नुकतीच आरोहीच्या आयुष्यात खूप मोठी वाईट घटना घडते . ती त्या घटनेला पुरेपूर विसरण्याच्या प्रयत्नात असते . त्या घटनेपासून ती सतत दूर दूर पळण्याचा प्रयत्न करत असते. पण त्या प्रयत्नांना हवं तसं यश मिळतच नव्हतं . वारंवार तिच्या समोर त्याचं घटनांची पुनरावृत्ती होतं असे , आणि भरलेल्या जखमा पुन्हा पुन्हा ओल्या होत असे . वेदना उरात दाटायच्या आणि डोकेदुखीच्या स्वरूपात बाहेर पडायच्या . त्या घटनेनंतर आपण कधी ही कोणाच्या प्रेमात पडायचं नाही , आणि कोणाला आपल्या प्रेमात पडू द्यायचं नाही .
प्रेम बिम असं काहीही नसतं असंत ते फक्त एक आकर्षण एक मृगजळ . त्यामुळे प्रेम ह्या फिलिंग पासून चार हात लांबच राहायचं .
असा निर्धार करून तिने नवीन आयुष्याची सुरुवात केलेली असतानाच . तिच्या आयुष्यात आलं एक नवीन वादळ आरव नावाचं दिसायला हँडसम , गुणांनी परिपूर्ण ,
लाखात एक असं ते व्यक्ती महत्त्व . त्याची आणि तिची भेट झाली . ती श्री गुरु दत्त मंदिरात तो गावात नुकताच राहायला आला होता . आई वडील आधी आलेले होते . पण त्याच वर्षभराच शिक्षण अपूर्ण राहिलेलं तो नुकताच पूर्ण करून आला होता . त्याला घराचा पत्ता ही व्यवस्थित माहीत नव्हता .
तेवढ्यात त्याला एक मुलगी दिसते . नाका डोळ्यांनी अतिशय सुंदर बघताच कोणत्याही मुलाला तिची सुंदरता भाऊक करेन . आणि तसचं आरव च्या बाबतीत झालं .
तो एक क्षण तिच्याकडे बघतच राहिला . तेवढ्यात आरोही ने त्याच्या डोळ्यासमोर आपला हात हलवला .
" ओ मिस्टर काय बघताय असं ? काय हवं आपल्याला "
" Would you like to help mi " असं म्हणत त्याने हातात असलेली adress recet दाखवत तिला विचारलं , " तुम्हाला हा adress माहीत आहे तुम्ही मला सांगू शकाल का ? ' यशोदा सदन ' कुठे आहे ते? "
" ओ sss म्हणजे तुम्ही यशोदा काकूंचा मुलगा आहात .
त्या तर , तुम्ही येणार म्हणून खूप खुश आहेत . त्या आमच्याच कॉलनीमध्ये राहतात . चला मी सोडते तुम्हाला , माझ्या स्कुटीवर यायला आवडेल ना "
" अहो , पण सामान खूप आहे कसं होईल adjust "
" अहो होईल ओ adjustment is the best option for living a life . " असं म्हणत ती त्याच्या हातात असलेल्या bags स्कुटिवर set करते .
" बरोबर बोलला तुम्ही thanks हा मला घरी सोडताय त्यासाठी "
" अहो thanks काय आणि कशासाठी अहो यशोदा काकू खूप प्रेमळ आहेत . त्या खूप आतुरतेने वाट बघत आहे . तुमची त्यांची आतुरता संपायला हवी . चला आता. वेळ नका दवडवू . " असं म्हणत ती एक हेल्मेट त्याला देते आणि एक हेल्मेट आपल्या डोक्यात घालते . आणि ते काही तासातच यशोदा सदन ला पोहोचतात .
" तुम्ही बाहेरचं थांबा हा " असं म्हणत ती काकूंकडे जाते आणि त्यांचे डोळ्यांवर आपले हात टेकवून बाहेर घेऊन येते .
" अगं अरोही असं काय करतेय डोळ्यांवर असे हात का टेकवले आणि मला कुठे नेतीस ? खूप पडली बाई मस्करी नको करू . "
" थांबा काकू एक मिनिट " असं म्हणत ती दरवाजासमोर गेल्यावर काकूंच्या डोळ्यावर टेकवलेले हात काढते .
काकू आरव ला बघताच भारावून जाता . डोळे त्यांचे आनंदाने पाणावले . गहीवरल्या स्वरात ,
" आरव बाळा कसा आहेस ? " हा प्रश्न विचारून त्याच्या मिठीत शिरतात . आणि रडतात . ते अश्रू दुःखाचे नाही तर , आनंदाचे असतात .
