नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 12, 2021

खूप काही गोष्टी इथेच विसराव्या लागतात ..

आयुष्य खूप सुंदर आहे , जगता आलं पाहिजे .
निसरगसौंदर्याने नटलेला परिसर न्याहाळता आला पाहिजे .
माणुसकीचे मर्म जपता आले पाहिजे ...प्रत्येकाशी प्रेमाने वागता आले पाहिजे . आणि जगताना खूप काही गोष्टी विसरताही आल्या पाहिजे. इथल्या इथेच . कारण काही गोष्टी खूप त्रासदायक असतात. Exmpal घ्यायचं ठरलं तर , एकाद्याचा past . 

           Past हा जर वाईट असेल ना तर , तो माणसाला दुःखच देतो . तेव्हा तो past विसरून जाणंचं बेस्ट ठरतं .
त्याला कवटाळत बसण्यात काहीचं पॉइंट नसतो .

तसचं असतं काही मानसांच खूप त्रास देणारे माणसं असतात . ह्या समाजात त्यांच्यापासून दूर राहण्यातचं आपलं भलं आहे. एखादा व्यक्ती आपल्याला कितीही आवडत असला ना , तरी त्याला कवटाळत बसू नका ,
 आपण त्याला कवटाळत बसू तर , तो अजूनच आपल्यापासून दूर दूर पळण्याचा प्रयत्न करेन . त्यापेक्षा त्याला जा म्हणायचं पळ जितक्या दूर पळता येईल तितक्या दूर पळ , शेवटी तो तुमच्याकडेच परत येईल .

मला माहितेय , जो व्यक्ती आपल्याला आवडतो . तोच व्यक्ती अनेकवेळा आपल्या डोळ्यांतील अश्रूंच कारण ठरतो . तोच व्यक्ती सगळ्यांत जास्त आपल्याला दुःख देतो . तिथेही मन भरलं नाही तर , तो आपल्याला गृहीत धरायला लागतो . त्याला माहित असतं ना , ह्याला आपली सवय आहे . त्यामुळे तो नक्कीचं आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करेन .
   
                त्याला आपली सवय नसते , असं काही नसतं पण आपण एक चूक करतो , आपण आपली सवय दाखवतो , त्याच्या पुढे पुढे करून त्यामुळेच तो आपल्याला गृहीत धरायला लागतो . काहीही झालं तरी कोणाच्याही पुढे पुढे करायचं नाही . एकद्या बद्दल आपल्याला कितीही आपुलकी , जिव्हाळा , माया वाटतं असली तरीही , स्पेशली ज्यांना attitude असतो ना , त्या लोकांपुढे चुकूनही मला तुझी गरज आहे . हे दाखवायचा नाही . देवालाच ठाऊक कसला माज 
असतो  . Attitude वाल्या लोकांना .....!!

तसल्या विचीत्र ग्रह फिरलेल्या माणसांना ही विसरून जाणं योग्य ठरतं . तो व्यक्ती कधी आपल्या आयुष्यात आलाच नाही , किंवा तो व्यक्ती अस्तित्वातच नाही . असं समजून त्याला विसरून जाण्याचा प्रयत्न करायचा .
मला माहितेय एकाद्या व्यक्तीला विसरून जाणं एवढं सोपं नसतं . पण काही अवघड ही नसतं .

आयुष्य आहे खूप काही गोष्टी इथे विसराव्याच लागतात. नवीन गोष्टी एक्सेप्ट करण्यासाठी जुन्या गोष्टी इग्नोर कराव्याच लागतात ...

मी हा लेख कोणाचेही मन दुखवण्याच्या हेतूने लिहिलेला नाही . पण खरंच जगताना खूप विचीत्र माणसं भेटतात .
त्या विचीत्र माणसांना विसरून जानच बेस्ट असतं .
सर्व सामान्य माणसाला तुम्ही जरूर प्रेम , आपुलकी , माया , विश्वास आपलेपणा द्या . पण ज्या ही व्यक्तीला. माज attitude असेल ना , त्या व्यक्तीला तुमच्या सावलीला ही उभ राहू देऊ नका .....तेचं बेस्ट आहे , नाहीतर नंतर पस्थाव होतो ....

आणि चुकून ही कोणी असा विचार करू नका , की हा माझा अनुभव आहे . सुचलं म्हणुन लिहिलं. रियल लाईफशी काही संबंध नाही ....

दुर्गा मते ....

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...