लिहायला सुरुवात केली ...
आयुष्यातील दुःख सरली ..
स्वतःचीच एक ओळख निर्माण झाली ..
भेट झाली माझी ..
माझ्यातीलचं कवयित्रीशी ..
आयडीया आली.
स्वतःशी संवाद साधन्याची ..
खळखळून हसायला शिकले ..
मनभरून रडायला शिकले ..
स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यास सज्ज झाले ..
प्रेमाची परिभाषा कशी कळली ...
माझी मलाच नाही समजली ..
माझी प्रीत कधी बहरली ..
प्रीतीनेच त्या विरहाची वाट कशी पत्करली ..
आज ही नाही समजली ...
प्रेमाची परिभाषा कशी उमगली ..
स्वतःशीच एक ओळख निर्माण झाली ..
जेव्हा मी कवयित्री म्हणून लिहायला लागली ..
अनुभवांची शिदोरी सोबतीला आली ..
माझ्यातील कवयित्री खऱ्या अर्थाने कवयित्री झाली .
दुर्गा मते
खूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteछानच लेख... !
ReplyDelete🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