तेवढ्यात आरोही " काकू पुरे झालं आता अजुन रडला ना तर आपल्याला नवीन सदन शोधावं लागेल . "
" आरोही काय ग हे मजाक घेतेस का काकूंची रडू दे ग खूप दिवसांनी आलाय भेटू दे त्याला मनभरून . "
" बरं काकू तू भेट मनभरून मी येते आता "
" तू आणि कुठे चालली थांब जरा वेळ जेवून जा की , "
" नको काकू कॉलेज ला जायचं आहे . नाहीतर थांबले असते . " असं म्हणत ती तिथून निघून जाते .
आरव आईला म्हणतो , " किती चांगली मुलगी आहे ना " काकू ही " हो रे खूप गोड मुलगी आहे. नेहमी आनंदी असते हिच्याकडे पाहिलं ना की माणसाचं दुःख विसरून जात. " असं म्हणत ते घरात जातात . खूप गप्पा वैगरे मारतात . आरोही त्याला खूपच आवडली होती . तिच्याशी मैत्री करण्याची त्याला खूप ईशा होती . सांजवेळी आरव च्या घरी एका मुलगा आणि त्याला त्याने निरोप दिला .
शेजारच्या दिदिने तुम्हाला चहा घ्यायला बोलावलं म्हणून ,
" कोण शेजारची दीदी " अस प्रश्न आरव ने त्या मुलाला केला .
" अहो आमची आरोही दीदी "
" Ohh ! येतो म्हणून सांगा तुमच्या आरोही दिदिला " असं म्हणत तो जागचा उठला आणि आईला सांगून आरोही च्या घरी चहा घेण्यासाठी गेला .
आरोही दारात उभी राहून त्याचीच वाट बघत होती .
" Welcome mr arv " असं म्हणत ती त्याच्या हातात हात देत वेलकम करते .
चहा वैगरे झाल्यानंतर तो घरी परतताना आरोही ला विचारतो , " will you friendship with mi "
" Yes why not " असं म्हणत ती त्याच्याशी मैत्री करते . दिवसेंदिवस त्यांची मैत्री बहरत जाते . आरव च्या मनात तिच्या साठी प्रेम जागं त आणि तिच्याही मनात आरव साठी तिचं फिलिंग निर्माण होत असते . पण ती कधीही पुढाकार घेऊन व्यक्त होणार नव्हती . सार एकदम सुरळीत चाललं होतं.
आरव व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तिला प्रपोज करायचं ठरवतो . तिच्यासाठी एकदम सुंदर daymond ring parches करतो. आणि सुखी संसाराची स्वप्न बघायला सुरुवात करतो . आणि नेमकं त्याचं दिवशी तो wp dipila एक जोक म्हणून स्टेटस ठेवतो . त्याला ती रिप्लाय देते . तू काय नुसता मुलींकडे बघत असतो का ?
त्याच्यावर त्याचा रिप्लाय येतो . हो मुलींकडे बघत असतो कधी कधी पण आता नाही बघणार कारण माझ लग्न होणार आहे . मग मुलींकडे बघून कसं चालणार . ती सगळी म जाक आरोही सीरीरसली घेते . आणि आरव ला नको नको ते बोलते . आरव ही तिच्याशी अबोल होतो . त्यांची असलेली मैत्री ही तुटते . दोघांचेही खूप मोठे गैर समज होतात . एकमेकांबद्दल काही जाणून घेण्याची त्यांना ईश्चां नसते . आरव ही कामानिमित्त परत दुसऱ्या शहरात निघून जातो . गैर समजाची अडी मनात ठेवून ती आपल्याला असं का बोलली ह्या प्रश्नाचं उत्तर न घेताच तो त्यांच्या नात्याला पूर्णविराम देतो .
आरोही ही नंतर खूप पस्तावते आपण दुसऱ्याचा राग त्याच्यावर का काढला ह्याचं gilt तिच्या मनाला सतत खात होतं . पण आता काहीच फायदा नव्हता नात्याचा the end alredi झालेला होता . प्रीतीचा सुगंध कधीच संपला होता .
तरीही तिच्या मनात अजूनही आस होती . त्याला आपली बाजू समजली तर , तो आपल्याला नक्की समजून घेईल .
तुझ्या प्रीतीचा सुगंध दरवळला नाही ,
गंध तो मनाचा तू ओळखला नाही ,
भावनेत होते मी हरवलेले ,
तुला तू न केलेल्या चुकांचे दोष दिले ,
त्यासाठी मनापासून माफी मागते एकदा माफ कर रे .....
तुझ्या प्रीतीचा सुगंध पुन्हा एकदा दरवळू दे रे !!!
ही कथा पूर्णतः कल्पनिकतेवर आधारित आहे . कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी संबधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ...
खुप सुंदर कथा....👌👍💐🍫
ReplyDeleteखुप सुंदर कथा
ReplyDeleteखुप सुंदर 👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर कथा आहे
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलंय👌👌👌
ReplyDeleteखूप छान👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete