मनातील डायरीचे पान विषय अंतर्गत ..
थोडस मनातल बोलूया सखी ..मनातील एखादी करायची राहून गेलेली गोष्ट मनाला खूप चटका लावून जाते .
" किती बरं झालं असतं ना , मी ज्या वेळी जी गोष्ट करायची मला संधी मिळाली होती . ती गोष्ट त्याचवेळी केली असती तर , मनात आज ही रुख रुख राहिली नसती .
एवढं सुंदर आयुष्य जगलो आपण पण जगताना एक क्षण जगायचा राहूनच गेला .. जो मला भर भरून जगायचा होता . पण ; समाजाचा विचार करत सामाजिक बंधने स्वतःवर लाधून जिथे मला मोकळा श्वास घ्यायचा होता . तिथेच मी स्तब्ध झाले ..आणि स्वतः चाचं आनंद मिळवण्यास कुठेतरी कमी पडले ..
ही सल माझ्या मनात कायम स्वरुपी टिकून राहील . पण त्याच बरोबर एक समजूत मी मनाची घातलीय . ह्यानंतरचं माझ जे ही काही आयुष्य उरलंय ते मात्र मी भरभरून जगणार ..समाजाने जी जोखंड माझ्या सभोवताली बांधली आहेत ना , ती मात्र मी तोडून टाकणार .
.आयुष्य माझं मनासारखंचं जगणार ..नंतर मनातलं थोडस बोलण्यासाठी कोणतीच पोकळी निर्माण होऊ ही देणार नाही . आणि मनात काही ठेवणारं ही नाही .
दुर्गा मते
खूप छान ...✍️👍👌🍫
ReplyDelete