निर्धार हा माझा एवढाच आहे ,
अपेक्षांचा डोंगर दुर्गम आहे ,
भावना मनात सखोल रुजलेल्या ,
पाणावलेल्या डोळ्यांत आसुसलेल्या ,
अपेक्षा काहीचं नाही ,
ठेवून काही फायदाच नाही ,
अपेक्षा पूर्ण करण्याचा कोणी वायदाच केला नाही ,
निर्धार हा माझा एवढाच आहे ,
लोकांच्या डोळ्यांत खुपेल एवढं खुश रहायचं ,
आयुष्यातील दुःख कोणासमोर नाही बोलायचं ,
सुखामागे धावत असताना ते विसरायचं ,
एकदा बोलून एक नातं दूरावलं ,
अजुनही नाही जोडल्या गेलं ,
आता परत तिचं चूक नाही करायची ,
कोण कडूनही कसलीच अपेक्षा नाही ठेवायची ...
व्वा..खूपच सुंदर लिहिलय..चांगले विचार👌👌👌👌
ReplyDeleteसुंदरच 👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर रचना
ReplyDeleteखुप छान अप्रतिम
ReplyDeleteApratim aahe
ReplyDelete