मुलींचा स्वभाव मुळातच साधा सरळ आणि प्रेमळ असतो . त्यांना प्रेमाचे रंग दाखवून फसवन कुठल्याही मुलाला सहज शक्य असतं . आणि मुलीही एखाद्या मुलाच्या ट्रॅप मध्ये कशा प्रकारे अडकतात . हे त्यांचं त्यांनाही कळत नाही . मग ते सोशल मीडिया वर असो किंवा रिअल लाईफ मध्ये . कुठेही त्या व्यवस्थित ट्रॅप मध्ये अडकतात . आणि एक समाज काहीही झालं तरी मुलींनाचं दोष देणार त्यांची बाजू समजून न घेता मुलींनाच गृहीत धरतो .
मुळातच एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र मैत्रीण असू शकतात . ह्या विचाराने तिची आणि त्याची फ्रेंड शिप झाली . सोशल मीडिया वर रिअल मध्ये ते एकमेकांना ओळखत नव्हते . सुरुवातीपासून त्यांची मैत्री खूप छान होती .
समजून घेणं समजून सांगणं एकमेकांना वेळ देणं . ह्या गोष्टी मुळे त्यांची मैत्री बहरत गेली . तिचा त्याच्यावर खूप विश्वास बसू लागला . आणि त्याचा ही तिच्यावर . विश्वासाच्या जोरावर त्यांच्या मैत्रीच हळू हळू प्रेमात रूपांतर व्हायला लागलं . पण ते प्रेमात होणार रूपांतर दोघांनाही मान्य नव्हत .
कोनामध्येही विनाकारण अडकायच नाही . अशा विचारांचा तो होता . आणि तिला तर तिच्या आयुष्यात कोणावरही कधीच प्रेम करायचं नव्हत .
ते त्यांच्या विचारांवर जरी ठाम असले , तरी यंग होते . त्यामुळे मनावर हवा तेवढा ताबा ठेवायला जमल नाही .
हळू हळू त्यांचं एक दीड तास होणार बोलणं . 3 ते 4 तासावर गेलं . आणि मग खरोखरच ते एकमेकांमध्ये गुंतू लागले .. हळू हळू त्यांच्या बोलण्या त नको ते विषय निघू लागले . अर्थात त्या विषयाचा तिला खूप त्रास व्हायचा .
त्यांचं मन आपल्यामुळे दुखावल्या जाऊ नये . ह्या भावनेने ती त्याला रिस्पॉन्स द्यायची. पण तिच्या मनात हळू हळू त्यांच्या बद्दल नको त्या शंका येऊ लागल्या .
" हा नक्की चांगला असेल ना , सोशल मीडिया वर कोणीही चांगलं वागत . रियल लाईफ मध्ये कसा असेल?"
अशा प्रकारे प्रश्न तिच्या मनात सतत येत होते . ती कधी कधी त्यांच्याशी बोलण टाळायची. पण तिने बोलण टाळलं की तो खूप upset व्हायचा . आणि तो upset झाला की ती ही upset व्हायची . त्यांच्या आनंदासाठी त्याच्या समाधानासाठी ती त्याच्या contact मध्ये राहिली.
त्याच्या गोड गोड बोलण्यात ती अडकत चालली होती .
त्याच्यात अडकतांना स्वतःला पूर्णपणे विसरत चालली होती . आता तर तिच्यासाठी तोच तीच आयुष्य झाला होता . "तिचं आयुष्य म्हणजे फक्त तो आणि तोच" अशी उपमा तिने दिली होती .
ऑनलाईन नातं त्यांचं खूप छान झालं . आपण एकमेकांना 4 - 5 महिन्यापासून नाही तर , जन्मापासून एकमेकांना ओळखत असल्याची फिलिंग त्यांना येत होती .
असं एकमेकांना किती दिवस wp बघायचं . असं दोघांनाही वाटू लागल होत . दोघानाही एकमेकांना भेटण्याची खूप ओढ लागली . ती ओढ संपुष्टात आली . ते काही दिवसांनी भेटले ही . आणि पहिल्याच भेटीत नको त्या घटना घडल्या .
ती दोन तीन वेळेस नाही म्हणाली . पण नंतर त्याच्या प्रेमळ आणि फसव्या शब्दांनी तिला फसवल व्यवस्थित रित्या ट्रॅप मध्ये अडकवल आणि बिचारीचं आयुष्य उदवस्थ झालं ....
दुर्गा मते
अशा घटना घडू नये म्हणून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे . सोशल मीडिया वाटते तेवढी चांगली नाही . हे लक्षात ठेवूनच लोकांशी संपर्क साधला पाहिजे .
हा पण इथे खूप चांगली माणस भेटतात ती ही जपून ठेवली पाहिजे .
ही कथा पूर्णतः काल्पनिक होती कोणाच्याही आयुष्याशी संबधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ..
No comments:
Post a Comment
Comments plz.