पण जुन्याच आठवणी मनाला छान वाटतात ..
बालपणीच्या बंधन मुक्त आयुष्याच्या ..
ज्या कधीच नाही जाणार पुसल्या ...
ना ओझ होतं जबाबदाऱ्यांच ,
ना दडपण होतं कोणी टोमणे देईल याचं ..
खरचं जगणं होतं ते न्यारचं ..
नेहमीच हवं हवंस वाटणारं ..
जाई जुई मोगरा गुलाब ,
ह्यांच्याशी तर होतीच मैत्री ..
पण अजबचं ना ..
चिखल - माती हे तर आवडीचे होते राजे ..
खरचं दिवसच होते ते न्यारे ,
मनातून कधीच न हरवणारे ,
कायम स्वरुपी आठवणीत राहणारे ..
Written by - durga mate
खूपच सुंदर अप्रतिम लिहले
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete