नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jul 21, 2022

लग्नाची बेडी ..

प्रतीलीपिने आज अगदी मनातला विषय दिला आहे .

लग्नाची बेडी जेव्हा मुलीच्या पायात बांधली जाते ना , तेव्हा खरोखर मुलीच आयुष्य बंधिस्त होऊन जातं .
तिने माहेरच्यांसाठी  जगावं की सासरच्यांसाठी जगावं हा तिच्या  पुढील सर्वात मोठा प्रश्न असतो . जन्मापासून ते लग्नाची बेडी पायात बांधे पर्यंत आई वडिलांनी तिला तळहातारील फोडाप्रमाणे जपलेलं असतं .

माहेर तिला दुरावल ते घर म्हणजे परक्याच घर . हे  मानन तिला सहज शक्य होतंच नाही ...आणि सासरी तिला तिचं पुढील संपूर्ण आयुष्य काढायचं असतं . त्यामुळे त्याला परक घर समजण्यात काही पॉइंट नव्हता .



असं असूनही सासरी तिला सतत परकेपणा जाणवतो .


आई वडिलांकडे कसं .. मनाची राणी ..जे वाट्टेल ते करायचं . एक भाजी आवडली नाही की , लगेच दुसरी भाजी बनवायची . कोणी बोलेल ही फिकिरच नव्हती.  आणि सासरी अस नाही होतं . एखादी भाजी जरी आवडली नाही तरी , मनमारून खावीच लागते . मग पोट भरो ना भरो ताटात पडेल ते खावचं लागतं ..


एखाद्या वेळेस भांडण करून ती माहेरी आली , की लगेच आई वडिलांना ही तिचा ताण यायला लागतो . कधी कधी तर तिला तिचं मनचं खायला उठतं . तिला प्रश्न पडतो . नक्की लग्नानंतर माझ घर कोणतं ? मी ना धड इकडची राहिले ना धड तिकडची .   ह्या प्रश्ना भवती ती स्थिरावते . प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात आसवांचा बांध फुटतो . आणि


उत्तरांचा रस्ताच ओलाचिंब होऊन जातो .


खरचं तिचं आयुष्य लग्नाची बेडीत अडकल्यानंतर बंधिस्त होऊन जातं .


तिचं तिलाच कळतं नाही ..


मी जन्मले कोणासाठी?


आणि जगतेय कोणासाठी ?


आयुष्य तर लग्नाच्या बेडीत बांधल्या गेलं ..


नियतीने स्वांतत्र्य माझं हिरावून घेतलं .


आसवांच्या वाटेवर आयुष्य माझं थोपवून धरलं ..


मी श्वास तरी का घेतेय ?


आणि अन्नाला तरी का स्पर्श करतेय ??


बंधिस्त बेडीत ह्या का उगी रडतेय ?


श्वास गुदमरत असतांनाही ..


ऑक्सीजन शोधतेय ..


स्त्री जन्म माझा ..
असा कसा मला त्रास दायक ठरला ..
दुर्गा मते

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...