आयुष्य आहे ..
आयुष्यात पुढे जावं लागतं ..
पुढे जाताना जुनं सारं विसरून जाव लागतं .
आठवणीतले क्षण साठवणीत ठेवावे लागतात.
आयुष्याची एक नवी सुरुवात करावी लागते.
कुणाच्यातरी आठवणीत झुरत बसणं नियतिला आणि ह्या आयुष्याला ही मान्य नसतं . सारं विसरून माझ्या आयुष्याची पाटी कोरीच आहे . असं समजून हसत हसत आयुष्य जगावं लागतं .
तरच आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचं आहे . हे समजत आणि आपण सकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो . आणि आयुष्याचा पुढील टप्पा पार करण्यास सज्ज होतो.
No comments:
Post a Comment
Comments plz.