ते वेळेवर घडायला हवं होतं ,
दिरंगाईने का होईना , कळायला हवं होतं ..
तुझ्याबद्दल माझ्या मनात वेगळचं महत्व होतं ,
तुझ्यातच माझं अस्तित्व दडलं होतं ..
प्रेम म्हणजे काय असतं ? माहीत नव्हतं ,
तुझ्या येण्याने ते अनुभवता आलं ,
तुझ्यावर प्रेम केलं ह्याचा आनंद होता ,
तू आयुष्यात कधी असू शकत नाही ,
हा तर सत्यभास होता ,
तरीही मला हवा हवासा होता ,
तुझा सहवास जगण्यास प्रेरणा देते होता ,
माझ्या अस्तित्वात पूर्णत्व आणत होता ...
तू ही प्रेम केलंस होतं ,
तुझ्या हातावर माझं नावं कोरलचं होतं ,
वेळेवरचं कळायला हवं होतं ,
तुला माझ मला तुझ प्रेम कधीचं मिळणार नव्हतं ,
आपल्या प्रेमाआड जातीच अस्तित्व येतं होतं ..
अप्रतिम रचना दुर्गा
ReplyDelete