नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 8, 2021

प्रेम बंधन - 16

शेखर एवढा समजूतदार आहे . हे कळल्यावर नित्या आणि राहुल ह्यांच्या जीवात जीव आला . त्यांची मैत्री कधीही तुटनार नाही . ह्याची त्यांना खात्री वाटू लागली .
शेकरच्या इश्चेखातर राहुल त्या दोघांना आपल्या घरी घेऊन जातो. 

त्याच्या घरचं वातावरण खूप छान होत . घर ही खूप मोठं नव्हत पण जेवढं होत . तेवढंच खूप छान होतं . 
 त्याची आई ही स्वभावाने खूप छान वाटल्या . रिदिमा ही चांगली वाटतं होती ...पण थोडीशी चिडचि डी होती . चहा वैगरे आणला तिने आमच्यासाठी ...ओठांवर ही गोड स्माई ल होती . पण मनात मात्र ती गोंधळलेली होती ...
" कोण आहेत हे ? तुम्ही ओळखता कसे एकमेकांना ? "
तेवढ्यात शेखर उठून उभा राहिला . आणि सांगू लागला.
" आम्ही फ्रेंड्स आहोत . एफबी वर भेटलेलो ..."
" Ohh ! Nice ..."

असं म्हणत ती चहाचा ट्रे घेऊन आतमध्ये गेली . आणि पोहे घेऊन बाहेर आली ...
आज रिदिमाला काय झालं आहे . तिच्यात अचानक असा बदल कसा झाला ? ह्या विचारात राहुल गडून गेला होता . 

रिदिमा नित्या आपली खूप जवळची मैत्रीण असल्यासारखी तिच्याशी बोलू लागली ..

"कशी आहेस तू ? नुकतच लग्न झालं ..एन्जॉय कर तुझ आयुष्य हे दिवस परत परत येत नाहीत आयुष्यात ...एकदा गेले की गेले .."

" हो नक्की !! थॅन्क्स फॉर सजेशन मी .."

" इट्स ओके डिअर .."

त्यांच्यातील तो गोडवा पाहून राहुल ही अचंबित झाला होता ... अरे व्वा ! ह्यांचा तर फार छान जमल असं म्हणत मनोमन खुश होत होता ...

शेखर आणि नित्या राहुलच्या घरी बराच वेळ थांबतात . 
संध्याकाळच्या वेळेस ते त्यांच्या घरीच जेवतात . आणि मग पुन्हा हॉटेल ब्रीज वर जातात . 

शेखर मनाने खूप चांगला होता . त्यामुळेच नित्याला त्याच्यापासून काहीही लपवून ठेवण्याची गरज भासत नव्हती . पण तिच्या मनात एक प्रश्न सतत रेंगाळत होता.
तो म्हणजे हा ह्याने  आपली आणि शेखरची मैत्री कशी काय except केली . ते हॉटेल ब्रीज वर पोहचन्यापूर्वी एका कॅफे मध्ये कॉफी घेण्यासाठी थांबले . त्याने कॉफी ऑर्डर केली . तेवढ्यात नित्या त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली . पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते . तिचा गोंधळलेला चेहरा पाहून शेखरने तिला प्रश्न केला . 
  " काय प्रोब्लेम आहे ?  काही बोलायचं आहे का ? बोलायचं असेल तर , बिनधास्त बोल . मी आय.पी.एस 
जगासाठी आहे . तुझ्यासाठी फक्त तुझा नवरा आहे . नवरा होण्याआधी एक जनरल फ्रेंड आहे . हा आता राहुल इतका नसेल जवळचा पण , दूरचा का होईना ."

नीत्याला त्याच्या बद्दल अजूनच कुतूहल वाटत होत .
किती फ्री आहे हा माणूस तिने त्याला प्रत्युत्तर दिलं . 
" राहुल इतका नाही राहुल पेक्षा ही खूप जवळचे मित्र आहात तुम्ही माझे ..."
तो लगेच मध्ये बोलला , " म्हणून हा अरे तुरे चा परकेपणा का मला ..."
" अहो पण पती आहात ना तुम्ही माझे ..."
" हो ... पतिधर्म म्हणून तू मला अरे तुरे करायचं ... " 
" ओके करेन पण फक्त आपल्या दोघांतच ..ओके ना "

तेवढ्यात वेटर कॉफी घेऊन येतो . आणि ते कॉफी घेतात  . शेखर कॉफी घेत घेत तिला विचारतो . 
" बरं तुला काय विचारायचं होत मला ते विचार की "
विचारू की नको ह्या विचारातच ती त्याला विचारते ..
" रागवनार नाही ना .."
तेवढ्यात प्रेमळ आणि आपलेपणाने " नाही ग राणी विचार "
" तुला माझ्या आणि राहुलच्या मैत्रीचा खरोखर काहीचं प्रोब्लेम नाही ...आणि नसेल तर मग का नाही ..कारण ह्या जगातील कुठल्याच पुरुषाला आपल्या पत्नीला एक मित्र आहे ..ही कल्पना सुध्धा सहन होतं नाही ..

