मन शरीरातील एक अनमोल घटक . ज्याचं मन चांगलं तो सर्वांचा आवडता व्यक्ती असतो . माणूस दिसायला कसा ही असला तरी चालतो . फक्त त्याच मन चांगलं असायला हवं . असं आपण बोलता बोलता नेहमीच बोलून जातो . आज मी त्याचं मनाची दुसरी बाजू मांडणार आहे ..
" जे वैरी न चींती , ते मन चींती " ह्या वाक्य सर्वांनीच ऐकलेल असेल . आणि खरच ते खूप खरं आहे . खूप सत्यता आहे. त्या वाक्यात . त्याला अनुसरूनच लिहिणार आहे मी आज .
आपलं मन जितका चांगला विचार करतो ना , त्याच्या पेक्षा दुपटीत वाईट विचार करत असतो.
नात्यात दुरावा किंवा गैरसमज निर्माण करण्याचं काम ही त्या मनाची नकारात्मक शक्तीच करत असतं. मन हे कधी स्थिर राहत नाही. सतत बदलत असतं .
समोरचा थोडस मनावीरुद्ध वागायला लागला की , तो नावडता होतो . काही काळाने तोच जर मनासारखं वागायला लागला तर तोच व्यक्ती सर्वात जास्त आवडायला लागतो .
कधी कधी मनात नसताना कळतं नकळत बरच काही घडून जातं . त्याला जबाबदार हे मन चं असतं . आपल्याच माणसांबद्दल ते क्षणात आपलेपणा निर्माण करत तर , क्षणात दुरावा निर्माण करत . हे मन हे ना खूपच वाईट कुठे असतं , ह्याचा शोध आज पर्यंत लागला नाही . आणि ते अस का असेल ह्याचा शोध तर लागुच शकत नाही ...
थँक्यू ! 🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर..." मन करा रे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण "
ReplyDeleteखुप सुंदर लिहीलस आहेस नित्या... अप्रतीम लेखनशैली...पुढील लिखाणासाठी शुभेच्छा...💐💐💐👏👏👏😍🍫