हा विषय जरा सांभाळून लिहिते ...
लिहावस वाटतं नव्हत पण आज जे दृश्य पाहील ते आवडल नाही म्हणून लिहिते ..
तिची शिर्षक ही पूर्ण नाही दिलं . कारण स्पेशली त्त्या विषयावर बोलायला मलाच आवडत . तिची मासिक पाळी .
महिन्यातून चार दिवस पाहुणी म्हणून येते . आणि पाचव्या दिवशी रिटर्न जाते . धार्मिक कार्यात आली तर मग तिची तिचं मासिक पाळी अडथळा बनते ..
एवढी का ओ वाईट ती ? प्रश्न सतत मनात येतो . उत्तर सापडता सापडता जीव थकतो . उत्तर मिळतच नाही .
आज पाहिलं मी एका बाईला मासिक आलेली होती . तर ती पंगतीत जेवायला बसली नाही . बाजूला बसली एकटीच आणि तेच मला खूप खटकल . मी त्यांना म्हंटल ही " अहो , एवढं काही मानायच नाही . पूर्वी चालायचं हे सगळ आता एवढं मानायच नाही . मी तरी बिलुकल मानत नाही "
तर त्या ह्यावर फक्त हसल्या लहान आहेस . हळू हळू समज येईल असं बोलल्या . मला तर आवडलच नाही आणि कधी आवडणार पण नाही .
ती एक नैसरगिक देणं आहे .
स्त्रित्वाची शान आहे ..
मग तिचाच का असा विटाळ ?
इथेच माझे शब्द संपले ..
हा लेख लिहिण्यामागे कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही
दुर्गा मते
©®
No comments:
Post a Comment
Comments plz.