नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 29, 2021

ओवाळणीची परतफेड

माधव आणि माधवी अनाथ पोर लहानपाणीच आईवडील देवाघरी गेले . पोरकेपन वाट्याला आले . माधव हा माधवी पेक्षा वयाने खूप लहान , माधवीने माधववर आईप्रमाणे प्रेम केले . त्याच्यावर कुठलही संकट येण्याआधी  तिने ते संकट झेलले  . कारण तिने शेवटच्या क्षणी आईला वचन दिलेले असते .  की मी माझ्या आधी नेहमीच माधवचा विचार करेन . त्याच्या सुख दुःखात त्याची सावली होईल .


तुझी जागा तर , नाही घेऊ शकणार पण तुझी उणीव ही नाही भासू देणार . ते वचन तिने जिवापाड जपल ही आणि पाळल ही .....


                             माधव ही तिला आईच्या  जागी  मानत  होता  . तो त्याच्या ताईलाच आपलं सर्वस्व मानत होता . आई म्हणजे काय ? माहीत नव्हत पण ; ताई म्हणजे काय ते उत्तम रित्या माहीत होत .


            ताई म्हणजे आईचचं दुसर रूप असत ,


            आयुष्याचं झाकतं माप असतं ,


            कोमल मन तिचं आयुष्य फुलवून टाकतो ,


            ताई हा शब्दच मला खूप अपरूक वाटतो ,


           


अशा सुंदर भावना ताई विषयीच्या माधवच्या मनात स्फुरलेल्या होत्या . त्याला वेळोवेळी खत पाणी घातलं होतं , ते माधवीच्या प्रेमळ स्वभावाने ,  तिच्या संस्काराने .


आई विना पोर होती ती तरी , ही खूप संस्कारी आणि स्वाभिमानी होती . आणि तिने माधवलाही तसचं घडवलं होतं .  लोकांनी जळावं आणि त्यांच्या नात्याला दृष्ट लागावी . असं त्यांचं नातं होतं .


            चाफ्याच्या फुलाला अबोलीचा गंध ,


             माधवच्या ताईला माधवचाचं सुंगध ...


असं म्हणत त्याचं नातं फुलत गेलं . ते अगदी सुंदर  आनंदाने लहानाचे मोठे झाले . माधवीचे  लग्नाचे वय उलटुन गेले होते . पण माधवची सीता शोधल्याशिवाय आपण आपला राम शोधायचा  नाही . असं माधविने पक्क ठरवलेले होते . मग ते तर , माधवला मान्यच करावे लागले . पण ते मान्य जरी करायचे होते . तरी त्याला फार काही पटतं नव्हते .


मनाची चीलबिल होतं होती , ताई आधी आपलं लग्न आई बाबा असते . तर आधी ताईचं केलं असत अन् , मग आपल घोड नाचवलं असतं .  माधव ताईला म्हणाला , " मी लग्न करेन पण लग्नाआधी माझी जी  काहअट असेल ती तुला मान्य करावीच लागेल .


" कोणती अट माधू ? तू म्हणशील ती अट मला मान्य असेल . तू फक्त बोल "


" ताई आपण दोघांनी एकाच मांडवात लग्न करायचं हिचं माझी अट "


तेवढ्यात शामराव काका आले आणि " अगदी बरोबर बोललास माधू एकाच मांडवात दोघांचं शुभ मंगल करून टाकू "


माधवी ,

" काका हे कसं शक्य आहे , किती धावपळ होईल . "


श्यामराव काका , " मी असल्यावर धावपळ कशी होईल "


ठरल्याप्रमाणे माधवी आणि माधुच एकाच मांडवात लग्न होतं . सारं सुरळीत चाललेलं  होतं . माधू आणि माधवी सुखी संसारात खुश होते .  लग्नाला दीड वर्ष झालं .


माधवीला दिवस गेले . आपण मामा होणार ह्या बातमीने माधू खूप खुश झाला . ती ही खूप खुश होती . पण त्या आनंदावर विरजण हे पडलं .


माधवीच्या नवऱ्याला बिजनेस मध्ये खूप मोठा फटका बसला . खूप कर्ज झाल . कर्ज फेडण्यासाठी स्वतः च राहत घर विकाव लागलं . ते रस्त्यावर आले . ही बातमी माधूला कळताच तो रस्त्यावर आलेल्या आपल्या ताईला आणि भाऊजीला मायेचा आदर देतो . तो त्यांना आपल्या घरी राहण्याचा आग्रह करतो . माधवी खूप स्वाभिमानी माहेरी जायला राजीच होईना . हे माधु च्या लक्षात येताच तो म्हणतो ,  " अगं वेडा बाई मी तुला आणि माझ्या साल्याला भाऊ बिजेसाठी न्यायला आलो . उद्या दिवाळी आणि परवा भाऊ बीज मला ओवळणार नाही का ह्यवर्षी


माधवी , " अरे माधू मी विसरले उद्या दिवाळी नाही का ?


भाऊ बिजेसाठी मी येते . पण भाऊ बीजेनंतर राहण्याचा आग्रह करायचा नाही . "


" मी का करू राहण्याचा आग्रह उगाच माझ्या घराला ओझ ... "  माधव लटक्या रागात ...


" हो का बरं चल आता जाऊ ह्या .... " माधवी


माहेरी गेल्यानंतर चार दिवस तिला सुखाचे क्षण उपभोगता येतात . ओवळणीच्या दिवशी ती आपल्या भावाला ओवाळते . तिचा भाऊ ओवळणीत तिला नव्या घराची किल्ली देतो . ती बघून ती आश्चर्यचकित होते .


