मानव जातीचा मुख्य आधार ..
जीवनाचे करी सार ..
अन्न , वस्त्र निवारा मानवाच्या मूलभूत गरजा ..ह्याच्या साथीनेंच मानवाचे जीवन होते सुखकर ...
मी हा लेख माझ्याच अनुभवावरून लिहिते ..आज मार्गशीष महिन्यातील गुरुवार म्हणजे आज माझा उपवास आहे ...सकाळपासून काहीचं खाल्ल नाही ..मागच्या वेळेस तरी खाल्ल होत ...त्यामुळे उपवास वैगरे आहे . असं काही जाणवलं नव्हत ..
पण आज जाणवलं काहीचं खाल्ल नव्हत त्यामुळे , आज चिडचिड होत होती . आणि मेन म्हणजे लिहायला ही काहीचं सुचत नव्हतं . तीन वाजेपासून एक स्टोरी लिहायला घेतली . ती तर अजुनही पूर्ण नाही झाली ..
कारण लक्षच लागत नव्हत ..लिहायला लागले की , सुचलेलं होतं ते ही विसरून जातं होते ...
मग काय मध्येचं एखादी स्टोरी वाचत होते . तिथे लक्ष नाही लागलं तर परत tyipe करत बसत होते . Tyipe करताना तर मला शब्दच सुचत नव्हते ...
खर खास म्हटल तर आज स्टोरी ची सुरुवात आणि शेवट काहीचं मनामध्ये ठरवलेलं नव्हत , आणि आता ही नाही नेमका शेवट काय करावा ...पण सुचेल ह्याची खात्री आहे . कारण स्वंयपाक झाला की मी लगेच जेवणार आहे . आणि अपूर्ण राहिलेली स्टोरी पूर्ण करणार आहे .
हे ही लिहिलं असं वाटलं नव्हत ..पण चहा मुळे शक्य झालं .
व्याकुळलेल्या देहाला माझ्या
चहा ने एनर्जी प्रेझेंट दिली ...
भूक माझी घाबरून पळून गेली ...
चहा नावाची एक गोड मैत्रीण मला मिळाली ...
तिच्यामुळेच तर आज मी एवढं लिहू शकली ...
खूप छान लिहिले आहेस,खरेच चहा हे अमृततुल्य आहे.👌👌👌
ReplyDelete