खूप दिवसांपासून मनात होतं ह्या विषयावर लिखाण करायचं . सो फायनली हा विषय हातात घेतला . तुम्हाला माझे विचार आवडतील की नाही माहीत नाही . पण मी मात्र लिहिणार आणि माझ्या विचारांना चालना देणार ....
गुंतन ...
एकाध्यामध्ये गूंतन खूप जीवघेणं असतं . खरच आहे ते ...
पण नात्याची ही एक कमिटमेंट असते .
कोणामध्ये किती गुंतायच हे आपल्याच हातात असतं . हो हे आपल्याच हातात असतं . एकाद्यामध्ये गुंतू नये म्हणून त्याच्यापासून दूर पळन हे काही मला पटण्यासारखं नाही .
अनेकदा दोघांचं कनेक्शन खूप छान असतं . पण कोणातरी एकाला वाटतं इथे विनाकारण गुंतून फायदा नाही . उगाच कशाला कोणा मध्ये गुंतायचं असं विचार करत , तो त्या व्यक्तिपासून दूर दूर पळू लागतो .
दोघांचं भल होईल ह्या उद्देशाने जरी तो दूर दूर पळत असला , तरी तो एक विसरून जातो .
आपण दूर दूर पळतोय ह्याचा समोरच्या व्यक्तीवर चुकीचा परिणामही होऊ शकतो . समोरच्याला वाईट ही वाटू शकत . एक क्षण असं ही वाटू शकत आपणच नातं निभवायला कुठेतरी कमी पडत आहोत . त्यामुळेच हा आपल्यापासून दूर दूर पळत आहे.
दूर पळणाऱ्याने एकदा तरी , समोरच्या व्यक्तीचा विचार करायला हवा . त्याच्या भावनांची कदर करायला हवी .
एकदा त्याचं मन समजून घ्यायला हवं . नाहीतर स्पष्टपणे सांगून टाकायला हव . मी तुझ्यात गुंतत चाललो आहे , आणि काहीही झालं तरी , मला कोनातही गुंतायच नाही . त्यामुळे आपल्या नात्याची एक कमिटमेंट हवी . असं त्या व्यक्तीला सांगायला हवं . कधाचीत समोरचा व्यक्ती आपल्याला समजून घेऊन प्रायवसी देईन .
आपल्यापासून आपणहून दूर ही होईल . दूर होणं शक्य नसलं तरी अशक्य नाही . फक्त जराशी आपणही हिम्मत करायला हवी .
एकमेकांपासून दूर होण्यापेक्षा नात्याला पर्सनल स्पेस देणं केव्हाही चांगलं . दूर होऊन यातनेत जळण्यापेक्षा एकमेकांसोबत आनंदाने जगणं केव्हाही चांगलं . आपण गुंतू ह्या भीतीने दूर पळण कधीचं योग्य ठरणार नाही . कारण आपण गुंततो त्याचं व्यक्तीत जी व्यक्ती आपल्याला सर्वात जास्त आवडते . आणि आपण आपल्या आवडत्या व्यक्तीपासूनच दूर पळलो तर , मोकळा श्वास घेऊ शकतो का ? आनंदाने जगू शकेल का ? त्या व्यक्तीचा विचार करण खरचं बंद होईल का ? दूर पळल्याने ती व्यक्ती मनातून कायमची दूर होऊ शकेल का ?
अर्थात नाही ...मग कशासाठी दूर पळायचं .... एकमेकांसोबत राहून ते नातं नव्याने फुलू द्यायचं ...
चुकीस क्षमस्व :
अतिशय सुंदर विचार मांडले,👌👌👌 सुंदर लेख.
ReplyDelete