आयुष्य हे ठिगळं ठिगळं करून जोडलेलं आहे .
सुख दुःख संघर्ष , हर्ष ह्या ठींगळाणी ते जोडलेलं आहे .
आयुष्याला खूप ठिगळं जोडावी लागतात तेव्हा कुठे ते परिपूर्ण होतं . दुःखात कधी कधी सुख ही शोधावं लागत मनभरुन हसावं लागतं .
खूप टप्पे येता जीवनात तो प्रत्येक टप्पा पार करून पुढे जावं लागतं . कधी वादळ आपली सावली होईल सांगता येणार नाही . ती सावली स्विकारण्याची तयारी असू द्यावी लागते .
जीवन प्रवास म्हटल तर , जीवनात भेटणारी नवनवीन माणसं ही त्या प्रवासातील स्टॉप किंवा स्टेशन असतात .
प्रत्येक स्टेशन हे वेगळ वेगळं असतं . त्याच्याशी निभावून घेता येईल का ? हा प्रश्न मनात असतोच .
कोणाला राग जास्त असतो , तर कोणाला समज कमी असते . समजून घेता आल तर , नात टिकतं .
समजुंन घेता आलच नाही तर , मग नत्याचा मेळ बसत नाही . आणि मग नाईला जामुळे एकमेकांपासून दूर व्हाव . हे स्टेशन नको दुसरं म्हणून आपण दुसऱ्या स्टेशन कडे. धाव घेतो . आणि मेन म्हणजे हे स्टेशन बदलायला पैसे नाही मोजावे लागत . त्यामुळे स्टेशन बदलन सोपं वाटतं .
आयुष्याच्या प्रवासात भावना खूप महत्त्वाच्या असतात .
त्या समजून घेणं खूप महत्त्वाच्या असतात .
जो समोरच्याच्या भावना समजून घ्यायला शिकला त्याला आयुष्य जगता आलं . असं म्हणायला हरकत नाही .
अतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केलीत
ReplyDeleteखुप सुंदर रचना केलीस पोरी👍🙏🙏🙏🙏🙏😊
ReplyDeleteखुप सुंदर रचना... वास्तवदर्शी...��������
ReplyDeleteअतिशय सुंदर लिखाण केले आहे 👌👌👌👌👌
ReplyDelete