नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 18, 2021

प्रेम बंधन भाग 16

मागच्या भागात आपण पाहिले शेखर आणि नित्या कोल्हापूर ला देव दर्शनासाठी गेलेले असताना ....
जे गेल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी शेखरला फोन आला त्याच्या पोलिस स्टेशन मधून आणि त्याला ही लगेच परतावं लागणार होतं . कारण तो आय.पी.एस होता . त्याच्यावर खूप मोठी responsibiliti होती ...

शेखरला ज्या दिवशी फोन आला होता , त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते औरंगाबादच्या दिशेने प्रवास करू लागतात . स्वतःची फॉर व्हीलर असल्यामुळे फार काही प्रेशर नव्हत . पण प्रवास खूप लांबचा असल्यामुळे 9 ते 10 तास लागतील हे विधिलिखित होतं . 

त्यांचा तो प्रवास दहा तासाचा होता ..नवीन कपल असल्यामुळे तो  प्रवास रोमँटिक आणि सुखकर असेल हे काही सांगायला नको . प्रवासाचा वेळ तर खूपच छान गेला . 
गप्पा टप्पा ह्यात त्यांनी कोल्हापूर हून कधी औरंगाबाद गाठल कळलंचं नाही ......

गाडीचा आवाज ऐकताच कोणीतरी आल्याची भनक रंगू मावशीला लागली ...रंगू मावशी शेखरच्या आई ..लहान पणापासून शेखरच्या मावशीची मुल शेखरच्या घरी राहायचे . ते त्यांना मावशी मावशी म्हणायचे . त्यामुळे शेखर आणि शेखरच्या बहिणीही मावशीचं म्हणायचे . 

गाडीचा आवाज ऐकताच रंगू मावशी ओवळणीच ताट घेऊन दारात उभ्या राहिल्या . दूरवरून प्रवास करून आलेल्या पाखरांची भाकर तुकडा ओवाळून दृष्ट काढू लागल्या .... " माझ्या लेकरांच्या सुखी संसाराला कोणाचीही दृष्ट न लागो अस म्हणत त्या नवजात जोडप्यांच स्वागत करू लागल्या . "

दोघांनीही घरातल्या देवांचे आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले . चहा पाणी झाल्यानंतर शेखर लगेच पोलीस स्टेशन मध्ये गेला . असा अचानक एवढ्या उशिरा आणि ते ही एवढ्या दूरवरचा प्रवास करून आल्यानंतर हा  असा पोलीस स्टेशन मध्ये का गेला ?
हा प्रश्न मावशीच्या मनात सतत येत होता . ह्याचं निराकरण व्हावं म्हणून त्यांनी नित्या ला आपल्या रूम मध्ये बोलावून घेतलं ... जसा निरोप नित्याला मिळाला की , मावशीने आपल्याला बोलावलं आहे . तशी नित्या मावशीकडे गेली ...
 " मावशी आत मध्ये येऊ का ? " परवानगी मागत दरवाजात चं  उभी राहिली ....

मावशी जागच उठून तिच्यापाशी येऊन तिचा हात आपल्या हातात घेऊन ....

" अगं बाळा , अशी बाहेर का ग उभी राहिली . ये , ना आतमध्ये ये .." 

त्या दोघेही रूम मध्ये आल्या आईनी , "प्रवास वैगरे कसा झाला ? प्रवासात काही त्रास तर नाही झाला ना ? " 
असे अनेक प्रश्न विचारून नीत्याला बोर केलं होतं . 
ती आधीच एवढ्या दूरवरच्या प्रवासामुळे बोर झाली होती . त्यात हे मावशीचे प्रश्न म्हणजे .. आगीवर मीठ चोलण्यासारख झालं होतं . तिचा जीव अगदी नकोसा झाला होता . पण तिला त्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागली . तिच्या चेहऱ्यावर आठ्या पडलेल्या पाहून मावशीला समजलं होतं . ही फारच बोर झाली . मग लगेच ह्यांनी विषयाला हात घातला ..

" नित्या , हा लगेच असा पोलीस स्टेशन मध्ये का गेला ? 
 नाही म्हणजे , एवढ्या दूरवरचा प्रवास .. तुझी इथे मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची ईशा नाही . आणि तो लगेच पोलीस स्टेशन मध्ये गेला ? "

" हा हा ..आई ते डी.एस.पी साहेबांचा फोन आला होता .
म्हणून ताबडतोब आम्हाला यावं लागलं. नाहीतर अजुन
दोन दिवस राहण्याची प्लॅनिंग होती .." 

" Hmm " मावशी असं बोलल्या आणि लगेच शेखर ..
नित्या  , मावशी ...सरू ताई 
सरूताई त्यांची खूप जुनी कुक खरं सांगायचं तर , मोलकरीणचं .पण त्यांनी कधीच तिला मोलकरीण मानलं नाही . ते तिला ताईचं म्हणून हाक मारायचे . 
असा आवाज देतच तो घरा मध्ये एंट्री करतो . 

