नात्यांची घडी जेव्हा विसकटते - खूप प्रयत्न करूनही अपयश पदरी पडते . तेव्हा सुरू होतो मनाचा संघर्ष .....
किरकोळ गैर समजामुळे जेव्हा आपल्यावर बोटं दाखवलं जातं . आपलीच माणसं आपल्याला नको नको ते बोल लावतात . तेव्हा सुरू होतो खरा मानसिक त्रास आणि मनाचा संघर्ष ...त्या संघर्षावर जो मात करतो . तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो .
वाद - विवाद करून काहीही साध्य होतं नसतं , शांततेचा
मार्ग अवलंबून शांत राहणच योग्य असतं . हे फक्त ज्ञानी आणि सयंमी माणसाला कळतं .
संघर्ष काळाची गरज आहे . माणसाला समोर येणाऱ्या संकटावर मात करण्याची जिद्द आणि ज्ञान हा संघर्ष चं देत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप संघर्ष आहे . आणि वेळोवेळी खूप संकट येतात म्हणून हतबल व्हायचं नसतं . तर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला नेटाने तोंड द्यायचं असतं . आणि आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं .
मानसिक त्रास झाल्यानंतर जो संघर्ष आपण करत असतो .तो खूपच मोठा असतो . अगदी जीवघेणा असतो . कारण त्या वेळेस आपल्याला आधार देणारेच कधी कधी बोल लावत असतात . त्यामुळे आपण अजूनच खचून जातो . पण तेव्हाही धीराने प्रत्येक परिस्थितीवर मात करायची. आणि आपल्याला आपल्या माणसांशी गरज असताना कोण आपल्याशी कसं वागतो . हे फक्त लक्षात ठेवायचं . कधी बोलून नाही दाखवायचं . आणि सरळ मार्गाने पुढे चालायचं . आणि आपलं आयुष्य हे आनंदाने जगायचं .
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.