माणसाने माणुसकी जपावी ,
जिवापाड ती जपावी ,
एकवेळ तहान भूक विसरावी ,
पण माणुसकीची शिकवण न विसरावी ....
माणुसकी खूप महत्वाची असते . माणसाचं हृदय कोमल असावं , स्पर्श करताच दुःख विसरून जावं . निश्टुर
निर्दयी नको . असं प्रत्येकाला वाटतं . मलाही आणि ह्या कथेतील मुलीलाही वाटत होत माझ्या माणसांची मन कोमल असावी . निर्दयी नसावी . का माझी हक्कांची माणस एवढी निर्दयी आहेत . असा विचार करून ती थकत होती . काय असेल तिची उत्सुकता आहे ना मलाही आहे लिहिण्याची ......
मानसी कष्टाळू , कनवाळू , दयाळू माणुसकी जपणारी . प्रत्येकाशी प्रेमाने वागणारी . आईविना पोरं बिचारी , सावत्र आईंच्या छायेखाली वाढली . छाया तर मिळाली च नाही उलट , छायेतही धूप मिळाली .
वडील तिचे कामानिमित्त सतत बाहेर राहायचे . काही दिवसांनी पुण्याला नोकरी मिळाली म्हणून पुणे त्यांना नाईलाजाने गाठावं लागलं . मानसीला सोडून जाण्याची ईच्छा चं होत नव्हती . पण काय करणार शेवटी पोटापाण्याचा प्रश्न होता . आणि सुरुवातीला मानसी ची दुसरी आई तिचं प्रेमाने करायची . त्यांची मस्त अट्टी - बट्टी जमली होती . त्यामुळे सुधाकरराव मानसी चे वडील ह्यांनी डोळे झाकून तिला वसू मानसी ची सावत्र आई हिच्या विश्वासावर सोडले . आणि ते पुण्याला शिफ्ट झाले .
ते पुण्याला शिफ्ट झाले आणि लगेच मानसीच्या आईचे चित्र पलटले . तिने मानसी चे चालू असलेले शिक्षण बंद केले . तिच्या अंगावर सारी घरची आणि दारची कामं सोडली . तिने नकार दिला तर नकार देता क्षणीच तिच्या आईने तिला लाकडाचे चटके दिले जिभेला उलथन्याचे चटके दिले . मजबुरिने मानसीला सातवीतच चालू असलेले शिक्षण बंद करावे लागेल आणि नशिबाचे भोग भोगावे लागले .
अधून मधून बाबा विचारपूस करायचे . तेव्हा तिची आई तिला बाबांशी बोलूच द्यायची नाही . आणि जर कधी बाबाने खूप हट्ट केला तर , कधीतरी तिला बाबांशी बोलायला मिळा यचं .
जर कधी बाबाने बाबाने विचारलं , " बाळा कशी आहेस ?"
तर हिचे डोळे पाण्याने तुडुंब भरून यायचे . तोंडातून शब्द फुटतं नव्हते . ती उर आणि हुंदके सांभाळत फक्त एवढीच बोलायची , " मी मस्त , तुम्ही कसे आहात ? "
" बाबा लवकर ह्या " अशी बोलायची इच्छा असूनही ती बोलू शकत नव्हती . कारण तिची आई तिच्या बाजूला जलक लाकूड घेऊन उभी असायची . मी मस्त मजेत आहे . तुम्ही तुमची कामं निवांत करा . आई खूप काळजी घेते . असं बोलण्यासाठी तिची आई तिला दटवायची .
तिच्या धाकाने ती काहीचं बोलू शकत नव्हती . होणारा अन्याय सहन करत होती .
मानसी लहानाची मोठी होईपर्यंत तिचा शारीरिक मानसिक छळ हा नेहमीच होतं राहिला . ती त्याला प्रत्यू त्तर देऊ शकली नाही .
खूप दिवसांनी बिचारी च्या कानावर आनंदाची बातमी पडते . बातमी ऐकून मानसीला आकाश ठेंगणे झाले . बातमी च अशी होती . तिचे बाबा आता कायमचे घरी परतणार होते . ते पुन्हा कधीही कामानिमित्त बाहेरगावी जाणार नव्हते . पण ते नेमके कधी येणार हेच बिचारीला माहीत नसतं ते सरप्राइज असतं . त्यामुळे ती थोडीशी नाराज होते , आणि बाबा येताय ना ते महत्वाचं सरप्राइज म्हंटल्यावर काय सांगा आजच ते आपल्याला मिळेल .
असं सांगून ती स्वतः ला समजावत राहायची .
ज्या दिवशी सुधाकर राव घरी येणार असतात . त्या दिवशी सुधाकरराव तिच्या आईला सांगतात . " मी आज येतोय प्लीज पोरांना सांगू नको . आणि प्लीज कोणालाही आज कुठेही बाहेर जाऊ देऊ नको . मी घरी आल्यावर मला माझी सारी पोरं माझ्या डोळ्यासमोर हवी . विशेष करून माझी मनु , चल मी ठेवतो आता निघण्याची तयारी करावी लागेल ."
असं म्हणून ते फोन ठेवून देतात इकडे ते येणार म्हणून वसुची तळपायाची आग मस्तकात गेली . ते येणार म्हंटल्यावर आपलं सारं पितळ उघडं पडणार . ह्या भीतीने तीला धासती भरली .
काय करावं सुचत नव्हत . ते येणार त्या दिवशी वासूने मानसी घ राबाहेर राहील अशी जास्तीची काम सांगितली . तिच्या काम सांगितले आणि मानसीने नकार दिला असं आज पर्यंत झालं . नव्हत कारण हिने नकार दिला तर मग हिला चाबकाचे फटके आणि जलक्या लाकडाचा अनुभव घ्यायला मिळायचा . जो की खूप जीवघेणा होता .त्यामुळे ती साऱ्या कामांना होकार द्यायची .
