वंदन माझे सरस्वती मातेला ,
ज्ञानदेवतेला ...
ह्या पाखरांना तिने कुशीत घेतले ,
ज्ञानाचे दिप ओंजळीत टाकले ...
किलबिलत्या मनाला आकार दिला ,
ज्ञानाचा झरा इथे ओसंडू लागला ,
सकाळ सकाळी रविकिरणाला ही अभिमान वाटला ,
ज्ञानदीप त्याच्या नयनात दाटला ...
वृक्ष वेली पशू पाखरे ,
घेर घालू लागले ज्ञान दिपाला ,
आशिष देऊ लागले ,
ज्ञान दिपात शिकत असलेल्या प्रत्येक पाखराला
अभिमानाप्रती माया साठली ,
ज्ञानदीपातील पाखरांसाठी ,
कोकिळा ही गाऊ लागली ...
आनंदाची जीवन गाणी ...
सकाळ सकाळी ज्ञानदीप उजळून निघत . पाखरांचा किलबिलाट , पशू पक्षांचा थवा , फुलांचा मनमोहक सुगंध, वाऱ्याची अलगद येणारी झुळूक आणि त्यात मनाला प्रसन्न करणारी हवा .
दिवाळीचा सण तोंडावर आला होता . मुलांना परीक्षेची ओढ लागली होती . कधी एकदा परीक्षा संपते आणि दिवाळीची सुट्टी मिळते . असं झालं होतं . रोज मिळणारा अभ्यास त्यांना समाधान द्यायचा . ज्ञानदीप आणि ज्ञानदिपातील पाखरं ह्यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध खूप छान जुळले होते .
ज्ञानदीप मुलांचा जीव की प्राण होता . ज्ञानदीप मुलांच भवितव्य उज्वल करण्यास मदत करत होता . मुलांना अप्रत्यक्षरित्या सक्षम करत होता ....
ज्ञानदिपाचे खूप उपकार होते मुलांवर आणि मुलांचे ही ज्ञानदिपावर .... त्यांच्यातील boinding खूपच छान होत .
पण अचानक त्यांच्या नात्याला त्या ज्ञानदिपाला दृष्ट लागते . ते ज्ञानदीप बिल्डर्सच्या डोळ्यावर येतं . ज्ञानदिपाच्या ठिकाणी मोठा मॉल आणि मार्केट बनवायचं असे ते ठरवतात . आणि त्या अनुषंगाने अथक प्रयत्न करत राहतात . ज्ञानदिपावर मुलांचा जडलेला जीव त्या बिल्डर्सच्या अथक प्रयत्नांना मोडून काढत होते .
वारंवार येणाऱ्या अपयशाने बिल्डर्स हताश झाले होते . शेवटी ते एक खूप मोठा आणि हृदय हिन निर्णय घेतात . जो ज्ञानदिपातील पाखरांना कायमचे उडवून लावतात .
ज्ञानदिपामध्ये लास्ट इअरच्या मुलांसाठी निरोप समारोपाचे आयोजन केलेले होते . त्या आयोजनासाठी त्या बिल्डर्स ना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावन्यात आले होते . त्यांनी खूप खूप मोठं मोठी भाषणे ठोकली ज्ञानदिपासाठी आम्ही आमचं सर्वस्व त्यागु वैगरे आणि इकडे सर्वजण गुंग असतानाच तिकडे जे अन्न आज त्या कीलबिलनाऱ्या पाखरांच्या मुखात जाणार होते . त्या चाऱ्यात विषाचे दंश सोडले होते . ज्ञान दिपातील पाखरे आजपासून ज्ञान दिपाला कायमचे पोरके होणार होते .
त्या बिल्डर्स चे भाषण वैगरे झाले ते बिल्डर्स आणि त्यांचे सहकारी ताबडतोब तिथून निघून गेले . त्या मुलांनी आवडीने जेवण वैगरे केले . घरी निघायला लागले ज्ञानदिपाच्या गेट पर्यंत जाईपर्यंत च प्रत्येक जण जमिनीवर कोसळू लागला . तर कोणाला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या . आणि ज्ञान दिपातील सर्वच पाखरांचा किलबिलाट कायमचा बंद झाला.
ज्ञानदीपाचा परिसर ओसाड झाला ..
अशा प्रकारे ज्ञान दिपातील पाखर हरवून गेली झाला . .
ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे ..
कोणत्याही घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा .
खुप भावस्पर्शी, विचार करण्यास भाग पाडणारी ह्रदयस्पर्शी कथा...आजकाल माणुस माणुसकी विसरुन आपला स्वार्थ साधण्यासाठी काहीही करु शकतो..हे आपण खुप छान प्रकारे कथेतुन स्प्ष्ट केल आहे...सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिम अतिशय सुंदर कथा भावस्पर्शी
ReplyDeleteअतिशय भावस्पर्शी कथा👌👌
ReplyDelete