मोबाईल ने हिरावून घेतली नाती गोती ..
आज काल सगळेच ,
स्टेटस अन् reels बघण्यातच बिझी ...
आज काल गप्पांची मैफिल बघायला मिळत नाही ,.
की कुठे सारीपाठाचा खेळ रंगत नाही ..
कारण ,
लोकांना मोबाईल शिवाय सुचत नाही दुसरं काही ..
अबोल झालीत मन ...
हरवून गेले आनंदाचे क्षण ...
मोबाईल नेचं सुरू केले राजकारण ..
माणसाला माणसापासून हिरावून घेतलं ..
जसं हिरावून घेतलं तसं जवळ ही केलं ..
सातासमुद्रापलीकडे असलेल्या व्यक्तीशी ही बोलू शकतो ..
त्याच्याशी जवळीक साधण्याचा नादात ..जवळ असलेला व्यक्तीला अंतर देऊन बसतो ..
मोबाईल नावाच्या राजाने ..
कबजा केलाय प्रत्येकाच्या मनावर ..
म्हणूनच आज मला लीहाविशी वाटली कविता
त्याच्या जीवनावर ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.