नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 8, 2021

प्रेम ह्या फिलिंग पासून दूर राहिलेलेचं बरं ..

उलाढाल दोन जीवांची ,
काही क्षणांची .. 
सोबत त्या अडीच शब्दांची ,
राख रांगोळी जीवनाची ...
काहीचं कळत नाही .

प्रेम ही  जगातील सर्वात सुंदर फिलिंग असली ना तरी , चांगल्या चांगल्या माणसाच आयुष्य बरबाद करण्याचं एकमेव कारण तिचं फिलिंग आणि त्या फिलिंग ला व्यक्त करणारे ते अडीच शब्द ठरतात . 

सुरुवातीला खूप भारी वाटत हे प्रेम पण , नंतर हेच प्रेम जगतानाच मरणयातना देत . जेव्हा दोन जीव एकमेकांमध्ये गुंततात . तेव्हा खरच खूप अवघड होऊन बसतं . कारण प्रेमाचा शेवट हा लग्नानेच होईल हे काही विधिलिखित नसत . 
  
    भगवान श्री कृष्णला ही त्याचं प्रेम कधी मिळालं नाही , तर मग शेवटी आपण सर्व सामान्यच आहोत . आपल्यालातरी कस मिळेल ? 
प्रेमात पडणं हे काही आपल्या हातात नसत . अचानक व्यक्ती प्रेमात पडतो . त्याची त्याला जाणीव ही नसते . 

पण खर सांगू का ? प्रेम ह्या फिलिंग पासून ना दोन हात दूर राहिलेले च बरं . कारण प्रेमात पडून दूर होताना जो त्रास होतो . ना तो खूप भयानक असतो . त्यापेक्षा प्रेम न केलेले बरं असतं . 

    आई वडील आपल्या प्रेमाला स्वीकारतीलच हे ही काही नक्की नसतं . त्यांना आपल प्रेम हा एक पोरखेळ ही वाटू शकतो . ते कधी आपलं प्रेम समजू शकतील ही अपेक्षा ठेवणे ही चुकीचं ठरत . कारण आई वडिलांची निवड कधी ही मुलांना आवडत नाही . आणि मुलांची निवड कधी आई वडिलांना आवडत नाही . हे ठरलेलं आहे ... 
घर घर की यही कहाणी है !!

त्यामुळे प्रेमापासून थोड दूर राहिलेलं च बरं . कारण ते प्रेम  हे  सुंदर आयुष्य कधी बरबाद करून टाकेन सागता नाही येणार ....

1 comment:

  1. अतिशय सुंदर लेख...मस्तच..सुंदर लिखाण 👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...