जिथे - तिथे हत्येचा कहर दिसतो ..
नियतीचा काळ हा ...
भल्या माणसाला जगणं विसरायला लावतो ..
पुरुषावर ही होतोच अन्याय ,
पण ; पुरुषांवर होणाऱ्या अन्याया पेक्षा ..
स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाची संख्या जास्त ..
कधीचं नाही होणारं त्याचा अंत ...
पूर्वी स्त्री भ्रूण हत्येने कहर मांडला ..आता , सर्वाना एक मुलगी , एक मुलगा हवा लळा लागला .. मग निर्माण होतात क्रिटिकल सीच्वसेन . पहिला मुलगा झाला तर ठीक , दुसरा गर्भ नाही ठेवला जात चेक करून . कारण आपल्या भारतीय संस्कृतीत एका घरात एका पेक्षा जास्त मुलं असतील तर चालतात .पण एका घरात एका पेक्षा जास्त मुली चालत नाही . मग आपल्याकडे प्रॉपर्टी आहे की , नाही ह्याचाही ते विचार करत नाही . असो .. हा वेगळाच विषय ..
जर मुला ऐवजीं पहिली मुलगी असेल तर , डेफिनेटली दुसरा गर्भ हा चेक करूनचं ठेवल्या जातो . आपल्याला माहीत आहे लिंग तपासणी हा कायद्याने गुन्हा आहे .
प
ण तरीही अनेक ठिकाणी लिंग तपासणी करून गर्भपात केल्या . आणि त्या वेळेस होणारा त्रास हा ही फक्त स्त्री लाचं भोगावा लागतो.
देव जाणे ..
किती जन्म असणार अजुन हिचं कहाणी स्त्री जन्माची ..
किती परीक्षा घेणार देव तिच्या अंताची ..
कधी थांबणार स्त्री भ्रूण हत्या ..
बलात्कार सारख्या घटना कधी तडीस जाणार.
स्त्रियांवर होणारा अन्याय कधी थांबणार ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.