नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 10, 2021

गंध प्रीतीचा

नुकतीच आरोहीच्या आयुष्यात खूप मोठी वाईट घटना घडते . ती त्या घटनेला पुरेपूर विसरण्याच्या प्रयत्नात असते .  त्या घटनेपासून ती सतत दूर दूर पळण्याचा प्रयत्न करत असते. पण त्या प्रयत्नांना हवं तसं यश मिळतच नव्हतं . वारंवार तिच्या समोर त्याचं घटनांची पुनरावृत्ती होतं असे , आणि भरलेल्या जखमा पुन्हा पुन्हा ओल्या होत असे . वेदना उरात दाटायच्या आणि डोकेदुखीच्या  स्वरूपात बाहेर पडायच्या . त्या घटनेनंतर आपण कधी ही कोणाच्या प्रेमात पडायचं नाही , आणि कोणाला आपल्या प्रेमात पडू द्यायचं नाही .

प्रेम बिम असं काहीही नसतं असंत ते फक्त एक आकर्षण एक मृगजळ . त्यामुळे प्रेम ह्या फिलिंग पासून चार हात लांबच राहायचं .

असा निर्धार करून तिने नवीन आयुष्याची सुरुवात केलेली असतानाच .  तिच्या आयुष्यात आलं एक नवीन वादळ आरव नावाचं दिसायला हँडसम , गुणांनी परिपूर्ण ,
लाखात एक असं ते व्यक्ती महत्त्व . त्याची आणि तिची भेट झाली . ती श्री गुरु दत्त मंदिरात तो गावात नुकताच राहायला आला होता . आई वडील आधी आलेले होते . पण त्याच वर्षभराच शिक्षण अपूर्ण राहिलेलं तो नुकताच पूर्ण करून आला होता . त्याला घराचा पत्ता ही व्यवस्थित माहीत नव्हता .

तेवढ्यात त्याला एक मुलगी दिसते . नाका डोळ्यांनी अतिशय सुंदर बघताच कोणत्याही मुलाला तिची सुंदरता भाऊक करेन . आणि तसचं आरव च्या बाबतीत झालं .
तो एक क्षण तिच्याकडे बघतच राहिला . तेवढ्यात आरोही ने त्याच्या डोळ्यासमोर आपला हात हलवला .

" ओ मिस्टर काय बघताय असं ? काय हवं आपल्याला "

" Would you like to help mi " असं म्हणत त्याने हातात असलेली adress recet दाखवत तिला विचारलं , " तुम्हाला हा adress माहीत आहे तुम्ही मला सांगू शकाल का ?  ' यशोदा सदन ' कुठे आहे ते? "

"  ओ sss म्हणजे तुम्ही यशोदा काकूंचा मुलगा आहात .
त्या तर , तुम्ही येणार म्हणून खूप खुश आहेत . त्या आमच्याच कॉलनीमध्ये राहतात . चला मी सोडते तुम्हाला , माझ्या स्कुटीवर यायला आवडेल ना "

" अहो ,  पण सामान खूप आहे कसं होईल adjust "

" अहो होईल ओ adjustment is the best option for living a life . " असं म्हणत ती त्याच्या हातात असलेल्या bags स्कुटिवर set करते .

" बरोबर बोलला तुम्ही thanks हा मला घरी सोडताय त्यासाठी "

" अहो thanks काय आणि कशासाठी अहो यशोदा काकू खूप प्रेमळ आहेत . त्या खूप आतुरतेने वाट बघत आहे . तुमची त्यांची आतुरता संपायला हवी . चला आता. वेळ नका दवडवू . " असं म्हणत ती एक हेल्मेट त्याला देते आणि एक हेल्मेट आपल्या डोक्यात घालते . आणि ते काही तासातच यशोदा सदन ला पोहोचतात .

" तुम्ही बाहेरचं थांबा हा " असं म्हणत ती काकूंकडे जाते आणि त्यांचे डोळ्यांवर आपले हात टेकवून बाहेर घेऊन येते .

" अगं अरोही असं काय करतेय डोळ्यांवर असे हात का टेकवले आणि मला कुठे नेतीस ? खूप पडली बाई मस्करी नको करू . "

" थांबा काकू एक मिनिट " असं म्हणत ती दरवाजासमोर गेल्यावर काकूंच्या डोळ्यावर टेकवलेले हात काढते .

काकू आरव ला बघताच भारावून जाता . डोळे त्यांचे आनंदाने पाणावले . गहीवरल्या स्वरात ,
" आरव बाळा कसा आहेस ? " हा प्रश्न विचारून त्याच्या मिठीत शिरतात . आणि रडतात . ते अश्रू दुःखाचे नाही तर , आनंदाचे असतात .