ती माधूला विचारते ,


" काय माधू हे ?  कशाची किल्ली आहे . ?"


" ती तुझी ओवाळणी आहे . तुझ्या नवीन हक्काच्या घराची किल्ली . "


" अरे पण कशासाठी नको अरे " ती खूप परावलंबी असल्यासारखी भाऊक होते .


तेवढ्यात माधु म्हणतो , " ताई लहानपणापासून तूच शिकवलं ना ओवाळणी कधीही   परत  करायची नसते म्हणून ,  मग आज तूच ओवाळणी अशी परत करतेस . भावाची माया एका क्षणात झटकली . "


" नाही रे  वेड्या असं काही नाही . माधू मी  ही भाऊबीज आणि  ही ओवाळणी  कधीच नाही विसरणार ह्याला जिवापाड जपणार . खूप खूप आभारी आहे तुझी" असं  बोलत असतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात . माधु तिला त्यांच्या मायेची ऊब देतो . आणि दोघेही मन मोकळ रडतात आणि आई वडीलांच्या फोटो समोर हात जोडून नमस्कार करतात .


दुसऱ्या दिवशी माधवी आपल्या नवीन घरी जाण्याची तयारी करत असते . ती गाडीत बसणार तेवढ्यात माधुची बायको नीलिमा हिला अचानक चक्कर येते आणि ती खाली कोसळते . तेवढ्यात तिला सावरायला माधवी येते .
आणि लगेच डॉक्टरांना कॉल करते . 


थोड्याच

वेळात. डॉक्टर येतात  तिला चेक करतात . तेव्हा खूप वाईट बातमी ऐकायला मिळते . की निलिमा केव्हाही आई होऊ शकत नाही . बातमी ऐकून माधू पूर्ण पणे खचून गेला . नीलिमाची अवस्था तर  , बघन्याजोगी नव्हती . ती आतून खूप कोलमडून गेली होती . तिची ती अवस्था पाहून माधवीला खूप वाईट वाटत होत . काय करावं सुचत नव्हतं . तेवढ्यात तिचा हात आपल्या गर्भात वाढणाऱ्या अंकुराकडे गेला . आणि तिच्या डोक्यात ही परिस्तिथी बदलण्याची कल्पना आली . ती तशीच धावत जाऊन आपल्या नवऱ्याकडे गेली . डोक्यात आलेली कल्पना त्याला सांगितली . आणि त्याच्या सहखुशिने एक योग्य निर्णय घेतला . सर्वांच्या सुखी आयुष्यासाठी आनंदासाठी .


दुसऱ्या दिवशी ती माधूला म्हणते   " माधू नीलिमा कुठे ,?


मला तिला आणि तुला एक good news द्यायची आहे"


" Good news कसली "


"नीलिमा आल्यावरच सांगते " तेवढ्यात नीलिमा आली ती जाते आणि नीलिमाला आनंदाने एक मिठी मारते . आणि आनंदाने म्हणते , " अभिनंदन तू आई होणार आहेस "


त्या वाक्याने नीलिमाचे डोळे भरून आले , आणि ती भरलेले डोळे पुसत म्हणते , " का उगाच मजाक घेता ताई माझ्या जखमेवर मीठ चोळताय "


" अग मीठ नाही खरच तू आई होणार आहेस आणि ती नीलिमाचा हात आपल्या पोटावर फिरवत म्हणते हे बघ तुझ बाळ कसा वाटला त्याचा स्पर्श ? आवडला ना . "

"माधू. ,  काय बोलतेस ताई तू मला नाही कळलं काही "


"अरे दादा मी आणि यांनी असा निर्णय घेतला आम्ही आमचं पाहिलं बाळ  हे नीलिमाच्या पदरी दान करायच ठरवलं . मी पुन्हा आई होऊ शकते, पुन्हा चान्स घेऊ शकते .  नीलिमाची ओंजळ रिकामी राहू नये यासाठी मी हा निर्णय घेतला . ही तुमच्यावर मेहरबानी म्हणून नाही तर , ही तुझ्या ओवळणीची परत भेट आहे . त्यामुळे ती तुला स्विकारावीच लागेल.

ही बातमी ऐकून महाधू आणि   नीलिमाचे डोळे भरून येतात . ते हात जोडून त्या दोघांचे आभार मानतात . नीलिमाला तर कळतच नव्हतं आपल्या नंदेचे आभार कसे मानावे .  ती अगदी स्तंब्ध झाली होती .


तेवढ्यात माधवी आणि माधवीचा नवरा एका सुरात" काय मग आवडली ना ओवळणीची परत भेट स्विकारणार ना ?"


आवडली म्हणजे खूप आवडली तुम्ही आता नाही म्हटला तरी आम्ही ती स्विकारणार आहोत . असं म्हणत निलिमा  आपला आनंद व्यक्त करत होती  .  आनंदी निलिमाला बघून  माधवी खूप समाधान मिळते .  त्यांच्या भावा बहिणींच्या नात्यावर नव्याने वेगळाच सांज चढतो .


नात कोणतंही असो समजून घेणं  खूप गरजेचं असतं , नात्यात    वेळोवेळी आधार देण्याची खूप गरज असते  .दुसऱ्याच्या  सुखासाठी काळजाचा तुकडा ही त्याग करण्याची क्षमता असावी लागते . तेव्हा कुठे नातं टिकतं आणि फुलतं  त्यामुळे ,  आयुष्य सार्थकी होतं.



1 comment:

  1. अप्रतिम ..खूप खूप सुंदर लेख लिहिलात भावा बहिण च्या नात्यातील प्रेम व समंजसपणा छान दर्शविला आहे👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...