस फिरले .
पुस्तक घरी घेऊन गेले तर खूप बोलणे खावे लागले असते माहीत होतं म्हणून पाणी मात्र पोटभर पिले .
आणि मग मनात आलं . त्यांचं पाणी पोटभर पिले . मग कुराण घ्यायलाच का पाऊले थबकली .
आपण पोटासाठी तहान भागवण्यासाठी त्यांची मदत घेतो . जात पात बघत . देवाचे पाय पडताना धर्माचा अभ्यास करताना चं का बघायची जात पात ..कोणत्याही धर्मातील देव कधीही भेदभाव करत नाही . हा माझ्या जातीचा नाही म्हणून दूर लोटत नाही .
येशू ख्रिस्ताकडे जा तो आशिष देतो . विठ्ठलाकडे जा तो ही जवळ करतो . अल्ला ही दुवा देतो . माणूस स्वार्थी विचार करतो देव कधीच करत नाही.
जर आपल्याला त्यांचं पाणी चालू शकतं तर , मग देव आणि धर्म चालायलाच हवा. तो मान्य करण्यात कोणताही कमीपणा वाटू न द्यावा ..😊😊😊🙏🙏🙏
दुर्गा मते
चुकून काही कमी जास्त लिहिलं गेलं असेल तर , चुकी साठी माफी असावी. जे मनातून वाटलं ते मी प्रामाणिकपणे लिहिलं .
No comments:
Post a Comment
Comments plz.