नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jul 18, 2023

पवित्र बंधन ..

पवित्र बंधन

पवित्र बंधन ..


Sacred bond:

लव्ह मॅरेज...अरेंज मॅरेज.कोर्ट मॅरेज ..आता बऱ्याच ठिकाणी आंतर जातीय विवाह केल्या जातो ..आणि मग त्या त्या संस्कृती नुसार विवाह पद्धत सगळ्याच सुंदर पद्धती आहेत विवाहाच्या ...

लव्ह मॅरेज - मनासारखा जोडीदार मिळाला ...ज्याच्यावर जिवापाड आपण प्रेम करतो ..तोच जीवन साथी म्हणून आज माझ्या जीवनात आला ...ह्याचा आनंद खूप वेगळा असतो ...लव्ह मॅरेज बर्याच वेळेस फॅमिली मान्य नसतो .. कारण तो मुलगा तुमच्यासाठी योग्य नाही .. असं आपल्या घरच्यांना वाटतं असतं ...आणि ते अयोग्य ही नसतं ..
कारण आपल्याला फक्त प्रेम करण माहीत असतं . संसार करण्याचा अनुभव नसतो ..

तो मुलगा व्यवस्थित कमावतो की नाही .. आपला उदार निर्वाह करन्यासाठी सक्षम आहे की नाही . आपल्याला काहीच माहित नसतं . कारण आपण फक्त त्याने दिलेल्या 10 रू च्या dairy milk catbarry वर त्याच्यावर फिदा झालेलो असतो ...

अनेकदा मुलींना माझ्या घरी एवढी प्रॉफरटी तेवढी प्रोफरटी म्हणून त्यांची फसवणूक ही केली जाते . आणि मग नंतर रिअल परिस्तिथी बद्दल तिला समजत तेव्हा.  ती बिचारी खूप hurt होते ...कारण अनेकदा मुली प्रिय करासाठी जन्म दात्या आई वडिलांना कायमचं राम राम करायला ही मागे पुढे बघत नाही .....

अनेकदा खूप पस्ताव अशा मुलींना ..पण वेळ निघून गेलेली असते काहीच फायदा नसतो ..म्हणून लव्ह मॅरेज खूप विचार पुर्वक करायला हवं मुलींनी ..कुठल्याही वयात नाही ..तर सज्ञान झाल्यावर करायला .फक्त वयाने नाही तर ..आर्थिक दृष्ट्या ..वैचारिक दृष्ट्या सज्ञान झाल्यावर मुलांनी लव्ह मॅरेज करण्याचं पाऊल उचलाव ....

लव्ह मॅरेज करण्याआधी प्रत्येक मुलींनी विचार करावा ...आपण ज्याच्यासाठी हक्या जगाशी भांडलो ...त्याचं लग्नानंतर लव्ह कमी झालं तर ?
स्वतः ला प्रश्न विचारून बघावा ..प्रामाणिक पने जे उत्तर येईल ..त्या उत्तर चा ही थोडा फार विचार करून पुढचं पाऊल . टाकावं ..तर आयुष्याचं कल्याण ..नाही तर संपूर्ण आयुष्य अंधारात जाईल ...

लग्न म्हणजे काही भातु कलीचा खेळ नाही हे ..हा भाहुला आवडला नाही म्हणून मी भाहुला change करणार ...लग्न ही खूप मोठी कमिटमेंट आहे ...
आयुष्यभरासाठी ची आपल्या साठीही आणि समोरच्यासठी ....

" अरेंज मॅरेज -

अरेंज मॅरेज एक सुखद सहवास ..हवा हवासा वाटणारा ..तडजोड adjustment शिकवणारा एक सुंदर प्रवास..हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळेलच ..अस काही नसत हे मिळालं त्यात समाधानी रहायचं ...अरेंज मॅरेज मला असं वाटतं ..खूप कठीण पण तितकाच छान प्रवास आहे ..तो प्रवास मी स्वतः अनुभवला ..आहे ..

ज्या व्यक्ती ला कधीही ओळखत नव्हते ..त्याच्या सोबत आज गुण्या गोविंदाने राहते ..कितीही वाद झाले तर मिटवावे लागतात ..आणि त्याला ही नमत घ्यावचं लागतं .....कारण समाजाने आम्हाला लग्न या पवित्र बंधनात अडकवलं ..जे आम्हाला आयुष्यभर जपायच आहे ...

ओळख नव्हती ..प्रेम नव्हतं ..सहवासाने सगळ शक्य झालं ...प्रेम ही झालं ओळख ही आणि संसार ही छान सुरळीत चालू आहे ...लव्ह मॅरेज मध्ये एवढा छान नवरा मला नसता मिळाला ..आमच्यात भाडण होतात .. पण तरीही माझा नवरा नेहमी माझ्या समोर सावली सारखा उभा राहतो ..कारण माझ्या वडिलांना दिलेलं वचन तो निभवतो आहे ..


अरेंज मॅरेज चा फायदा .....

कोर्ट मॅरेज ...

लव्ह मॅरेज करणाऱ्यांसाठी च नाही ..तर गरीब सरिब लोकांसाठी ही असतो ..पण आपला सो कॉल्ड समाज ..हा गर्विष्ठ खूप हे ...एक वेळेस स्वतःच एक एकर विकायला काढेल .. पण सरळ साध्या पद्धतीने आणि त्यात ही कायद्याने लग्न करायला मान्यता देणार ..आणि एखदाया सुशिक्षित जोडप्याने करायचं ठरवलं ही ना ..तर ते करू देणार नाही ....त्या पवित्र बंधनावर कलंक लावायला मागे पुढे बघणार बघ नाही .....

आंतर जातीय विवाहात ..वेगळ्या वेगळ्या म्हणजे आपल्या आपल्या संस्कृती नुसार लग्न करन ..एक सुखद क्षण.

मॅरेज कोणतंही असो ...मॅरेज करण महत्वाचं नाही ..हे तर ते मॅरेज निभवण महत्वाचं आहे ...

आपल्या जोडीदाराला कोणत्याच परिस्तिथी त एकटं न सोडता ...त्याच्या सोबत नेहमी सावली सारखं उभं राहणं ..हे खरं लग्न करणाऱ्या जोडप्याच कर्तव्य आहे ..

नवरा..पुरुष म्हणून पुरुषार्थ गाजवनार ..लग्न ह्या पवित्र बंधनावर कलंक आहे ....

एकमेकांचे नवरा बायको होण्या आधी एकमेकांचे चांगले मित्र मैत्रीण होण गरजेचं असतं . आणि तिचं खरी सुरुवात असते ..आपल्या आयुष्याची आपल्या संसाराची ..ज्याने ती सुरुवात शेवट पर्यंत जपली त्याचा संसार आदर्श संसार नक्की होणार .......किती वाईट परिस्थिती आली तरी ते एकमेकांना जिवापाड जपणार .......हसत खेळत त्यांच्या संसाराचा आनंद लुटणार ...

Written by - durga mate


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...