" अरे  !! काय ?? " 
गप बस असं आपल्या हाताने खुणावत मावशी त्याला शांत बसायला सांगत होत्या . मग तो ही लाजत काजत का होईना , शांत बसतो . पण त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद पसरलेला होता . की त्याला शब्दात ही व्यक्त होता येतं नव्हत ..पण त्याने सांगी तलचं ...
" आई मला प्रमोशन मिळाल . " तो सांगता नाही भारावून गेला होता . 
प्रमोशन म्हंटल्यावर मावशी गोंधळलेल्या , " प्रमोशन म्हणजे , ट्रान्स्फर होणार ..." असं त्या पुट पुटल्या ..

" हो तीन वर्षासाठी " अस शेखरने उत्तर दिलं . " पण 
मावशी तू अजिबात काळजी करू नकोस . मी वेळोवेळी पैसे पाठवत जाईल . आणि माझ्यासोबत नित्या राहीलच त्यामुळे माझीही खाण्या पिण्याची आबाळ होणार नाही."
हे तो फार आनंदाने मावशीला सांगत होता . 
त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मावशी ही सुखावून गेल्या होत्या . पण मनातून त्यांना बिलकुल वाटतं नव्हत.
की शेखरन आपल्याला सोडून पुण्यात राहायला जावं .
पण त्याने आय. पी.एस होण्यासाठी घेतलेली मेहनत मावशीने उघड्या डोळ्यांनी पाहिलेली होती . त्यामुळे त्या शेखरला जाण्यापासून कधीच थांबवु शकणार नव्हत्या . 

" ओके बाळा , कधी जावं लागणार आहे पुण्याला .."

हातातील प्रमोशन लेटर मावशीला दाखवत , " हे बघ मावशी उद्या गेलो तरी ही काही प्रोब्लेम नाही . पण आम्ही दोन दिवसांनी जातो . तोपर्यंत नित्या ही तिच्या फॅमिली ला भेटून येईल . आणि मी ही काही माझी राहिलेली महत्वाची काम पूर्ण करून घेईल . "

" ओके बाळा ..तुला जे योग्य वाटतं ते तू कर . मी तुला कधीच अडवल नाही आणि ह्यानंतर ही कधी अडवणार नाही . ते बघ रात्रीचे बारा वाजले . एवढ्या दूरवरच्या प्रवासाने थकला असशील ना . जा आता जाऊन झोप . उद्या बोलू आपण . " 

" ओके मावशी good night " असं म्हणत ते दोघेही आपल्या रूम मध्ये गेले . तो एवढा खुश झाला होता की,
काय करू आणि काय नको करू . असं त्याला झालं होतं . ते रूम मध्ये गेल्यानंतर पहिले दरवाजा लावून घेतो.  आणि आनंदाच्या भरात नित्या ला एक मीठी मारतो , त्याची ती मिठी त्याला खूपच uncomfrtable वाटते . त्याने तिला स्वीकारलं असलं तरी , अजुनही ती त्याला आपलं सर्वस्व देण्यासाठी वेळ मागत होती. हे शेखरच्या लक्षात आल्याबरोबर तो तिला स्वारी बोलतो आणि झोपायला जातो . 
" इट्स ओके " म्हणून ती त्याला प्रत्युत्तर देते . दुसऱ्या दिवशी त्याला प्रमोशन मिळाल्याची बातमी नित्याच्या महेराच्यांस समजते . सगळेच खुश होतात .  ती एक दिवस माहेरी राहते . आणि दुसऱ्याचं दिवशी bags वगैरे भरण्यासाठी लगेच सासरी येते . माहेर आणि सासर फार फार तर एक किलोमीटर  अंतर असेल , त्यामुळे ती लगेच सासरी गेली . 
पुण्याला जाण्याची पूर्ण तयारी केली.  थोडीफार शॉपिंग करायची होती , ती शॉपिंग पण करून घेतली . 
दुसऱ्या दिवशी ते पुण्याला जाणार होते . लेक एवढ्या दूर जाणार म्हणून मावशीचे डोळे पाणावले होते . त्यांना खूप भरून आलं होतं . त्या कितीतरी वेळ रूम मधून बाहेर आल्याचं नाही . त्या बाहेर येत नाही म्हंटल्यावर शेखर आणि नित्या चं रूम मध्ये जाऊन मावशीचा निरोप घेऊ लागले . 
मावशीने पाणावलेल्या डोळ्यांनी च शेखर आणि नित्या ला निरोप दिला . ते जाणार म्हणून नित्या ची माहेरची मंडळी ही त्यांना निरोप देण्यासाठी आली होती . त्यांनी सर्वांचे आशीर्वाद घेऊन त्याच्या नवीन आयुष्याचा नवीन प्रवास सुरू केला ... 
 
बघुया लवकरच त्यांचा पुणे प्रवास तो पर्यंत वाचत रहा ..प्रेम बंधन ..

क्रमशः ...

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...