नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 13, 2021

ठिगळ

आयुष्य हे ठिगळं ठिगळं करून जोडलेलं आहे .


सुख दुःख संघर्ष , हर्ष ह्या ठींगळाणी ते जोडलेलं आहे .


आयुष्याला खूप ठिगळं जोडावी लागतात तेव्हा कुठे ते परिपूर्ण होतं . दुःखात कधी कधी सुख ही शोधावं लागत   मनभरुन हसावं लागतं .


खूप टप्पे येता जीवनात तो प्रत्येक टप्पा पार करून पुढे जावं लागतं . कधी वादळ आपली सावली  होईल सांगता येणार नाही . ती सावली स्विकारण्याची तयारी असू द्यावी लागते .


जीवन प्रवास म्हटल तर ,  जीवनात भेटणारी नवनवीन माणसं ही त्या प्रवासातील स्टॉप किंवा स्टेशन  असतात .
प्रत्येक स्टेशन हे वेगळ वेगळं  असतं . त्याच्याशी निभावून घेता येईल का ? हा प्रश्न मनात असतोच .

कोणाला राग जास्त असतो , तर कोणाला समज कमी असते . समजून घेता आल तर , नात टिकतं .
  
समजुंन घेता आलच नाही तर , मग नत्याचा मेळ बसत नाही . आणि मग नाईला जामुळे एकमेकांपासून  दूर व्हाव  . हे स्टेशन नको  दुसरं म्हणून आपण दुसऱ्या स्टेशन कडे. धाव घेतो . आणि मेन म्हणजे हे  स्टेशन बदलायला पैसे नाही मोजावे लागत . त्यामुळे स्टेशन बदलन सोपं वाटतं .

आयुष्याच्या प्रवासात भावना खूप महत्त्वाच्या असतात .
त्या  समजून घेणं खूप महत्त्वाच्या असतात .
जो समोरच्याच्या भावना समजून घ्यायला शिकला त्याला आयुष्य जगता आलं . असं म्हणायला हरकत नाही . 

5 comments:

  1. अतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना केलीत

    ReplyDelete
  3. खुप सुंदर रचना केलीस पोरी👍🙏🙏🙏🙏🙏😊

    ReplyDelete
  4. खुप सुंदर रचना... वास्तवदर्शी...��������

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर लिखाण केले आहे 👌👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...