काही क्षणांची ..
सोबत त्या अडीच शब्दांची ,
राख रांगोळी जीवनाची ...
काहीचं कळत नाही .
प्रेम ही जगातील सर्वात सुंदर फिलिंग असली ना तरी , चांगल्या चांगल्या माणसाच आयुष्य बरबाद करण्याचं एकमेव कारण तिचं फिलिंग आणि त्या फिलिंग ला व्यक्त करणारे ते अडीच शब्द ठरतात .
सुरुवातीला खूप भारी वाटत हे प्रेम पण , नंतर हेच प्रेम जगतानाच मरणयातना देत . जेव्हा दोन जीव एकमेकांमध्ये गुंततात . तेव्हा खरच खूप अवघड होऊन बसतं . कारण प्रेमाचा शेवट हा लग्नानेच होईल हे काही विधिलिखित नसत .
भगवान श्री कृष्णला ही त्याचं प्रेम कधी मिळालं नाही , तर मग शेवटी आपण सर्व सामान्यच आहोत . आपल्यालातरी कस मिळेल ?
प्रेमात पडणं हे काही आपल्या हातात नसत . अचानक व्यक्ती प्रेमात पडतो . त्याची त्याला जाणीव ही नसते .
पण खर सांगू का ? प्रेम ह्या फिलिंग पासून ना दोन हात दूर राहिलेले च बरं . कारण प्रेमात पडून दूर होताना जो त्रास होतो . ना तो खूप भयानक असतो . त्यापेक्षा प्रेम न केलेले बरं असतं .
आई वडील आपल्या प्रेमाला स्वीकारतीलच हे ही काही नक्की नसतं . त्यांना आपल प्रेम हा एक पोरखेळ ही वाटू शकतो . ते कधी आपलं प्रेम समजू शकतील ही अपेक्षा ठेवणे ही चुकीचं ठरत . कारण आई वडिलांची निवड कधी ही मुलांना आवडत नाही . आणि मुलांची निवड कधी आई वडिलांना आवडत नाही . हे ठरलेलं आहे ...
घर घर की यही कहाणी है !!
त्यामुळे प्रेमापासून थोड दूर राहिलेलं च बरं . कारण ते प्रेम हे सुंदर आयुष्य कधी बरबाद करून टाकेन सागता नाही येणार ....
अतिशय सुंदर लेख...मस्तच..सुंदर लिखाण 👌👌👌👌
ReplyDelete