आयुष्यात कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर , तो खूप काळजी पूर्वक घ्यावा ..
आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का ? आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपला वर्तमान काळ किंवा भवितव्य तर धोक्यात येणार नाही ना ..ह्याचा वारंवार विचार करून बघावा.
समाजात घडणाऱ्या विविध घटनांची आपल्या आयुष्याशी सांगड घालून बघावी ..
उदाहरण : आपण एखाद्या मुलावर खूप प्रेम करतो . अगदी एवढं जेवढं आपण आपल्या आई वडिलांवर सुद्धा एक वेळ करत नसू ..त्याच्या सोबत पळून जाऊन लग्न
लग्न करण्याचा सुखी संसाराची स्वप्न बघण्याचा जो आपण निर्णय घेत आहोत किंवा घेणारं आहोत . तो निर्णय तर चुकणार नाही ना ह्याचा शंभर दा विचार करावा . कारण एकदा का निर्णय चुकला की आयुष्य भर पश्चाताप करण्या शिवाय आपल्या हातात काहीचं राहत नाही .
नुकतीच घडलेली घटना श्रद्धा आणि आफताबची आठवून बघावी अशा वेळेस कदाचित आपण योग्य निर्णय घेत ही असू तरीही ती घटना आठवून बघावी एकदा नाही . तर , हजारदा विचार करायला लावणारी घटना आहे ती .
आज एक गोष्ट मनातून सांगावीशी वाटते . जो मुलगा आपल्यावर शंभर टक्के खरं प्रेम करतो ना . तो आपल्याला त्याच्या आयुष्यात सन्मानानेचं घेऊन जातो . मग थोडा वेळ का लागेना ..पळून घेऊन जाणाऱ्या मुलाचं प्रेम खरं असूचं शकत नाही . ते प्रेम नाही तर फक्त एक attraction असू शकतं ..फक्त एक attraction
Anyway ..
मी सोडते तो विषय ..सांगायचा मुद्दा एवढाच आयुष्यातील कोणताही निर्णय माणसाने खूप विचार पूर्वक घ्यावा ...
विचार करून केलेली कुठलीही कृती सहसा चुकत नाही. मग पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.