शब्द सुधा अपुरे पडतात , जेव्हा आपलीच माणसं आपला घात करतात . मनात खूप काही बोलायचं असताना सुद्धा आपण गप्प राहणं पसंद कराव . कारण गप्प राहून ते नातं 1 टक्का का होईना टिकतं .
सावरून घेण्याचा प्रयत्न करूनही ते सावरलं नाही तरी ते पसरत नक्कीच नाही . ओढ जिव्हाळा टिकेल की नाही माहीत नाही . पण क्लेश आणि शत्रुत्व नक्कीच निर्माण होणार नाही .
एखादा व्यक्तीवर आपण जिवापाड प्रेम करतो . त्याचा खूप आदर करतो. आणि तोच व्यक्ती जर आपल्याला जाणून बुजून इग्नोर करत असेल तर त्याला परत कधीही भाव देत बसायचं नाही . आपण भाव देत बसलो तर मग आपल्यावरच रडायची पाळी येते .
तो व्यक्ती आपला प्रियकरच नाही कोणीही असू देत ज्याने आपल्याला इग्नोर केलं . त्याला आपण आउट ऑफ करायचं जो पर्यंत तो ठिकान्यावर येत नाही तोपर्यंत .
Tit for tat आणि नंतर जर त्याला रीलाईज झालं आपण चुकलो तो माफी मागायला आला . तर मनात कुठलाच क्लेश न ठेवता त्याला मोठ्या प्रमाणे माफ करायचं . तुटलेलं नातं पुन्हा एकदा जोडायचं .
No comments:
Post a Comment
Comments plz.