प्रतीलीपिने आज अगदी मनातला विषय दिला आहे .
लग्नाची बेडी जेव्हा मुलीच्या पायात बांधली जाते ना , तेव्हा खरोखर मुलीच आयुष्य बंधिस्त होऊन जातं .
तिने माहेरच्यांसाठी जगावं की सासरच्यांसाठी जगावं हा तिच्या पुढील सर्वात मोठा प्रश्न असतो . जन्मापासून ते लग्नाची बेडी पायात बांधे पर्यंत आई वडिलांनी तिला तळहातारील फोडाप्रमाणे जपलेलं असतं .
माहेर तिला दुरावल ते घर म्हणजे परक्याच घर . हे मानन तिला सहज शक्य होतंच नाही ...आणि सासरी तिला तिचं पुढील संपूर्ण आयुष्य काढायचं असतं . त्यामुळे त्याला परक घर समजण्यात काही पॉइंट नव्हता .
असं असूनही सासरी तिला सतत परकेपणा जाणवतो .
आई वडिलांकडे कसं .. मनाची राणी ..जे वाट्टेल ते करायचं . एक भाजी आवडली नाही की , लगेच दुसरी भाजी बनवायची . कोणी बोलेल ही फिकिरच नव्हती. आणि सासरी अस नाही होतं . एखादी भाजी जरी आवडली नाही तरी , मनमारून खावीच लागते . मग पोट भरो ना भरो ताटात पडेल ते खावचं लागतं ..
एखाद्या वेळेस भांडण करून ती माहेरी आली , की लगेच आई वडिलांना ही तिचा ताण यायला लागतो . कधी कधी तर तिला तिचं मनचं खायला उठतं . तिला प्रश्न पडतो . नक्की लग्नानंतर माझ घर कोणतं ? मी ना धड इकडची राहिले ना धड तिकडची . ह्या प्रश्ना भवती ती स्थिरावते . प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात आसवांचा बांध फुटतो . आणि
उत्तरांचा रस्ताच ओलाचिंब होऊन जातो .
खरचं तिचं आयुष्य लग्नाची बेडीत अडकल्यानंतर बंधिस्त होऊन जातं .
तिचं तिलाच कळतं नाही ..
मी जन्मले कोणासाठी?
आणि जगतेय कोणासाठी ?
आयुष्य तर लग्नाच्या बेडीत बांधल्या गेलं ..
नियतीने स्वांतत्र्य माझं हिरावून घेतलं .
आसवांच्या वाटेवर आयुष्य माझं थोपवून धरलं ..
मी श्वास तरी का घेतेय ?
आणि अन्नाला तरी का स्पर्श करतेय ??
बंधिस्त बेडीत ह्या का उगी रडतेय ?
श्वास गुदमरत असतांनाही ..
ऑक्सीजन शोधतेय ..
स्त्री जन्म माझा ..
असा कसा मला त्रास दायक ठरला ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.