नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

May 4, 2022

स्पर्श जाणिवांचा ..

मनातील डायरीचे पान विषय अंतर्गत ..🌿🌿🌿🌿

विषय - स्पर्श ...

माझ्या

लेखाचं शीर्षक आहे .." स्पर्श जाणिवांचा "


आयुष्यात  जाणीव असणे खूप महत्त्वाची असते .


माणसाला गरिबीची जाणीव असावी , पैशाची जाणीव असावी , कष्टाची जाणीव असावी . सर्वांत महत्त्वाची म्हणजे माणुसकीची जाणीव असावी .

जसा कोवळ्या बाळाला आईचा कोमल स्पर्श होतो . तसाच माणसाला खडतर परिस्थितीत जाणिवांचा स्पर्श होतो . तो कोमल नाही तर , कठोर असतो . जीवन जगण्यासाठी प्रेरक असतो .


जेव्हा माणसाला अनुभव येतो ...अनुभव चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव करून देतो . तेव्हाच एक मन दुसऱ्या मनाची बाजू आणि परिस्तिथी समजून घेण्याच ज्ञान ही ग्रहण करतो .


उदा : हे उदा हरण मी काल्पनिक देते . वैयक्तिक आयुष्याशी संबधित नाही ..


उदा : मी एखाद्या मुलाच्या प्रेमात आहे . त्याने आणि मी दोघांनी मिळून लग्नाची स्वप्न ही पाहिली . ते स्वप्न सत्यात उतरण्याचे क्षण ही आयुष्यात आले . आणि लगेच नशिबाने खेळ बदलला . माझ्या आवडीचा व्यक्ती काही कारणास्तव माझ्या आयुष्यातून बेदखल झाला . तेव्हा मला पहिला आणि शेवटचा अनुभव आला . प्रेम बिम ह्या फक्त म्हणण्याचा आणि कल्पनेच्या जगात खऱ्या होणाऱ्या गोष्टी . ज्याच्या नशिबात प्रेम ही संकल्पना पूर्ण होण असतं . त्याचच प्रेम कुठेतरी पूर्ण होत . बाकीचे प्रेमी युगल ह्यांच्या नशिबी रडगाणेचं लिहिलेलं असतं . ह्या गोष्टी मी नवा अनुभव घेत असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी ना सांगू शकते . कारण प्रेम केल्यानंतर विरहाची जाणिव माझ्या मनाला स्पर्शून गेलेली असते . आणि त्याच्या यातना ही मी अतोनात भोगलेल्या असतात .


जेव्हा आपल्याला जाणीव होते . तेव्हा आपण त्या जाणिवेची जाणिव समोरच्याला शब्दात का होईना करून देऊ शकतो ..समोरच्याला थोडसं का होईना शाब्दिक मार्गदर्शन करू शकतो ..
दुर्गा मते

1 comment:

  1. छानच लिहिले आहे 👌
    अनुभवातून साक्षर होत जाते
    मग विषय काहीही असो..!
    खूपच छान...!
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा...✍️

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...