आयुष्य सरत चाललंय ..
आसवांच्या ढिगाऱ्यात मन लोळत पडलंय ..
आधाराच्या काठी कडे डोळे लावून बसले ..
निवारा शोधतांना मी स्वतःच हरवले ..
रोजचं त्या आभाळाकडे टक लावुन बघते ..
त्याच्या दुनियेत कुठेतरी माझ्यासाठी जागा शोधते ..
प्रवास सुरूच आहे परतीचा ..
देवा तूच सांग रे आता ...
कधी होणार अंत ह्या म्हातारीचा ..
खरचं थकले रे मन , थकले रे शरीर ..
तुझ्याकडे येण्यासाठी झाले मी अधीर ..
तूच दे आता ह्या म्हातारीला आधाराची काठी ..
तूच भर आता हीची आनंदाने ओटी ...
घर भरलेलं असताना नाही खायला रोटी ..
मग काय कामाची ही रक्ताची नाती - गोती ..
इथेच सारेच आहे रे माणसं खोटी..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.