न पेटताचं विझली ,
तव्यावरची भाकर ,
तेला वाचून करपली ...
झोपडीला चांदण्यांनी वरदान दिले ,
म्हणून दिवे तरी लागले खरे ,
नाहीतर अंधारातच जगावे लागले असते बरे ...
मोळी विकली नाही ,
म्हणून लेकरं माझी उपाशी राहिली ,
पोटात पेटलेली आग ,
पाण्यानेच विझवली ..
ह्या वेदनेने आई ती घायाळ झाली ...
लेकरासाठी राब राब राबली ,
तरीही बिचारी ती लेकरं माझी ,
उपाशीच झोपी गेली .....
ह्या विचारांनेच ती माऊली अर्धी अर्धी झाली ...
दुर्गा मते ...
खूप भावस्पर्शी रचना 👌👌👌
ReplyDelete