नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 29, 2021

समलिंगी संबंध पाप नाही

आजचा माझा विषय आहे समलिंगी संबंध पाप नाही . आज जरा वेगळा विषय हाताळते , चुकून गैरसमज करून घेऊ नका की मला atracation आहे की काय एखाद्या मुलीबद्दल तर , असं काही नाही . मला सामाजिक विषय हाताळायला आवडतात म्हणून लिहितेय .

आज जग  पुढे गेलं असलं तरी काही , रुढी परंपरा अजुनही भूरसटलेल्या विचारांच्या आहे . प्रेम प्रकरण , जातीबाह्य विवाह करणारे लोक ह्यांना समाजात योग्य तो मान - सन्मान नाही मिळत . वेळप्रसंगी वाळीत टाकण्यात येत . ह्या रुढीबरोबरचं जोडण्यात आलेली आहे अजुन एक समलिंगी संबंधांची रुढी .....!!!!!

समलिंगी संबंध असलेल्या मुला मुलींना खूप तूच्श मानलं जातं . समलिंगी संबंध असणाऱ्या लोकांना एवढी भीती असते . की त्यांना त्यांचं नातं समाजापासून लपवून ठेवाव
लागतं . ते उगडिक आलं तर भयानक शिक्षा नां सामोरे जावं लागतं  .  " असं  का ?"
"  समलिंगी संबंध हे काही पाप आहे का ? ती काही चूक आहे का ? "

             ती चूक असेल तर मग ती त्यांच्या जन्मतःच झालेली आहे . ( हा पॉईंट मी धर्म आणि हिंसा ह्या पुस्तकातून घेतला आहे )
हो ती त्यांच्या जन्मतःच झालेली आहे .
       जन्मा ला येताना आपल्या लैंगिक प्रेरणा कशा असाव्यात हे ठरवणं माणसाच्या हातात नसतं . अशा वेळी बहुंताश माणसांच्या लैंगिक प्रेरणा ह्या भिन्नलिंगी आकर्षनाच्या असतात .  त्याचं बरोबर तुरळक लोकांच्या प्रेरणा समलिंगी आकर्षण च्या असतात . म्हणून त्या चूक हे ठरवण्याचा अधिकार कोणालाच असता नये . पण जे सर्वसामान्य नाही ते विकृत , अनैसरगिक , ईश्र्वर अमान्य , कारण ईश्र्वरान स्त्री निर्माण केली तिचं मुळी पुरुषांच्या सुखासाठी आणि प्रजोत्पसाठी अशा धारणा माणसाच्या मनात धर्मग्रथानी पक्क्या करून टाकल्या आणि त्याविरुद्ध जनाऱ्याला शिक्षाही निश्चित केली .
         शिक्षा अश्याच गुन्हयाला केली जाते . तो समजून ऊमजून केला जातो , ज्यांन दुसऱ्याच्या जीवित - वित्ताची हानी होते अथवा शारीरिक - मानसिक छळणुक केली जाते . पण एकतर समलिंगी संबंध ठेवणारी माणसं ही अन्य कोणाचीच कसलीच हानी करत नाही . आणि दुसरं म्हणजे समलिंगी संबंधांच आकर्षण ही जर चूक असेल , तो जर बिघाड असेल तर तो त्यांच्या जन्मतःच झालेला असतो .
           ज्या बिघाडामुळे अशी माणस ज्याला आपण सर्वसामान्य आयुष्य म्हणतो , तसं आयुष्य जगू शकत नाही . त्यांना त्यांच्या लैगिंक सुखासाठी वेगळ्या वाटा शोधव्या लागतात . आणि मुख्य म्हणजे ही त्यांची हौस नसते , हे त्यांना वाटणारं वैविध्यच आकर्षण नसतं , तर तो त्यांचा नाईलाज असतो .

मग त्यांचा नाईलाज आपण चूक कसा म्हणू शकतो . समलिंगी संबंध हे पाप नाही . ती त्यांची हौस नाही . मग तरीही का समाज त्यांना स्वीकारत नाही . का त्यांना आपले संबंध समाजापासून लपवून ठेवावें लागतात .
का मनामारुंन  आयुष्य जगावं लागतं .

हा विचार बदलायला हवा त्यांना ही समाजात योग्य तो मान सन्मान मिळायला हवा . त्यांनाही ही आपलं नातं मिरवण्याचा एक मोकळा श्वास घेण्याचा अधिकार आहे . तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही .

2 comments:

  1. सखोल आणि तितकाच उत्तम लेख ।
    ☺️✌️

    ReplyDelete
  2. छान, विचार करायला लावणारा लेख ✍️👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...