निसरगसौंदर्याने नटलेला परिसर न्याहाळता आला पाहिजे .
माणुसकीचे मर्म जपता आले पाहिजे ...प्रत्येकाशी प्रेमाने वागता आले पाहिजे . आणि जगताना खूप काही गोष्टी विसरताही आल्या पाहिजे. इथल्या इथेच . कारण काही गोष्टी खूप त्रासदायक असतात. Exmpal घ्यायचं ठरलं तर , एकाद्याचा past .
Past हा जर वाईट असेल ना तर , तो माणसाला दुःखच देतो . तेव्हा तो past विसरून जाणंचं बेस्ट ठरतं .
त्याला कवटाळत बसण्यात काहीचं पॉइंट नसतो .
तसचं असतं काही मानसांच खूप त्रास देणारे माणसं असतात . ह्या समाजात त्यांच्यापासून दूर राहण्यातचं आपलं भलं आहे. एखादा व्यक्ती आपल्याला कितीही आवडत असला ना , तरी त्याला कवटाळत बसू नका ,
आपण त्याला कवटाळत बसू तर , तो अजूनच आपल्यापासून दूर दूर पळण्याचा प्रयत्न करेन . त्यापेक्षा त्याला जा म्हणायचं पळ जितक्या दूर पळता येईल तितक्या दूर पळ , शेवटी तो तुमच्याकडेच परत येईल .
मला माहितेय , जो व्यक्ती आपल्याला आवडतो . तोच व्यक्ती अनेकवेळा आपल्या डोळ्यांतील अश्रूंच कारण ठरतो . तोच व्यक्ती सगळ्यांत जास्त आपल्याला दुःख देतो . तिथेही मन भरलं नाही तर , तो आपल्याला गृहीत धरायला लागतो . त्याला माहित असतं ना , ह्याला आपली सवय आहे . त्यामुळे तो नक्कीचं आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करेन .
त्याला आपली सवय नसते , असं काही नसतं पण आपण एक चूक करतो , आपण आपली सवय दाखवतो , त्याच्या पुढे पुढे करून त्यामुळेच तो आपल्याला गृहीत धरायला लागतो . काहीही झालं तरी कोणाच्याही पुढे पुढे करायचं नाही . एकद्या बद्दल आपल्याला कितीही आपुलकी , जिव्हाळा , माया वाटतं असली तरीही , स्पेशली ज्यांना attitude असतो ना , त्या लोकांपुढे चुकूनही मला तुझी गरज आहे . हे दाखवायचा नाही . देवालाच ठाऊक कसला माज
असतो . Attitude वाल्या लोकांना .....!!
तसल्या विचीत्र ग्रह फिरलेल्या माणसांना ही विसरून जाणं योग्य ठरतं . तो व्यक्ती कधी आपल्या आयुष्यात आलाच नाही , किंवा तो व्यक्ती अस्तित्वातच नाही . असं समजून त्याला विसरून जाण्याचा प्रयत्न करायचा .
मला माहितेय एकाद्या व्यक्तीला विसरून जाणं एवढं सोपं नसतं . पण काही अवघड ही नसतं .
आयुष्य आहे खूप काही गोष्टी इथे विसराव्याच लागतात. नवीन गोष्टी एक्सेप्ट करण्यासाठी जुन्या गोष्टी इग्नोर कराव्याच लागतात ...
मी हा लेख कोणाचेही मन दुखवण्याच्या हेतूने लिहिलेला नाही . पण खरंच जगताना खूप विचीत्र माणसं भेटतात .
त्या विचीत्र माणसांना विसरून जानच बेस्ट असतं .
सर्व सामान्य माणसाला तुम्ही जरूर प्रेम , आपुलकी , माया , विश्वास आपलेपणा द्या . पण ज्या ही व्यक्तीला. माज attitude असेल ना , त्या व्यक्तीला तुमच्या सावलीला ही उभ राहू देऊ नका .....तेचं बेस्ट आहे , नाहीतर नंतर पस्थाव होतो ....
आणि चुकून ही कोणी असा विचार करू नका , की हा माझा अनुभव आहे . सुचलं म्हणुन लिहिलं. रियल लाईफशी काही संबंध नाही ....
दुर्गा मते ....
No comments:
Post a Comment
Comments plz.