   " कॉफी  चा एक गोठ घेत आणि मान हलवत , " बरोबर आहे तुझ म्हणणं ..पण मला नाही आहे प्रोब्लेम तुझ्या आणि राहुल च्या मैत्रीचा ..तुमची मैत्री आहे तशीच राहू देत . जगापासून लपवून का होईना पण ती टिकवून ठेवा . प्रत्येकाच्या नशिबात नसते अशी मैत्री ..ती तुमच्या नशिबात आहे . तिचा आदर करा . "

तो बोलतांना खूपच हळवा झाला होता . त्याच्या ही आयुष्यात असेल का कोणी मैत्रीण हा प्रश्न नकळत नित्याच्या मनात आला आणि तिने सहज विचारलं ..
" तुला पण आहे का ? एखादी मैत्रीण .."


   त्याचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते . त्याच्या डोळ्यातील पाणी भूतकाळाला आठवत होते . तिने त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला ..आणि त्याच्या डोळ्यातील एक दवबिंदू आपल्या बोटावर झेललं ती त्याला विचारू लागली ..
      " डोळ्यात हे पाणी का ? डोळ्यात आलेल्या ह्या पाण्याचं नक्की कारण काय ? कळू शकेल का तुझ्या ह्या नव्या मैत्रिणीला ...."

त्याने मानेने च होकार दिला आणि आपल्या व्हायलेट मध्ये असणारी एक फोटो कॉपी काढली . आणि नित्याला ती दाखवली ...

" नेत्रा माझी गर्लफ्रेंड ...लग्न करायचं होतं आम्हांला पण हा समाज खूप वाईट नसत होऊ दिलं आमचं लग्न कारण काश्ट ...वेगळ्या समाजाची होती . ती त्यामुळे आम्ही लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाकला होता . पण मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत जपण्याचा निर्धार होता . पण तो ही जपण्यासाठी आम्ही अपूर्ण पडलो .
तिचं लग्न झालं मी तिचा मित्र आहे . हे तिच्या नवऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिचं फ्रीडम लाईफ तिच्याकडून काढून घेतलं . साधं गल्लीत न विचारता जाण्याचीही तिला परमिशन नाही . हे ती जेव्हा माहेरी आली होती.  तेव्हा तिने मला सांगितल . आणि मग आम्ही आमच्या मैत्रीच्या नात्याला पूर्ण विराम दिला .
त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याची बदली झाली . मग आमचा कॉन्टॅक्ट नाही ...आता मी तिला ओळखू शकेन की नाही. हे ही मला मला माहित नाही. "

प्रत्येक शब्द उच्चारताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते . नित्या निशब्द झाली होती ...
" थॅन्क्स शेखर माझ्या आणि राहुलच्या मैत्रीला सपोर्ट करण्यासाठी ...थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात माझा श्वास बनुन आलात त्यासाठी ..."
असं म्हणत ती त्याला कधी बिलगली हे तिच्याही लक्षात नाही आलं ...त्यांची लव्हस्टोरी आजपासून नव्याने सुरू होणार होती ..किती चड उतार येणार आहेत. देव जाणे .

         ते  कॉफी वैगरे घेतात आणि हॉटेल ब्रीज वर जातात . हॉटेल ब्रीज वर गेल्यानंतर शेखर ला एक कॉल येतो . त्याच्या पोलीस स्टेशन मधून त्याच्या सिनिअर चा त्याला तूर्तास पोलीस स्टेशन मध्ये बोलावण्यात येते . काही खास कारणास्तव ...पण ते कारण काय आहे . ते काही त्याला कळल नव्हत ...
स्टेशन मधून कॉल आल्यानंतर ते लगेच परत निघण्याची तयारी करतात....

तुम्हाला काय वाटतं काय कारण असेल शेखरला तूर्तास पोलीस स्टेशन मध्ये बोलेवण्याच ....आहेत ना वाचण्यासाठी उत्सुक मी पण आहे लिहिण्यासाठी ...
तुम्ही वाचत रहा मी लिहीत राहते ...


 क्रमशः 
पुढील भाग लवकर ...

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...