नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 30, 2021

एक अनुभव ...

आपण इथे कुठल्याही विषयावर लिहू शकतो ना इथे आपल्याला पूर्ण लिखाणाचं स्वंतत्र आहे . मग का कोण्या वाचकाने आपल्याला धमक्या द्याव्या की मी तुम्हाला कोर्टात घेईन वैगरे.  काय अधिकार आहे एका वाचकाला लेखनाच्या लिखाणावर आरोप करण्याचा . 
त्याच खरच लिखाण चुकीचं असेल तर , खुशाल आरोप करा . तो ते स्विकारतो ही पण त्याच लिखाण चुकीचं नसेल तर का त्याने मान्य करावं . का नमत घ्यावं . 

    माझ्या अनुभवावरून हा लेख लिहितेय . मी 13 डिसेंबर ला एक पोस्ट शेअर केली होती.  त्याचा त्रास ती लोक मला आज पर्यंत मला देताय....

हे योग्य आहे का ? किती दिवस किती रात्र उलटून गेल्या . तरीही ते त्याचं प्रश्नांवर अडून का राहिले . माझी तर कुठेच काहीच चूक नाही .

त्याच्या साठी स्वारी पण बोलले पण त्याने ही त्याच समाधान झाल नाही . अजुन काय करायला हवं मी चूक नसताना स्वारी बोलले . मग अजुन काय करू .

मुळात लेखकाने कोणत्या विषयावर लिखाण करायचं. हा ज्या त्या लेखकाचा प्रश्न. आहे . कुठल्याच वाचक नाही सांगू शकत लेखकाला तुम्ही विषयावर लिखाण करू नका .

वाचाय च असेल तर वाचा , नाही तर सोडून द्या.  तो तुम्हाला विनंती नाही करत  माझ लिखाण वाचा म्हणून .

आणि सर्वात जास्त वाईट तर ह्या गोष्टीचं वाटतंय त्यातील एक माझा खूप जवळचा मित्र होता . आणि एक स्त्री असून एका स्त्री च्या विरोधात कशी काय बोलू शकते . 
तिची काहीही चूक नसताना ...

कोड च आहे सार ....

मला हे सगळं नवीन आहे . कधी कोणाशी दुष्मनी नाही केली . जो माझ्याशी जसा वागला . मी ही त्याच्याशी तशीच वागले . 

जेव्हा मनासारखी वागले तेव्हा हवी हवी वाटले , आणि आता नकोशी ही कुठली पद्धत आहे वागण्याची...
खरच लोकांची मानसिकता खूपच बदलते ....

कलियुग आहे कोणाच्या ग्रह कधी फिरतील सांगता येत नाही . 

सांगायचं एवढंच आपल्याला अधिकार नाही हे . कुठल्याच लेखकाला त्यांच्या लिखाणाचा विषय बदल म्हणून सांगण्याचा ......

वाचक असाल वाचायचं असेल तर वाचा नाहीतर सोडून द्या.  पण निदान त्यांच्या लिखाणावर टीका तरी करू नका ... 


1 comment:

  1. बरोबर आहे तुझं....
    कुठल्याही लेखकावर विषयाचं बंधन नसतं.
    कुठल्याही लेखकाला विषयाचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे..
    पण समाजाला लागलेली किड फक्त चुका काढण्यात व्यस्त आहे..

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...