बालपणीची मैत्री दुरावली ..
आठवणीत फक्त दुनियादारी राहिली ..
क्षण अल्लड अवखळ हरवले ..
या कुमार अवस्थेत नाही कधी ते गवसले ..
बालपण गोंडस मी जगले ...
ते दिवस अजुनही नाही विसरले ..
बालपण सरले तरुणपण आले ..
उच्च माध्यमिक विद्यालयात मैत्रिणीचे ग्रुप वाढले ..
आठवी ते दहावीच्या बॅच मध्ये खूप मैत्रिणी भेटल्या ..
त्या अजुनही नाही विसरता आल्या .
वर्ष वर्ष भेट होत नाही ..
असा एक ही दिवस जात नाही ..
ज्या दिवशी आमचं बोलणं होत नाही ..
लिपीवर ही खूप जणांशी मैत्री झाली ..
अनोळखी वीण ओळख निर्माण करू लागली ..
ऑनलाईन मैत्री ही नाही ऑनलाईन वाटू लागली ..
ती निस्वार्थ मैत्री ही जिवाभावाची वाटू लागली ..
रक्ताच्या नात्या पलिकडील नातं मैत्रीचं ..
तेच नातं खरं हक्काचं ..
No comments:
Post a Comment
Comments plz.