खरच मला तरी मनापासून वाटतं ' हम दो और हमारे दो ' ची ही काही गरज नाही . " हम दो और हमारा सिर्फ एक "
हे सगळ्यात सुंदर समीकरण आहे . कारण आता काही राजा महाराजांचा काळ नाही हे , की शंभर दोनशे एकर जमिनीला वारस हा हवास . अष्टपुत्र हे हवेच . सर्वसामान्य माणसाकडे . फार फार तर एक ते दीड एकर जमीन . ह्या पेक्षा जास्त मोठी प्रॉपर्टी नसते .
मग कशाला हवे दोन तीन मुलं ?
' हम दो और हमारा एक ' केव्हाही चांगलं .
बाळाला जन्म द्यायचा म्हणून द्यायचा नसतो . जन्म देताना त्याच्या अस्तीत्वाचा जरूर विचार करावा . आपण बाळास योग्य शिक्षण देऊ शकतो का ? त्याची सारी स्वप्न पूर्ण करण्याच बळ आपल्यात आहे का ? ह्याचा जरूर विचार करावा . जर आपण तिथेच कुठेतरी कमी पडत असू तर , काही अधिकार नाही आपल्याला एका निरागस जिवाचं आयुष्य विस्कळीत करण्याचा . त्या जीवाला त्याचं जीवन मनमारून जगावं लागणार असेल तर , तो जन्माला न आलेलं च केव्हाही चांगल . काही अधिकार नाही आपल्याला कोणत्याची जीवाचा आयुष्य कोलमडून टाकण्याचा , मग ते आपल्या रक्ताच हाडा मासाच बाळं का असेना ?
जेव्हा ते निरागस बाळ जन्माला येत . तेव्हा ह्या जगाशी त्याचा फार काही संबंध नसतो . कोण आपल? कोण परक ? ह्याची त्याला जाणं ही नसते . हळू हळू त्याचा ह्या जगाशी संबद्ध येतो . हळू हळू आपले आई वडील कोण ? हे त्याला कळायला लागत . आपण कोणाच्या विश्वासावर ह्या सुंदर जगात आलो , आपले आयुष्याचे शिल्पकार कोण ? ह्याची त्याला हळू हळू ओळख व्हायला लागते . तो त्याच्या त्या शिल्पकाराच्या विश्वासावर स्वप्न बघायला लागतो . स्वप्न नक्की पूर्ण होईल . ह्या आशेवर तो जगत असतो . काही ठिकाणी होतात स्वप्न पूर्ण त्या निरागस जीवाचे , पण बहुंता श ठिकाणी नाही होतं.
जिथे स्वप्न पूर्ण होतं नाही ना , तिथे त्या जीवाला वाटायला लागतं. आपल्याला ह्यांनी जन्मच का दिला ? जगताना मरणयातना काय असतात ? त्या अनुभवायला .
थोड्याच वेळात त्याच्या लक्षात येतं आपली स्वप्न का पूर्ण होऊ शकत नाही . कारण आपले बहिण - भाऊ ते ही आपल्यात वाटेकरी आहेत . कधाचीत ते नसते तर , आपले स्वप्न झालेही असते पूर्ण , आपल्या आईवडील फक्त आपले असते . आणि त्यांनी आपल्यासाठीच त्यांचं आयुष्य पणाला लावले असते . आपल्यात कोणी वाटेकरी नसता . आपले स्वप्न काहीही झालं तरी पूर्ण होणारच नाही . असं समजून तो आपल्या स्वप्नांना पूर्ण विराम देतो . आणि असेल तस आयुष्य स्विकारतो . ते आयुष्य स्विकारताना नक्कीच त्याचा श्वास गुदमरत असतो . पण दुसरा त्याच्याकडे काहीचं पर्याय नसतो . कारण माहीत असतं ना त्याला , आपले आई वडीलचं आपले शिल्पकार आहेत आणि ते जसे आपल्याला घडवणार तसेच आपण घडणार ...
प्लीज बाळाला जन्म देताना आपण त्याच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करावा . केवळ द्यायचा म्हणून द्यायचा जन्म देऊ नका . काही फायदा नाही मग त्याला जन्म देण्याचा ... !!
आपल्यात आपल्या बाळाला स्वप्न दाखवायचं ही बळ हवं , आणि ते त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता ही हवी. दोन मुलाला जन्म देण्यापेक्षा एकाच मुलाला जन्म देऊन त्याचं अस्तित्व परिपूर्ण करावं . तुमची जशी क्षमता तशी तुम्ही फॅमिली प्लॅनिंग ठेवा .
एक सांगू , केवळ बाळाला जन्म देऊन आपलं कर्तव्य नाही पूर्ण होत . आपलं खरं कर्तव्य तेव्हा पूर्ण होत . जेव्हा आपण आपल्या बाळाला एक चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करत असतो . त्याच्या साऱ्या स्वप्नाचा शिल्पकार होऊ . त्याच्या आयुष्याचा सहारा होऊ . त्याच्या जगण्याचा आपण आधार होऊ .
जेव्हा आपण एकाच बालकांचे आई वडील असू , तेव्हा अजुन एक चांगली गोष्ट होईल . तो पण म्हातारंपणी आपल्याला वाऱ्यावर नाही सोडणार. कारण जर आज त्याच्यात कोणीही वाटेकरी नसेल ना तर , उद्या कोणी आपलेही वाटे नाही करणार . तुम्ही करणार तर , उद्या हमखास तुमचेही वाटे होणार . कारण सुरवात तुम्ही केली त्याने कधीच नाही . तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावरचं तो चालणार कारण , तो मार्ग तो रस्ता तुम्हीच दाखवलेला आहे त्याला अगदी लहान पणापासून . त्या रस्त्यावरच तो चालणार त्यात त्याची काहीचं चूक नाही .
मी हा लेख ' हम दो औंर हमारा सिर्फ एक ' हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजवण्या च्या हेतूने लिहिलेला आहे .
कोणाचंही मन दुखवण्याचा माझा हेतू नाही ...
दुर्गा मते ...
अप्रतिम सुंदर लेख
ReplyDeleteअगदी छानच लिहिले आहेस 👌👌👌👌
ReplyDeleteफारच छान विचार मांडलेत दुर्गाताई
ReplyDeleteअगदीच अप्रतिम आणि सुंदर विचार मांडलेत👌👌👌👌
ReplyDelete