तेवढ्यात आरोही " काकू पुरे झालं आता अजुन रडला ना तर आपल्याला नवीन सदन शोधावं लागेल . "

" आरोही काय ग हे मजाक घेतेस का काकूंची रडू दे ग खूप दिवसांनी आलाय भेटू दे त्याला मनभरून . "

" बरं काकू तू भेट मनभरून मी येते आता "

" तू आणि कुठे चालली थांब जरा वेळ जेवून जा की , "

" नको काकू कॉलेज ला जायचं आहे . नाहीतर थांबले असते . " असं म्हणत ती तिथून निघून जाते .

आरव आईला म्हणतो , " किती चांगली मुलगी आहे ना " काकू ही " हो रे खूप गोड मुलगी आहे. नेहमी आनंदी असते हिच्याकडे पाहिलं ना की माणसाचं दुःख विसरून जात. " असं म्हणत ते घरात जातात . खूप गप्पा वैगरे मारतात . आरोही त्याला खूपच आवडली होती . तिच्याशी मैत्री करण्याची त्याला खूप ईशा होती . सांजवेळी आरव च्या घरी  एका मुलगा आणि त्याला त्याने निरोप दिला .
शेजारच्या दिदिने तुम्हाला चहा घ्यायला बोलावलं म्हणून ,

" कोण शेजारची दीदी " अस प्रश्न  आरव ने त्या मुलाला केला .

" अहो आमची आरोही दीदी "

" Ohh ! येतो म्हणून सांगा तुमच्या आरोही दिदिला " असं म्हणत तो जागचा उठला आणि आईला सांगून आरोही च्या घरी चहा घेण्यासाठी गेला .

आरोही दारात उभी राहून त्याचीच वाट बघत होती .
" Welcome mr arv " असं म्हणत ती त्याच्या हातात हात देत वेलकम करते .

चहा वैगरे झाल्यानंतर तो घरी परतताना आरोही ला विचारतो , " will you friendship with mi "

" Yes why not "  असं म्हणत ती त्याच्याशी मैत्री करते . दिवसेंदिवस त्यांची मैत्री बहरत जाते . आरव च्या मनात तिच्या साठी प्रेम जागं त आणि तिच्याही मनात आरव साठी तिचं फिलिंग निर्माण होत असते . पण ती कधीही पुढाकार घेऊन व्यक्त होणार नव्हती . सार एकदम सुरळीत चाललं होतं. 

आरव व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तिला प्रपोज करायचं ठरवतो . तिच्यासाठी एकदम सुंदर daymond ring parches करतो.  आणि सुखी संसाराची स्वप्न बघायला सुरुवात करतो . आणि नेमकं त्याचं दिवशी तो wp dipila एक जोक म्हणून स्टेटस ठेवतो . त्याला ती रिप्लाय देते . तू काय नुसता मुलींकडे बघत असतो का ?
त्याच्यावर त्याचा रिप्लाय येतो . हो मुलींकडे बघत असतो कधी कधी पण आता नाही बघणार कारण माझ लग्न होणार आहे . मग मुलींकडे बघून कसं चालणार . ती सगळी म जाक आरोही सीरीरसली घेते . आणि आरव ला नको नको ते बोलते . आरव ही तिच्याशी अबोल होतो . त्यांची असलेली मैत्री ही तुटते . दोघांचेही खूप मोठे गैर समज होतात . एकमेकांबद्दल काही जाणून घेण्याची त्यांना ईश्चां नसते . आरव ही कामानिमित्त परत दुसऱ्या शहरात निघून जातो . गैर समजाची अडी मनात ठेवून ती आपल्याला असं का बोलली ह्या प्रश्नाचं उत्तर न घेताच तो त्यांच्या नात्याला पूर्णविराम देतो .

आरोही ही नंतर खूप पस्तावते आपण दुसऱ्याचा राग त्याच्यावर का काढला ह्याचं gilt तिच्या मनाला सतत  खात होतं . पण आता काहीच फायदा नव्हता नात्याचा the end alredi झालेला होता . प्रीतीचा सुगंध कधीच संपला होता .

तरीही तिच्या मनात अजूनही आस होती . त्याला आपली बाजू समजली तर , तो आपल्याला नक्की समजून घेईल .

तुझ्या प्रीतीचा सुगंध दरवळला नाही ,
गंध तो मनाचा तू ओळखला नाही ,
भावनेत होते  मी हरवलेले ,
तुला तू न केलेल्या चुकांचे दोष दिले ,
त्यासाठी मनापासून माफी मागते एकदा माफ कर रे .....
तुझ्या प्रीतीचा सुगंध पुन्हा एकदा दरवळू दे रे !!!

ही कथा पूर्णतः कल्पनिकतेवर आधारित आहे . कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी संबधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ...












  


6 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...