पेटलेल्या रानात करुनेला ही जागा नव्हती ....
मनाच्या स्मशालीत ,
वणवे पेटले होते गैरसमजाचे ,
तिथे पहारेकरी पहारा देत होते ,
निर्दयी मनाचे ...
अस्ताला गेलेले गैरसमज ,
पुन्हा पेटून उठायचे ...
वेदनेचे कारण ठरायचे ...
जोडलेली घडी पुन्हा विस्कळीत व्हायची ,
द्वेषाची एक ठिणगी त्याचं कारण ठरायची ...
मग मनात करुनेलाही जागा नसायची ..
दुर्गा मते ..
No comments:
Post a Comment
Comments plz.