हल्ली काम एवढे वाढले ,
छंद जोपासणे ही अवघडले ,
माणसाचे घड्याळ हतबल झाले ...
माणसाचे माणूसपण हरवत चालले ..
वाटत मनासारखं जगावं ,
काम बाजूला ठेवून ही जगता यावं ,
सतत काय ते मरमर राबावं ,
थोडं स स्वतःसाठी ही असावं ,
स्वतःसाठी जगताना खांद्यावर कसलही प्रेशर नसावं ...
जन्मापासून ते मरेपर्यंत कामं आहे ,
नशिबी रेखाटलेली ,
जशी पायात चप्पल धुळीत माखलेली ,
तशी माणूस आणि कामं ह्यांची जन्मतःच नेट विणलेली ,
कष्टातच माणसाची जीवन शैली गजबजलेली ,
कामाच्या व्यापात च मन गुंतलेली ,
जीवन म्हणजे काय ? जगणं म्हणजे काय ? तेच आता ती विसरली ...
काल्पनिक कविता आहे . काम महत्वाची आहेत पण त्याच बरोबर स्वतःसाठी वेळ देणं ही खूप महत्त्वाच आहे ..
अतिशय सुंदर लिखाण केले आहे 👌👌👌👌
ReplyDelete