आनंद सुद्धा भरून यावा ....
माणसाची आवड मुळात छंद जोपासणे हवी . कलेची आर्द साद त्याच्या हृदयात वसायला हवी . छंदां ची साथ असेल जगण्याला तर मग बघा तिथे दुःखाची किनार वसणार नाही ...
दुःख कितीही असले आयुष्य जगताना , तरीही ते मिसळून जाईल छंद जोपासताना छंदात ...सामील होईल ... संगीताच्या सुरात..कवितेच्या रचनेत , नृत्याच्या ठेक्यात ...ढोलकीच्या तालात ती बंधिस्त होईल ...
माणसाने छंद जोपासयला हवी ...जोपासलेली छंद जपायला हवी . दिवसातून एकदा तरी आपल्या आवडीच्या गोष्टी साठी वेळ काढावा .. म्हणजे जो आपला छंद असेल त्यासाठी .....
काम हे मरे पर्यंत करावं लागतं . त्यामुळे नियमित थोडा तरी वेळ आपल्या आवडी साठी द्यायला हवा . तेवढाच जीवन जगताना थोडासा फ्रेश नेश येईल .....
छंद हे ठराविक चं असतात . असे काही नाही. छंद हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो .
कोणाला लिहिण्याचा असतो . कोणाला वाचण्याचा असतो . कोणाला गाणे ऐकन्याचा असतो . कोणाला दगड गोळा करण्याचा असतो . छंद हा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतो. सांगणं एकच ज्याचा जो छंद त्याने तो जोपासयलाच हवा . तेवढाच आनंदाला हातभार थोडासा . जेव्हा माणूस आपल्या आवडीच काम करत असतो ना , तेव्हा माणूस त्या कामाशी समरस होतो . एकरूप होऊन जातो. थोड्या काळासाठी का होईना ..
तो सार विसरून त्याच्या त्या कलेसाठी त्याच्या त्या छंदासाठी जगत असतो....
दुर्गा मते
©®
खूपच छान 👌
ReplyDeleteछंदा शिवाय माणूस नाही..!
आबा
🙏
अतिशय सुंदर लिखाण 👌👌👌👌
ReplyDeleteछंद जोपासणं म्हणजे आपला आनंद जपणं
ReplyDeleteअप्रतिमच लिहीलंयस 👌🏼👌🏼🌟🌟🌟🌟
अतिशय सुंदर..👌👌👍
ReplyDelete