आपण पूर्ण पने जेव्हा कोरा करकरीत कागद असतो . तेव्हा सुरुवात केलेली असते. मग त्या कागदावर किती तरी गोष्टी लिहून , रुजवून त्याला सजवलेलं असतं .
तो कागद फाडून परत तेवढाच सजवन खरच सोप असतं का ?
ह्याचं उत्तर नक्कीच नाही मिळेल . कारण खरच खूपच अवघड आहे . एक करकरीत कागद नव्याने शब्दांनी सजवन .
तसचं असतं आपल्या नावाचं . आपण खूप कष्ट करून आपलं नाव कमावलेलं असतं . त्या नावावर कोणी एकदा शक घेतला ना . त्यावर शक घेणाऱ्या हजारो नजरा असतात . त्या आपण रोखू नाही शकत .
आपण चूकीचो आहोत की नाही . हे फक्त आपल्याला माहीत असतं. पण समाजाचं काय ? त्यांच्या समोर तर आपण चुकीचोचं होऊन बसतो. चूक नसताना .
त्यामुळें जिथे आपल्याला चुकीचं ठरवल्या गेलं. तिथून लगेच बाजूला व्हायचं . कारण आपण चुकीचं आहोत की बरोबर ह्याच्याशी जगाला घेणं देणं नसत. त्यांना तर फक्त
आपल्या नावावर उडालेल्या शींतोड्या शी घेणं देणं असतं . आपल्याकडून ह्याच्या नावावर कसा शिंतोडा उडेल ह्याच्याशी .
त्यामुळे वेळीच बाजूला व्हायचं आणि एक नवीन सुरुवात करायची . कारण आपण खरे आहोत हे लोकांना समजावून सांगण्यात काहीचं पॉइंट नसतो . कारण लोक
ते कधी स्वीकारतील असं मला वाटतं नाही .
अनुभवाच्या पुस्तकातून ...
No comments:
Post a Comment
Comments plz.