रचनेत त्याचे अनुभव टिपत असतो . लेखाद्वारे मानवी संदेश तो देत असतो . कथेमध्ये त्याचेच आयुष्य तो मांडत असतो .
लेखक हा त्याच्या परिस्तिथीतून मनस्थितीतून जन्माला येत असतो.
परकेपणा झेलत झेलत तो जगत असतो . वेडा कवी म्हणून जगप्रसिध्द होतो . लेखक कवी हा ऑन द स्पॉट जन्माला येतो . परिस्थिती वर मात करून तो नावा रूपाला येत असतो .
लेखक - कवी जितका कणखर तितकाच हळवा असतो.
सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलतेचं रूप असतो .
टीका त्याच्यावर पेटून उठतात ,
लिखाण त्याचं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. तरीही त्याचे शब्द त्याला लढण्यासाठी बळ देतात. कल्पना त्याची सहानुभूती होते. नकळतपणे त्याची मानसिकता त्याचीच सकारात्मकता होते ..
लेखक - कवी संकटांवर मात करूनचं जन्माला येतो.
नव्या जिद्दीने , नव्या उमेदीने त्याच्या लिखाणाला बळ देतो ..
हा लेख लिहिताना कोणाच्याही मनाला किंवा भावनेला ठेच पोहोचली असेल तर चूकिस क्षमस्व :
दुर्गा मते
©®
No comments:
Post a Comment
Comments plz.