कधी खणकर , तर कधी शीतल व्हावं लागतं ....
कधी सर्वांच्या मनात घर करून राहावं लागतं ,
तर कधी घर करून राहिलेल्या मनातून उतरावं ही लागतं .....
जसा रस्ता असेल , तस वळावं लागतं ,
खाचं खळगे सगळचं स्वीकारावं लागतं ...
समोरचा आपल्याशी जसा वागतो , तसचं वागावं लागतं ,
तरच जीवनातील खरा आनंद गवसतो .....
कधी प्रामाणिक तर कधी अप्रामाणिक ,
होऊन आयुष्यातील प्रत्येक पात्र हे निभावाव लागतं ...
असं म्हणतात मनुष्य देह हा ,
84 लक्ष योनीतून गेल्यावर लाभला ,
त्या तत्वानुसार निधान 84 वेळेस तरी स्वतःला बदलाव लागतं ...
तरच कुठे जरास सुख मिळत ,
दुःख हे जीवनातील काही अंश का होईना नाहीस होतं ..
दुर्गा मते
©®
Khup Chan vichar mandle aahet👍👍
ReplyDeleteग्रेट.... कस काय सुचत बाई तुला....मूर्ती लहान कीर्ती महान..👍👌✍️🍫🍫🍫🍫🍫🍫😘
ReplyDeleteखूप सुदंर लिखाण👌👌👌
ReplyDelete