जसा सायंकाळचा सुर्य नाही थांबत अस्ताचा ...
इवलस बीज रुजवलं होतं , दोन स्पंदनात ,
रोपट झालेलं झाड , आज कोलमडून पडलं एका क्षणात
ना गेला होता तडा हृदयाला , ना मनाला ,
तरीही का थांबवावस वाटलं ह्या क्षणाला ..
भीती भविष्याच्या रम्य पहाटेची ,
तिनेच गोडी संपवून टाकली ह्या गोड नात्याची ...
मनात असलेली स्वप्न भावना शून्य झाली ,
एकमेकांना विसरून जाण्याची पाळी त्यांच्यावर आली .
एकमेकांपासून दूर जाणं एवढं सोपं असतं का ?
ज्याची सवय झाली , त्याला नजर अंदाज करण शक्य असत का ?
खरच सलाम करायला हवा त्या दोघांना ,
ज्यांनी आपल सर्वस्व समर्पित केल होत एकमेकांना ..
अप्रतीम रचना...👌👍💐🍫
ReplyDelete