चांगुलपणा मागे लपलेले विध्वंसक चेहरे आपल्याला नाही ओळखता येत .
आपले आपले वाटणारे कधी शत्रू होऊन आपला घात करेन नाही सांगता येत ...
आजकाल डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न मला नेहमी पडत असतो . कारण डोळे झाकून विश्वास ठेवावा अशा व्यक्तींशी भेट होतंच नाही . झाली तरी काही काळापूरती जो पर्यंत आम्ही एकमेकींशी गोड आहोत तोपर्यंत ती गोड असते . जेव्हा आमच्या त छोट्याशा कारणावरून वाद होतात ..तेव्हा ती लगेच कडू होते . जिवापाड जपलेला विश्वासाला कसा तडा गेला . हे ही लक्षात येतं नाही .
असं म्हणतात कपड्यांचं कापड ओळखता नाही आलं तरी चालतं ..पण माणसं ओळखता आली पाहिजे .
कपडे
अडगळीत टाकण्याचा ऑप्शन असतो . माणसं अडगळीत टाकण्याचा ऑप्शन नसतो . पण इथे नेमक होतं चुकीचं .. कापडाची निवड आपण काही क्षणात करतो . त्याची कॉलीटी कशी ? त्याचा रंग कसा ? ते किती दिवसापर्यंत टिकेन ह्याचाही अंदाज आपण काही क्षणात लावतो . माणसं ओळखण्यात आयुष्याचं खर्चिकरन होतं .
तरीही माणसाच्या स्वभावाचा अंदाज नाही बांधता येत ...
दुर्गा मते
व्वा छान व्यक्त झालीये.
ReplyDelete