ती एक गरीब घरची गरीब कारभारी न ...आपली शेती हेच तीच आयुष्य ..गुर - ढोर तिचा जीव की प्राण ..
दहा ते पंधरा शेळी तिच्याकडे आत्ता ही होत्या ...गाय , म्हैस , कुत्रा , घोडा , ससा ह्यासारखे विविध प्राणी तिच्या गोठ्यात आज ही होते .....
ती आज पूर्णपने खचून गेली होती . जिवंत पणीच मरणयातना भोगत होती ....लोकं तिच्यावर मिश्किल पने हसत होते ...तिला विचीत्र विचीत्र टोमणे मारत हिणवत होते .. तिचा जीव खूप कंटाळला होता ..ह्या सगळ्या विक्षप्त प्रकरणाने ..ती अगदी उध्वस्त झाली होती ...
का ती एवढी उधस्त्व झाली होती . हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला सांगते तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं कारण ही सांगते ....
मगाशीच सांगितले मी जनावरे तिचे जीव की प्राण .
ती तिच्या सर्वच जनावरांवर खूप प्रेम करायची .
..आपल्या मुलाबाळां प्रमाणे त्याचे लाड करायची .
ती शेतात दिवस भर एकटीच असायची . तिचा कारभारी तिच्या भरोष्यावर सर्व कारभार सोडून आपली इतर कामे पार पाडायचा . दोघांचा संसार एकमेकांच्या आधारावर चांगलाच फुलाला होता .....
तिची सगळ्यात आवडती शेळी वसू .. तिला आज पिल्ल होणार होती . तिचे दिवस भरले होते ..ती आज खूप खुश होती कारण आज तिच्या परिवारात नवीन पाहुणा येणार असतो . आला ही तो पाहुणा सर्वांना हवा हवासा वाटणारा ...आज वसू ला दोन पिल्ले झाले ..
एक पाठ आणि एक बोकड ...
पण वसू मात्र अचानक हे जग सोडून गेली . प्रसूती नंतर जनावरांच जो जार बाहेर पडायला हवा . तो किती तरी वेळ पडला चं नाही . आणि जेव्हा पडला तेव्हा कोणाचेही लक्ष नव्हतं . तो तिचा जार तिने खाल्ला आणि ती मृत पावली ...
ती मृत पावली ह्या गोष्टीचं सुनंदा ताईंना खूप वाईट वाटलं. पण जो जन्माला आला त्याला मरण कधी चुकले नाही ..अस म्हणत त्यांनी तिचे अंत्य संस्कार चांगल्या पद्धतीने पार पाडले ...
तिला ज्या ठिकाणी खड्डा करून पुरले त्या ठिकाणी गुल मोहऱ्याचं झाडं लावलं . ते झाड आता खूप मोठं आहे . आणि त्या झाडाच्या प्रत्येक हालचालीत वसू ची आठवण दडलेली आहे ...तीची शेवटची आठवण ह्या उद्देशानेच ते झाड लावले होते .
वसू गेल्यानंतर काहीचं दिवसात तिची लेक म्हणजेच ती पाठ पण मेली राहील फक्त ते बोकडूच ..सुनंदा ताईने त्या बोकड्या वर खूप प्रेम केलं . आईची पूर्ण माया त्या बोकडू ला दिली . ते बोकडू ही अगदी धश्ट पुष्ट झालं ..
धश्ट पुष्ट तर झालच पण खूप विक्षिप्त ही झालं .
एवढं मारायचं कोणालाही बाई असो वा पुरुष अंगावर धावून यायचं ...एक दिवस असच सुनंदा ताई त्याला खावू घालत होत्या ...त्याला खावू घालत असताना त्या इतर छोट्या छोट्या पिल्लांना पण खावू घालायच्या .
त्या पिल्लाक डे गेल्या की हा बोकडू त्याच्याकडे राक्षसी वृत्तीने बघायच्या ... त्यांना जावून बराच वेळ झाला होता.
ह्याची भूक खूप वाढली होती . ह्याला आता भूक सहन चं होतं नव्हती . तेवढ्यात सुनंदा ताई नेहमी प्रमाणे त्याच्यासमोर खाद्य ठेवण्यासाठी गेल्या तर , त्या राक्षसाने आपल्या टोकदार शिं गाणे ताईच्या हृदयावर खूप खोलवर घाव घातले . ताई शेवटी रक्त बंभाळ होवून खाली कोसळल्या आणि तडफडू लागल्या ....
मदतीची याचना करू लागल्या ...
लोकं जेव्हा मदत करण्यासाठी धावून आले , तेव्हा सगळीकडे सुनंदा ताई वर बोकडू ने बलात्कार केला ही अफवा गावभर पसरली होती . आणि आजही तिचं अफवा त्यांना जिवंत पणीच मरणयातना देत होती ...
अप्रतीम लेखनशैली...👏👏👏👌👍💐🍫
ReplyDelete👌👌👌👌👌वेगळी कथा
ReplyDelete