दखल त्यांची घेता येईना ,
आसवे वाऱ्यावर पडली ,
जिवांपणीच चीता मनाची पेटली ,
ती विझवायला ही कोणी येईना ....
हुंदके उरात दाटले ,
सभोवतालचे माणसेही बेईमान झाले ,
वाऱ्यावर पडलेली आसवे ही कोणी झेलेना ,
हुंदक्यांचा आवाज ही कोणी ऐकेना ,
पेटलेल्या मनाची चीता काही केल्या विझेना ...
तलाव नयनांचे आटले ,
मी एकांताचे शिखर गाठले ,
मनाची पेटलेली चीता मी विझवू शकत नाही ,
पण ती चीता विझवण्याचा अधिकार सोडणार नाही ..
ही केवळ एक काल्पनिक रचना आहे . मी जर कधी चुकून रडले ना तर माझे बाबा माझ्या चेहऱ्यावर हसू येईपर्यंत मला विचारतात काय झालं का रडतेस .
आणि एकांतात मी राहूच शकत नाही . कारण माझ्या घरी एवढी चिल्लर पार्टी असते त्यांच्यात मी पण मिसळून जाते . एकटी राहण्याची मला सवयच नाही ..
जिथे जाईल तिथे त्यांची होईल ओळख पाळख काही लागत नाही मला त्यामुळेच सर्वांना आवडते ..
अतिशय सुंदर..👌👌👌👌💐💐💐💐
ReplyDelete