तिचे बाबा घरी आले त्यांनी सगळ्यांना जवळ घेऊन सोबत आणलेल्या भेटवस्तू दिल्या . त्यांचे डोळे आतुरले होते ते मानसी ला बघायला . पण मानसी काही त्यांना दिसत नव्हती . त्यांनी वसुला विचारले , " वसू मानसी कुठे गेली काही सांगून गेली का ? "
वसूने आल्या आल्या च त्यांच्या मनात वसू विषयी तिरस्कार निर्माण होईल असं तिच्या वागण्याचं वर्णन केलं . त्या वर्ण नावर सुधाकर भाऊंचा विश्वास बसत नव्हता . पण थोड्या वेळाने जे घडलं त्याने त्यांना वसूच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला भाग पाडलं .
वसू एका अनोळखी मुलाच्या गाडीवर बसून आली होती , ती ही त्याला चांगली च खेटून ची टकून बसली होती .
डोकं पूर्ण त्याच्या खांद्यावर टेकवलेल होतं . कसली तरी धुंदी चडली असावी . नशा केली असावी कधाचीत तिने , वाटतं तर तसचं होतं .
ती गाडीवर उतरली सुधाकर भाऊंनी तिला विचारलं , " काय आहे मनु हे , दिवसा ढवळ्या उन्हात काय थेर सुचताय तुला . एवढी कशी बदलली माझी मनु नशाच्या भरात मानसी उलट सुलट बोलली . मनात असलेलं एवढं मोठं दुःख ती बडबड बोलली . तिचं दुःख खरं असलं तरी , तिची वेळ चुकली होती बोलण्याची म्हणून कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही . तिच्या बापाने तर तिला खोलीत बंद केलं . वसुने अजुन आगीत तेल ओतले नको नको ते बोलून सुधाकर रावांचे कान भरले . शेवटी मानसी चे मामा ह्यांनी सुधाकर रावांना सुचवले तुम्ही गावात चर्चा व्हायच्या आत मानसी च लग्न उरकून टाका . तिच्या बाबांनाही ते पटतं . ते तिच्यावर खूप चिडतात तिच्याशी अबोला धरतात . ते तिच्या मामाना म्हणतात . " तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा . मला तिचं तोंडही बघण्याची इच्छा नाही . ती आजपासून मेली माझ्यासाठी आणि ते तावातावा त घराबाहेर जातात . तिचे मामा तिच्यासाठी खूप चांगला मुलगा बघतात . लग्न लावून देतात .
तिचं नशीब चांगलं म्हणून तिला खूप प्रेमळ सासू सासरे मिळाले होते . नवराही खूप जीव लावणारा निघाला . आयुष्य सोण्यापरी सुंदर उजळून निघाल . तिला माहेरच्यांची आठवण पण नव्हती येत. तिथे तर बिचारीने नेहमीच दुःख भोगलेले होते .
लग्नाला दोन एक वर्ष पूर्ण झाले होते . तिच्या नवऱ्याच्या जवळच्या मित्रांसाठी पार्टी ठेवली होती . त्यात एक जण तिला बघताच आश्चर्य चकित होतो. आणि विचारतो , " तू इथे कशी ? "
ती ही त्याला म्हणते , " मी इथेच असते . पण तू इथे कसा ? का आलास ? माझ्या आयुष्य बरबाद करुन फरार झाला . पुन्हा का आलास माझ आयुष्य बरबाद करायला . निघ इथून . "
ती कडक शब्दात त्याला दम देत असताना तिच्या नवऱ्याने पहिले आणि तो तिला सावरायला आला .
" अग का एवढी चिडतेस त्याच्यावर मित्र आहे .
तो माझा मीच बोलावलं त्याला हा मित्र तुमचा ज्याने माझं आयुष्य बरबाद केलं . माझ्या एकमेव अश्या हक्काच्या माणसाला माझ्यापासून तोडल . "
" म्हणजे काय बोलतेस तू मला काहीच नाही कळत , तू ह्याला कशी ओळखतेस ? "
तेवढ्यात त्याचा मित्र बोलतो , " थांब शेखर मी सांगतो तुला सगळं " तो आधी पाय धरून मानसीची माफी मागतो .
तुम्ही माफी नका मागू पण त्या वेळी असं का वागला एवढंच सांगा मी खूप ऋणी असेल तुमची . "
त्यावेळी मला पैशाची नड होती . म्हणून मी तसा वागलो तुमच्या आईने ते कृत्य करण्यास मला भाग पाडलं . मनात
नसूनही मी तसा वागलो . "
तेवढ्यात तिचे आई वडील येणार होते ते ही ते संभाषण ऐकतात . आता सर्वांना कळून चुकलं होतं की तेव्हा चूक मानसीची नव्हती . तिचे बाबा तर तिच्या आईवर हात उचलतात तेव्हा तिचं जाऊन त्यांचा हात पकडते आणि बोलते. " तिने तिची माणुसकी सोडली म्हणून आपण आपली माणुसकी सोडायची का ? ती चुकली तिला माफ करा . "
आज नियतीने माझ्यावर दया दाखवली माझ्या वर लागलेले सारे कलंक मिटले . आज मी कोणाशीही निश्ट्युर वागणार नाही. तुम्हीही वागू नका .
माणुसकी माणसाचे आत्मदर्शन घडवते . ती कधीही विसरू नये .
खूपच सुंदर👌👍
ReplyDeleteखूप छान...👌👍✍️🍫
ReplyDeleteखूप छान लिहिलंय👌👌👌👌
ReplyDelete